इतिहास म्हंटले की आपल्या डोळ्यांसमोर नेहमी शिवाजी, बाजीराव, राणा प्रताप, अकबर, औरंगजेब, इंग्रज, गांधी, नेहरू हेच लोक येत असतात. मोठ्या देशपातळीवर प्रभाव टाकणाऱ्या अशा मोजक्या लोकांची माहिती म्हणजेच आपला इतिहास असे आपण समजतो. मग आपल्या अवतीभोवतीच्या परीसरात, आपल्या गाव तालुक्यात वा अगदी जिल्ह्यात कुणी महान पराक्रमी माणसे होऊन गेली नाहीत का? देश आणि राज्याचा इतिहास ठेवा बाजूला, आपल्या गावाला, आपल्या तालुक्याला काही इतिहास नाही का? इथे कुणी शून्यातून राज्य निर्माण केले नाही का? शिवाजी राजांनी पराक्रमाने बलाढ्य सत्तेला शह देऊन नवे राज्य निर्मिले, पण तितक्याच पराक्रमाने तितक्याच बलाढ्य शक्तीशी लढलेला कुणी वीर आपल्या परीसरात नव्हता का? शिवाजी महाराज नसोत पण आपल्या गावातून किंवा पंचक्रोशीतून कुणी बहिर्जी नाईक, तानाजी मालुसरे, प्रतापराव गुजर, बाजीप्रभू देशपांडे हे निर्माण झालेच नाहीत का? असे तर नसणार. प्रत्येक गावाला, किंवा किमान एका प्रांताला तरी नक्कीच पराक्रमांचा मोठा इतिहास असणार, कुणी ना कुणी महान पराक्रमी वीर अथवा वीरांगना आपल्याही आजूबाजूस पूर्वी कधीतरी निर्माण झालेच असणार. फक्त त्यांचे प्रभावक्षेत्र छोटे असल्याने त्यांच्या कहाण्यांची नोंद ठेवली गेली नसेल आणि म्हणून त्यांचे कार्य इतिहास म्हणून आपल्या पुढे आले नसेल. आज आपण फक्त ज्यांची नोंद ठेवली गेली तेवढ्याच घटनांना आपला इतिहास समजतो. एवढेच नाही तर ज्यांची नोंद ठेवली गेली त्यातही अनेकदा असे होते की फक्त काहीच प्रकरणे पॉप्युलर झाल्याने तीच पुढे आली आणि त्यातच अधिक संशोधन झाले, काही अशाही घटना असतील ना की ज्यांची ओझरती नोंद झाली मात्र त्या नकळत वा मुद्दाम दुर्लक्षिल्या गेल्या वा अनुल्लेखल्या गेल्या आणि मग हळूहळू विस्मृतीत जाऊन नष्टच झाल्या? हो असेही नक्कीच झाले असणार. प्रत्येक गावात वा गडावर आपल्याला वीरगळ दिसते, प्रत्येक वीरगळ ही त्या त्या गावातील एकेका पराक्रमाची गाथा आहे, मात्र ती लिखित नव्हे तर चित्ररूपात असल्याने आपल्याला तिचे डिटेल्स कळत नाहीत. आपल्या गावाशेजारी असलेल्या त्या डोंगरावर जिथे आता फक्त काही भिंतीचे भग्नावशेष दिसतात, तिथे काय घ्या आपल्या गावाच्या चार वीरांनी असीम पराक्रम करून ४०० आक्रमकांना धूळ चाटवली असेल. आपण जो सांगतो तो म्हणजे फक्त शिवाजी महाराज एकदा इथे आले होते वा अहिल्याबाई होळकरांनी इथे येऊन या मंदिराचा जीर्णोद्धार केला हा तर काही गावाचा मोठा अभिमानाचा इतिहास नव्हे. आपल्या गावातील माणसांनी केलेल्या काही ज्ञात, अज्ञात पराक्रमांची, त्यांच्या गोष्टींची माहीती हा खरा आपला इतिहास. आपल्या गावातील कुणीतरी शिवाजीराजांना, वा अगदी निजामाला का होईना अत्यंत पराक्रम करून मदत केली हा आपला अभिमानाचा इतिहास. असा प्रत्येक गावाचा इतिहास नक्की असणार, मात्र त्याची नोंद न झाल्याने वा असलेली नोंद दुर्लक्षिली गेल्याने आपल्याला तो इतिहास कळलाच नाही आणि मग दूर कुठेतरी झालेली सिराजुद्दौला आणि इंग्रजांमधली प्लासीची लढाई यासारख्या घटना हाच केवळ आपला इतिहास असे आपण मानू लागलो आणि मानतो. मग आपल्या लोकल पातळीवर इतिहास घडलाच नाही का? आपल्या परिसरात काहीच ऐतिहासिक महत्वाच्या घटना घडल्या नाहीत? याच जिज्ञासेतून आपल्या गावात, परीसरात कुणी हिरो निर्माण झाला असेल का याची माहिती काढण्याचा प्रयत्न केल्यावर मला जुन्या लोकांच्या बोलण्यांतून आणि काही पुस्तके व दस्तऐवजांतून माझ्या जन्मगावाचा एक हिरो, किंवा माझ्या जन्मगावाचा शिवाजी म्हणता येईल असा एक शूरवीर सापडला.
मावळात बोरघरचा हिरोजी बांबळे नाईक हा बिदरच्या सुल्तानशाहीने पूर्वी कधीतरी बहाल केलेल्या परंपरागत मनसबदारीचा शेवटचा वारस होता. त्याचा मृत्यू १७६०ला झाला. त्याला जावजी नावाचा एक मुलगा होता. जावजी हा तसा मध्यम उंचीचा शिडशिडीत अंगाचा आणि गोरापान रंग असलेला एक अत्यंत हुशार, शूर, धाडशी आणि महत्वाकांक्षी माणूस होता. असे म्हणतात की जावजी हा पायाळू होता. पायाळू असणे हा अपशकुन मानला जातो. म्हणून जावजी तान्हा असताना त्याला पायाळू असण्याच्या अपशकुनातून वाचवण्यासाठी नदीच्या कडेला उघड्या पडलेल्या उंबराच्या मुळ्याखालून तीनचार वेळा घालून काढण्यात आले. जावजी हा हिरोजीच्या मृत्यूच्या वेळी जुन्नर येथे नोकरीस (नाईक) होता. आपल्या पित्याच्या मृत्यूनंतर त्याने जुन्नरच्या सुभेदाराकडे अर्ज करून पेशव्यांकरवी आपल्या पित्याची मनसबदारी वारसा हक्काने आपल्याला मिळावी असा अर्ज केला.
जावजीला जुन्नरमधील अनेकजण नापसंत करत असत. असे म्हंटले जाई की जावजी त्याच्या अनेक मित्रांना देशावर वेगवेगळ्या ठिकाणी दरोडे आणि लूट करण्यास मदत करीत असे. विशेषतः जुन्नरचा सावंत आणि त्याचे कुटुंब यांना जावजी खूप खुपत असे. त्यांनी सुभेदाराला फूस लावून जावजीचा अर्ज फेटाळायला भाग पाडले. मग सुभेदारानेही जावजीचा अर्ज फेटाळला. या प्रकाराने जावजी नाराज झाला आणि नोकरी सोडून आपल्या गावी शेती करण्यासाठी निघून गेला. मात्र तीनेक वर्षे शेतीत राबूनही त्या कामात काही रस नसल्याने त्याला काही करता आले नाही. अगदी शेतसारा देण्याइतकेही उत्पन्न त्याला काढता आले नाही.
एकदा पेशवा शिपाई शेतसारा गोळा करण्यास गावात आले असता गावच्या पाटलाने त्यांना सांगितले की मी जावजीकडून सारा गोळा करू शकत नाही, तो माझे ऐकणार नाही, तेव्हा तुमचे तुम्हीच त्याचे काय करायचे ते करा. शिपाई म्हणाला की मी त्याचा बंदोबस्त करेल. मग पाटलाने शिपायाला एका चपराश्याबरोबर जावजीकडे पाठवले. शिपायाने जावजीला दमदाटी केली परंतु जावजीने त्याला कसेबसे समजावून माघारी धाडले. मात्र या प्रकारामुळे जावजीला पाटलाचा खूप राग आला. आपल्याला शेतीउत्पन्न कमी मिळालेले असूनही पाटलाने शिपाई घरी पाठवून आपला असा अपमान केल्याबद्दल पाटलाला याची किंमत चुकवावी लागेल अशी घोषणा करून तो जंगलांत निघून गेला. हे ऐकताच पाटलाची पाचावर धारण बसली. पाटील घाबरून थेट जुन्नरच्या सुभेदाराकडे गेला आणि त्याला सर्व वृत्तांत सांगितला. मग सुभेदाराने आपल्याकडील तीन नाईकांना जावजीस समजावून परत जुन्नरला घेऊन येऊन जुन्या नोकरीवर रुजू होण्यासाठी राजी करण्याची कामगिरी दिली. ते तिघे नाईक जावजीला भेटायला व समजवायला जावजीकडे आले आणि मग जावजी त्यांच्यावर विश्वास ठेऊन परत जुन्नरला आला. जावजी परत आल्यावर सुभेदाराने त्याला त्याची वारसाहक्काची मनसब पेशव्यांकडे मागणी करून परत देण्याचा विचार केला असतानाच परत एकदा जुन्नरचे काही सावंत आणि काही सिंधी सुभेदाराला भेटले आणि त्यांनी जावजीच्या चहाड्या केल्या. त्यांनी सांगितले की तेव्हा देशावर घडलेले सगळे दरोडे जावजीने घडवून आणले आहेत, आणि अशा माणसाला मनसब न देता उलटपक्षी त्याचा परस्पर काटा काढायला हवा. त्यांनी सुभेदाराला जावजीस कैद करून चांगला धडा शिकवण्याचा सल्ला दिला. मात्र जावजीच्या चार मित्रांना (त्यात एक ब्राह्मणही होता) हे कळल्यावर त्यांनी सुभेदाराला स्वतःच्या शपथेवर अशी हमी दिली की जावजी काहीही सरकारविरोधी काम करणार नाही. त्यांच्या या हमीवर सुभेदाराने जावजीस कैद वगैरे न करता नोकरीमध्ये आहे त्या स्थितीत ठेवण्याचे ठरविले.
