हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २८ जून, २०१३

उत्तराखंड

"पोरा चार दिस झाले आपण काही खाल्ले नाही. म्या तर काय म्हातारीच हाय पण तू बी चालून चालून दमला असशील ना? जरा वाइच कुठं काय खायला मिळतंय का बघ."
"आता इथं माह्या बानं काय हॉटेल काढून ठिवलय का म्हातारे, गप गुमान चालत रहा. हि इथली लोकं रांडेचे चार भाकरी, भाजी अन एक बाटली पाण्याचं हजार दीड हजार रुपडं मागत्यात. मले घरी जायचंय जे काय ५-६ हजार रुपडे उरलेत त्ये तिकिटासाठी हायेत."
"मले म्हातारीले आता चालवत न्हाई रं बाबा...!! पायजे तर ह्ये माहे कांगनं घ्ये, विक अन कुणीतरी बघ… झोळी करून मले न्यायला.."
"आये तू बी ना.!! तरी तुला आधीच म्हणत होतो कशाला पायजे ती चार धामं? पण ऐकशील तर ना. चल दे इकडं ते कांगनं म्या बघतो कोणी मिळतंय का. तू बस इथं दगडावर कुठं जाऊ नगस. म्या आलोच."
........
"सर अभी अभी खबर आई है, की सेक्टर ४२ के रेस्क्यू ऑपरेशन में व्यस्त एक हेलीकॉप्टर गिर गया है, मेरा 'आयएएफ'वाला भाई भी था उसी टीम में.!! मेरे ख़याल से मुझे वहाँ जाना चाहिए.!!"
"अरे देशमुख ये एक अफवाह भी हो सकती है, आगे हमारे रेस्क्यू कॅम्पमें पहुँचनेपर ही पक्की खबर मिलेगी. चाहो तो तुम अभी वहां जाकर तसल्ली कर सकते हो."
...
"साबजी जय हिंद.!!" "अभी अभी वायरलेस पर मेसेज आया है कि एक रेस्क्यू हेलीकॉप्टर गिर गया है, करीब बीस लोग मरने की आशंका है, शायद हमारे देशमुख का भाई भी था उनमे.. मगर अभीतक किसी नाम की पुष्टी नही हुई है.!!"
"कहां पर हुआ ये हादसा?"
"सर यहां से १२० किमी दूर की पहाडीयोंमे.. अगर देशमुख पीछे की तरफ जाये तो वहां पे जो हायवे है वहांसे उसे कोई गाडी मिलेगी उधर जानेवाली."
"हां शफीक मुझे लागता है कि हमें देशमुख को पीछे भेज देना चाहिये."
..
"साबजी यहां एक बुढी औरत बेहोश पडी है, जल्दी आईये मुझे लगता है इसे जल्द से जल्द कैंप के अस्पताल में पहुंचाना चाहिए"
"अरे इन्हे पहुँचायेंगे कैसे? इनकी हालत देखते हुए इनका चलना मुश्किल ही लगता है, इन्हें तो उठाकर ले जाना होगा"
"मगर हम तो ४ ही लोग है, एक वायरलेस वाला, एक मै, एक आप और एक देशमुख.!! हमें आगे जो पूल टुटा है वहांपर किसी भी हालत में पहुंचना पडेगा.. वहा सैन्कडो लोग फसे हैं.. हममें से कम से कम तीन का वहां जाना जरुरी है, ताकि छोटा टेम्पररी पुल बनवा कर रस्सियोंके सहारे लोगोंको पार निकाल सकें..!! देशमुख को भी अपने भाई के पास जाना होगा.!! और वैसे भी पच्चिस किमी तक किसी को इन्हे अकेले ले जाना मुश्किल है.. अब क्या करे?"
"साबजी मांजी को मै लेकर जाउंगा..!!"
"क्या देशमुख तुम जाओगे? मगर अकेले आदमी को पच्चीस किमी तक किसी को उठाकर ले जाना वो भी ऐसे मौसम में तो नामुमकिन है!! और तुम्हे अपने भाई की खबर लेने भी तो जाना होगा."
"सर मैं नही जानता की मेरा भाई जिंदा है या नही, और यदि वो मर चुका है तो मैं वहां जाने के बजाय यहां एक जिंदगी को बचाना ज्यादा उचित समझता हूँ..!! रही बात मुश्किल की, तो मै आपको भरोसा दिलाता हुं कि इस औरत को कॅम्पतक पहुंचाए बगैर मै दम नही लुंगा. आप बस मुझे इजाजत दें!!
......
"काय झाले आजी इथे एकट्या कशा आलात? कुणी बरोबर नव्हते काय?"
"माझा ल्योक आहे ना. तो गेलाय बाजुला एखादे गाव असेल तर मदत मागायला.. सकाळच्याला गेलाय आता दुपार ढळली अजून कसा येईना? माझी सोन्याची कांगणं बी घेऊन गेलाय.. म्हणे इथली लोकं खूप पैसे मागत्यात मदत करण्यासाठी.. पैसे बी सारे त्याचेकडच हायेत थोड्या वेळात येइलच तो."
"आजी अगं तुझा पोरगा पैसे अन दागिने घेऊन पळून गेला असणार आता कसला परत येतोय तो?? जिथे देव माणसाचा नाही राहिला तिथे तुझा पोरगा काय तुझा राहणार? चल बस माझ्या पाठकुळी मी तुला घेऊन जातो सुरक्षित जागी."
"पोरा तू म्हणतोस कि देव बी माणसावर उलटलाय, मग तू मला मदत करणारा त्या देवाहून चांगला असा आहेस तरी कोण?"
"मी? मी "भारतीय सैनिक" आहे आजी. चल निघुयात...!!"

सोमवार, १७ जून, २०१३

नदी

मुसळधार पाऊस होतो सुरु.
माती दरवळून जाते.. नव्या नवरीसारखी लाजून ओलीचिंब होते..
कोवळे हिरवे अंकुर धुमाऱ्यांसारखे फुटू लागतात कणाकणांतून..
कुणी जीवाभावाचे भेटल्यावर असंख्य आठवणी उमलून याव्यात तसे
कित्येक प्राणी, पक्षी, कीटक बाहेर येउन बागडू लागतात..
रात्रभर संसद भरलेली असते बेडकांची.
डोंगर टेकड्यांना पाझर फुटतात...
काळ्या डोंगरांवर झऱ्यांच्या पांढऱ्या रेघा दिसू लागतात.....

सखारामचे भाताचे रोप तरारून आलेले असते..
गजाबा सांगत असतो नातवंडांना चाळीस वर्षांपूर्वी आलेल्या मोठ्ठ्या पुराची कहाणी..
कोथळ्याकडची पेरणी झाली का रे दादा? असे येणाऱ्या जाणाऱ्यास विचारून
लक्ष्मीबाई घेत असते माहेरचे क्षेम...
अगं गोवरी घाल ना चुलीत किती धूर झालाय? म्हणून दारकाबाई सुनेवर ओरडत असते..
अशात एक दिवस महादू जाता जाता हाळ घालतो..
नदी आलेय शिसवदपर्यंत.. दुपारपर्यंत येईल आपल्या पासानदहाडात..!!
(पासानदहाड हा आमच्या इथला नदीचा मोठा डोह)

आम्ही मग कशीबशी न्याहारी उरकून सुटायचे नदीकडे पळत...
जमेल तेवढे अधिक पश्चिमेकडे.
बऱ्याच वेळाने मग प्रचंड आवाज येऊ लागायचा..
आधी गुरगुरणाऱ्या वाघासारखा आणि मग ढगांच्या गडगडाटासारखा..!!!
आम्ही मग "बा-अदब बा-मुलाहिजा होशियार" व्हायचो..!!!
आणि मग वरचा काठवट नावाचा डोह भरून गढूळलेल्या पाण्याचा एक प्रचंड लोट लोळण घेत, रोरावत उतरायचा पासानदहाडात....

आधी वाळू, मग मोठे दगड आणि मग खडक एकापाठोपाठ एक गुडूप व्हायचे पाण्यात…
हळूहळू पासानदहाड भरू लागायचे. वरून वाहून आणलेले मोठमोठे ओंडके, फांद्या घेऊन बाणाच्या टोकासारखे मध्ये गढूळ पाणी आणि बाजूने जुने नितळ पाणी असा तो लवाजमा पुढे सरकायचा..
आम्ही नदीच्या काठावरून सुसाट पळत जायचो त्या प्रवाहाबरोबर शर्यत लावत...
हळूहळू सगळे पासानदहाड गढूळ होऊन जायचे, आणि मग काठोकाठ भरल्यावर पुन्हा ढोलताशे वाजवीत पाणी पुढच्या जाखुबाईच्या डोहात उडी घ्यायचे...
आठ महिने सासुरवास सोसून माहेरास निघालेल्या सवाष्णीसारखी आनंदी आणि उत्साही भासायची तेव्हा मुळा..
बराच वेळ ते वाहत जाणारे तांबडे पाणी पाहत बसल्यावर मग आम्ही गावात येणार आणि "नदी निघून गेली रे" असा गावभर डंका पिटून टाकणार...
...
...काल फोनवर कळले यंदाची नदी निघून गेल्याचे........
.... खरेच खूप दूर निघून गेली आहे नदी. नाही का?