"पाटील, फागुन संपत आला. तव्हा आता चैतरात गावोगाव जत्रा चालू व्हनार बगा. आपल्या बी जत्रंच्या तयारीला लागाया पायजे. उंद्याला सरपंचानं मिटिंग बोलावली हाय." गुणा पाटलाच्या घरी बसता बसता नारबा म्हणाला.
"आता काय जत्रांत मजा रायली नाय बग नारबा, मायला काय योक काळ व्हता. आरं आपल्या गावच्या जत्रंला काय लोकं यायची. काय आपल्या गावाचा तमाशा असायचा. आन काय कुस्त्यांचा जंगी फड रंगायचा. संब्याचं नाव ऐकलंय काय रं त्वा?"
"कंचा त्यो नाच्या?"
"व्हय व्हय त्योच. आरं काय नाचायचा आन काय गाणं म्हणायचा म्हणून सांगू तुला.!! पार पुना अन नगरातून लोकं यायची खास संब्याचा नाच अन वग पहाया. एकदा गावकऱ्यांनी नारायणगावाहून खरीखुरी बाई आणली तमाशात नाचवायला. पण संब्यालाच पहायाला आलेल्या लोकांना ती खरीखुरी बया आज्याबात आवडली नाय. लोकांनी मोठा गोंधळ घातला. दगडं फेकली अन रातीचा फड बंद पाडला. मग दुसऱ्या दिशी हाजऱ्यांमंदी परत संब्याला बाईच्या जागी उभा क्येला तवा कुठं लोकांनी वग होऊ दिला. त्याचा त्यो वग "सखु सासराशी जाते" काय गाजला व्हता म्हणून सांगू? किती लांबलांबवरनं लोकं यायची संब्याच्या तमाशाची सुपारी घियाला. मोठमोठ्या बोली लागायच्या संब्याच्या सुपारीसाठी. गावोगाव तमाशा येवढा नावाला आला की थेट पुण्याच्या एका गोऱ्या सायबापतुर किरत पोचली संब्याची. माकिंत्या सायेब नाव त्येचं. पुण्याहून येकदा त्यो एका मोठ्या बामण कारभाऱ्याला घेऊन आला खास संब्याचा वग पहाया. या इथं पारावं खुर्ची सोडून निस्त्या सतरंजीवं मांड घालून बसला सायेब, अन जोडीला पुण्याचा त्यो बामण कारभारी बी. तुला सांगतो नारबा, सखूचं सोंग घेतलेल्या संब्याचं काम बगून ढसाढसा रडला कारभारी.!! माकिंत्या सायबाला कितीक भाषा समजली कोणास ठाऊक पण त्येनं बी डोळ्याला रुमाल लावला बग. वगाचा पडदा पडला अन पुण्याचा कारभारी सोता उठून संब्याकडं ग्येला, त्येचा हात हातात घेतला आनं त्येची पाठ थोपीटली. त्ये पाहून ह्या आपल्या पिल्याभटाचा बाप नाग्याभट लगोलग म्होरं ग्येला अन कारभाऱ्याला म्हणाला, "पंत त्यो म्हार हाय त्येला शिवू नगा" त्ये आयकून कारभाऱ्यानं संब्याचा हात सोडला, अन नाग्याभटाला इचारलं काय म्हणता? ह्यो महार हाय? व्हय व्हय सरकार याला शिवलात आणि इटाळ करून घेतला तुमी. हे ऐकताच त्या कारभाऱ्यानं काय करावं? तडक देवळाम्होरं आला, पाटलाच्या मंजी माह्या आज्याच्या अन नाग्याभटाच्या संगं संब्याला पुढं बोलीवला आनं समद्या माणसांपुढं त्याला कडकडून मिठी मारली. मंग त्यो नाग्याभटाला म्हणाला, नागोजी अवं नाटक म्हंजी पाचवा वेद हाय. आनं या संबाजीच्या अंगात कलेच्या रुपात साक्षात देवच येतो. कुठं शिवाशिव घेऊन बसलाइसा? समदी लोकं तवा कशी पार गलबलून गेली व्हती. तुला सांगतो नारबा भैरुनाथ देवळातून समदं बगत असतो. संब्याची कला भैरुनाथाला दिसत व्हतीच म्हणून तर मग माकिंत्या सायबानं कारभाऱ्याच्या शिफारसीवरून संब्याला तिथल्या तिथं नदीच्या कडंची ३० येकर जमीन नावावं करून दिली. मी तवा लय ल्हान होतो पण मला चांगलं आठवतंय, म्या भैरुनाथाच्या मूर्तीकडं पायलं तर मूर्ती हसत असल्यासारखी मला दिसली."