जरी मित्रांच्या हमीवर जावजीने सुभेदाराचा विश्वास मिळविला असला तरी जावजीला पाण्यात पाहणारे जुन्नरातील इतरजण स्वस्थ बसलेले नव्हते. ते सदैव जावजीचा काटा काढण्याच्या प्रयत्नात होते. दरम्यान पेशव्यांनी जंजिऱ्याच्या सिद्धीविरुद्ध मोहीम सुरु केली होती. त्या मोहिमेत भाग घेण्यासाठी सुभेदाराचे दोन ब्राह्मण सैन्यअधिकारी आपल्या सैन्यटोळ्या घेऊन जंजिऱ्यास निघाले होते. त्या दोघांना जावजीचा कट्टर विरोधी असलेला एक ब्राह्मण जाऊन भेटला व त्याने त्यांच्याशी मिळून जावजीला मोहिमेवर घेऊन जाण्याचा व तिकडेच ठार मारण्याचा कट रचला. त्यानुसार त्यांनी ठरवले की बिनिवाल्याबरोबर जावजीला मोहिमेवर पाठवायचे व लढाईच्या वेळी जावजी आणि त्याचे कोळी साथीदार नावेत बसून समुद्रात गेले की मग ती नाव बुडवून त्या सर्वांना ठार करायचे. मात्र ते दोघे ब्राह्मण बिनिवाल्यास हा कट सांगत असताना जावजीच्या एका समर्थकाने ते ऐकले व त्याने लगोलग जावजीस ही खबर दिली. हे ऐकताच जावजी सावध होऊन लगोलग परत जुन्नर सोडून जंगलात पळून गेला. मात्र आता आपल्याविरुद्ध शिजविल्या जाणाऱ्या या सगळ्या कट कारस्थानांचा बदला घेण्यासाठी आणि आपला मनसबदारीचा वारसा हक्क मिळवण्यासाठी त्याने प्रयत्न करण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने लढाईसाठी आपली टोळी तयार करण्यास सुरुवात केली. आणि मग या कामासाठी पैसे मिळविण्यासाठी त्याने खंडणी गोळा करण्यास सुरुवात केली. सुभेदारास हे कळताच त्याने जावजीच्या कुटुंबीयांस कैद करून जुन्नर येथे डांबले आणि मग जावजीला पकडण्यासाठी सैन्याची एक तुकडी जंगलात रवाना केली. आता आपण सुभेदाराविरुद्ध लढल्यास तो त्याच्या कैदेत असलेल्या आपल्या कुटुंबियांच्या जीवाचे काही बरेवाईट करेल हे ओळखून जावजीने काही काळ शांत राहण्याचे ठरवले व तो गुपचूप तिथून थेट खानदेशात निघून गेला.
खानदेशात गेल्यावर काही दिवसांनी आपल्या कुटुंबाची माहिती काढण्यासाठी जावजीने आपले दोन भाऊ दादाजी आणि सूर्याजी व एक पुतण्या यांच्यासह सात जणांना जुन्नरला पाठवले. मात्र योगायोगाने हे सातही जण फिरता फिरता चुकून जावजीला पकडण्यासाठी नियुक्त केलेल्या रावजी सावंत याच्या सैन्याच्या तुकडीला सापडले. सावंतने त्यांना पकडून जुन्नरला नेले. आणि भावांना वेगवेगळे करण्यासाठी दादोजीला जुन्नरमध्ये तर सूर्याजी आणि इतर पाच जणांना चावंड किल्ल्यावर कैदेत ठेवले. जावजीला ही खबर लागताच तो खानदेशातून निघून कोतुळमध्ये आला आणि मूळा नदीच्या किनाऱ्यावर कुठेतरी लपून बसून आपल्या भावांना सोडविण्याच्या संधीची वाट पाहू लागला. सावंतने दरम्यान सुभेदाराचे कान भरून जावजीचे भाऊ जिवंत राहील्यास ते काहीतरी युक्ती करून पसार होतील व अजून त्रास देतील म्हणून त्यांना चामड्याच्या पिशव्यांत बांधून कडेलोट करावी असे सुचवले. सुभेदारानेही असे करण्याची परवानगी दिली व त्यानुसार पाच जणांना चामड्याच्या पिशव्यांत भरून त्यांची डोंगरावरून कडेलोट करण्यात आली. मात्र सूर्याजी आणि जावजीचा पुतण्या यांनी विनंती केली की आम्ही लढवय्ये आहोत तेव्हा आम्हाला असे मरण देऊ नका. त्याऐवजी आम्हाला दोन तलवारी द्या आणि मग आम्ही त्या तलवारींनी एकमेकांशी लढू व लढून दमलो की मग स्वतःच कड्यावरून खाली उडी घेऊ. मात्र यांच्या हातात शस्त्र दिल्यास हे काहीही करू शकतात हे माहित असल्याने घाबरून त्यांना फक्त दोन काठ्या देण्यात आल्या आणि मग नाईलाजाने दोघांनी त्या काठयांनी एकमेकांशी लढून शेवटी दमल्यावर एकामागोमाग एक कड्यावरून उड्या घेऊन आपले प्राण दिले.
आपले भाऊ आणि पुतण्या व इतर साथीदारांच्या दुर्दैवी मृत्यूची ही खबर जावजीला मिळताच तो अत्यंत निराश आणि हताश होऊन गेला. आता आपल्या लढाईला वा लढ़ाई करून मिळणाऱ्या मनसबदारीला काही अर्थ नसेल, असे त्याला वाटू लागले. आता लढाई वगैरे करण्यात काहीही अर्थ राहीला नसल्याने आपण शांत राहून घ्यावे असे नैराश्यपूर्ण विचार त्याच्या मनात येऊ लागले. मात्र त्याचे जिवलग मित्र देवजी भांगरे आणि धारेराव साबळे यांनी त्याला धीर दिला आणि सांगितले की आता किमान कैदेत असलेल्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी तरी असे हताश होऊन चालणार नाही. मग हे दोघे मित्र जुन्नरच्या सुभेदाराकडे गेले व स्वतःच्या हमीवर जावजी यापुढे शांत बसेल, जुन्नर प्रांतात फिरकणाराही नाही असा सुभेदारापुढे जामीन देऊन त्यांनी जावजीच्या कुटुंबीयांची सुटका करवून दिली. मात्र तरीही जावजी लपून छपून येतो आणि देवजी भांगरेला भेटतो याची कुणकुण सुभेदाराला लागली. त्याने जावजी आणि त्याच्या मित्रांच्या हालचालीवर नजर ठेवायची व्यवस्था केली. मात्र त्याने पाठविलेल्या सैन्याला काही जावजी आढळला नाही. मग त्याने देवजी भांगरेलाच कैद करून जुन्नर येथे तुरुंगात टाकले.
आपल्या मित्राला काहीही पुरावा नसताना कैद केले हे पाहून जावजी चवताळून उठला आणि मग त्याने कळंबईकडे कूच केले. मध्येच जावजीला खबर लागली की पोखरी आणि कळंबईच्या मध्ये सावंताच्या एका भावाने एक लाकडी वाडा बांधला असून तिथे तो एका गोसाव्यासोबत आपल्याला काही इजा होऊ नये म्हणून मंत्रपठण आणि अघोरी तांत्रिक पूजा करवतो आहे. जावजीला हे कळताच त्याने लगेच तिथे हल्ला केला आणि सावंत व तो गोसावी असे दोघांनाही ठार केले. जावजीने आपल्या भावाला ठार मारल्याचे कळताच राजा सावंत त्वरित पुण्यास पेशवा दरबारात गेला व त्याने जुन्नर प्रांताची घडी पूर्णपणे विस्कटली असून जावजीने पेशवे प्रशासन पूर्ण खिळखिळे करून टाकले आहे, असे खोटेनाटे आणि प्रक्षोभक आरोप करून पेशवे दरबाराने जावजीचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली. हे ऐकल्यावर नाना फडणवीसाने संतप्त होऊन सहाशे सशस्त्र सैनिकांची एक तुकडी राजा सावंतला जावजीचा बंदोबस्त करण्यासाठी दिली.
सावंत जावजीला मारण्यासाठी पेशव्यांची एवढी मोठी सशस्त्र फौज घेऊन जुन्नरला आला असला तरी जावजीही काही कच्या गुरूचा चेला नव्हता. त्याला ही खबर लागताच त्याने अत्यंत चलाखीने आपल्या सर्व सहकाऱ्यांना वेगवेगळे होण्याच्या सूचना दिल्या. एवढे मोठे सैन्य घेऊन आपल्या मागावर असलेल्या राजा सावंताला हुलकावणी देण्यासाठी मग जावजीचे सगळे साथीदार इकडे तिकडे पांगले. जावजीने आपल्याबरोबर फक्त बारा अत्यंत विश्वासू साथीदार ठेवले. आता जावजी आणि त्याचे साथीदार असे वेगवेगळ्या ठिकाणी पांगल्यामुळे राजा सावंताला कोणत्याही एका ठिकाणी आणि एका दिशेने आपली कारवाई करता येईना. अशाप्रकारे सैन्याला गुंगारा देण्यात यशस्वी झाल्यावर मग उलटे राजा सावंतलाच धडा शिकविण्यासाठी जावजीने एक योजना आखली. त्यानुसार आधी त्याने स्वतःबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरवायला सुरुवात केली जेणेकरून सावंत अजून गोंधळून जाईल. कधी तो जुन्नरच्या जवळ असल्याची अफवा पसरवे, तर कधी तो घाबरून पळून गेल्याची अफवा पसरवे, तर कधी तो कोकणात गेल्याची आवई उठवे. जावजीच्या योजनेला बळी पडून मग राजा सावंतानेही आपले सैन्य अनेक तुकड्यांत विभागून त्यांना अफवांमध्ये बोलल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी जावजीचा माग काढण्यासाठी पाठवले. पण जावजी आपल्या ठावठिकाण्याच्या इतक्या अफवा उडवत असे की कोणत्याही टोळीला कधीही तो दिसला नाही. स्वतः राजा सावंतही सैनिकांच्या सर्वात मोठ्या तुकडीबरोबर जावजीच्या शोधमोहिमेत भाग घेत असे. एव्हढी सक्षम सैन्य तुकडी दिमतीला असूनही जावजीची प्रचंड भीती असल्यामुळे राजा सावंत जिथे जाईल तिथे आपल्या सुरक्षेचा अत्यंत चोख बंदोबस्त ठेवीत असे. अगदी रात्रीच्या वेळीही आपल्यावर हल्ला होऊ नये म्हणून पहारेकऱ्यांची मजबूत व्यवस्था त्याने केलेली होती. पण जावजीही अत्यंत धूर्त होता, त्याने आपल्या गुप्तहेरांकरवी राजा सावंताचे तळ कुठे असतात, सुरक्षा व्यवस्था कशी असते, त्यात काय त्रुटी आहेत याची खडानखडा खबर काढलेली होती.
