रविवारी कसारा ट्रेनमध्ये भेटला एक अवलीया. पायात एक तुटकी पण दोऱ्याने शिवून जोडलेली ती ब्लू व्हाईट स्लीपर जी आजकाल दिसतही नाही ती घातली होती त्याने. तीही नावापुरतीच. जमीन आणि पायातले अंतर जेमतेम चार मिलीमिटरचे ठेवेल एवढी घासलेली. शरीरयष्टी बऱ्यापैकी जाडीजुडी म्हणावी अशी. हाफ शर्ट आणि पॅंट घातलेली होती आणि दुसऱ्याच्या हातातला पेपर डोकावून वाचत होता म्हणजे किमान हायस्कुलपर्यंत शाळा शिकलेला असावा. वय पन्नाशीच्या आसपास असावे. गळ्यावर, उघड्या छातीवर फाटलेली त्वचा, हातावरही नायटासदृश विकारांच्या खुणा असा काहीसा अवतार होता त्याचा.
मी आजपर्यंत धम्मक पिवळे दात असलेली माणसेही पाहिली आहेत, पण याचे दात अक्षरश: काळेकभिन्न होते. त्यांची ठेवणसुद्धा वाडग्याच्या कडेला फुटक्या वेगवेगळ्या आकाराच्या फरश्या कंपाउंड म्हणून वाकड्या तिकड्या रोवून ठेवाव्यात तशीच होती. मात्र तरीही तो ओंगळवाणा नव्हता. कपडे मळके नव्हते.
खिडकीच्या शेजारी माझ्या समोरच बसला होता तो. कुणीही विचारले नसूनही आजूबाजूच्यांना ट्रेन कधी सुटेल आणि कधी कुठे पोचेल हे अविरत बडबड करून सांगत होता. माझा मित्र एक पाण्याची बाटली घेऊन आला. आम्ही त्यातून घोट घोटभर पाणी प्यालो. तेवढ्यात डब्यात पाणी बॉटल विकणारा आला. त्याने त्याचेकडून एक बाटली घेतली आणि म्हणाला ही मला अशीच दे. विक्रेता म्हणाला अशीच म्हणजे? तो म्हणाला म्हणजे मी पैसे नाही देणार. विक्रेता म्हणाला असे कसे? तो म्हणाला अरे माझे आशीर्वाद लाभतील तुला, धंद्याची भरभराट होईल. विकणारा म्हणे फुकट दिल्याने धंद्याची भरभराट कशी होईल? तेवढ्यात विक्रेत्याचा दुसरा जोडीदार लांबून ओरडला, अरे त्याचेकडून घे ती बाटली आधी. उगीच टाईमपास नको. मग त्याने ती बाटली परत केली. त्यानंतर डब्यात वडापाववाला येवो की भेळवाला, त्याने प्रत्येकाकडे त्याची वस्तू फुकटात मागीतली पण कुणीही दिली नाही. परत एक पाण्याच्या बाटलीवाला आला याने परत त्याचेकडेही बाटली मागीतली. त्याने दिली आणि वीस रुपये मागीतले. हा म्हणाला फुकट दे. बाटलीविक्याने त्याचे हातातून बाटली परत हिसकून घेतली. अशा प्रकारे प्रत्येक विक्रेत्याकडून नकार घेऊनही त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे, दु:खाचे अथवा क्रोधाचे इवलेसेही एक्स्प्रेशन उमटले नाही. तो भिकारी नव्हता पण मी तर कित्येक भिकाऱ्यांन्नाही भीक न दिल्यावर केविलवाणा चेहरा केलेले अथवा अगदी शिवी दिलेले पाहिले आहे. पण याचे रसायन काही वेगळेच होते. मग त्याने माझ्याकडे पाणी मागीतले मी त्याला माझी बाटली दिली. त्याने बाटलीला तोंड लावूनच पाणी पिले. त्याच्या काळ्या दातांचे दर्शन घेतल्यावर मी त्याने उष्टी केलेली बाटली परत घेणे शक्यच नव्हते. मी त्याला म्हंटले की ती बाटली तुम्हालाच राहू द्या.
