रान-वनातून हिरवी धून, आला ऊन-पावसाचा सण..
धुक्या-पावसात घाटघरचे, असेल फुलले नवयौवन.!!
पडले असतील ओल्या वाटांना, पांथस्थांचे मोह..
काठोकाठ भरून बसले असतील.. प्रवरेचे डोह..!!
उनाड झरा कोणी मारीत असेल, डोंगरावरून उड्या..
शेकोट्यात भुरभुरत असतील, ओल्या वाळक्या काड्या..!!
कालच स्वप्नात घातली होती, ओढ्या-नाल्यांनी साद..
साधला नाहीस म्हणे, किती दिवस संवाद..!!
आलो म्हणालो.. जोडू पुन्हा, फिरस्त्यांचे दल..
परत रंगवू जुनी आपली.. वेडी रानमैफल..!!
खुप छान....नक्कीच निसर्ग साद घालत आहे!!!
उत्तर द्याहटवा