"पाटील अन त्यो उस्मान पहिलवान आठतुय का? त्येची काय गोष्ट हाय? त्येच्याबद्दल आमी लय आईकलंय पण समदं वरवरचं. आसं खोलात शिरून तुमीच काही माहिती दिलीत तर बरं हुयील."
"व्हय व्हय चांगलाच आठवतोय मला उस्मान पैलवान. काय उंचपुरा अन दणगट गडी व्हता. काय पछाड मारायचा म्हणून सांगू..!! म्या सोता पाहिलंय त्याला कुस्ती खेळताना. उस्मान समशेरपुराचा. सलग पाच वरसं उस्मान कुठंबी कुणाकडनंबी कुस्ती हारला नाय. ज्या ज्या जत्रेत उस्मान गेला, तिथली कुस्ती त्येनं मारलीच. या आपल्या शेजारच्या वाघदरी गावाचा कुस्त्यांचा फड सगळ्यात तवा सगळ्यात जास्त मोठा व्हायचा. त्या काळात बी दुसरीकडं शे-पाचशेच्या कुस्त्या व्हत असताना ५०००ची कुस्ती असायची वाघदरीत. उस्माननं मोठमोठ्या पैलवानांस हरवून सलग ४ येळा त्ये ५००० जीतले. पाचव्या वर्षी वाघदरीचा संतू पाटील बाजूच्या ४ गावच्या पाटलांना घेऊन आमच्या आबाकडं आला अन म्हणाला, "चार वरीस झालं, येक मुसलमान आपल्या जत्रांच्या कुस्त्या मारतुया. आपल्याला लाज वाटाया पायजे."
"त्यात काय लाज वाटायची? आरं मुसलमान आसला तरी बक्षीस घेताना पागोटं बांधतो, कपाळाला गुलाल बुक्का लावून घेतोच की तो. उलटं आपल्यास्नी अभिमान वाटाया हवा की आपल्या तालुक्याचा माणूस आजूबाजूच्या दोन तीन जील्यांतल्या कुस्त्या मारतोय."
"त्यात काय लाज वाटायची? आरं मुसलमान आसला तरी बक्षीस घेताना पागोटं बांधतो, कपाळाला गुलाल बुक्का लावून घेतोच की तो. उलटं आपल्यास्नी अभिमान वाटाया हवा की आपल्या तालुक्याचा माणूस आजूबाजूच्या दोन तीन जील्यांतल्या कुस्त्या मारतोय."
"न्हाय गुणा पाटील काय बी झालं तरी यंदा जीतणारा माणूस हिंदूच असला पायजे बगा."
"पण संतु पाटील तुमी सांगा उस्मान्याला हरवील असा एकतरी गडी हाये का समद्या जील्ल्यात?"
"मायला पाटील तुम्या आसं म्हणावं? आवं आता म्हतारपन आलं म्हणून गुमान हाय, नायतर सोता मैदानात उतरून लोळावला आस्ता बगा त्या उस्मान्याला. पण आता आम्ही समदे पाच गावाचे पाटील एक ठराव करून आलोय. यंदा थेट कोल्हापुराच्या तालमीतून मोठा मल्ल भाड्याने आणायचा उस्मानबरुबर भिडाया. शिकलेल्या अन कसलेल्या मल्लापुढं कसा टिकतोय हा गावठी वळू त्ये यंदा बगूच.!! काय बी झालं तरी भैरुनाथाची कावडी यंदा मुसलमानाच्या खांद्यावं जाणार न्हाय...."