त्याचेकडे एक भरलेली बाजाराची पिशवी होती. ती त्याने आम्ही समोरासमोर बसलेले असल्याने आमच्या दोघांच्याही पायाच्या मध्ये ठेवली होती. मग त्याने त्या पिशवीत हात घालून एका प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेली दुसरी एक पिशवी काढली आणि तिच्यातून थोडी तंबाखू हातावर घेतली आणि मला चुना मागीतला. मी म्हणालो मी तंबाखू खात नाही. मग त्याने बसल्या जागेवरूनच इकडे तिकडे वळून ज्या कुणाचे त्याचेकडे लक्ष जाइल अशा प्रत्येकाकडे चुना मागितला. पण त्याला कुणीच चुना दिला नाही. मग तो उठला आणि त्याच्या जागेवर पिशवी ठेऊन दुसरीकडे चुना आणायला गेला. एकाच मिनिटात हातात चुन्याची डबी घेऊन तो परत आला. मी म्हणालो अहो कुणाची डबी आणलीत? त्याला चुना काढून परत करा की ? तो म्हणाला नाही नाही त्याने ती मलाच देऊन टाकली आहे.
मग त्याने तंबाखूचा तोबरा भरला. आमच्या शेजारी एक ट्रेकर्स ग्रुप बसला होता ती पोरे याचे चाळे पाहून त्याचेवर जोक्स मारून हसत होती. पण त्याला त्याने काडीचाही फरक पडत नव्हता. त्याची अविरत बडबड चालूच होती. या पोरांनी काहीतरी खाऊ खायला काढला. याने त्यांना खाताना पाहीले. आणि म्हणाला खा खा तुम्ही बिनधास्त खा. त्याला ते काय खाताहेत ते खायचे असावे पण जसे विक्रेत्यांकडे तो सरळ सरळ वस्तू मागत होता तसे त्याने या पोरांकडे सरळ नाही मागीतले. पण त्या पोरांनी त्याचेकडे लक्षही दिले नाही उलट त्याचेवर काहीतरी कमेंट मारून त्यांनी एकमेकांच्या टाळ्या घेतल्या.
मी मित्राला म्हणालो की मला वाटते हे एक परफेक्ट स्टोरी मटेरीयल आहे आपण याची थोडी अजून माहिती काढू. मी मग त्याला विचारले की तुमचे गाव कोणते? त्याने आसनगावजवळचे कोणतेसे गाव सांगितले. तो आसनगावला उतरून तिथून एसटी किंवा जीप अथवा रिक्षा पकडून गावी जाणार होता. (याने ट्रेनचे तिकीट काढले असेल का? असा विचार माझ्या मनात आला. आणि ट्रेनमध्ये एकवेळ तो सुटेल पण एसटीवाले त्याला विनातिकीट प्रवास करू देतील?) मी म्हणालो इकडे कशाला आला होतात तुम्ही? तो म्हणाला बाजार करायला, ही काय बाजाराची पिशवी.! मी त्याला विचारले इथे बाजारात तुम्हाला पैसे न देता लोक वस्तू देतात? तो म्हणाला हो तर. म्हणजे वस्तूंच्या दुकानावाले वस्तू देत नाहीत पण भाजीवाले देतात थोडी थोडी भाजी. ही काय मी सगळी पिशवी भरून घेतली आहे. आणि एवढेच नाही तर हे बघा एका दुकानदाराने तर मला चिकनसुद्धा दिले आहे असे म्हणून त्याने त्याच्या पिशवीतली एक दीडेकशे ग्राम चिकन असलेली काळी पिशवी काढून दाखविली. मी या माणसाच्या या अंगभूत गुणाने अचंबित झालो होतो. मला तर माझी स्वत:ची दुसऱ्याला दिलेली एखादी वस्तू त्याला मी परत मागितल्याने वाईट तर वाटणार नाही ना अशा विचाराने परत मागण्याची लवकर हिम्मत होत नाही, आणि हा मनुष्य या क्रूर व्यावहारिक जगात सहजपणे कुणाकडेही त्याला हव्या त्या वस्तू खुशाल आणि फुकट मागत होता. आणि त्यात आजतागायत यशस्वी देखील झालेला होता.
