हिमालयाच्या
डोंगररांगांतल्या निबीड अरण्यात एक निसर्गपूजक गणराज्य होते.! तिथला
राजा राजमहालात नाही तर पर्णकुटीत राहत असे. तो लोकलज्जेस्तव आवश्यक
तेवढीच
वस्त्रे परिधान करत असे. त्याची राणीही अगदी त्याच्याचसारखी साधीसुधी
राहणारी होती. दक्षिण
हिमालयाकडील नागरी राज्यातील एका मोठ्या राजाची राजकन्या असूनही तिस
कोणत्याही दागिन्याचा मोह नव्हता की साजशृंगाराची हौस नव्हती. ना राजमहाल
ना राजदरबार. एका पठारावर एका मोठ्या सपाट पृष्ठभाग असलेल्या शिळेवर राजा
आपल्या राणीसोबत बसे आणि
समोरच्या माळावर मोकळ्या आभाळाखाली त्याचा दरबार भरे.! ती सपाट पृष्ठभागाची
शिळा हेच त्याचे सिंहासन आणि तो मोकळा माळ हीच त्याची राजसभा.!! राजा आणि
राणी अशा दोघांचीही आपापली अशी काही कार्यक्षेत्रे होती. त्यांचा कारभार ते
दोघेही वैयक्तिकरीत्या पाहत असत.
प्रामुख्याने दूर दक्षिणेकडील नद्यांच्या खोऱ्यांतील नागरी राज्यांमधून विविधोपयोगी
कार्यांसाठी खूप मागणी असलेल्या हिमालयातील अतिशय दुर्मिळ
वनस्पती, फलवृक्ष, पक्षी, पशु
यांचे योग्य संवर्धन करून त्यांचे विविध प्रभागांत सुयोग्य असे प्रमाण
राखणे हे राजाच्या जमातीचे मुख्य काम होते. पशु, पक्षी, वनस्पती, मानव अशा
सर्वांची मोजणी करून नोंदी ठेवणे, विशिष्ट प्रमाणात हे वृक्ष व त्यांची
उत्पादने, व विविध पशु पक्षी यांचा दक्षिणेतील मानवांच्या उपयोगासाठी
पुरवठा करणे, एखादी पशु जमात वा एखादी वनस्पती एका विभागात प्रमाणाहून अधिक
वाढली की ती जमात इतर प्रजातींस मारक ठरत असते अशा प्रजातींचे स्थलांतर
अथवा क्षालन करून प्राकृतिक समतोल कायम ठेवणे, प्रमाण कमी होत चाललेल्या
प्रजातीसाठी संवर्धन योजना राबविणे हे त्यांचे पारंपरिक काम होते.
ही कामे माणसांचे वेगवेगळ्या प्रांतांत वेगवेगळे गट बनवून विभागून देण्यात आलेली होती. या गटांना गण असे म्हणत. व्याघ्र गण वाघांचे नियोजन करी, सुरुची गण सुरुची वृक्षांचे, मेष गण मेष पशूंचे, वृषभ गण बैलांचे, हस्ती गण हत्तींचे नियोजन करत असे. सर्व गणांची आपापली प्रतिकचिन्हे होती. दोन शिंगांचा मुकुट हे वृषभ गणाचे प्रतीकचिन्ह होते तर मयूरपंखाचा शिरपेच हे मयूर गणाचे प्रतीकचिन्ह होते. अशाप्रकारे राज्यात विविध भागांत जिथे संबंधित प्रजातींचे नैसर्गिक वास्तव्य अधिक असेल त्या त्या विभागात गण प्रमुखांद्वारे पाच ते दशसहस्त्र स्त्री पुरुष गण सहकाऱ्यांच्या मदतीने सदर प्रजातीशी संबंधित कार्यभाग पार पडत असे. या सर्व गणांचे प्रमुख दर सहा महीन्यांनी राजापुढे येऊन कारभाराचा सर्व वृत्तांत सादर करीत व काही समस्या असल्यास राजाकडून त्याचे समाधान प्राप्त करीत. शेतीसाठी बैलांची, व काही धार्मिक विधींसाठी मयूरपंखांची मागणी नदी खोऱ्यांतील राज्यांतून सर्वात अधिक असल्याने वृषभ व मयूर गणाचे प्रस्थ राज्यात खूप मोठे होते. आणि वृषभ व मयूर गणाचे प्रमुख म्हणूनच नेहमी राजासमवेतच राहत असत. किंबहुना राजाचा एकमेव पुत्र हाच मयूर गणाचा प्रमुख होता.