"त्या वर्षी जत्रंच्या कुस्तीच्या फडात मग मागच्या वर्षी जीतलेल्या उस्मानला जवा आखाड्यातून आव्हान देत फिरवला तवा गर्दीतून कोल्हापूरवरून संतू पाटलानं आणलेला मानसिंग काकडा उभा ऱ्हायला, अन त्येनं उस्मानचा हात धरून आव्हान स्वीकारलं. मानसिंग काकडे म्हणजे हा असा मोठा सात फुटी उभा अन मोठ्या आंब्याच्या खोडासारखा आडवा आडदांड गडी बरं का नारबा. कापडं काढून त्यो आखाड्यात उतरला अन माती अंगाला लावून त्येनं जवा शड्डू ठोकला तवा समद्या बगणारांच्या काळजाचा ठोका चुकला. आता उस्मानचं काय खरं नाय आसं समदे कुजबुजू लागले."
"कुस्ती चालू झाली. संतू पाटील लय वरडत व्हता. दोघं पैलवान भिडलं. मानसिंग गडी लय दमदार. उस्मान्यानं लय चपळाई केली पण मानसिंगानं त्याला खाली पाडलाच. उस्मान आता पोटावं पडला व्हता पण दोन्ही हात मातीत घट रेलून मानसिंगाला पलटी मारून पाठ जमिनीला टेकवू देत नव्हता. बाहेर संतू पाटील आखाड्याला येढा घालीतच व्हता. त्यो जोरात वरडून म्हणाला, भैरुनाथाच्या कावडीला यंदा मुसलमानाचा हात नाय लागणार. शाब्बास रे मानसिंग मर्दा. आता लोळव त्याला.!! तेवढाच एक कौतुकाचा शब्द आनं मानसिंगाने संतू पाटलाकडे ते कौतुक स्वीकारायसाठी पाहिलं. बास तेवढा येकच क्षण अन मानसिंगाचा फासा हलकासा ढिला झाला. उस्मान्यानं ती ढिलाई लगेच हेरली. तो क्षणात गुडघ्यावर आला अन डावा हात तसाच जमिनीवर ठीऊन उजव्या हातानं पलटी मारून मानसिंगला बाजूला पाडला आन मग चपळाईनं कोलांटी मारून मानसिंगाच्या मागं गेला आणि त्याचा हुकमी पछाड टाकला. मानसिंग भांबावला व्हता, काय व्हतय हे कळायच्या आत उस्मान्यांनं मानसिंगाला उलटा केला अन कुस्ती जिंकली. जितल्यावर उस्मान्यांनं आखाड्यातली माती उधळीत लय थयथयाट केला. आपल्यापेक्षा दीड अंग मोठा असलेल्या मानसिंग काकड्याला मात देणारा उस्मानचा त्यो डाव पाहून लोक कितीतरी येळ बेभान व्हऊन नुसते टाळ्या वाजवीत राहीले. सांजच्याला भैरुनाथाची कावडी उचलायची येळ आली तवा उस्मानने आमच्या आबास पुढं बोलीवलं. संतू पाटील कावडी उचलून उस्मानच्या खांद्यावं देण्यासाठी पडलेल्या तोंडानं उभा व्हता. उस्मान पुढं झाला त्यानं कावडीला लवून नमस्कार केला, भंडारा वाहिला आणि मग संतु पाटलाला म्हणाला, पाटील मी तर भेद मानीत न्हाय पण तुमी मानीत व्हता तर मला सांगायचं व्हतं. अवं भैरुनाथासाठी कुस्ती खेळलो सुदिक नसतो मी. आसं म्हणून उस्मान बाजूला उभ्या आमच्या आबास म्हणाला, "गुणा पाटील भैरुनाथाच्या किरपेनं मला चार साल कावडी उचलायचा मान मिळाला, पण आता मी कावडी घेण्याचा मान तुम्हाला देतो. आनं यापुढं कंच्या बी जत्रेत कुस्ती खेळणार न्हाई आसं मी भैरुनाथाच्या साक्षीनं जाहीर करतो." त्यानंतर उस्मान परत कधी कुस्ती खेळला न्हाई. लोकांनी कावडी उस्मानच्याच खांद्यावं न्यावी म्हणून लई घोषणा दिल्या, पण उस्माननं नकार दिला. त्या दिशी लोकांनी कावडीच्या मिरवणुकीत भैरुनाथाइतकाच उस्मानचा म्हंजी एका मुसलमानाचा बी जयजयकार क्येला ह्ये मी माज्या डोळ्यांनी पायलंय नारबा.!!! सच्चा माणूस व्हता उस्मान... म्हणून त्येला लोकांतून येवडा मान मिळाला. भैरुनाथ समदं बघत असतो बग. त्या दिशी दुसऱ्यांदा भैरुनाथाची मूर्ती म्या हसताना पाह्यली. आपल्या भैरुनाथाची मूर्ती हसणाऱ्या रूपातली नाय, पण संब्या अन उस्मानसाठी म्या भैरुनाथाला हसताना पाह्यलंय.!!"