मला एकंदर त्याच्या जीवनशैलीबद्दल अंदाज आला होता. मग मी त्याला थोडे वेगळे प्रश्न विचारायचे ठरविले. मी विचारले तुम्हाला मोदी कोण आहेत हे माहित आहे का? तो म्हणाला हो माहित आहेत. मी म्हणालो कोण आहेत मोदी? तो म्हणाला "सरकार". त्याच्या या उत्तरावर ट्रेकर्स ग्रुप मधून हशा उसळला. त्या हसण्याने मात्र त्याला वाईट वाटले असावे. मी त्याच्याकडे पाहिले. त्याने एका विचित्र नजरेने माझ्याकडे पाहून तू मुद्दाम माझे हसे करण्यासाठीच तर हा प्रश्न विचारला नाहीस ना असे नजरेनेच मला विचारल्यासारखे वाटले. त्याचा चेहरा काहीसा उतरला असावा असे मला जाणवले. मला त्याचे फार वाईट वाटले. मी मग त्याला प्रश्न विचारणे बंद केले. मित्र म्हणाला अजून माहिती काढ ना त्याची. मी म्हणालो नको रे बाबा, काय घ्यावे पुन्हा लोक त्याला हसले तर तो माझ्या कानाखाली देखील खेचायचा. पण मित्र म्हणाला असे काही होणार नाही थांब मीच विचारतो तू नुसते ऐक. पण कथा भन्नाट झाली पाहीजे. मी म्हणालो अरे एवढे पुरेसे आहे यात मी माझ्या मनाने त्याच्या कॅरेक्टरला अजून कंगोरे जोडून लिहील रे. पण मित्र म्हणाला नाही आपण त्याला अजून विचारुच. मग आम्ही दोघांनीही परत त्याला थोडे प्रश्न विचारले. त्यातून त्याचेबद्दल मिळालेली माहिती अशी. तो कुठलेही काम, धंदा, नोकरी करत नाही. तो फक्त आठवड्यातून तीन वेगवेगळ्या गावच्या बाजारांत जातो. आणि तिथून असाच फुकट मागून बाजार करतो. त्याला घरचे कोणी नाही. लग्न झाले नाही. तो बहिणीकडे राहतो. पण फुकट कसे रहावे म्हणून असा बाजार करून आणतो. कधी कधी विनातिकीट प्रवास करता येत नाही, रिक्षा अथवा जीपवाले लोक मारायला धावतात मग अशावेळी त्यांना द्यायला पैसे असावेत म्हणून तो दर शनिवारी मारुतीच्या मंदिरात रुईच्या पानाच्या माळा बनवून विकतो. त्याने खिशातून एक डायरी काढून त्यात ठेवलेल्या दहा दहाच्या दोन नोटादेखील मला दाखविल्या. खरेतर देवापुढे अशा वस्तू विकून धंदा करण्याच्या प्रथांचा मला अत्यंत तिटकारा आहे. असा कसा देव जो भक्तांना लुबाडायला इतर भामट्यांना मदत करतो असे मला वाटते. पण तो मारुतीच्या माळा विकतो हे ऐकल्यावर मी लौकिकार्थाने नास्तिक असलो तरीही माझी देवाप्रतीची ही तक्रार निदान आतापुरती तरी दूर झाली आहे. भलेही भक्तांना लुबाडणारे लाखो लोक असा धंदा करत असोत पण देव ते सगळे खपवून घेतो कारण देवाला अशा एखाद्या भणंग वेड्याला तिकिटाचे पैसे देत नाही म्हणून मार खाण्यापासून वाचवायचे असते. या अशा एकाला वाचविण्यासाठी देव इतर हजार लुबाडणारांनाही सहन करतो.
मी त्याला म्हणालो तुम्ही मुंबईला का जात नाही मग? तिथे काही काम मिळेल. कधी गेला आहात का मुंबईला? तो म्हणाला, नाही गेलो कधीच. आयुष्यभर कसारा-आसनगाव ट्रेन प्रवास करणारा माणूस कधीच मुंबईला गेला नाही हे एक आश्चर्यच नव्हे काय? मग तो म्हणाला एकदा गेलो होतो पण मुंबईला नव्हे तर ठाण्याला. मी म्हणालो कशाला? तर म्हणाला ते xy जातीचे अधिवेशन होते ना तेव्हा खूप गाड्या पाठविण्यात आल्या होत्या, त्यात बसवून मला घेऊन गेले होते अधिवेशनाला. खूप छान होते अधिवेशन कारण आम्हाला पैकेटमध्ये भरून जेवण देखील तिथे फुकट दिले आणि मग परत गावीही गाडीतच बसवून आणून सोडले. मी मनातच म्हणालो वाह रे जात.!! अधिवेशनासाठी उपस्थितांची संख्या एकाने वाढविणारा एवढीच जातीला त्याची किंमत. बाकी आयुष्याला जात नुसतीच बिनकामाची फरफटविलेल्या गोंदणासारखी कायमची माखलेली.