राजा सावंत एकदा आंबेगाव पठारावर तळ ठोकून होता, त्याच्या सुरक्षेचा घेराही नेहमीप्रमाणे अत्यंत मजबूत होता. मात्र जावजीने आधीच त्याच्या सुरक्षा रचनेची पूर्ण खबर काढलेली असल्याने मजबूत शिबंदी असूनही त्याने राजा सावंतावर तिथेच हल्ला करायचे ठरवले. मग एक पक्की योजना बनवून जावजीने रात्री गुपचूप त्याच्या तळावर हल्ला केला. जावजीच्या हल्ल्याच्या जबर तडाख्याने राजा सावंताचे सैन्य हादरले आणि पळून जाऊन झाडाझुडपांत लपून बसले. मग जावजीने राजा सावंत व त्याच्या बारा वर्षाच्या मुलाला पकडले. जावजी आपल्याला माफ करणार नाही हे राजा सावंताला माहीत होते, तरीही किमान आपल्या बारा वर्षांच्या मुलाला जीवदान द्यावे अशी त्याने जावजीकडे विनंती केली, मात्र माझ्या भावांना आणि छोट्या पुतण्याला मारताना तू कशी दया दाखवली नाहीस असे त्यास उलट विचारून जावजीने दोघांनाही ठार मारले. राजा सावंत पकडला गेला आहे असे कळल्यावर त्याचे पळून गेलेले काही सैनिक परत लढायला आले, त्या सर्वांनाही जावजीने यमसदनी धाडले.
राजा सावंतला आणि पर्यायाने नाना फडणवीसाला अशी धूळ चारल्यावर मग जावजी बांबळे थेट हरिश्चंद्रगडावर सुरक्षित वास्तव्यास निघून गेला. राजा सावंत मारला गेला ही खबर त्याच्या कुटुंबियांना दुसऱ्या दिवशी लागली जेव्हा राजा सावंताचा घोडा रक्तबंबाळ आणि शेपटी तोडली गेल्याच्या अवस्थेत चालत त्याच्या घरी जुन्नरला पोचला. राजा सावंताचा मुलगा लगोलग पुण्याला पेशवे दरबारात हजर झाला आणि त्याने नाना फडणवीसला हा वृत्तांत कथन केला. फडणवीस आता अत्यंत बेचैन झाला, सहाशे सशस्त्र सैनिकांची टोळी पाठवूनही जावजीने उलट राजा सावंतालाच ठार केले हे पाहून आता जावजीला संपवण्यासाठी याहून मोठी कुमक आणि मोठ्या क्षमतेची कारवाई करावी लागेल हे त्याला कळले. मग फडणवीसने राजा सावंताच्या मुलाला थेट जुन्नरची सुभेदारी बहाल केली जेणेकरून त्याला जावजीच्या बंदोबस्तासाठी अधिक अधिकार मिळाले. त्याला नाना फडणविसाने सुभेदारीची सनद देतानाच आपल्या नव्या अधिकारांचा व फौजेचा पूर्ण वापर करून जावजी बांबळेस संपविण्याची सूचना केली. मात्र राजा सावंताच्या मुलाला सुभेदारी मिळाली हे पाहून त्याच्याच कुटुंबातील काहीजण नाराज झाले. त्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा आपण जावजीला जाऊन मिळू असे त्यांनी ठरवले. मग त्यानुसार एकजण जावजीला भेटायला गेला व त्याला नव्या सुभेदाराचा काटा काढण्यास सांगितले. त्यानुसार मग जावजीने आपली माणसे पाठवली. सावंताच्या फितूर भावाने त्यांना सुभेदार सावंताचे घर दाखवले. घराजवळच एक वरात पाहत उभा असताना जावजीच्या माणसांनी नव्या सुभेदारावर हल्ला करून त्याला ठार मारले.
याच दरम्यान जावजीने राघोबादादाशी संपर्क साधायला सुरुवात केली. नाना फडणवीस आपल्यावर प्रचंड चवताळलेला असल्याने राघोबादादाला पेशवा बनण्यासाठी मदत करावी असे त्याने ठरविले. मात्र नव्या सुभेदारालाही जावजीने ठार केल्याचे समजताच नाना फडणवीस प्रचंड क्रोधीत झाला. जावजीच्या बंदोबस्तासाठी मग त्याने कोळी नाईक देवजी कोकाटे या जुन्नरच्या मोकासदाराला बोलावून घेतले व त्याला जावजीचा बंदोबस्त करायला सांगितले. कोकाटेने नाना फडणवीसाला सांगितले की मला जावजीच्या बंदोबस्तासाठी हवी ती सैन्य व इतर कुमक पेशव्यांतर्फे देण्यात यावी, जावजीस पकडले तर त्यास ठार मारण्याची लेखी परवानगी द्यावी, आणि इतकेच नाही तर बावन्न मावळातील सर्व कोळी नाईकांचे तंटे व मसलती सोडविण्याचे अधिकार लेखी देण्यात यावेत. मग नाना फडणविसाने जावजीला पकडण्याचे व मारण्याचे आदेश, इतर सैन्य व रकमेचे अधिकार तसेच ५२ मावळांतील कोळी नाईकांच्या नियंत्रणाचे अधिकार कोकाटेला लेखी स्वरूपात दिले आणि जावजीचा बंदोबस्त करण्यासाठी परत पाठवले.
प्रत्यक्ष युद्ध व सैनिक कारवाई करून जावजीसारखा धडाडीचा वीर पुरुष हाती लागू शकत नाही हे माहीत असल्याने मग कोकाटेने कपटाने जावजीस पकडण्याची योजना बनवली. एकदा कोकाटे त्याच्या तीन मुलांसकट जंगलात फिरत असताना त्याची गाठ अचानक जावजीशी पडली. कोकाटे धूर्त होता, त्याने गोड बोलून जावजीला फसवले. त्याच्यावर कसा अन्याय झाला, आणि इतर कोळी नाईकांनी कशी त्याला साथ द्यायला हवी असूनही साथ दिली नाही याची त्याने हळहळ व्यक्त केली. मी आपल्या जातीशी इमान राखून तुला न्याय मिळवून देईल अशी हमी दिली. मी तुला जुन्नरला तुझा अधिकार मिळवून देईल, तू माझ्याबरोबर चल असे त्याने जावजीला सांगितले. जावजीही कोकाटेच्या भूलथापांना बळी पडला. त्याने कोकाटेबरोबर जाण्याची तयारी दाखवली. त्यांच्यात अशाप्रकारे वार्तालाप होत असताना चालता चालता वाटेत एक नदी लागली. नदी पाहून जावजी कोकाटेला म्हणाला की आपण नदीत आधी अंघोळ करून घेऊ आणि मग पुढे जाऊ. जावजीने असे म्हंटल्यावर कोकाटेने आपला झोळणा म्हणजे पिशवी तिथेच एका झाडावर टांगून ठेवली आणि तो जावजीबरोबर अंघोळीसाठी नदीत उतरला. जावजीच्या एका मराठा सैनिकाने सहज त्या झोळण्यात पाहीले तर त्याला पेशवाईची मोहोर उमटवलेली असलेले काही कागद दिसले. त्याने जावजीचा पुतण्या काळू बांबळे याला बोलावून ते दाखवले. दोघांनी ते कागद गुपचूप बाहेर काढून वाचले. त्यात फडणवीसाने जावजीला ठार मारण्यासाठी संमती दिल्याचा दस्तऐवज होता. ते वाचल्यावर कोकाटेच्या कटाची त्यांना कल्पना आली, मग त्यांनी ते कागद परत जसेच्या तसे ठेवून, गुपचूप जावजीच्या कानावर ही गोष्ट घातली. जावजी म्हणाला की मला ही शंका होतीच त्यामुळे आता आपण यांनाही तीच वागणूक देऊ जी ते आपल्याला देणार होते. मग रात्री सगळे झोपलेले असताना जावजीने त्या चौघांनाही ठार मारले.
नाना फडणवीसाने जावजीस संपविण्याच्या अशा दोन्ही योजना धुळीस मिळविल्यानंतर काही दिवसांनी मग जावजीला राघोबादादाचा एक खलिता मिळाला. त्या खलित्यात राघोबाने जावजीला सगळे डोंगरी किल्ले जिंकून घेण्याची सूचना केली होती. राघोबा हाच खरा पेशवा आहे आणि आपल्याला त्याचा पाठिंबा आहे हे या खलित्याने सिद्ध होते असा दावा जावजीने केला त्यामुळे त्याला इतर अनेक कोळी सरदारांची साथ मिळाली. मग जावजीने आधी कोकण मोहीम हाती घेऊन सिद्धगड भैरवगड आणि कोथळीगड हे पेशव्यांकडून जिंकून घेतले. भैरवगडाच्या किल्लेदाराकडे एक अत्यंत सुंदर असे सोन्याचे कडे होते ते जावजीने हस्तगत केले. लवकरच जावजीने कोथळीगडही काबीज केला. जावजीच्या यशाची ही खबर लागताच पेशव्यांनी सेनेची एक तुकडी जुन्नरवरून जावजीशी लढण्यासाठी खाली कोकणात पाठवली. जावजीला हे कळताच त्याने हल्ल्याची वाट न पाहता स्वतःच त्या सैन्यावर हल्ला करून त्यांना अक्षरशः पळवून लावले. त्यानंतर जावजीने गोरखगडही ताब्यात घेतला.