जसा सजीव प्रजातींचा कारभार राजा बघत असे तसा विविध, धान्ये, खनिजे, मृदा, मीठ, घडीव पाषाण, धातू इत्यादी वस्तूंचे नियोजन राणी करत असे. या सर्व वस्तुंच्याही नियोजनासाठी विविध गणांचे विभाग निर्माण करण्यात आले होते, व या विभागांच्या नियोजनाचे काम हे स्त्री गणप्रमुखा पाहत असत. या स्त्री गणप्रमुखादेखील दर सहा महिन्यांनी येऊन राणीपुढे आपल्या कारभाराचा वृत्तांत सादर करत असत.
सहसा राजा राणी असा दोहोंचाही कारभार विनाव्यत्यय सुरळीतपणे चालत असे, मात्र कधी कधी उत्तर पश्चिमेकडून अश्व नावाच्या अनोळखी आणि वेगवान प्राण्यांवर आरूढ होऊन येणारे काही आक्रमक, कधीकधी उत्तर पूर्वेकडून हल्ले करणारे गोल चेहऱ्याचे गौरवर्णीय हल्लेखोर तर कधी कधी दक्षिणेकडील नद्यांच्या राज्यांतील काही विद्रोही उपद्रव देत असत. अशा वेळी मग राजा वृषभ व मयूर गणप्रमुखांच्या मदतीने युद्धकारवाई करून त्यांचे उपद्रव मोडून काढत असे.
अशाच एका वेळी सर्व स्त्री गणप्रमुखा सहा महिन्यांचा वृत्तांत सादरीकरणासाठी राणीकडे आल्या होत्या. त्याचवेळी उत्तर पश्चिमेकडून हिमालय गणराज्यावर अश्ववाहनी आक्रमकांनी मोठा हल्ला केलेला होता. त्यांच्या बंदोबस्तासाठी राजा दोन आठवड्यांपूर्वी स्वतः सैन्य घेऊन गेलेला होता. राणीच्या अर्धवार्षिक सभेच्या दिवशी राणीचा दरबारी कारभार संपल्यावर तिने नेहमीप्रमाणे इतर गणप्रमुखांना आपापल्या प्रांतात जाण्यासाठी निरोप देऊन, काहीसे दूरवरून येणाऱ्या आणि राणीची जवळची मैत्रीण असलेल्या मलत्वनी (आजचा उच्चार मुलतानी) मृदेच्या गणप्रमुखेस दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या कुटीविहारात भेटीस बोलावले. या मलत्वनी मृदेच्याच भूभागात अश्ववाहनी आक्रमकांनी हल्ला केलेला होता. आणि राजा त्यांच्या बंदोबस्तासाठी त्याच प्रांतात गेला होता. मलत्वनी मृदेत खूप औषधी गुणधर्म होते. त्या मृदेच्या लेपाने अनेक त्वचाविकार तर बरे होतच असत, पण त्वचाही अतिशय मऊशार व तेजस्वी बनत असे. मलत्वनी गणप्रमुखा 'मला' ही नेहमी येताना राणीसाठी सोबत ती मृदा घेऊन येत असे व राणीच्या पूर्ण अंगाला तिचा लेप लावून मृत्तिकोपचार करून देत असे. दुसऱ्या दिवशी सकाळी राणी आपल्या कुटीत 'मला'ची वाट पाहत होती पण ठरलेली वेळ निघून गेली तरीही 'मला' आली नाही. राणी मग थोडा वेळ अजून वाट पाहून स्वतःच गणप्रमुखांसाठी असलेल्या कुटीविहाराकडे 'मला'च्या चौकशीसाठी गेली. राणी मलत्वनी गणप्रमुखेच्या कुटीत गेली तेव्हा 'मला' एकटीच उदासपणे बसलेली होती. राणी तिच्याजवळ बसली व तिस उदास होण्याचे कारण विचारले. 'मला'ने जवळच बांधलेल्या झोळीकडे निर्देश केला. झोळीमध्ये एक बालक झोपलेले होते. 