मी मित्राला म्हणालो की मला वाटते हे एक परफेक्ट स्टोरी मटेरीयल आहे आपण याची थोडी अजून माहिती काढू. मी मग त्याला विचारले की तुमचे गाव कोणते? त्याने आसनगावजवळचे कोणतेसे गाव सांगितले. तो आसनगावला उतरून तिथून एसटी किंवा जीप अथवा रिक्षा पकडून गावी जाणार होता. (याने ट्रेनचे तिकीट काढले असेल का? असा विचार माझ्या मनात आला. आणि ट्रेनमध्ये एकवेळ तो सुटेल पण एसटीवाले त्याला विनातिकीट प्रवास करू देतील?) मी म्हणालो इकडे कशाला आला होतात तुम्ही? तो म्हणाला बाजार करायला, ही काय बाजाराची पिशवी.! मी त्याला विचारले इथे बाजारात तुम्हाला पैसे न देता लोक वस्तू देतात? तो म्हणाला हो तर. म्हणजे वस्तूंच्या दुकानावाले वस्तू देत नाहीत पण भाजीवाले देतात थोडी थोडी भाजी. ही काय मी सगळी पिशवी भरून घेतली आहे. आणि एवढेच नाही तर हे बघा एका दुकानदाराने तर मला चिकनसुद्धा दिले आहे असे म्हणून त्याने त्याच्या पिशवीतली एक दीडेकशे ग्राम चिकन असलेली काळी पिशवी काढून दाखविली. मी या माणसाच्या या अंगभूत गुणाने अचंबित झालो होतो. मला तर माझी स्वत:ची दुसऱ्याला दिलेली एखादी वस्तू त्याला मी परत मागितल्याने वाईट तर वाटणार नाही ना अशा विचाराने परत मागण्याची लवकर हिम्मत होत नाही, आणि हा मनुष्य या क्रूर व्यावहारिक जगात सहजपणे कुणाकडेही त्याला हव्या त्या वस्तू खुशाल आणि फुकट मागत होता. आणि त्यात आजतागायत यशस्वी देखील झालेला होता.
मला एकंदर त्याच्या जीवनशैलीबद्दल अंदाज आला होता. मग मी त्याला थोडे वेगळे प्रश्न विचारायचे ठरविले. मी विचारले तुम्हाला मोदी कोण आहेत हे माहित आहे का? तो म्हणाला हो माहित आहेत. मी म्हणालो कोण आहेत मोदी? तो म्हणाला "सरकार". त्याच्या या उत्तरावर ट्रेकर्स ग्रुप मधून हशा उसळला. त्या हसण्याने मात्र त्याला वाईट वाटले असावे. मी त्याच्याकडे पाहिले. त्याने एका विचित्र नजरेने माझ्याकडे पाहून तू मुद्दाम माझे हसे करण्यासाठीच तर हा प्रश्न विचारला नाहीस ना असे नजरेनेच मला विचारल्यासारखे वाटले. त्याचा चेहरा काहीसा उतरला असावा असे मला जाणवले. मला त्याचे फार वाईट वाटले. मी मग त्याला प्रश्न विचारणे बंद केले. मित्र म्हणाला अजून माहिती काढ ना त्याची. मी म्हणालो नको रे बाबा, काय घ्यावे पुन्हा लोक त्याला हसले तर तो माझ्या कानाखाली देखील खेचायचा. पण मित्र म्हणाला असे काही होणार नाही थांब मीच विचारतो तू नुसते ऐक. पण कथा भन्नाट झाली पाहीजे. मी म्हणालो अरे एवढे पुरेसे आहे यात मी माझ्या मनाने त्याच्या कॅरेक्टरला अजून कंगोरे जोडून लिहील रे. पण मित्र म्हणाला नाही आपण त्याला अजून विचारुच. मग आम्ही दोघांनीही परत त्याला थोडे प्रश्न विचारले. त्यातून त्याचेबद्दल मिळालेली माहिती अशी. तो कुठलेही काम, धंदा, नोकरी करत नाही. तो फक्त आठवड्यातून तीन वेगवेगळ्या गावच्या बाजारांत जातो. आणि तिथून असाच फुकट मागून बाजार करतो. त्याला घरचे कोणी नाही. लग्न झाले नाही. तो बहिणीकडे