गोरखगड घेतल्यावर जावजीला कळले की देवाजी सावंताने त्याला मारण्याची सुपारी नऊ बेरडांना (दरोडे टाकणारे आणि सुपारी घेऊन हत्या करणारे) दिली आहे, आणि वरून त्यांना प्रत्येकी एक सोन्याची अंगठीदेखील वानगीदाखल दिली आहे. पण जावजी सावध होता, त्यामुळे बेरडांना जावजीला शोधता सुद्धा आले नाही, मारणे तर दूरच. कोकणात एकामागून एक किल्ले ताब्यात घेतल्यावर मग जावजीने आपला मोर्चा आता घाटावर वळवला. त्याने रतनगडाला वेढा घातला. गोविंद खाडे हा तेव्हा रतनगडाचा किल्लेदार होता. जावजीने खाडेला सहा हजार रुपयांत किल्ला सोडण्याचा प्रस्ताव दिला, आणि गोविंद खाडे याने तो मान्य करून किल्ला जावजीच्या स्वाधीन केला. त्यानंतर जावजीने अलंग जिंकून घेतला आणि मग मदनगड त्याला स्वतःहून शरण आला. जावजीने अशा प्रकारे एकामागून एक पेशवाईचे लचके तोडल्यावर नाना फडणवीस अत्यंत खवळला व त्याने जावजीला कशाही प्रकारे पकडून त्वरीत तोफेच्या तोंडी द्यावे असे फर्मान काढले. मग नाना फडणवीसाने जावजीने जिंकलेले किल्ले परत घेण्यासाठी एक मोठी फौज रवाना केली. जावजी त्यावेळी कोकणात होता. पण नानाने पाठविलेल्या फौजेची खबर ऐकताच तो त्वरित घाटावर आला आणि त्या फौजेवर हल्ला करून त्यांचे अपरिमित नुकसान केले.
मग पेशव्यांची दुसरी एक फौज गोडबोले याच्या नेतृत्वाखाली कोकणातून वर घाटावर जावजीवर चालून आली, मात्र जावजीने त्यांच्यावरही गनिमी काव्याने हल्ले केले. अशाप्रकारे विजयामागून विजय प्राप्त करीत असला तरी आता जावजी नाना फडणविसाने पाठविलेल्या अनेक फौजांमुळे चोहीकडून वेढला जाऊ लागला होता. त्यामुळे त्याने राघोबादादास पत्र लिहून आपण पेशवे आहात आणि माझ्याशी लढायला येणारी फौजही पेशव्यांचीच आहे मग अशा प्रसंगी मी पुढे काय करावे ते विचारले. मात्र राघोबादादाने सांगितले की इंग्रजांनी त्यास जी मदत करण्याचा वायदा केला होता तो त्यांनी तोडल्याने राघोबा एकटा पडला होता. त्याने जावजीस पेशव्यांच्या सैन्याविरुद्ध लढून किल्ले राखून ठेवण्यास सांगितले. पुढे गोष्टी अनुकूल झाल्यावर मदत पाठवेल असे सांगितले. पण राघोबा स्वत:च इंग्रजांच्या नजरकैदेत आहे त्यामुळे राघोबाकडून काही अपेक्षा नाही हे कळल्यावर मात्र जावजी सावध झाला. जावजी हा फक्त वीर पुरुषच नव्हे तर अत्यंत चलाख मुत्सद्दी देखील होता. नाना फडणवीसाला आपण किती त्रास दिला आहे हे त्याला माहित होते त्यामुळे तो आपल्याला मारण्यासाठी सगळी शक्ती पणाला लावेल हेही त्याला माहित होते. म्हणूनच आता एवढ्या मोठ्या पेशवाईच्या शक्तीसमोर टिकाव धरायचा तर त्याला निर्बल झालेला राघोबा सोडून इतरांची साथ घेण्याची गरज होती. मग त्यानुसार त्याने हालचाली सुरु केल्या. धोंडू महादेव या त्याच्या मित्राला त्याने नाशिकच्या सुभेदाराकडे पाठवले तर मल्हारपूरचा पाटील भांगरे याच्याकरवी तुकोजी होळकर यांचेशी संपर्क साधला. भांगरे पाटील हा तुकोजी होळकराच्या सैन्यातला एक घोडेस्वार आणि तुकोजीचा अत्यंत विश्वासातला व जवळचा माणूस होता.
दरम्यानच्या काळात मधूनच गनिमी हल्ला करून पसार होणाऱ्या जावजीचा शोध घेण्याचे काम गोडबोलेने आपल्या फौजेसह सुरूच ठेवले होते. त्याला कळले की जावजी रतनगडावर असून तो खाली येणार आहे, तेव्हा त्याने आपल्या फौजेसह रतनगडाला वेढा दिला. कुणीही खाली जाताना दिसला की त्याला ठार मारा असे सांगून अत्यंत पक्की आणि मजबूत अशी वेढ्याची रचना त्याने केली. मात्र अंधार झाल्यावर जावजी स्वतः खाली उतरून गोडबोलेच्या फौजेला गुंगारा देऊन रातोरात रतनगडावरून पसार झाला. जावजी निघून गेल्यावर दोन दिवसांनी गोडबोलेला कळले की जावजी केव्हाच निघून गेला असून त्याने उत्तरेकडील पेशव्यांच्या गावांत खंडण्या वसूल करून जे विरोध करतील त्यांना मारण्याचा सपाटा लावला आहे.
गोडबोलेला एवढ्या मोठ्या फौजेनिशी असूनही जावजीच्या केसालाही धक्का लावता आला नाही आणि जावजी एकामागून एक किल्ले ताब्यात घेताच चालला होता हे पाहील्यावर मग नाना फडणविसाने शेवटी नाईलाजाने जावजीशी समेट करण्यासाठी संपर्क साधण्यात यावा असे आदेश देऊन आपल्या फौजा माघारी बोलावून घेतल्या. असे असले तरी जावजी आता सावध होता. जरी माघार घेतलेला दिसत असला तरी आपले प्राण घेण्यास नाना फडणवीस उतावीळ आहे हे जावजीस माहीत होते म्हणून मग तो धोंडू महादेवाने सांगितल्याप्रमाणे थेट तुकोजी होळकरास जाऊन मिळाला. तुकोजी होळकर हा पेशवाईचा अत्यंत महत्वाचा सरदार होता, आणि नाना फडणवीस त्याचा शब्द मोडू शकत नव्हता. मग तुकोजीने फडणविसास जावजीला पेशवे सरकारात सामील करून घेण्यास सांगितले, आणि त्या बदल्यात जावजीवर लोहगड ताब्यात घेण्याची मोहीम सोपवली. जावजी लोहगडावर कूच करून गेला. त्याने आपल्या तोफा लोहगडावर फिरवल्या. जावजीने एक मोक्याची जागा पाहून तिथे एक तोफ उभी केली व तिथून गडावर मारा करायला सांगितला. या तोफेचा एक गोळा नेमका किल्ल्यावरील दारुगोळ्याच्या गोदामावर पडला आणि त्याचा प्रचंड मोठा स्फोट होऊन किल्ला आरामात जावजीच्या ताब्यात आला. खुश होऊन जावजीने तोफेकऱ्यास आपल्या हातातील सोन्याचे कडे बक्षीस म्हणून दिले. दरम्यान जावजी तुकोजीचा अत्यंत जवळचा माणूस बनला. जेव्हा तुकोजी पुणे सोडून हिंदोस्थानात (उत्तरेत) गेला तेव्हा जावजीही त्याच्याबरोबर चांदूर येथे गेला. एव्हना धोंडू महादेव याने जावजीसाठी नाना फडणवीसाचे मन वळवून जावजीला विरोध करण्यात नुकसानच आहे त्याउलट त्याला आपल्यात घेतले तर त्याच्या वीरतेचा पेशवाईस फायदाच होईल असे सांगून जावजीस सरकारात सामील करून घेण्यास राजी केले होते. मग जावजीसाठी खास राजूर हा एक नवा सुभा तयार करण्यात आला. या सुभ्यात राजुरातील चाळीस गावे, महालदेशातील बावीस गावे, कोकणातील साकुर्ली जिल्ह्याची साठ गावे आणि कोकणातील इतर प्रांतातील अठ्ठावीस गावे अशी एकूण दीडशे गावे राजूर सुभ्यात आणि पर्यायाने जावजीच्या अंमलाखाली आली. सुभेदार हा पेशवाईत किंवा मध्ययुगीन भारतात, दरबारातील मंत्र्यांखालोखाल सर्वात मोठ्या दर्जाचा अधिकारी होता. आता ही सत्ता किती मोठी होती याची यावरून कल्पना यावी की त्याच वेळी जव्हारच्या गादीकडे केवळ ८३ गावे होती. म्हणजे जावजीच्या ताब्यात एका संस्थानाच्याही जवळ जवळ दुप्पट साम्राज्य आले होते. सुभ्यातील टाकेद हे गाव जावजीस त्याची वैयक्तिक जहागीर म्हणून देण्यात आले, तिथून त्याला दरवर्षी वैयक्तीक साडे आठशे रुपये मिळत. पेशवे दरबाराकडूनदेखील त्याला तनख्यात साडेतेराशे रुपये मिळत. प्रत्येक गावातूनही त्याला प्रत्येकी एक रुपया आणि तूप धान्य आदि मिळत असे. साकीरवाडीचा भांगरे आणि बारीचा खाडे हे दोघे नाईकही जावजीच्या हाताखाली नेमण्यात आले. याउपर सुभ्याच्या व्यवस्थेसाठी संगमनेर आणि सिन्नर सुभ्यांतूनही राजूरला चार ते पाच हजार रुपये वार्षिक मिळत असत.
