हा ब्लॉग शोधा

बुधवार, ३१ जुलै, २०१३

अभंग

हाती ब्युरेट, पीपेट, बीकरे।। आम्ही विठोबाची लेकरे।।धृ।।

सॉल्वेंट आणि सोल्युशने।। विज्ञाननिष्ठांची भूषणे।।
कशास जन देत दूषणे।। नास्तिकतेची।।१।।

जगी दुर्जनांचा साह।। जसा ऍसिडाचा दाह।।
तू रे ऑक्सिजनचा प्रवाह।। बा विठ्ठला।।२।।

तू विश्वव्यापी विराट।। आमचे इवले मेगा-गीगा बाईट।।
ही हार्डडिस्क पायीची वीट।। तुझिया व्हावी।।३।।

माझी ही जी लॅबोरेटरी।। झालीसे तीच पंढरी।।
प्रेरणा होय तूच अंतरी।। अस्मादिकाच्या।।४।।

हाती ब्युरेट, पीपेट, बीकरे।। आम्ही विठोबाची लेकरे।।

कोशिश


...
काल एक कपल भेटले. इनफ़ॅक्ट एक ट्रिपल..!! बाप, आई अन मुलगा..!!!
बाप जन्मजात बहिरा. आणि म्हणूनच 'अव्यंग साथीदार मिळण्याचा त्यास अधिकारच नव्हे', या जगरहाटीच्या क्रूर न्यायानुसार आईदेखील जन्मजात बहिरी.!! कधी शब्दच कानावर न पडल्यामुळे दोघांनाही आपसूक मिळालेले मुकेपण..!! बाप बऱ्यापैकी हुशार.. म्हणून सुखेनैव राहता यावे एवढा पगार असणारी नोकरी.!! मुल होण्यापूर्वी दोघांनीही कान तपासून घेतले. मग श्रवणयंत्रे मिळाली. आणि कोण आश्चर्य..!! आता दोघांनाही बऱ्यापैकी ऐकू येऊ लागले.! पण भाषेचा प्रश्न आलाच.! तशी बऱ्यापैकी शाळा शिकल्याने मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा अवगत झालेल्या… पण फक्त अक्षरओळखीने..!! शब्द मनात, मात्र ओठांवर येत नाहीत.. उच्चार करता येत नाही..!! मग त्यावरही मात करून भाषाउच्चार तज्ञांच्या मदतीने दोघांनी बोलायला सुरुवात केली. पण अडखळत अडखळतच..!! प्रत्येक शब्द दोन-दोनदा उच्चारावा लागत होता. मध्येच जिभेचे गुंतणे वगैरे.. आईची प्रगती त्यामानाने बरी. ती थोडी कमी अडखळत होती. संवाद हा शब्दांचा आधार घेत, मात्र खाणा-खुणांच्या भाषेतच अधिक..!!
..
पेडियाट्रीशियनकडे दोघे आत आले तेव्हा मुल झोपलेले होते. खत्रूड रीशेप्शनिष्टने वैतागलेला चेहरा करून आणि जरूर नसताना त्रासिकसे जोरजोरात ओरडून फॉर्म भरून घेतला. थोड्या वेळाने ४-५ वर्षांचे ते मुल रडत रडत उठले. माझ्या मनात आले, मुलाला ऐकू/बोलता येत असेल? पण त्याने रडून होताच हाताचा अंगठा डोक्याला लावून आईला काहीतरी विचारले (हाताचा अंगठा कपाळास लावणे ही वडिलांसाठीची सांकेतिक खुण होय). आईने दूर बसलेल्या बापाकडे निर्देश केला, आणि मग मुलाच्या चेहऱ्यावर एक छानसे स्मित उमटले. मग बराच वेळ फक्त उंहू उंहू आणि हसणे खिदळणे चालू होते. अनुवान्शिकतेने सावकाराच्या कर्जासारखे आईबापाचे व्यंग मुलातही आले होते? दोघांपैकी एकजण जरी नॉर्मल असते तरी मुलाला कदाचित.......
...थोड्या वेळाने टोकनच्या डिस्प्लेचा 'टिंग टिंग' आवाज झाला, आणि त्यावरचा नंबर बदलला. मुलाने त्या नव्या आवाजाच्या दिशेने दचकुन पाहिले, आणि जोरात ओरडला "मम्मा ते बघ, थ्ली वन वन"
..
आई, बापही तूच अन पुंडलिकदेखील तूच. पांडुरंगा तू महान कृपाळू आहेस बाबा. पहिल्यांदा आषाढीच्या दिवशी एक नितांतसुंदर अन परमानंद देणारा अभंग ऐकविलास. त्या अभंगाचे बोल होते…
"थ्ली वन वन"