'मला'ने राणीस सांगितले की महिन्याभरापूर्वी झालेल्या अश्ववाहनी आक्रमकांच्या हल्ल्यात तिचा पती मारला गेला होता. अश्ववाहनी आक्रमक कधीही हल्ला करून समोर येतील त्या सर्वांचा शिरच्छेद करत असत. अशा हल्ल्यांच्या वेळी पतीसोबत असताना 'मला' सुरक्षित जागी पलायन करू शकत असे, मात्र आता पती नसताना आपल्या पुत्रासह असे करणे तिस शक्य नव्हते. म्हणून आपल्या मुलाच्या काळजीने ती अत्यंत दुःखात होती. यावर राणीने सांगितले की तू काहीही काळजी न करता तुझ्या बालकास माझ्या स्वाधीन कर. मी तुझ्या बालकास माझा पुत्र म्हणून दत्तक घेते आणि त्याला माझ्या पहील्या पुत्राप्रमाणेच माझ्या काळजाच्या तुकड्यासारखी सांभाळेल असे वचन देते. इथे वृषभ गणाचे मोठे वास्तव्य असल्याने त्यास या बालवयातही दूधदुभत्याचीही काही समस्या येणार नाही. त्यामुळे तू काळजी करू नकोस. इतकेच नाही तर पुढे तोही माझ्या थोरल्या पुत्राप्रमाणे पराक्रमी वीर होईल असे संगोपन आणि उच्च प्रतीचे शिक्षण त्यास मिळावे याचीही मी व्यवस्था करेन. राणीने असे म्हंटल्यावर 'मला'च्या मनावरचे दुःख हलके झाले. ती आपल्या पुत्रास राणीकडे सोपविण्यास त्यायार झाली. राणी लगेच 'मला' आणि तिच्या पुत्रास घेऊन आपल्या झोपडीकडे परत आली. झोपडीत ते बालक छान इकडे तिकडे रांगत मजेने खेळू लागले. बाहेर ओसरीवर मयूर पक्षांशी खेळण्यात रमू लागले. आपल्या मुलास इथे करमेल याची खात्री पटून मग 'मला' चांगली आनंदी झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी 'मला'ने राणीच्या अंगास तिने आणलेल्या मलत्वनी मृदेचा लेप लावून मृत्तिकोपचार सुरु केले. पहील्या प्रहरी राणीच्या अंगावर मृत्तिका लावून मग आपल्या बाळाचा निरोप घेऊन ती मलत्वन प्रांतात जाण्यास निघाली. मृत्तिकोपचारात अंगावर मलत्वनी मृत्तिकेचा लेप लावल्यानंतर दोन प्रहर होईपर्यंत तो तसाच ठेवावा लागत असे, तदनंतर तो लेप अंगावरून तुपाच्या साहाय्याने काढून टाकून मग आंघोळ करावयाची असे. 'मला' गेल्यावर मग राणी आपल्या झोपडीत स्नानगृहाजवळ तशाच अवस्थेत बसून राहिली. बाळ तिथेच ओसरीवर व बाहेरच्या भागात इकडे तिकडे रांगत खेळत होते. राणीचे बाळाकडे लक्ष होतेच, पण एकाच अवस्थेत खूप वेळ बसून राहिल्याने तिला कधी झोप लागली तेच कळले नाही.
तिकडे उत्तर पश्चिमेकडील अश्ववाहनी आक्रमकांचा मोठा बिमोड करून राजा परत आला. कुटीविहारात राजाची कुटी आणि राणीची कुटी यांची सामायिक ओसरी होती. ओसरीत आल्यावर त्याने पाहीले की राणी कुठे दिसत नाही. युद्ध मोहिमेनंतर रात्रभर वृषभवाहनांत प्रवास करून आल्यावर तोही दमला होता. त्यामुळे राणीस आत जाऊन न शोधता त्याने घाईघाईने त्याची शस्त्रे शस्त्रागारात ठेवण्याऐवजी तिथेच ओसरीत भिंतीला टेकवून ठेवली आणि तो त्याच्या कुटीत स्नानासाठी गेला. तो आपल्या कुटीत पोचला आणि स्नानासाठी पाणी तयार करून तो स्नानास बसणार तोच त्याला बाहेर ओसरीवरून आपले एक शस्त्र खाली पडल्याचा आवाज आला. आपण शस्त्रागारात शस्त्र ठेवण्यास विसरलो हे त्याच्या लक्षात आले आणि लगोलग तो शस्त्रे शस्त्रागारात ठेवून देण्यासाठी स्नान सुरु न करताच ओसरीकडे आला.