आपल्या पराक्रमाच्या बळावर अशाप्रकारे भारतातील सर्वात मोठी शक्ती असलेल्या पेशवाईशी एकट्याने टक्कर घेऊन एकही लढाई न हरता अक्षरशः शून्यातून एखाद्या संस्थानापेक्षा मोठा सुभा मिळविणाऱ्या जावजीने अनेक वर्षे राजूर सुभ्याचा कारभार उत्तमरीतीने चालवला.
जुलै १७८९ मध्ये जव्हारच्या राणीचे म्हणणे पुणे दरबारात मांडण्यासाठी तीस घेऊन जात असताना कोतुळ येथे मुळा नदीच्या तीरावर जावजी थांबला. नदीला पूर आलेला होता, त्याच्यासोबत इष्टे नावाचा एक नाईक होता, त्या नाईकाने मुद्दाम जावजीला बहाण्याने नदीच्या खोल जागी नेले आणि तिथे त्याला पाठीमागून धक्का मारून दगडांवरून पाण्यात पाडले. पाण्यात पडल्यावरही जावजी पोहून वर निघण्याचा प्रयत्न करत असताना मग इष्टेने त्याच्या डोक्यावर प्रहार करून त्यास बेशुद्ध केले आणि अशाप्रकारे मग जावजीचा मूळेच्या पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. देशातील सर्वात बलाढ्य शत्रूशी एकट्याने लढून त्यालाच धूळ चारणाऱ्या पराक्रमी जावजीचा हा पराक्रम नक्कीच शिवाजी महाराजांसारखाच अभिमानास्पद होता. मात्र अशा अजोड पराक्रमी वीराचा त्याच्याच जवळच्या माणसाच्या फितुरीने दुर्दैवी मृत्यू झाला.
जवळ जवळ चाळीस वर्षे राजूर सुभा अस्तित्वात राहीला, त्यानंतर पेशवाई बुडाली आणि इंग्रजांनी हा सुभा आणि सुभेदारी बरखास्त करून पगारी पोलीस आणि कारकून आदि अधिकारी यांच्यातर्फे संपूर्ण प्रांताचा कारभार हाकायला सुरुवात केली. या परकीय इंग्रजांनी ठेवलेल्या नोंदींतूनच जावजी आणि त्याचा पराक्रम आज समजू शकतो. अन्यथा एतद्देशीय इतिहासकारांनी एकतर त्याला सपशेल टाळले किंवा केला तरी केवळ राघोबाचा बंडखोर साथीदार असा अल्प उल्लेख करून दुर्लक्षित ठेवले होते.
मावळात बोरघरचा हिरोजी बांबळे नाईक हा बिदरच्या सुल्तानशाहीने पूर्वी कधीतरी बहाल केलेल्या परंपरागत मनसबदारीचा शेवटचा वारस होता. त्याचा मृत्यू १७६०ला झाला. त्याला जावजी नावाचा एक मुलगा होता. जावजी हा तसा मध्यम उंचीचा शिडशिडीत अंगाचा आणि गोरापान रंग असलेला एक अत्यंत हुशार, शूर, धाडशी आणि महत्वाकांक्षी माणूस होता. असे म्हणतात की जावजी हा पायाळू होता. पायाळू असणे हा अपशकुन मानला जातो. म्हणून जावजी तान्हा असताना त्याला पायाळू असण्याच्या अपशकुनातून वाचवण्यासाठी नदीच्या कडेला उघड्या पडलेल्या उंबराच्या मुळ्याखालून तीनचार वेळा घालून काढण्यात आले. जावजी हा हिरोजीच्या मृत्यूच्या वेळी जुन्नर येथे नोकरीस (नाईक) होता. आपल्या पित्याच्या मृत्यूनंतर त्याने जुन्नरच्या सुभेदाराकडे अर्ज करून पेशव्यांकरवी आपल्या पित्याची मनसबदारी वारसा हक्काने आपल्याला मिळावी असा अर्ज केला.
जावजीला जुन्नरमधील अनेकजण नापसंत करत असत. असे म्हंटले जाई की जावजी त्याच्या अनेक मित्रांना देशावर वेगवेगळ्या ठिकाणी दरोडे आणि लूट करण्यास मदत करीत असे. विशेषतः जुन्नरचा सावंत आणि त्याचे कुटुंब यांना जावजी खूप खुपत असे. त्यांनी सुभेदाराला फूस लावून जावजीचा अर्ज फेटाळायला भाग पाडले. मग सुभेदारानेही जावजीचा अर्ज फेटाळला. या प्रकाराने जावजी नाराज झाला आणि नोकरी सोडून आपल्या गावी शेती करण्यासाठी निघून गेला. मात्र तीनेक वर्षे शेतीत राबूनही त्या कामात काही रस नसल्याने त्याला काही करता आले नाही. अगदी शेतसारा देण्याइतकेही उत्पन्न त्याला काढता आले नाही.
एकदा पेशवा शिपाई शेतसारा गोळा करण्यास गावात आले असता गावच्या पाटलाने त्यांना सांगितले की मी जावजीकडून सारा गोळा करू शकत नाही, तो माझे ऐकणार नाही, तेव्हा तुमचे तुम्हीच त्याचे काय करायचे ते करा. शिपाई म्हणाला की मी त्याचा बंदोबस्त करेल. मग पाटलाने शिपायाला एका चपराश्याबरोबर जावजीकडे पाठवले. शिपायाने जावजीला दमदाटी केली परंतु जावजीने त्याला कसेबसे समजावून माघारी धाडले. मात्र या प्रकारामुळे जावजीला पाटलाचा खूप राग आला. आपल्याला शेतीउत्पन्न कमी मिळालेले असूनही पाटलाने शिपाई घरी पाठवून आपला असा अपमान केल्याबद्दल पाटलाला याची किंमत चुकवावी लागेल अशी घोषणा करून तो जंगलांत निघून गेला. हे ऐकताच पाटलाची पाचावर धारण बसली. पाटील घाबरून थेट जुन्नरच्या सुभेदाराकडे गेला आणि त्याला सर्व वृत्तांत सांगितला. मग सुभेदाराने आपल्याकडील तीन नाईकांना जावजीस समजावून परत जुन्नरला घेऊन येऊन जुन्या नोकरीवर रुजू होण्यासाठी राजी करण्याची कामगिरी दिली. ते तिघे नाईक जावजीला भेटायला व समजवायला जावजीकडे आले आणि मग जावजी त्यांच्यावर विश्वास ठेऊन परत जुन्नरला आला. जावजी परत आल्यावर सुभेदाराने त्याला त्याची वारसाहक्काची मनसब पेशव्यांकडे मागणी करून परत देण्याचा विचार केला असतानाच परत एकदा जुन्नरचे काही सावंत आणि काही सिंधी सुभेदाराला भेटले आणि त्यांनी जावजीच्या चहाड्या केल्या. त्यांनी सांगितले की तेव्हा देशावर घडलेले सगळे दरोडे जावजीने घडवून आणले आहेत, आणि अशा माणसाला मनसब न देता उलटपक्षी त्याचा परस्पर काटा काढायला हवा. त्यांनी सुभेदाराला जावजीस कैद करून चांगला धडा शिकवण्याचा सल्ला दिला. मात्र जावजीच्या चार मित्रांना (त्यात एक ब्राह्मणही होता) हे कळल्यावर त्यांनी सुभेदाराला स्वतःच्या शपथेवर अशी हमी दिली की जावजी काहीही सरकारविरोधी काम करणार नाही. त्यांच्या या हमीवर सुभेदाराने जावजीस कैद वगैरे न करता नोकरीमध्ये आहे त्या स्थितीत ठेवण्याचे ठरविले.
जरी मित्रांच्या हमीवर जावजीने सुभेदाराचा विश्वास मिळविला असला तरी जावजीला पाण्यात पाहणारे जुन्नरातील इतरजण स्वस्थ बसलेले नव्हते. ते सदैव जावजीचा काटा काढण्याच्या प्रयत्नात होते. दरम्यान पेशव्यांनी जंजिऱ्याच्या सिद्धीविरुद्ध मोहीम सुरु केली होती. त्या मोहिमेत भाग घेण्यासाठी सुभेदाराचे दोन ब्राह्मण सैन्यअधिकारी आपल्या सैन्यटोळ्या घेऊन जंजिऱ्यास निघाले होते. त्या दोघांना जावजीचा कट्टर विरोधी असलेला एक ब्राह्मण जाऊन भेटला व त्याने त्यांच्याशी मिळून जावजीला मोहिमेवर घेऊन जाण्याचा व तिकडेच ठार मारण्याचा कट रचला. त्यानुसार त्यांनी ठरवले की बिनिवाल्याबरोबर जावजीला मोहिमेवर पाठवायचे व लढाईच्या वेळी जावजी आणि त्याचे कोळी साथीदार नावेत बसून समुद्रात गेले की मग ती नाव बुडवून त्या सर्वांना ठार करायचे. मात्र ते दोघे ब्राह्मण बिनिवाल्यास हा कट सांगत असताना जावजीच्या एका समर्थकाने ते ऐकले व त्याने लगोलग जावजीस ही खबर दिली. हे ऐकताच जावजी सावध होऊन लगोलग परत जुन्नर सोडून जंगलात पळून गेला. मात्र आता आपल्याविरुद्ध शिजविल्या जाणाऱ्या या सगळ्या कट कारस्थानांचा बदला घेण्यासाठी आणि आपला मनसबदारीचा वारसा हक्क मिळवण्यासाठी त्याने प्रयत्न करण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने लढाईसाठी आपली टोळी तयार करण्यास सुरुवात केली. आणि मग या कामासाठी पैसे मिळविण्यासाठी त्याने खंडणी गोळा करण्यास सुरुवात केली. सुभेदारास हे कळताच त्याने जावजीच्या कुटुंबीयांस कैद करून जुन्नर येथे डांबले आणि मग जावजीला पकडण्यासाठी सैन्याची एक तुकडी जंगलात रवाना केली. आता आपण सुभेदाराविरुद्ध लढल्यास तो त्याच्या कैदेत असलेल्या आपल्या कुटुंबियांच्या जीवाचे काही बरेवाईट करेल हे ओळखून जावजीने काही काळ शांत राहण्याचे ठरवले व तो गुपचूप तिथून थेट खानदेशात निघून गेला.
