१ मार्च २००३. तब्बल तीन वर्षांनंतर आलेला योग. विश्वचषक नाही मिळाला तर चालेल पण ही लढत जिंकायची होती. वर्षानुवर्षांचे पारंपारिक वैर आणि युद्धापेक्षाही निकराने लढली जाणारी क्रिकेटची ही लढत.
स्थळ - सेंच्युरीयन. (आणि सबंध भारत वर्षातले प्रत्येक घर)
नेहमीच भारताविरुद्ध त्वेषाने खेळणारा.. आणि निवृत्तीचा उंबरठा ओलांडून, संन्यस्त होऊन दाढी वाढविलेला पण विश्वचषकासाठी परत माघारी आलेला सैद अन्वर पुन्हा एकदा नडला आणि त्याच्या शतकाच्या जोरावर पाक ने २७३ धावांचे लक्ष ठेवले.
२५० च्या वरचे टारगेट म्हणजे हमखास विजय असे त्यावेळचे सूत्र. पाकिस्तानची वसीम, वकार व शोएब आदींनी भरलेली जगातली सर्वोत्तम गोलंदाजी आणि जगातली सर्वाधिक बेभरवशाची भारतीय फलंदाजी.
नेमकी इथे लाईट गेली आणि राजुरातल्या एकमेव जनरेटर असलेल्या दुकानासमोर सगळे राजूर जमा झाले. १६व्या षटकात टीमचे १४४ रन पूर्ण करून वैयक्तिक १२००० धावांचा पल्ला ओलांडला आणि सचिन लंगडू लागला. २८विसाव्या षटकात वैयक्तिक धावसंख्या ९८ व भारतीय धावसंख्या १७७ असताना सचिनसाठी रनर मैदानात आला. त्या दिवसापर्यंतच काय पण आजपावेतो सचिनने एकही धाव रनर घेऊन काढलेली नाही. (आज त्याचे ३२७१० आंतरराष्ट्रीय रन्स आहेत) म्हणून छातीत धस्स झाले. आणि शोएबने डाव साधला. सचिन ९८ वर बाद... पण जखमी वाघाची शिकार करून आनंद साजरा करण्याच्या स्थितीत सचिनने पाकिस्तान्यांना सोडलेच नव्हते. सचिनच्या कामगिरीवर कळस चढवीत युवराजने अर्धशतक मारून विजयश्री खेचून आणली.. आणि एकच जल्लोष झाला..!! प्रत्येक रनाबरोबर थिरकणारे आणि प्रत्येक चौकार षटकारा नंतर उधाणणारे राजूर संपूर्ण जल्लोषात बुडून गेले. आत्मप्रेरणेने कुठलेसे एक ढोल-पथक आले आणि सुरु झाला राजूर बाजारपेठेत प्रचंड उल्हासात एक सामुहिक विजयी नृत्याचा उन्माद..!! वाजविणारे ही बेभान आणि नाचणारे तर त्याहून बेभान. फटाक्यांच्या माळा फुटत होत्या, आरोळ्या आणि घोषणा आसमंत दणाणून सोडीत होत्या व सबंध भारत देशाबरोबर राजूर अपूर्व विजयोन्मादी तालांवर थिरकत होते..!! रात्री किती वाजेपर्यंत धिंगाणा चालला आठवत नाही.. पण उद्याच्या लढती आधी पुन्हा एकदा त्या आठवणींनी उर भरून आलाय हे मात्र नक्की..!!
स्थळ - सेंच्युरीयन. (आणि सबंध भारत वर्षातले प्रत्येक घर)
नेहमीच भारताविरुद्ध त्वेषाने खेळणारा.. आणि निवृत्तीचा उंबरठा ओलांडून, संन्यस्त होऊन दाढी वाढविलेला पण विश्वचषकासाठी परत माघारी आलेला सैद अन्वर पुन्हा एकदा नडला आणि त्याच्या शतकाच्या जोरावर पाक ने २७३ धावांचे लक्ष ठेवले.
२५० च्या वरचे टारगेट म्हणजे हमखास विजय असे त्यावेळचे सूत्र. पाकिस्तानची वसीम, वकार व शोएब आदींनी भरलेली जगातली सर्वोत्तम गोलंदाजी आणि जगातली सर्वाधिक बेभरवशाची भारतीय फलंदाजी.
पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर सचिनने वसीम अक्रम ला कवर्समधून सीमेवर टोलावला आणि ठिणगी पडली!! वेगाच्या खुमखुमीत असणाऱ्या शोएबला डावाच्या पुढच्या षटकातील चौथ्या चेंडूवर point च्या डोक्यावरून सचिनने आसमान दाखविले आणि अंगांगात थरार पेटून उठला! (या षटकारास त्या विश्वचषकातील सर्वोत्तम क्षण म्हणून नंतर ICC ने जाहीर केले) पुढच्याच षटकात सेहवागने वकारला तिथेच आणि तसाच भिरकावला व भक्कम पाकिस्तानी गोलंदाजीच्या चिंधड्या उडविल्याची नांदी दिली.
पुढे वकार ने सेहवागला बाद करून, पुढच्याच चेंडूवर लटपटत्या गांगुलीस देखील माघारी धाडला आणि उत्कंठेने व भीतीने शंभर कोट हृदये धडधडू लागली. पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी.!! आमचा देव अजून मैदानात होता.. आणि हा देव ज्याला मारी त्याला कोण तारणार? पाकिस्तान्यांची यथेच्छ धुलाई त्याने चालूच ठेवली. सचिनने आपली ६० वी फिफ्टी साजरी केली तेव्हा भारताचा स्कोअर होता ८१.
पुढे वकार ने सेहवागला बाद करून, पुढच्याच चेंडूवर लटपटत्या गांगुलीस देखील माघारी धाडला आणि उत्कंठेने व भीतीने शंभर कोट हृदये धडधडू लागली. पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी.!! आमचा देव अजून मैदानात होता.. आणि हा देव ज्याला मारी त्याला कोण तारणार? पाकिस्तान्यांची यथेच्छ धुलाई त्याने चालूच ठेवली. सचिनने आपली ६० वी फिफ्टी साजरी केली तेव्हा भारताचा स्कोअर होता ८१.
नेमकी इथे लाईट गेली आणि राजुरातल्या एकमेव जनरेटर असलेल्या दुकानासमोर सगळे राजूर जमा झाले. १६व्या षटकात टीमचे १४४ रन पूर्ण करून वैयक्तिक १२००० धावांचा पल्ला ओलांडला आणि सचिन लंगडू लागला. २८विसाव्या षटकात वैयक्तिक धावसंख्या ९८ व भारतीय धावसंख्या १७७ असताना सचिनसाठी रनर मैदानात आला. त्या दिवसापर्यंतच काय पण आजपावेतो सचिनने एकही धाव रनर घेऊन काढलेली नाही. (आज त्याचे ३२७१० आंतरराष्ट्रीय रन्स आहेत) म्हणून छातीत धस्स झाले. आणि शोएबने डाव साधला. सचिन ९८ वर बाद... पण जखमी वाघाची शिकार करून आनंद साजरा करण्याच्या स्थितीत सचिनने पाकिस्तान्यांना सोडलेच नव्हते. सचिनच्या कामगिरीवर कळस चढवीत युवराजने अर्धशतक मारून विजयश्री खेचून आणली.. आणि एकच जल्लोष झाला..!! प्रत्येक रनाबरोबर थिरकणारे आणि प्रत्येक चौकार षटकारा नंतर उधाणणारे राजूर संपूर्ण जल्लोषात बुडून गेले. आत्मप्रेरणेने कुठलेसे एक ढोल-पथक आले आणि सुरु झाला राजूर बाजारपेठेत प्रचंड उल्हासात एक सामुहिक विजयी नृत्याचा उन्माद..!! वाजविणारे ही बेभान आणि नाचणारे तर त्याहून बेभान. फटाक्यांच्या माळा फुटत होत्या, आरोळ्या आणि घोषणा आसमंत दणाणून सोडीत होत्या व सबंध भारत देशाबरोबर राजूर अपूर्व विजयोन्मादी तालांवर थिरकत होते..!! रात्री किती वाजेपर्यंत धिंगाणा चालला आठवत नाही.. पण उद्याच्या लढती आधी पुन्हा एकदा त्या आठवणींनी उर भरून आलाय हे मात्र नक्की..!!