ओसरीवर येऊन बघतो तर काय.!! ते खाली पडलेले शस्त्र एका बालकाच्या मानेवर पडून त्या बालकाची मान धडावेगळी झाली होती व ते बालक रक्ताच्या थारोळ्यात तिथे मृत्युमुखी पडले होते. राजाने घाईघाईत केलेली एक साधी चूक त्या बालकाच्या जीवावर बेतली होती. शस्त्रागार जवळच असल्याने त्याच वेळी तिथे वृषभ आणि मयूर गणप्रमुखही आपली शस्त्रे ठेवण्यासाठी येऊन पोचले. त्या मृत बालकाचा देह त्यांनीही पाहिला. ते बालक रांगत रांगत त्या शस्त्रांजवळ गेले असणार आणि ती ओसरीला टेकवून ठेवलेली शस्त्रे पकडण्याच्या नादात एक शस्त्र नेमके त्याच्या अंगावर पडले असणार हे स्पष्ट दिसत होते. हे बालक कुणाचे आहे आणि आपल्या ओसरीत कसे आले हे राजास कळेना. तेवढ्यात शेजारच्या झोपडीतून वृषभ गणप्रमुखाची पत्नी बाहेर आली. तिने सांगितले की राणी 'मला'च्या मृत्तिकोपचारानुसार अंगावर मृत्तिकेचा लेप लावून बसलेली असून थोड्यावेळाने ती अंगावरून ती माती काढून आंघोळ करून तयार होऊन मगच आपल्या पुत्रास घेण्यासाठी बाहेर येईल. हा 'मला'चा पुत्र असून या बालकास राणीने त्याच्या जीवनाच्या रक्षणासाठी कालच दत्तक घेतले आहे. त्यामुळे मयत बालक हा राजाचा स्वतःचाच पुत्र आहे. राजा हे ऐकून अत्यंत चिंतातुर झाला. राणीने त्या बालकाच्या जीवित रक्षणाची हमी देऊन त्यास दत्तक घेतले होते आणि अपघाताने का होईना पण आईपासून दूर झाल्यानंतर काही क्षणांतच त्या बालकाचा मृत्यू ओढवला होता. ही बाब राणीच्या आणि पर्यायाने राजाच्याही वचनबद्धतेस आणि विश्वासार्हतेस कमीपणा आणणारी होती. राणी जेव्हा स्नानगृहातून बाहेर येईल तेव्हा तिला हे कळल्यास ती प्रचंड क्रोधीत होईल आणि मग क्रोधात ती कोणतेही पाऊल उचलू शकेल हे राजाला चांगले ठाऊक होते. अंगावर माती लावलेल्या राणीला बाहेर येण्यास अजून दीडेक प्रहर समय होता. ती बाहेर यायच्या आत काहीतरी केले पाहीजे हे त्याने ठरविले. मग त्याने तात्काळ 'मला'च्या पुत्राचा देह पुरण्याची व्यवस्था केली आणि वृषभ गणाच्या प्रमुखास सांगितले की त्वरीत आपल्या गणांतील सर्वात चपळ आणि हुशार गणांची एक तुकडी दक्षिणेस रवाना कर व समोर ज्यांची वस्ती भेटेल अशा कोणत्याही गणांतून जिथे एक सहा सात महिन्यांचे अनाथ बालक सर्वप्रथम मिळेल ते त्वरीत घेऊन या. हे काम राणी स्नानगृहातून बाहेर येण्याच्या आधी झाले पाहिजे अशी त्याने ताकीद दिली. आपण तेच बालक राणीने दत्तक घेतलेला 'मला'चा पुत्र म्हणून इथे वाढवू असे त्याने सांगितले. पाच सहा महिन्यांची सगळीच बालके समान दिसत असतात. त्यामुळे बालक बदलले गेले आहे हे राणीस आणि सहा महीन्यांनी येणाऱ्या 'मला'स देखील कळणार नाही हे राजास ठाऊक होते. त्यामुळे राणीवर वचनभंगाचे लांछन येणार नाही आणि ती क्रोधीत होऊन काही नुकसानदायी कृत्य करणार नाही यासाठी ही युक्ती करण्याचे त्याने ठरवले. राजाने उपस्थित सर्वांकडून राणीपुढे याची कुणीही वाच्यता करणार नाही याचे वचन घेतले. आणि मग क्षणाचाही विलंब न करता आपल्या सर्वोत्तम गणांची एक तुकडी घेऊन वृषभ गणप्रमुख दक्षिणेकडे निघाला.
जवळजवळ एक प्रहर उलटून गेल्यावर वृषभ गणप्रमुख आणि त्याची तुकडी एका बालकास घेऊन परत आले. हे बालक शरीरयष्टी आणि चेहऱ्याने अगदी त्या मृत बालकासारखेच दिसत होते. तिथे आणल्यावर त्या बालकास त्वरित मृत बालकाप्रमाणेच वस्त्रे आणि तसेच अलंकार परिधान करविण्यात आले आणि मग त्यास परत ओसरीवर खेळण्यासाठी सोडून दिले. वृषभ गणप्रमुखाने सांगितले की दूर दक्षिणेकडील हत्तीवनात हस्तीगणाचा प्रमुख दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या अश्ववाहनी आक्रमकांविरुद्ध केलेल्या मोहीमेदरम्यान मृत्युमुखी पावला होता. त्याचे हे बालक असून या बालकाच्या मातेचे प्रसूतीसमयीच निधन झाले होते. हस्ती गणप्रमुखाची बहीण त्याचा सांभाळ करत होती, तिने आनंदाने त्या बालकास वृषभ गणप्रमुखाच्या हवाली केले.