खानदेशात गेल्यावर काही दिवसांनी आपल्या कुटुंबाची माहिती काढण्यासाठी जावजीने आपले दोन भाऊ दादाजी आणि सूर्याजी व एक पुतण्या यांच्यासह सात जणांना जुन्नरला पाठवले. मात्र योगायोगाने हे सातही जण फिरता फिरता चुकून जावजीला पकडण्यासाठी नियुक्त केलेल्या रावजी सावंत याच्या सैन्याच्या तुकडीला सापडले. सावंतने त्यांना पकडून जुन्नरला नेले. आणि भावांना वेगवेगळे करण्यासाठी दादोजीला जुन्नरमध्ये तर सूर्याजी आणि इतर पाच जणांना चावंड किल्ल्यावर कैदेत ठेवले. जावजीला ही खबर लागताच तो खानदेशातून निघून कोतुळमध्ये आला आणि मूळा नदीच्या किनाऱ्यावर कुठेतरी लपून बसून आपल्या भावांना सोडविण्याच्या संधीची वाट पाहू लागला. सावंतने दरम्यान सुभेदाराचे कान भरून जावजीचे भाऊ जिवंत राहील्यास ते काहीतरी युक्ती करून पसार होतील व अजून त्रास देतील म्हणून त्यांना चामड्याच्या पिशव्यांत बांधून कडेलोट करावी असे सुचवले. सुभेदारानेही असे करण्याची परवानगी दिली व त्यानुसार पाच जणांना चामड्याच्या पिशव्यांत भरून त्यांची डोंगरावरून कडेलोट करण्यात आली. मात्र सूर्याजी आणि जावजीचा पुतण्या यांनी विनंती केली की आम्ही लढवय्ये आहोत तेव्हा आम्हाला असे मरण देऊ नका. त्याऐवजी आम्हाला दोन तलवारी द्या आणि मग आम्ही त्या तलवारींनी एकमेकांशी लढू व लढून दमलो की मग स्वतःच कड्यावरून खाली उडी घेऊ. मात्र यांच्या हातात शस्त्र दिल्यास हे काहीही करू शकतात हे माहित असल्याने घाबरून त्यांना फक्त दोन काठ्या देण्यात आल्या आणि मग नाईलाजाने दोघांनी त्या काठयांनी एकमेकांशी लढून शेवटी दमल्यावर एकामागोमाग एक कड्यावरून उड्या घेऊन आपले प्राण दिले.
आपले भाऊ आणि पुतण्या व इतर साथीदारांच्या दुर्दैवी मृत्यूची ही खबर जावजीला मिळताच तो अत्यंत निराश आणि हताश होऊन गेला. आता आपल्या लढाईला वा लढ़ाई करून मिळणाऱ्या मनसबदारीला काही अर्थ नसेल, असे त्याला वाटू लागले. आता लढाई वगैरे करण्यात काहीही अर्थ राहीला नसल्याने आपण शांत राहून घ्यावे असे नैराश्यपूर्ण विचार त्याच्या मनात येऊ लागले. मात्र त्याचे जिवलग मित्र देवजी भांगरे आणि धारेराव साबळे यांनी त्याला धीर दिला आणि सांगितले की आता किमान कैदेत असलेल्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी तरी असे हताश होऊन चालणार नाही. मग हे दोघे मित्र जुन्नरच्या सुभेदाराकडे गेले व स्वतःच्या हमीवर जावजी यापुढे शांत बसेल, जुन्नर प्रांतात फिरकणाराही नाही असा सुभेदारापुढे जामीन देऊन त्यांनी जावजीच्या कुटुंबीयांची सुटका करवून दिली. मात्र तरीही जावजी लपून छपून येतो आणि देवजी भांगरेला भेटतो याची कुणकुण सुभेदाराला लागली. त्याने जावजी आणि त्याच्या मित्रांच्या हालचालीवर नजर ठेवायची व्यवस्था केली. मात्र त्याने पाठविलेल्या सैन्याला काही जावजी आढळला नाही. मग त्याने देवजी भांगरेलाच कैद करून जुन्नर येथे तुरुंगात टाकले.
आपल्या मित्राला काहीही पुरावा नसताना कैद केले हे पाहून जावजी चवताळून उठला आणि मग त्याने कळंबईकडे कूच केले. मध्येच जावजीला खबर लागली की पोखरी आणि कळंबईच्या मध्ये सावंताच्या एका भावाने एक लाकडी वाडा बांधला असून तिथे तो एका गोसाव्यासोबत आपल्याला काही इजा होऊ नये म्हणून मंत्रपठण आणि अघोरी तांत्रिक पूजा करवतो आहे. जावजीला हे कळताच त्याने लगेच तिथे हल्ला केला आणि सावंत व तो गोसावी असे दोघांनाही ठार केले. जावजीने आपल्या भावाला ठार मारल्याचे कळताच राजा सावंत त्वरित पुण्यास पेशवा दरबारात गेला व त्याने जुन्नर प्रांताची घडी पूर्णपणे विस्कटली असून जावजीने पेशवे प्रशासन पूर्ण खिळखिळे करून टाकले आहे, असे खोटेनाटे आणि प्रक्षोभक आरोप करून पेशवे दरबाराने जावजीचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली. हे ऐकल्यावर नाना फडणवीसाने संतप्त होऊन सहाशे सशस्त्र सैनिकांची एक तुकडी राजा सावंतला जावजीचा बंदोबस्त करण्यासाठी दिली.
सावंत जावजीला मारण्यासाठी पेशव्यांची एवढी मोठी सशस्त्र फौज घेऊन जुन्नरला आला असला तरी जावजीही काही कच्या गुरूचा चेला नव्हता. त्याला ही खबर लागताच त्याने अत्यंत चलाखीने आपल्या सर्व सहकाऱ्यांना वेगवेगळे होण्याच्या सूचना दिल्या. एवढे मोठे सैन्य घेऊन आपल्या मागावर असलेल्या राजा सावंताला हुलकावणी देण्यासाठी मग जावजीचे सगळे साथीदार इकडे तिकडे पांगले. जावजीने आपल्याबरोबर फक्त बारा अत्यंत विश्वासू साथीदार ठेवले. आता जावजी आणि त्याचे साथीदार असे वेगवेगळ्या ठिकाणी पांगल्यामुळे राजा सावंताला कोणत्याही एका ठिकाणी आणि एका दिशेने आपली कारवाई करता येईना. अशाप्रकारे सैन्याला गुंगारा देण्यात यशस्वी झाल्यावर मग उलटे राजा सावंतलाच धडा शिकविण्यासाठी जावजीने एक योजना आखली. त्यानुसार आधी त्याने स्वतःबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरवायला सुरुवात केली जेणेकरून सावंत अजून गोंधळून जाईल. कधी तो जुन्नरच्या जवळ असल्याची अफवा पसरवे, तर कधी तो घाबरून पळून गेल्याची अफवा पसरवे, तर कधी तो कोकणात गेल्याची आवई उठवे. जावजीच्या योजनेला बळी पडून मग राजा सावंतानेही आपले सैन्य अनेक तुकड्यांत विभागून त्यांना अफवांमध्ये बोलल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी जावजीचा माग काढण्यासाठी पाठवले. पण जावजी आपल्या ठावठिकाण्याच्या इतक्या अफवा उडवत असे की कोणत्याही टोळीला कधीही तो दिसला नाही. स्वतः राजा सावंतही सैनिकांच्या सर्वात मोठ्या तुकडीबरोबर जावजीच्या शोधमोहिमेत भाग घेत असे. एव्हढी सक्षम सैन्य तुकडी दिमतीला असूनही जावजीची प्रचंड भीती असल्यामुळे राजा सावंत जिथे जाईल तिथे आपल्या सुरक्षेचा अत्यंत चोख बंदोबस्त ठेवीत असे. अगदी रात्रीच्या वेळीही आपल्यावर हल्ला होऊ नये म्हणून पहारेकऱ्यांची मजबूत व्यवस्था त्याने केलेली होती. पण जावजीही अत्यंत धूर्त होता, त्याने आपल्या गुप्तहेरांकरवी राजा सावंताचे तळ कुठे असतात, सुरक्षा व्यवस्था कशी असते, त्यात काय त्रुटी आहेत याची खडानखडा खबर काढलेली होती.
राजा सावंत एकदा आंबेगाव पठारावर तळ ठोकून होता, त्याच्या सुरक्षेचा घेराही नेहमीप्रमाणे अत्यंत मजबूत होता. मात्र जावजीने आधीच त्याच्या सुरक्षा रचनेची पूर्ण खबर काढलेली असल्याने मजबूत शिबंदी असूनही त्याने राजा सावंतावर तिथेच हल्ला करायचे ठरवले. मग एक पक्की योजना बनवून जावजीने रात्री गुपचूप त्याच्या तळावर हल्ला केला. जावजीच्या हल्ल्याच्या जबर तडाख्याने राजा सावंताचे सैन्य हादरले आणि पळून जाऊन झाडाझुडपांत लपून बसले. मग जावजीने राजा सावंत व त्याच्या बारा वर्षाच्या मुलाला पकडले. जावजी आपल्याला माफ करणार नाही हे राजा सावंताला माहीत होते, तरीही किमान आपल्या बारा वर्षांच्या मुलाला जीवदान द्यावे अशी त्याने जावजीकडे विनंती केली, मात्र माझ्या भावांना आणि छोट्या पुतण्याला मारताना तू कशी दया दाखवली नाहीस असे त्यास उलट विचारून जावजीने दोघांनाही ठार मारले. राजा सावंत पकडला गेला आहे असे कळल्यावर त्याचे पळून गेलेले काही सैनिक परत लढायला आले, त्या सर्वांनाही जावजीने यमसदनी धाडले.