"पाटील, यंदा जत्रंला उस्मानचा ल्योक आनं संब्याचा नातू यास्नी बोलावून त्येंचा सत्कार केला तर?"
"वा वा नारबा अगदी मनातलं बोललास बग. उद्या गावकीची मिटिंग बोलीवली हाय तिच्यात ठरवू. "
"व्हय व्हय पाटील त्ये वर्गणी अन बाकी कार्यक्रमाचं नियोजन ठरवायचं हाय. उद्याच आटपून घेतलं म्हंजी तयारीला वखत पूरंल. कसं?"
"वा वा नारबा अगदी मनातलं बोललास बग. उद्या गावकीची मिटिंग बोलीवली हाय तिच्यात ठरवू. "
"व्हय व्हय पाटील त्ये वर्गणी अन बाकी कार्यक्रमाचं नियोजन ठरवायचं हाय. उद्याच आटपून घेतलं म्हंजी तयारीला वखत पूरंल. कसं?"
दुसऱ्या दिवशी मिटिंगीला गावकरी जमले. हजार रुपये घरटी वर्गणी गोळा करायचे ठरले. काठीच्या पूजेला आमदाराला बोलवायचे असे एकजण म्हणाला. "आरं आमदार न्हाई येऊ शकणार". सरपंच म्हणाला. "त्ये निवडणुका जाहीर झाल्यात न्हवं का? तवा आमदाराला आसं काय करता येत न्हाय."
"काय म्हणता सरपंच? आवं आधी बी एवढ्या निवडणुका झाल्या तवा तर आमदार येतच व्हता की."
"आरं येड्या तुला काय म्हाईत हाय का? आता तिकडं दिल्लीत कोण सेसन सायेब आलाय त्येनं नियम बदलल्यात. लई कडक हाये म्हणं त्यो. आपला आमदारच काय, तर मंत्र्यांस्नी बी हादरवून ठिवलय त्या सायबानं. मात्र काळजी करू नगा. यंदा आमदार जत्रसाठी दुप्पट देणगी देणार हाय. आनं निवडणुका संपल्यावर देवळाचा मंडप शिमेंट मदी बांधून देणार हाये सायेब. त्येच्या बदल्यात आपल्या गावातलं एक बी मत दुसरीकडं जाणार न्हाई असा शब्द दिलाय म्या आमदाराला."
"काय म्हणता सरपंच? आवं आधी बी एवढ्या निवडणुका झाल्या तवा तर आमदार येतच व्हता की."
"आरं येड्या तुला काय म्हाईत हाय का? आता तिकडं दिल्लीत कोण सेसन सायेब आलाय त्येनं नियम बदलल्यात. लई कडक हाये म्हणं त्यो. आपला आमदारच काय, तर मंत्र्यांस्नी बी हादरवून ठिवलय त्या सायबानं. मात्र काळजी करू नगा. यंदा आमदार जत्रसाठी दुप्पट देणगी देणार हाय. आनं निवडणुका संपल्यावर देवळाचा मंडप शिमेंट मदी बांधून देणार हाये सायेब. त्येच्या बदल्यात आपल्या गावातलं एक बी मत दुसरीकडं जाणार न्हाई असा शब्द दिलाय म्या आमदाराला."
"अन तमाशाचं काय करायचं?"