राणी बाहेर आल्यावर तिने आपल्याला परत एकदा पालकत्वाचे सुख दिले या आनंदाप्रीत्यर्थ राजाने त्या बालकास त्याच समयी या शिशुवयातच हस्ती गणाचा प्रमुख म्हणून घोषित केले. व हस्तीगणाचे चिन्ह असलेली चामड्याची बनवलेली छोटी हत्तीची सोंड हारात गुंफून त्याच्या गळ्यात घातली. त्या बालकाचा पुढे दोघा राजा राणींनी आपल्या थोरल्या मुलापेक्षा अधिक लाडाने सांभाळ केला. ते बालक अतिशय बुद्धिमान आणि पराक्रमी म्हणून लौकिकास पावले आणि मोठे झाल्यावर आपली हुशारी आणि पराक्रमाच्या जोरावर गणराज्यातील सर्व गणप्रमुखांचा पहीला नेता बनले. यापूर्वी सर्व गणप्रमुखांचा मिळून असा कोणीही अधिपती नव्हता. राजा आणि राणी या दोहोंच्या अधिकारात असलेल्या सर्व गणांचे अधिपत्य त्याला मिळाले आणि मग तो 'मला'चा पुत्र, हत्तीगणाचा प्रमुख बालक सर्व गणांचा सर्वाधिपती म्हणजेच गणपती म्हणून प्रसिद्ध झाला.
ही कामे माणसांचे वेगवेगळ्या प्रांतांत वेगवेगळे गट बनवून विभागून देण्यात आलेली होती. या गटांना गण असे म्हणत. व्याघ्र गण वाघांचे नियोजन करी, सुरुची गण सुरुची वृक्षांचे, मेष गण मेष पशूंचे, वृषभ गण बैलांचे, हस्ती गण हत्तींचे नियोजन करत असे. सर्व गणांची आपापली प्रतिकचिन्हे होती. दोन शिंगांचा मुकुट हे वृषभ गणाचे प्रतीकचिन्ह होते तर मयूरपंखाचा शिरपेच हे मयूर गणाचे प्रतीकचिन्ह होते. अशाप्रकारे राज्यात विविध भागांत जिथे संबंधित प्रजातींचे नैसर्गिक वास्तव्य अधिक असेल त्या त्या विभागात गण प्रमुखांद्वारे पाच ते दशसहस्त्र स्त्री पुरुष गण सहकाऱ्यांच्या मदतीने सदर प्रजातीशी संबंधित कार्यभाग पार पडत असे. या सर्व गणांचे प्रमुख दर सहा महीन्यांनी राजापुढे येऊन कारभाराचा सर्व वृत्तांत सादर करीत व काही समस्या असल्यास राजाकडून त्याचे समाधान प्राप्त करीत. शेतीसाठी बैलांची, व काही धार्मिक विधींसाठी मयूरपंखांची मागणी नदी खोऱ्यांतील राज्यांतून सर्वात अधिक असल्याने वृषभ व मयूर गणाचे प्रस्थ राज्यात खूप मोठे होते. आणि वृषभ व मयूर गणाचे प्रमुख म्हणूनच नेहमी राजासमवेतच राहत असत. किंबहुना राजाचा एकमेव पुत्र हाच मयूर गणाचा प्रमुख होता.
जसा सजीव प्रजातींचा कारभार राजा बघत असे तसा विविध, धान्ये, खनिजे, मृदा, मीठ, घडीव पाषाण, धातू इत्यादी वस्तूंचे नियोजन राणी करत असे. या सर्व वस्तुंच्याही नियोजनासाठी विविध गणांचे विभाग निर्माण करण्यात आले होते, व या विभागांच्या नियोजनाचे काम हे स्त्री गणप्रमुखा पाहत असत. या स्त्री गणप्रमुखादेखील दर सहा महिन्यांनी येऊन राणीपुढे आपल्या कारभाराचा वृत्तांत सादर करत असत.
सहसा राजा राणी असा दोहोंचाही कारभार विनाव्यत्यय सुरळीतपणे चालत असे, मात्र कधी कधी उत्तर पश्चिमेकडून अश्व नावाच्या अनोळखी आणि वेगवान प्राण्यांवर आरूढ होऊन येणारे काही आक्रमक, कधीकधी उत्तर पूर्वेकडून हल्ले करणारे गोल चेहऱ्याचे गौरवर्णीय हल्लेखोर तर कधी कधी दक्षिणेकडील नद्यांच्या राज्यांतील काही विद्रोही उपद्रव देत असत. अशा वेळी मग राजा वृषभ व मयूर गणप्रमुखांच्या मदतीने युद्धकारवाई करून त्यांचे उपद्रव मोडून काढत असे.