राजा सावंतला आणि पर्यायाने नाना फडणवीसाला अशी धूळ चारल्यावर मग जावजी बांबळे थेट हरिश्चंद्रगडावर सुरक्षित वास्तव्यास निघून गेला. राजा सावंत मारला गेला ही खबर त्याच्या कुटुंबियांना दुसऱ्या दिवशी लागली जेव्हा राजा सावंताचा घोडा रक्तबंबाळ आणि शेपटी तोडली गेल्याच्या अवस्थेत चालत त्याच्या घरी जुन्नरला पोचला. राजा सावंताचा मुलगा लगोलग पुण्याला पेशवे दरबारात हजर झाला आणि त्याने नाना फडणवीसला हा वृत्तांत कथन केला. फडणवीस आता अत्यंत बेचैन झाला, सहाशे सशस्त्र सैनिकांची टोळी पाठवूनही जावजीने उलट राजा सावंतालाच ठार केले हे पाहून आता जावजीला संपवण्यासाठी याहून मोठी कुमक आणि मोठ्या क्षमतेची कारवाई करावी लागेल हे त्याला कळले. मग फडणवीसने राजा सावंताच्या मुलाला थेट जुन्नरची सुभेदारी बहाल केली जेणेकरून त्याला जावजीच्या बंदोबस्तासाठी अधिक अधिकार मिळाले. त्याला नाना फडणविसाने सुभेदारीची सनद देतानाच आपल्या नव्या अधिकारांचा व फौजेचा पूर्ण वापर करून जावजी बांबळेस संपविण्याची सूचना केली. मात्र राजा सावंताच्या मुलाला सुभेदारी मिळाली हे पाहून त्याच्याच कुटुंबातील काहीजण नाराज झाले. त्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा आपण जावजीला जाऊन मिळू असे त्यांनी ठरवले. मग त्यानुसार एकजण जावजीला भेटायला गेला व त्याला नव्या सुभेदाराचा काटा काढण्यास सांगितले. त्यानुसार मग जावजीने आपली माणसे पाठवली. सावंताच्या फितूर भावाने त्यांना सुभेदार सावंताचे घर दाखवले. घराजवळच एक वरात पाहत उभा असताना जावजीच्या माणसांनी नव्या सुभेदारावर हल्ला करून त्याला ठार मारले.
याच दरम्यान जावजीने राघोबादादाशी संपर्क साधायला सुरुवात केली. नाना फडणवीस आपल्यावर प्रचंड चवताळलेला असल्याने राघोबादादाला पेशवा बनण्यासाठी मदत करावी असे त्याने ठरविले. मात्र नव्या सुभेदारालाही जावजीने ठार केल्याचे समजताच नाना फडणवीस प्रचंड क्रोधीत झाला. जावजीच्या बंदोबस्तासाठी मग त्याने कोळी नाईक देवजी कोकाटे या जुन्नरच्या मोकासदाराला बोलावून घेतले व त्याला जावजीचा बंदोबस्त करायला सांगितले. कोकाटेने नाना फडणवीसाला सांगितले की मला जावजीच्या बंदोबस्तासाठी हवी ती सैन्य व इतर कुमक पेशव्यांतर्फे देण्यात यावी, जावजीस पकडले तर त्यास ठार मारण्याची लेखी परवानगी द्यावी, आणि इतकेच नाही तर बावन्न मावळातील सर्व कोळी नाईकांचे तंटे व मसलती सोडविण्याचे अधिकार लेखी देण्यात यावेत. मग नाना फडणविसाने जावजीला पकडण्याचे व मारण्याचे आदेश, इतर सैन्य व रकमेचे अधिकार तसेच ५२ मावळांतील कोळी नाईकांच्या नियंत्रणाचे अधिकार कोकाटेला लेखी स्वरूपात दिले आणि जावजीचा बंदोबस्त करण्यासाठी परत पाठवले.
प्रत्यक्ष युद्ध व सैनिक कारवाई करून जावजीसारखा धडाडीचा वीर पुरुष हाती लागू शकत नाही हे माहीत असल्याने मग कोकाटेने कपटाने जावजीस पकडण्याची योजना बनवली. एकदा कोकाटे त्याच्या तीन मुलांसकट जंगलात फिरत असताना त्याची गाठ अचानक जावजीशी पडली. कोकाटे धूर्त होता, त्याने गोड बोलून जावजीला फसवले. त्याच्यावर कसा अन्याय झाला, आणि इतर कोळी नाईकांनी कशी त्याला साथ द्यायला हवी असूनही साथ दिली नाही याची त्याने हळहळ व्यक्त केली. मी आपल्या जातीशी इमान राखून तुला न्याय मिळवून देईल अशी हमी दिली. मी तुला जुन्नरला तुझा अधिकार मिळवून देईल, तू माझ्याबरोबर चल असे त्याने जावजीला सांगितले. जावजीही कोकाटेच्या भूलथापांना बळी पडला. त्याने कोकाटेबरोबर जाण्याची तयारी दाखवली. त्यांच्यात अशाप्रकारे वार्तालाप होत असताना चालता चालता वाटेत एक नदी लागली. नदी पाहून जावजी कोकाटेला म्हणाला की आपण नदीत आधी अंघोळ करून घेऊ आणि मग पुढे जाऊ. जावजीने असे म्हंटल्यावर कोकाटेने आपला झोळणा म्हणजे पिशवी तिथेच एका झाडावर टांगून ठेवली आणि तो जावजीबरोबर अंघोळीसाठी नदीत उतरला. जावजीच्या एका मराठा सैनिकाने सहज त्या झोळण्यात पाहीले तर त्याला पेशवाईची मोहोर उमटवलेली असलेले काही कागद दिसले. त्याने जावजीचा पुतण्या काळू बांबळे याला बोलावून ते दाखवले. दोघांनी ते कागद गुपचूप बाहेर काढून वाचले. त्यात फडणवीसाने जावजीला ठार मारण्यासाठी संमती दिल्याचा दस्तऐवज होता. ते वाचल्यावर कोकाटेच्या कटाची त्यांना कल्पना आली, मग त्यांनी ते कागद परत जसेच्या तसे ठेवून, गुपचूप जावजीच्या कानावर ही गोष्ट घातली. जावजी म्हणाला की मला ही शंका होतीच त्यामुळे आता आपण यांनाही तीच वागणूक देऊ जी ते आपल्याला देणार होते. मग रात्री सगळे झोपलेले असताना जावजीने त्या चौघांनाही ठार मारले.
नाना फडणवीसाने जावजीस संपविण्याच्या अशा दोन्ही योजना धुळीस मिळविल्यानंतर काही दिवसांनी मग जावजीला राघोबादादाचा एक खलिता मिळाला. त्या खलित्यात राघोबाने जावजीला सगळे डोंगरी किल्ले जिंकून घेण्याची सूचना केली होती. राघोबा हाच खरा पेशवा आहे आणि आपल्याला त्याचा पाठिंबा आहे हे या खलित्याने सिद्ध होते असा दावा जावजीने केला त्यामुळे त्याला इतर अनेक कोळी सरदारांची साथ मिळाली. मग जावजीने आधी कोकण मोहीम हाती घेऊन सिद्धगड भैरवगड आणि कोथळीगड हे पेशव्यांकडून जिंकून घेतले. भैरवगडाच्या किल्लेदाराकडे एक अत्यंत सुंदर असे सोन्याचे कडे होते ते जावजीने हस्तगत केले. लवकरच जावजीने कोथळीगडही काबीज केला. जावजीच्या यशाची ही खबर लागताच पेशव्यांनी सेनेची एक तुकडी जुन्नरवरून जावजीशी लढण्यासाठी खाली कोकणात पाठवली. जावजीला हे कळताच त्याने हल्ल्याची वाट न पाहता स्वतःच त्या सैन्यावर हल्ला करून त्यांना अक्षरशः पळवून लावले. त्यानंतर जावजीने गोरखगडही ताब्यात घेतला.
गोरखगड घेतल्यावर जावजीला कळले की देवाजी सावंताने त्याला मारण्याची सुपारी नऊ बेरडांना (दरोडे टाकणारे आणि सुपारी घेऊन हत्या करणारे) दिली आहे, आणि वरून त्यांना प्रत्येकी एक सोन्याची अंगठीदेखील वानगीदाखल दिली आहे. पण जावजी सावध होता, त्यामुळे बेरडांना जावजीला शोधता सुद्धा आले नाही, मारणे तर दूरच. कोकणात एकामागून एक किल्ले ताब्यात घेतल्यावर मग जावजीने आपला मोर्चा आता घाटावर वळवला. त्याने रतनगडाला वेढा घातला. गोविंद खाडे हा तेव्हा रतनगडाचा किल्लेदार होता. जावजीने खाडेला सहा हजार रुपयांत किल्ला सोडण्याचा प्रस्ताव दिला, आणि गोविंद खाडे याने तो मान्य करून किल्ला जावजीच्या स्वाधीन केला. त्यानंतर जावजीने अलंग जिंकून घेतला आणि मग मदनगड त्याला स्वतःहून शरण आला. जावजीने अशा प्रकारे एकामागून एक पेशवाईचे लचके तोडल्यावर नाना फडणवीस अत्यंत खवळला व त्याने जावजीला कशाही प्रकारे पकडून त्वरीत तोफेच्या तोंडी द्यावे असे फर्मान काढले. मग नाना फडणवीसाने जावजीने जिंकलेले किल्ले परत घेण्यासाठी एक मोठी फौज रवाना केली. जावजी त्यावेळी कोकणात होता. पण नानाने पाठविलेल्या फौजेची खबर ऐकताच तो त्वरित घाटावर आला आणि त्या फौजेवर हल्ला करून त्यांचे अपरिमित नुकसान केले.
मग पेशव्यांची दुसरी एक फौज गोडबोले याच्या नेतृत्वाखाली कोकणातून वर घाटावर जावजीवर चालून आली, मात्र जावजीने त्यांच्यावरही गनिमी काव्याने हल्ले केले. अशाप्रकारे विजयामागून विजय प्राप्त करीत असला तरी आता जावजी नाना फडणविसाने पाठविलेल्या अनेक फौजांमुळे चोहीकडून वेढला जाऊ लागला होता. त्यामुळे त्याने राघोबादादास पत्र लिहून आपण पेशवे आहात आणि माझ्याशी लढायला येणारी फौजही पेशव्यांचीच आहे मग अशा प्रसंगी मी पुढे काय करावे ते विचारले. मात्र राघोबादादाने सांगितले की इंग्रजांनी त्यास जी मदत करण्याचा वायदा केला होता तो त्यांनी तोडल्याने राघोबा एकटा पडला होता. त्याने जावजीस पेशव्यांच्या सैन्याविरुद्ध लढून किल्ले राखून ठेवण्यास सांगितले. पुढे गोष्टी अनुकूल झाल्यावर मदत पाठवेल असे सांगितले. पण राघोबा स्वत:च इंग्रजांच्या नजरकैदेत आहे त्यामुळे राघोबाकडून काही अपेक्षा नाही हे कळल्यावर मात्र जावजी सावध झाला. जावजी हा फक्त वीर पुरुषच नव्हे तर अत्यंत चलाख मुत्सद्दी देखील होता. नाना फडणवीसाला आपण किती त्रास दिला आहे हे त्याला माहित होते त्यामुळे तो आपल्याला मारण्यासाठी सगळी शक्ती पणाला लावेल हेही त्याला माहित होते. म्हणूनच आता एवढ्या मोठ्या पेशवाईच्या शक्तीसमोर टिकाव धरायचा तर त्याला निर्बल झालेला राघोबा सोडून इतरांची साथ घेण्याची गरज होती. मग त्यानुसार त्याने हालचाली सुरु केल्या. धोंडू महादेव या त्याच्या मित्राला त्याने नाशिकच्या सुभेदाराकडे पाठवले तर मल्हारपूरचा पाटील भांगरे याच्याकरवी तुकोजी होळकर यांचेशी संपर्क साधला. भांगरे पाटील हा तुकोजी होळकराच्या सैन्यातला एक घोडेस्वार आणि तुकोजीचा अत्यंत विश्वासातला व जवळचा माणूस होता.
दरम्यानच्या काळात मधूनच गनिमी हल्ला करून पसार होणाऱ्या जावजीचा शोध घेण्याचे काम गोडबोलेने आपल्या फौजेसह सुरूच ठेवले होते. त्याला कळले की जावजी रतनगडावर असून तो खाली येणार आहे, तेव्हा त्याने आपल्या फौजेसह रतनगडाला वेढा दिला. कुणीही खाली जाताना दिसला की त्याला ठार मारा असे सांगून अत्यंत पक्की आणि मजबूत अशी वेढ्याची रचना त्याने केली. मात्र अंधार झाल्यावर जावजी स्वतः खाली उतरून गोडबोलेच्या फौजेला गुंगारा देऊन रातोरात रतनगडावरून पसार झाला. जावजी निघून गेल्यावर दोन दिवसांनी गोडबोलेला कळले की जावजी केव्हाच निघून गेला असून त्याने उत्तरेकडील पेशव्यांच्या गावांत खंडण्या वसूल करून जे विरोध करतील त्यांना मारण्याचा सपाटा लावला आहे.
गोडबोलेला एवढ्या मोठ्या फौजेनिशी असूनही जावजीच्या केसालाही धक्का लावता आला नाही आणि जावजी एकामागून एक किल्ले ताब्यात घेताच चालला होता हे पाहील्यावर मग नाना फडणविसाने शेवटी नाईलाजाने जावजीशी समेट करण्यासाठी संपर्क साधण्यात यावा असे आदेश देऊन आपल्या फौजा माघारी बोलावून घेतल्या. असे असले तरी जावजी आता सावध होता. जरी माघार घेतलेला दिसत असला तरी आपले प्राण घेण्यास नाना फडणवीस उतावीळ आहे हे जावजीस माहीत होते म्हणून मग तो धोंडू महादेवाने सांगितल्याप्रमाणे थेट तुकोजी होळकरास जाऊन मिळाला. तुकोजी होळकर हा पेशवाईचा अत्यंत महत्वाचा सरदार होता, आणि नाना फडणवीस त्याचा शब्द मोडू शकत नव्हता. मग तुकोजीने फडणविसास जावजीला पेशवे सरकारात सामील करून घेण्यास सांगितले, आणि त्या बदल्यात जावजीवर लोहगड ताब्यात घेण्याची मोहीम सोपवली. जावजी लोहगडावर कूच करून गेला. त्याने आपल्या तोफा लोहगडावर फिरवल्या. जावजीने एक मोक्याची जागा पाहून तिथे एक तोफ उभी केली व तिथून गडावर मारा करायला सांगितला. या तोफेचा एक गोळा नेमका किल्ल्यावरील दारुगोळ्याच्या गोदामावर पडला आणि त्याचा प्रचंड मोठा स्फोट होऊन किल्ला आरामात जावजीच्या ताब्यात आला. खुश होऊन जावजीने तोफेकऱ्यास आपल्या हातातील सोन्याचे कडे बक्षीस म्हणून दिले. दरम्यान जावजी तुकोजीचा अत्यंत जवळचा माणूस बनला. जेव्हा तुकोजी पुणे सोडून हिंदोस्थानात (उत्तरेत) गेला तेव्हा जावजीही त्याच्याबरोबर चांदूर येथे गेला. एव्हना धोंडू महादेव याने जावजीसाठी नाना फडणवीसाचे मन वळवून जावजीला विरोध करण्यात नुकसानच आहे त्याउलट त्याला आपल्यात घेतले तर त्याच्या वीरतेचा पेशवाईस फायदाच होईल असे सांगून जावजीस सरकारात सामील करून घेण्यास राजी केले होते. मग जावजीसाठी खास राजूर हा एक नवा सुभा तयार करण्यात आला. या सुभ्यात राजुरातील चाळीस गावे, महालदेशातील बावीस गावे, कोकणातील साकुर्ली जिल्ह्याची साठ गावे आणि कोकणातील इतर प्रांतातील अठ्ठावीस गावे अशी एकूण दीडशे गावे राजूर सुभ्यात आणि पर्यायाने जावजीच्या अंमलाखाली आली. सुभेदार हा पेशवाईत किंवा मध्ययुगीन भारतात, दरबारातील मंत्र्यांखालोखाल सर्वात मोठ्या दर्जाचा अधिकारी होता. आता ही सत्ता किती मोठी होती याची यावरून कल्पना यावी की त्याच वेळी जव्हारच्या गादीकडे केवळ ८३ गावे होती. म्हणजे जावजीच्या ताब्यात एका संस्थानाच्याही जवळ जवळ दुप्पट साम्राज्य आले होते. सुभ्यातील टाकेद हे गाव जावजीस त्याची वैयक्तिक जहागीर म्हणून देण्यात आले, तिथून त्याला दरवर्षी वैयक्तीक साडे आठशे रुपये मिळत. पेशवे दरबाराकडूनदेखील त्याला तनख्यात साडेतेराशे रुपये मिळत. प्रत्येक गावातूनही त्याला प्रत्येकी एक रुपया आणि तूप धान्य आदि मिळत असे. साकीरवाडीचा भांगरे आणि बारीचा खाडे हे दोघे नाईकही जावजीच्या हाताखाली नेमण्यात आले. याउपर सुभ्याच्या व्यवस्थेसाठी संगमनेर आणि सिन्नर सुभ्यांतूनही राजूरला चार ते पाच हजार रुपये वार्षिक मिळत असत.
आपल्या पराक्रमाच्या बळावर अशाप्रकारे भारतातील सर्वात मोठी शक्ती असलेल्या पेशवाईशी एकट्याने टक्कर घेऊन एकही लढाई न हरता अक्षरशः शून्यातून एखाद्या संस्थानापेक्षा मोठा सुभा मिळविणाऱ्या जावजीने अनेक वर्षे राजूर सुभ्याचा कारभार उत्तमरीतीने चालवला.
जुलै १७८९ मध्ये जव्हारच्या राणीचे म्हणणे पुणे दरबारात मांडण्यासाठी तीस घेऊन जात असताना कोतुळ येथे मुळा नदीच्या तीरावर जावजी थांबला. नदीला पूर आलेला होता, त्याच्यासोबत इष्टे नावाचा एक नाईक होता, त्या नाईकाने मुद्दाम जावजीला बहाण्याने नदीच्या खोल जागी नेले आणि तिथे त्याला पाठीमागून धक्का मारून दगडांवरून पाण्यात पाडले. पाण्यात पडल्यावरही जावजी पोहून वर निघण्याचा प्रयत्न करत असताना मग इष्टेने त्याच्या डोक्यावर प्रहार करून त्यास बेशुद्ध केले आणि अशाप्रकारे मग जावजीचा मूळेच्या पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. देशातील सर्वात बलाढ्य शत्रूशी एकट्याने लढून त्यालाच धूळ चारणाऱ्या पराक्रमी जावजीचा हा पराक्रम नक्कीच शिवाजी महाराजांसारखाच अभिमानास्पद होता. मात्र अशा अजोड पराक्रमी वीराचा त्याच्याच जवळच्या माणसाच्या फितुरीने दुर्दैवी मृत्यू झाला.
जवळ जवळ चाळीस वर्षे राजूर सुभा अस्तित्वात राहीला, त्यानंतर पेशवाई बुडाली आणि इंग्रजांनी हा सुभा आणि सुभेदारी बरखास्त करून पगारी पोलीस आणि कारकून आदि अधिकारी यांच्यातर्फे संपूर्ण प्रांताचा कारभार हाकायला सुरुवात केली. या परकीय इंग्रजांनी ठेवलेल्या नोंदींतूनच जावजी आणि त्याचा पराक्रम आज समजू शकतो. अन्यथा एतद्देशीय इतिहासकारांनी एकतर त्याला सपशेल टाळले किंवा केला तरी केवळ राघोबाचा बंडखोर साथीदार असा अल्प उल्लेख करून दुर्लक्षित ठेवले होते.