"आरं ती मेनका खटावकर हाये ना, तिच्याच फडाला सुपारी देऊ यंदा. संगीत बारी लय झ्याक हाये त्या फडाची. वग कमजोर आसतुया पण आजकाल तसाबी वग कोण बघतो? चार पोरी हायेत लय फटाकड्या. पप्लिक त्येंचा नाच बगून जाम खुस व्हनार बगा."
"अन सरपंच आम्ही तरुण मंडळी राब राब राबणार तवा आमची बी सोय हुयाला पायजेल काय?"
"आरं हो हो राज्यांनो. तुमच्यासाठी खास इंग्रजी मागवू. पोरं ती इंग्रजी घेतील अन म्हतारी ध्येंडं आपली मारतील हातभट्टीची."
"पण गावच्या वर्गणीतून दारू नको बरं का सरपंच, देवाचं कार्य हाये, तसं केल्यावं वंगाळ दिसंल." एक वयस्कर थेर बोललं.
"आरं गावाच्या देवाच्या पैक्याला कोण हात लावतुय रं? मला काय समजत नाय की काय? यंदा आपण जुगार मटकेवाल्यांस बी जागा देऊ. त्येंच्याकुन येणाऱ्या भाड्यात दारू आणू. कसं?"
गुणा पाटील इतका वेळ गुपचूप ऐकत होता पण आता त्याला कळ निघेना.
"अहो सरपंच ह्ये काय चाललंय? काज देवाचं हाय आनं तुमी खुशाल दारू अन जुगार आणताय? ह्ये बरुबर न्हाय"
"ओ पाटील गप बसा, तुमची पाटीलकी गेली, नदीत बुडाली कवाच. आता जन्ता जे म्हणंल त्येच व्हणार. उगाच परंपरा हाय म्हणून तुमाला बोलीवलं जातंय. तुमी गप ऱ्हावा हेच बरं." एक तरुण बोलला.
"आरं ये संप्या, बस्तू का गुमान सुक्काळीच्या? पाटलाला आसं बोलतोस? वढू का दोन कानाखाली?" सरपंच भडकलेल्या संप्यास म्हणाला. आणि मग पाटलाकडे वळून, "पाटील तुम्ही मनावं घेऊ नगा. पोरगं बैताल हाय."
असे म्हणून थोड्या वेळातच मांडलेले सगळे ठराव पास करून सरपंचाने मिटिंग संपवली. सगळे निघून गेले. फक्त गुणा पाटील, नारबा आणि सरपंच उरले. मग सरपंच पाटलाकडे आला आणि म्हणाला, "पाटील अवं त्या संप्याचं काय मनावर घेऊ नगा. आणि हे दारू अन जुगाराचं मला बी पटलेलं न्हाई बगा. पण तुमी समजून घ्या. महीन्याभरानं विलेक्शन हाये. तवा लोक खुश ऱ्हाया पायजे, म्हणून सोता आमदार सायबानं तसा आदेश दिलाय मला. ह्ये राजकारण हाय पाटील. आता आमदाराला तसं मागच्या सारखं खुले आम दारू अन पैका देता येत न्हाय. म्हणून हा मार्ग शोधलाय."
"अवो सरपंच, पण म्हणून जत्राचा असा नास करायचा व्हय? अवो भैरुनाथाला काय वाटंल?"
"पाटील अवो आमदाराला खुश ठिवलं ना की त्यो भैरुनाथाचा मंडप शिमेंटमदी बांधून देणार हाय. भैरुनाथासाठीच करतुया हे समदं. भैरुनाथ बी खुश व्हईल, तुमी काळजी करू नगा."
असे सांगून सरपंचही निघून गेला, "भैरुनाथ समदं बघतुया, भैरुनाथ समदं बघतुया... " असं काहीसं अस्पष्ट पुटपुटत पाटील पारावरून उतरून चालू लागला. नारबाने खिन्नपणे देवळाच्या आत भैरवनाथाच्या मूर्तीकडे पाहिले, त्याला गुणा पाटलानंतर आता तिसऱ्यांदा भैरुनाथाची मूर्ती हसत असलेली दिसली.
"आरं ती मेनका खटावकर हाये ना, तिच्याच फडाला सुपारी देऊ यंदा. संगीत बारी लय झ्याक हाये त्या फडाची. वग कमजोर आसतुया पण आजकाल तसाबी वग कोण बघतो? चार पोरी हायेत लय फटाकड्या. पप्लिक त्येंचा नाच बगून जाम खुस व्हनार बगा."
"अन सरपंच आम्ही तरुण मंडळी राब राब राबणार तवा आमची बी सोय हुयाला पायजेल काय?"
"आरं हो हो राज्यांनो. तुमच्यासाठी खास इंग्रजी मागवू. पोरं ती इंग्रजी घेतील अन म्हतारी ध्येंडं आपली मारतील हातभट्टीची."
"पण गावच्या वर्गणीतून दारू नको बरं का सरपंच, देवाचं कार्य हाये, तसं केल्यावं वंगाळ दिसंल." एक वयस्कर थेर बोललं.
"आरं गावाच्या देवाच्या पैक्याला कोण हात लावतुय रं? मला काय समजत नाय की काय? यंदा आपण जुगार मटकेवाल्यांस बी जागा देऊ. त्येंच्याकुन येणाऱ्या भाड्यात दारू आणू. कसं?"
गुणा पाटील इतका वेळ गुपचूप ऐकत होता पण आता त्याला कळ निघेना.
"अहो सरपंच ह्ये काय चाललंय? काज देवाचं हाय आनं तुमी खुशाल दारू अन जुगार आणताय? ह्ये बरुबर न्हाय"
"ओ पाटील गप बसा, तुमची पाटीलकी गेली, नदीत बुडाली कवाच. आता जन्ता जे म्हणंल त्येच व्हणार. उगाच परंपरा हाय म्हणून तुमाला बोलीवलं जातंय. तुमी गप ऱ्हावा हेच बरं." एक तरुण बोलला.
"आरं ये संप्या, बस्तू का गुमान सुक्काळीच्या? पाटलाला आसं बोलतोस? वढू का दोन कानाखाली?" सरपंच भडकलेल्या संप्यास म्हणाला. आणि मग पाटलाकडे वळून, "पाटील तुम्ही मनावं घेऊ नगा. पोरगं बैताल हाय."
असे म्हणून थोड्या वेळातच मांडलेले सगळे ठराव पास करून सरपंचाने मिटिंग संपवली. सगळे निघून गेले. फक्त गुणा पाटील, नारबा आणि सरपंच उरले. मग सरपंच पाटलाकडे आला आणि म्हणाला, "पाटील अवं त्या संप्याचं काय मनावर घेऊ नगा. आणि हे दारू अन जुगाराचं मला बी पटलेलं न्हाई बगा. पण तुमी समजून घ्या. महीन्याभरानं विलेक्शन हाये. तवा लोक खुश ऱ्हाया पायजे, म्हणून सोता आमदार सायबानं तसा आदेश दिलाय मला. ह्ये राजकारण हाय पाटील. आता आमदाराला तसं मागच्या सारखं खुले आम दारू अन पैका देता येत न्हाय. म्हणून हा मार्ग शोधलाय."
"अवो सरपंच, पण म्हणून जत्राचा असा नास करायचा व्हय? अवो भैरुनाथाला काय वाटंल?"
"पाटील अवो आमदाराला खुश ठिवलं ना की त्यो भैरुनाथाचा मंडप शिमेंटमदी बांधून देणार हाय. भैरुनाथासाठीच करतुया हे समदं. भैरुनाथ बी खुश व्हईल, तुमी काळजी करू नगा."
असे सांगून सरपंचही निघून गेला, "भैरुनाथ समदं बघतुया, भैरुनाथ समदं बघतुया... " असं काहीसं अस्पष्ट पुटपुटत पाटील पारावरून उतरून चालू लागला. नारबाने खिन्नपणे देवळाच्या आत भैरवनाथाच्या मूर्तीकडे पाहिले, त्याला गुणा पाटलानंतर आता तिसऱ्यांदा भैरुनाथाची मूर्ती हसत असलेली दिसली.