अशाच एका वेळी सर्व स्त्री गणप्रमुखा सहा महिन्यांचा वृत्तांत सादरीकरणासाठी राणीकडे आल्या होत्या. त्याचवेळी उत्तर पश्चिमेकडून हिमालय गणराज्यावर अश्ववाहनी आक्रमकांनी मोठा हल्ला केलेला होता. त्यांच्या बंदोबस्तासाठी राजा दोन आठवड्यांपूर्वी स्वतः सैन्य घेऊन गेलेला होता. राणीच्या अर्धवार्षिक सभेच्या दिवशी राणीचा दरबारी कारभार संपल्यावर तिने नेहमीप्रमाणे इतर गणप्रमुखांना आपापल्या प्रांतात जाण्यासाठी निरोप देऊन, काहीसे दूरवरून येणाऱ्या आणि राणीची जवळची मैत्रीण असलेल्या मलत्वनी (आजचा उच्चार मुलतानी) मृदेच्या गणप्रमुखेस दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या कुटीविहारात भेटीस बोलावले. या मलत्वनी मृदेच्याच भूभागात अश्ववाहनी आक्रमकांनी हल्ला केलेला होता. आणि राजा त्यांच्या बंदोबस्तासाठी त्याच प्रांतात गेला होता. मलत्वनी मृदेत खूप औषधी गुणधर्म होते. त्या मृदेच्या लेपाने अनेक त्वचाविकार तर बरे होतच असत, पण त्वचाही अतिशय मऊशार व तेजस्वी बनत असे. मलत्वनी गणप्रमुखा 'मला' ही नेहमी येताना राणीसाठी सोबत ती मृदा घेऊन येत असे व राणीच्या पूर्ण अंगाला तिचा लेप लावून मृत्तिकोपचार करून देत असे. दुसऱ्या दिवशी सकाळी राणी आपल्या कुटीत 'मला'ची वाट पाहत होती पण ठरलेली वेळ निघून गेली तरीही 'मला' आली नाही. राणी मग थोडा वेळ अजून वाट पाहून स्वतःच गणप्रमुखांसाठी असलेल्या कुटीविहाराकडे 'मला'च्या चौकशीसाठी गेली. राणी मलत्वनी गणप्रमुखेच्या कुटीत गेली तेव्हा 'मला' एकटीच उदासपणे बसलेली होती. राणी तिच्याजवळ बसली व तिस उदास होण्याचे कारण विचारले. 'मला'ने जवळच बांधलेल्या झोळीकडे निर्देश केला. झोळीमध्ये एक बालक झोपलेले होते. 'मला'ने राणीस सांगितले की महिन्याभरापूर्वी झालेल्या अश्ववाहनी आक्रमकांच्या हल्ल्यात तिचा पती मारला गेला होता. अश्ववाहनी आक्रमक कधीही हल्ला करून समोर येतील त्या सर्वांचा शिरच्छेद करत असत. अशा हल्ल्यांच्या वेळी पतीसोबत असताना 'मला' सुरक्षित जागी पलायन करू शकत असे, मात्र आता पती नसताना आपल्या पुत्रासह असे करणे तिस शक्य नव्हते. म्हणून आपल्या मुलाच्या काळजीने ती अत्यंत दुःखात होती. यावर राणीने सांगितले की तू काहीही काळजी न करता तुझ्या बालकास माझ्या स्वाधीन कर. मी तुझ्या बालकास माझा पुत्र म्हणून दत्तक घेते आणि त्याला माझ्या पहील्या पुत्राप्रमाणेच माझ्या काळजाच्या तुकड्यासारखी सांभाळेल असे वचन देते. इथे वृषभ गणाचे मोठे वास्तव्य असल्याने त्यास या बालवयातही दूधदुभत्याचीही काही समस्या येणार नाही. त्यामुळे तू काळजी करू नकोस. इतकेच नाही तर पुढे तोही माझ्या थोरल्या पुत्राप्रमाणे पराक्रमी वीर होईल असे संगोपन आणि उच्च प्रतीचे शिक्षण त्यास मिळावे याचीही मी व्यवस्था करेन. राणीने असे म्हंटल्यावर 'मला'च्या मनावरचे दुःख हलके झाले. ती आपल्या पुत्रास राणीकडे सोपविण्यास त्यायार झाली. राणी लगेच 'मला' आणि तिच्या पुत्रास घेऊन आपल्या झोपडीकडे परत आली. झोपडीत ते बालक छान इकडे तिकडे रांगत मजेने खेळू लागले. बाहेर ओसरीवर मयूर पक्षांशी खेळण्यात रमू लागले. आपल्या मुलास इथे करमेल याची खात्री पटून मग 'मला' चांगली आनंदी झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी 'मला'ने राणीच्या अंगास तिने आणलेल्या मलत्वनी मृदेचा लेप लावून मृत्तिकोपचार सुरु केले. पहील्या प्रहरी राणीच्या अंगावर मृत्तिका लावून मग आपल्या बाळाचा निरोप घेऊन ती मलत्वन प्रांतात जाण्यास निघाली. मृत्तिकोपचारात अंगावर मलत्वनी मृत्तिकेचा लेप लावल्यानंतर दोन प्रहर होईपर्यंत तो तसाच ठेवावा लागत असे, तदनंतर तो लेप अंगावरून तुपाच्या साहाय्याने काढून टाकून मग आंघोळ करावयाची असे. 'मला' गेल्यावर मग राणी आपल्या झोपडीत स्नानगृहाजवळ तशाच अवस्थेत बसून राहिली. बाळ तिथेच ओसरीवर व बाहेरच्या भागात इकडे तिकडे रांगत खेळत होते. राणीचे बाळाकडे लक्ष होतेच, पण एकाच अवस्थेत खूप वेळ बसून राहिल्याने तिला कधी झोप लागली तेच कळले नाही.