राहतो. पण फुकट कसे रहावे म्हणून असा बाजार करून आणतो. कधी कधी विनातिकीट प्रवास करता येत नाही, रिक्षा अथवा जीपवाले लोक मारायला धावतात मग अशावेळी त्यांना द्यायला पैसे असावेत म्हणून तो दर शनिवारी मारुतीच्या मंदिरात रुईच्या पानाच्या माळा बनवून विकतो. त्याने खिशातून एक डायरी काढून त्यात ठेवलेल्या दहा दहाच्या दोन नोटादेखील मला दाखविल्या. खरेतर देवापुढे अशा वस्तू विकून धंदा करण्याच्या प्रथांचा मला अत्यंत तिटकारा आहे. असा कसा देव जो भक्तांना लुबाडायला इतर भामट्यांना मदत करतो असे मला वाटते. पण तो मारुतीच्या माळा विकतो हे ऐकल्यावर मी लौकिकार्थाने नास्तिक असलो तरीही माझी देवाप्रतीची ही तक्रार निदान आतापुरती तरी दूर झाली आहे. भलेही भक्तांना लुबाडणारे लाखो लोक असा धंदा करत असोत पण देव ते सगळे खपवून घेतो कारण देवाला अशा एखाद्या भणंग वेड्याला तिकिटाचे पैसे देत नाही म्हणून मार खाण्यापासून वाचवायचे असते. या अशा एकाला वाचविण्यासाठी देव इतर हजार लुबाडणारांनाही सहन करतो.
मी त्याला म्हणालो तुम्ही मुंबईला का जात नाही मग? तिथे काही काम मिळेल. कधी गेला आहात का मुंबईला? तो म्हणाला, नाही गेलो कधीच. आयुष्यभर कसारा-आसनगाव ट्रेन प्रवास करणारा माणूस कधीच मुंबईला गेला नाही हे एक आश्चर्यच नव्हे काय? मग तो म्हणाला एकदा गेलो होतो पण मुंबईला नव्हे तर ठाण्याला. मी म्हणालो कशाला? तर म्हणाला ते xy जातीचे अधिवेशन होते ना तेव्हा खूप गाड्या पाठविण्यात आल्या होत्या, त्यात बसवून मला घेऊन गेले होते अधिवेशनाला. खूप छान होते अधिवेशन कारण आम्हाला पैकेटमध्ये भरून जेवण देखील तिथे फुकट दिले आणि मग परत गावीही गाडीतच बसवून आणून सोडले. मी मनातच म्हणालो वाह रे जात.!! अधिवेशनासाठी उपस्थितांची संख्या एकाने वाढविणारा एवढीच जातीला त्याची किंमत. बाकी आयुष्याला जात नुसतीच बिनकामाची फरफटविलेल्या गोंदणासारखी कायमची माखलेली.
ते काही असो त्याच्या आयुष्यात प्रचंड वेदना होती पण चेहऱ्यावर निरंकार भाव होते. ही निर्विकारता त्यास बिकट परिस्थितीतून साकारली होती की अपघाताने साधली होती हे माहित नाही, पण याच निरपेक्ष निरंकार स्थितीला पोचण्यासाठी ज्ञानी लोक आपली अवघी आयुष्ये तपश्चर्येत घालवितात हे मला माहित आहे.
जीवन म्हणजे तरी काय असते? किती माणसे खऱ्या अर्थाने आयुष्य जगतात? आणि किती नुसतीच जिवंत असतात? नुसते बक्कळ पैसा कमाविणे, शरीरास भोग देणे आणि ऐषोरामात लोळणे म्हणजे जगणे काय?
'द कृड्स' या चित्रपटात एक वाक्य आहे. अश्मयुगातील आपल्या कुटुंबाला अनेको हिंस्त्र पशुंपासून वाचविण्यासाठी नेहमी एका गुहेतच बंद करून ठेवणाऱ्या बापाला त्याची नुकतीच वयात आलेली मुलगी म्हणते, "धिस इज नॉट लिविंग, धिस इज जस्ट नॉट डायींग." मी अजूनही हे ठरवू शकलो नाहीये की हा माणूस नुसताच जिवंत आहे की थोर आणि अत्यंत कठोर तपश्चर्येपश्चात प्राप्त होणाऱ्या स्थितीस सहजपणे पोचून खऱ्या अर्थाने आयुष्य जगतो आहे?