गुरुवार, ४ जुलै, २०१३

बीत गया

कब मिली, कब ढली ज़िंदगी याद नही..
पचास सालका सफ़र इक लम्हासा बीत गया..!!

बस कशमकश में रहे संजने-संवरने की,
और बिना मनाए हर जलसा बीत गया..!!

शब और सहर में ही उलझी रही
उमर,
हर एक आज हमारा, कलसा बीत गया..!!

रोज़गार का क़ानून चर्चा में फँसा रहा,
बच्चोंकी भूख में बचा-बचाया, पैसा बीत गया..!!

घर बह गये हज़ारोंके, तो वो रिपोर्टर बहुत रोया..
"हाय बिना फुटेजके ही ये हादसा बीत गया..!!"

चंद अच्छी बातें सुनूँ तो शायद चैन आये..
मगर पिछले मोड़ पर ही, मदरसा बीत गया..!!

उसका दीदार भी काले बादल जैसा,
मिनट दो मिनटभर बरसा.... बीत गया..!!!

हम तो हारे मगर वो भी कहां जीत पाया..
बिना नतीजे के ये किस्सा बीत गया..!!

कुछ इस तरह की उसने बेवफ़ाई कि,
यकीं तो हुआ मगर, भरोसा बीत गया..!!!

अब एहसास नही होता, या आदतसी हो गयी..
मनाया भी नही और हमारा, गुस्सा बीत गया..!!

दुख तो पहले भी था मगर अब,
तेरे बाजुओंसे लिपटने का, दिलासा बीत गया..!!

इश्क सूना है हँसाता है, और रुलाता भी..
हमें तो हँसाए हुए, अरसा बीत गया..!!

कलयुग में किस पयम्बर को पुकारता है 'अस्मादिक'..
दो हज़ार साल पहले ही ईसां बीत गया..!!

(शब-night, सहर-morning)
(पयम्बर=prophet, ईसां=Jesus Christ)

मंगळवार, २ जुलै, २०१३

गढुळ


राम म्हणाला, "लक्ष्मणा.! आज कमंडलूतले पाणी गढूळसे आहे.
आचमन कसे घ्यावे?
कावडीचे जलही तांबडेसे दिसते.
जानकीने अन्न कसे शिजवावे?"

लक्ष्मण म्हणाला, "देवा, गेली चौदा लाख युगे,
हा सह्याद्रि वनवास भोगतो आहे..
अन् पुन्हा एकदा जगत्कल्याणास्तव,
वरुणराजास अंगाखांद्यावर घेऊन नाचतो आहे..!!"

"हिरव्या साजात सजला आहे,
मेघांचे उत्तरिय ल्याला आहे..!!
कित्येक गंगा शिरी धारणारा,
जणु दुसरा सांब भोळा आहे..!!"

"पण राघवा, कितीही दृढ महापुरुष असला तरीही,
काळजात कुठेतरी असतोच ना पीळ..
हलाहल प्राशतो म्हणणारांचाही,
कंठ होतोच ना नीळ..!!!"

"घामांच्या धारा असोत वा खळाळते निर्झर,
आतली वेदना ज्याची त्यालाच कळते..!!
म्हणूनच रघुनन्दना, या राकट पर्वताचेही
अमृत होऊन वाहण्यापूर्वी, पाणी जरा गढुळते..."