तिकडे उत्तर पश्चिमेकडील अश्ववाहनी आक्रमकांचा मोठा बिमोड करून राजा परत आला. कुटीविहारात राजाची कुटी आणि राणीची कुटी यांची सामायिक ओसरी होती. ओसरीत आल्यावर त्याने पाहीले की राणी कुठे दिसत नाही. युद्ध मोहिमेनंतर रात्रभर वृषभवाहनांत प्रवास करून आल्यावर तोही दमला होता. त्यामुळे राणीस आत जाऊन न शोधता त्याने घाईघाईने त्याची शस्त्रे शस्त्रागारात ठेवण्याऐवजी तिथेच ओसरीत भिंतीला टेकवून ठेवली आणि तो त्याच्या कुटीत स्नानासाठी गेला. तो आपल्या कुटीत पोचला आणि स्नानासाठी पाणी तयार करून तो स्नानास बसणार तोच त्याला बाहेर ओसरीवरून आपले एक शस्त्र खाली पडल्याचा आवाज आला. आपण शस्त्रागारात शस्त्र ठेवण्यास विसरलो हे त्याच्या लक्षात आले आणि लगोलग तो शस्त्रे शस्त्रागारात ठेवून देण्यासाठी स्नान सुरु न करताच ओसरीकडे आला.
ओसरीवर येऊन बघतो तर काय.!! ते खाली पडलेले शस्त्र एका बालकाच्या मानेवर पडून त्या बालकाची मान धडावेगळी झाली होती व ते बालक रक्ताच्या थारोळ्यात तिथे मृत्युमुखी पडले होते. राजाने घाईघाईत केलेली एक साधी चूक त्या बालकाच्या जीवावर बेतली होती. शस्त्रागार जवळच असल्याने त्याच वेळी तिथे वृषभ आणि मयूर गणप्रमुखही आपली शस्त्रे ठेवण्यासाठी येऊन पोचले. त्या मृत बालकाचा देह त्यांनीही पाहिला. ते बालक रांगत रांगत त्या शस्त्रांजवळ गेले असणार आणि ती ओसरीला टेकवून ठेवलेली शस्त्रे पकडण्याच्या नादात एक शस्त्र नेमके त्याच्या अंगावर पडले असणार हे स्पष्ट दिसत होते. हे बालक कुणाचे आहे आणि आपल्या ओसरीत कसे आले हे राजास कळेना. तेवढ्यात शेजारच्या झोपडीतून वृषभ गणप्रमुखाची पत्नी बाहेर आली. तिने सांगितले की राणी 'मला'च्या मृत्तिकोपचारानुसार अंगावर मृत्तिकेचा लेप लावून बसलेली असून थोड्यावेळाने ती अंगावरून ती माती काढून आंघोळ करून तयार होऊन मगच आपल्या पुत्रास घेण्यासाठी बाहेर येईल. हा 'मला'चा पुत्र असून या बालकास राणीने त्याच्या जीवनाच्या रक्षणासाठी कालच दत्तक घेतले आहे. त्यामुळे मयत बालक हा राजाचा स्वतःचाच पुत्र आहे. राजा हे ऐकून अत्यंत चिंतातुर झाला. राणीने त्या बालकाच्या जीवित रक्षणाची हमी देऊन त्यास दत्तक घेतले होते आणि अपघाताने का होईना पण आईपासून दूर झाल्यानंतर काही क्षणांतच त्या बालकाचा मृत्यू ओढवला होता. ही बाब राणीच्या आणि पर्यायाने राजाच्याही वचनबद्धतेस आणि विश्वासार्हतेस कमीपणा आणणारी होती. राणी जेव्हा स्नानगृहातून बाहेर येईल तेव्हा तिला हे कळल्यास ती प्रचंड क्रोधीत होईल आणि मग क्रोधात ती कोणतेही पाऊल उचलू शकेल हे राजाला चांगले ठाऊक होते. अंगावर माती लावलेल्या राणीला बाहेर येण्यास अजून दीडेक प्रहर समय होता. ती बाहेर यायच्या आत काहीतरी केले पाहीजे हे त्याने ठरविले. मग त्याने तात्काळ 'मला'च्या पुत्राचा देह पुरण्याची व्यवस्था केली आणि वृषभ गणाच्या प्रमुखास सांगितले की त्वरीत आपल्या गणांतील सर्वात चपळ आणि हुशार गणांची एक तुकडी दक्षिणेस रवाना कर व समोर ज्यांची वस्ती भेटेल अशा कोणत्याही गणांतून जिथे एक सहा सात महिन्यांचे अनाथ बालक सर्वप्रथम मिळेल ते त्वरीत घेऊन या. हे काम राणी स्नानगृहातून बाहेर येण्याच्या आधी झाले पाहिजे अशी त्याने ताकीद दिली. आपण तेच बालक राणीने दत्तक घेतलेला 'मला'चा पुत्र म्हणून इथे वाढवू असे त्याने सांगितले. पाच सहा महिन्यांची सगळीच बालके समान दिसत असतात. त्यामुळे बालक बदलले गेले आहे हे राणीस आणि सहा महीन्यांनी येणाऱ्या 'मला'स देखील कळणार नाही हे राजास ठाऊक होते. त्यामुळे राणीवर वचनभंगाचे लांछन येणार नाही आणि ती क्रोधीत होऊन काही नुकसानदायी कृत्य करणार नाही यासाठी ही युक्ती करण्याचे त्याने ठरवले. राजाने उपस्थित सर्वांकडून राणीपुढे याची कुणीही वाच्यता करणार नाही याचे वचन घेतले. आणि मग क्षणाचाही विलंब न करता आपल्या सर्वोत्तम गणांची एक तुकडी घेऊन वृषभ गणप्रमुख दक्षिणेकडे निघाला.
जवळजवळ एक प्रहर उलटून गेल्यावर वृषभ गणप्रमुख आणि त्याची तुकडी एका बालकास घेऊन परत आले. हे बालक शरीरयष्टी आणि चेहऱ्याने अगदी त्या मृत बालकासारखेच दिसत होते. तिथे आणल्यावर त्या बालकास त्वरित मृत बालकाप्रमाणेच वस्त्रे आणि तसेच अलंकार परिधान करविण्यात आले आणि मग त्यास परत ओसरीवर खेळण्यासाठी सोडून दिले. वृषभ गणप्रमुखाने सांगितले की दूर दक्षिणेकडील हत्तीवनात हस्तीगणाचा प्रमुख दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या अश्ववाहनी आक्रमकांविरुद्ध केलेल्या मोहीमेदरम्यान मृत्युमुखी पावला होता. त्याचे हे बालक असून या बालकाच्या मातेचे प्रसूतीसमयीच निधन झाले होते. हस्ती गणप्रमुखाची बहीण त्याचा सांभाळ करत होती, तिने आनंदाने त्या बालकास वृषभ गणप्रमुखाच्या हवाली केले.
राणी बाहेर आल्यावर तिने आपल्याला परत एकदा पालकत्वाचे सुख दिले या आनंदाप्रीत्यर्थ राजाने त्या बालकास त्याच समयी या शिशुवयातच हस्ती गणाचा प्रमुख म्हणून घोषित केले. व हस्तीगणाचे चिन्ह असलेली चामड्याची बनवलेली छोटी हत्तीची सोंड हारात गुंफून त्याच्या गळ्यात घातली. त्या बालकाचा पुढे दोघा राजा राणींनी आपल्या थोरल्या मुलापेक्षा अधिक लाडाने सांभाळ केला. ते बालक अतिशय बुद्धिमान आणि पराक्रमी म्हणून लौकिकास पावले आणि मोठे झाल्यावर आपली हुशारी आणि पराक्रमाच्या जोरावर गणराज्यातील सर्व गणप्रमुखांचा पहीला नेता बनले. यापूर्वी सर्व गणप्रमुखांचा मिळून असा कोणीही अधिपती नव्हता. राजा आणि राणी या दोहोंच्या अधिकारात असलेल्या सर्व गणांचे अधिपत्य त्याला मिळाले आणि मग तो 'मला'चा पुत्र, हत्तीगणाचा प्रमुख बालक सर्व गणांचा सर्वाधिपती म्हणजेच गणपती म्हणून प्रसिद्ध झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा