पुन्या भगत. हीच ओळख होती त्याची. पुनाजी भांगरे हा माणूस माझ्यासाठी
नेहमीच एक अतर्क्य, गूढ आणि भीतीदायक व्यक्ती राहिलेला आहे. त्याच्या बद्दल अशी भीती वाटण्याला कारणही तसेच घडले होते. खूप लहानपणी
एकदा मी रात्री नदीवरून गावात येत होतो, अंधार होता. बहुदा अमावस्या असावी.
बरोबर माझे नाना होते. चालता चालता पुढे वाटेवरच्या पिंपळाच्या झाडाखाली मला लांबूनच एक टेंभा पेटलेला दिसला. मी नानांना तो दाखविला, आणि विचारले, "नाना येवढ्या रात्री झाडाखाली कोन्ही टेंभा लावला
आसंल?" नाना म्हणाले, "तो येडा पुन्या आसंल. मुठ नाहीतर करणी करीत आसंल कोणावं
तरी." मी म्हंटले "त्ये काय असतंय?" "आरं त्यो तेच्या तंतर अन मंतराच्या
इद्येनं कोणालाबी मारू शकतो, रक्ताच्या उलट्या करवून आणू शकतो." "पण तो आसं
का करतो?" "त्यो सोता न्हाय करीत. लोकं त्येला येउन नारळ, चुडा, खण, कोंबडं
देत्यात अन आपल्या
दुस्मनाचा काटा काढाया सांगत्यात. मग त्यो भानामती करून त्येचं काम तमाम
करतो." "खरंच आसं व्हतं का नाना?" "कोणाला म्हाईत, पण एवढी लोकं म्हणत्यात
म्हंजी खरं बी आसंल काय घ्या." असे बोलता बोलता मग आम्ही जेव्हा त्या पिंपळाच्या झाडाजवळून
आलो तेव्हा मी पाहिले की पुन्या तिथं उघडाबंब होऊन डोळे मिटून बसला होता.
त्याच्या समोर बहुदा माणसाची अर्धी कवटी असावी. ती अशी वाटीसारखी उपडी ठेऊन त्याने तिच्यात
काही तरी जाळले
होते, त्याचा खूप धूर निघत होता. पुन्याच्या सगळ्या अंगावर भस्माचे पट्टे
ओढलेले होते. चेहरा संपूर्ण भंडाऱ्याने पिवळा केलेला होता. ती वाट आमची नेहमीची
वाट नव्हती. नदीवरून आमच्या घरी येणारा तो शोर्टकट होता. उशीर झाला असल्यामुळे आम्ही त्या वाटेने येत होतो. त्या पेटविलेल्या पलित्याच्या पिवळसर उजेडात अधिकच भेसूर दिसणारे पुन्याचे ते
रूप पाहून मला अंमळ भीती वाटून गेली. पुन्या नेमके काय करीत असेल या कुतुहलाने दुसऱ्या दिवशी मी दोन तीन मित्रांबरोबर
तिथे पिंपळाखाली जाउन पाहिले तर तिथे लिंबू आणि मिरच्या कापून ठेवलेल्या
होत्या.
पिंपळाच्या झाडाला खूप खिळे मारलेले होते. कित्येक खिळे तर पार गंजून
गेलेले होते. "ह्ये खिळे कह्याला मारलं आसतील रं पुन्यानं?" "आरं त्ये खिळे
म्हंजी भुतांच्या पायऱ्या आसत्यात. भूताचं पाय उलटं आसत्यात ना त्यामुळं
त्येला झाडावं चढता येत न्हाय. म्हणून पुन्या तेंच्यासाठी पायऱ्या बनवून
ठिवतो." तिथे थोडेसे रक्त सुद्धा सांडलेले होते आणि थोडीशी कोंबडीची पिसेही होती. राम्याला
तेवढ्यात एका जागी तीन दगड एकावर एक रचून ठेवलेले दिसले. तिथे खड्डा खणून
तो बुजवल्यावर त्यावर ते दगड ठेवलेले दिसत होते. "पुन्यानं हिथं कायतरी पुरल्यालं
दिसतंय. उकरून बघायचं काय रं रावल्या?" "नको नको", एकजण म्हणाला. "काहीतरी
भूताचं आसंन, अन आपण त्ये हालीवलं तर भूत आपल्यालाच झपाटील." "आरं पन येखांद
टायमाला तेच्यात दोन चार रुपये बी आसू शकतील. त्या पैशांनी वंजाऱ्याच्या
दुकानातून लय
गोट्या मिळतील. काय करायचं? तूच सांग राव्हल्या." मला भीती वाटत होती पण
खेळायला खूप गोट्या मिळतील या आशेने मी म्हंटलो की चला उकरून पाहूच. मग
आम्ही ते दगड बाजूला करून खड्डा उकरला. त्या खड्यात आम्हाला एक कोंबड्याचे
कापलेले मुंडके आणि खूप सारे कुंकू, हळद आणि ओले ओले कोळसे सापडले. आम्ही भुताचे
खाणे उकरून ठेवले या विचाराने माझी तर पाचावर धारण बसली, आणि पळा रे पळा
असे म्हणत आम्ही तिथून
धूम ठोकली. त्या दिवसानंतर मी एकटा असल्यावर दिवसादेखील त्या वाटेने
येण्याची कधी हिम्मत केली नाही.
माझ्या मनाने तेव्हापासून पुन्याची जाम धास्ती घेतली. पुन्या दिसला रे दिसला की मी उलटी धूम ठोकायचो. त्याचे घर ज्या गल्लीत होते मी त्या गल्लीत सुद्धा फिरकायचो नाही. पण मोठी माणसे कधी पुन्याला घाबरायची नाहीत. उलट एकदा तर एका वरातीत आमच्या आळीतल्या वामन्याने दारू पिउन पुन्याला खूप मारला होता. मला खात्री होती की दोन चार दिवसांत वामन्या रक्ताच्या उलट्या करून करून मरणार. पण तसे काहीच झाले नाही. वामन्या आजही जिवंत असून तेवढीच दारू पितो आणि तसाच वरातींत धिंगाणा घालतो. वामन्या आठवडाभरात मेला नाही हे पाहून माझ्या मनात आले की काही असो पण पुन्या अगदीच काही वाईट माणूस नसावा. नाहीतर त्याच्याकडे एवढी विद्या असूनही त्याने वामन्याला जिवंत कसा सोडला असता?
माझ्या मनाने तेव्हापासून पुन्याची जाम धास्ती घेतली. पुन्या दिसला रे दिसला की मी उलटी धूम ठोकायचो. त्याचे घर ज्या गल्लीत होते मी त्या गल्लीत सुद्धा फिरकायचो नाही. पण मोठी माणसे कधी पुन्याला घाबरायची नाहीत. उलट एकदा तर एका वरातीत आमच्या आळीतल्या वामन्याने दारू पिउन पुन्याला खूप मारला होता. मला खात्री होती की दोन चार दिवसांत वामन्या रक्ताच्या उलट्या करून करून मरणार. पण तसे काहीच झाले नाही. वामन्या आजही जिवंत असून तेवढीच दारू पितो आणि तसाच वरातींत धिंगाणा घालतो. वामन्या आठवडाभरात मेला नाही हे पाहून माझ्या मनात आले की काही असो पण पुन्या अगदीच काही वाईट माणूस नसावा. नाहीतर त्याच्याकडे एवढी विद्या असूनही त्याने वामन्याला जिवंत कसा सोडला असता?
एकदा आमच्याकडे कुठलीशी पांजी होती. पांजी म्हणजे कोंबड्याचा बळी देऊन शेताखेताची सुरक्षा करण्याचा कार्यक्रम. अशा अनेक पांज्या होतात. पांजी म्हणजे शेताखेताची सुरक्षा वगैरे काही नसते तर तो एक बहाणा असतो, मंडळी दारू पिउन मस्त कोंबड्यावर ताव मारण्यासाठीच पांजी करतात हे मला लहानपणापासून माहित आहे. एरवी पांजीला भगत नसला तरी चालतो पण या पांजीला भगताच्या हातूनच कोंबडे कापावे लागते असे लोक म्हणत. "मायला हा पुन्या कुठं उलथला काय म्हाईत. आजून कसा येईना?" गजाबा आशाळभूतपणे दारुंच्या बाटल्यांतली एक उचलून आणि उगीच हाताने पुसून परत ठेवता ठेवता म्हणाला. "व्हय की लैच टाइम झाला", काशाबा दुसरी बाटली उचलून पुसून ठेवीत म्हणाला. "कोणाला तरी त्येच्या घरी धाडाया पायजे. आजून कसा येईना तो भुसनळीचा?" अशा प्रकारे वाट पाहता पाहता पुन्याला शिव्या घालण्याचा कार्यक्रम चालू झाला. समोर बाटल्या ठेवलेल्या असूनही केवळ कोंबड्याचे मुंडके कापणारा पुन्या नाही म्हणून होणाऱ्या उशीरामुळे मंडळी कासावीस होत होती. गजाबाने वेळ निघेना म्हणून सगळ्या बाटल्या एकदा पुसून झाल्यावर पुन्हा एकदा त्यांना पहिल्यापासून पुसायला सुरुवात केली. यावेळी तो जरा रगडून पुसत होता. त्याच जोरात त्याने पुसता पुसता एका बाटलीचे बुच उघडून ठेवले. "आररं च्यामायला चुकून बुचच उघाडलं ब्वा." गजाबाने कुणीही विचारले नसूनही स्पष्टीकरण दिले. त्या बुच उघडल्याने दारूचा वास बाहेर पसरला. जवळच बसलेल्या काशाबाच्या नाकात तो आंबट वास गेला आणि तो अधिकच कासावीस होऊन म्हणाला, "चला बरं एखादं कार्ट पिटाळा त्या पुन्याच्या घरी, आता लईच उशीर व्हतुय." मग पुन्याच्या घरी जाउन त्याला घेऊन येण्याची कामगिरी माझ्याकडे आली. खरेतर मला जायची भीती वाटत होती, पण तसे सांगून सगळ्यांपुढे मला माझे हसे करून घ्यायचे नव्हते म्हणून मी निघालो.
मी
भीत भीतच पुन्याच्या घरी गेलो. बाहेर अंगणात त्याचा वयाने माझ्याच एवढा असलेला
मुलगा काहीतरी खेळत होता. तो कधीही मुलांत खेळायला यायचा नाही. मी अंगणात
जाताच तो पटकन पळत घरात गेला आणि मग बाहेर येउन मला म्हणाला की "बा नं तुला
घरात बोलीवलंय" मी घरात गेलो. एक विचीत्रसा कोंदट वास भरून राहिलेला होता.
बाहेरच्या खोलीत एक
सगळी भिंत देवदेवतांच्या फोटोंनी भरलेली होती. काही फोटो लहान तर काही
खूप मोठे होते. मला तर त्यातली फक्त कालीमाता सोडून एकही देव ओळखता आला नाही.
मात्र प्रत्येक देवाच्या फोटोत तोडलेले मुंडके, गळ्यात कवट्यांची किंवा मुंडक्यांची माळ अथवा एखाद्याच्या छातीत
खुपसलेला खंजीर असे प्रसंग मात्र रेखाटलेले होतेच. सगळ्या देवतांच्या फोटोखाली
एक जटाधारी माणसाचा फोटो होता त्याचे डोळे अतिशय लालबुंद होते, आणि त्या
फोटोखाली
"गुरुवर्य तीरलोकनंद म्हाराज" असे लिहिलेले होते. गुरुवर्य मधल्या रु चा
उकार असा र च्या पोटाला नसून हु पु या शब्दांत असतो तसा 'र'च्याही खाली
दिलेला होता. सगळ्या भिंतींवर काळ्या रंगाने काढलेल्या मानवी बाहुल्या
होत्या. त्या सगळ्या मानवी बाहुल्यांचे अंग काळे असले तरी डोक्याच्या जागी
मात्र एक मोठा कुंकवाचा गोल ठिपकवीलेला होता. दिवा जळत होता, त्यामुळे सगळे
काही स्पष्ट
दिसत होते. मी आतल्या खोलीत गेलो तर पुन्या दोन गोधड्या अंगावर घेऊन
अंथरुणात पडलेला. मला पाहताच "काय रावूल आज कसा काय इकडं आला?" असे त्याने
मला विचारले. त्याला माझे नाव माहित आहे याचे मला आश्चर्य वाटले. मी
म्हंटले "काय तब्येत बराबर न्हाई का काय?" "व्हय व्हय, कालधरनं आंग वाइच तापलंय
बग." मी त्याच्या अंगाला हात लावून पाहिला तर मला जोरात चटका बसला. "लैच ताप
हाय रं पुन्याबा तुला.
डाक्तरकडं ग्येला व्हता का?" यावर पुन्या हलकाच हसला. "रावूल आरं म्या
लोकांस्नी सगळ्या आजारांवर अंगारा देतुया अन म्याच डाक्तरकडं गेलू तं मला
पुढं कोण इचारील? उपाशी मरायची बारी येईल माह्यावं." "मग त्वा अंगारा तरी
घेतला हाये का सोताला, बरं होयासाठी?" मी विचारले. त्यावर तो हसला आणि
म्हणाला "आरं तुमी साळंत शिकता ना रं पोरांनो? तरीबी मला आसं इचारतुस? बरं
आज इकडं कशीकाय वाट
वाकडी क्येली?" "त्ये पांजीचं कोंबडं कापायचं व्हतं, पर आता तूच आजारी हाईस
म्हणल्यावर मी जातो परत." "आरं व्हय की म्या इसरलोच बग. थांब थांब तू थोडा
येळ, म्या निगतुच." "आरं पण पुन्याबा तुहं आंग पार चटका बसतोय येवढं तापलंय,
जाऊ दे ना आजच्या दिवस दुसरं कोणीतरी कापील कोंबडं." "मला काय व्हत नाय", असं
म्हणून पुन्या अंथरुणातून उठला, कपडे घातले, त्याची तिथल्या खुंटीवर
अडकवलेली पिशवी घेतली
आणि भिंतीवरच्या र चा उकार खाली असलेल्या गुरुवर्याला नमस्कार करून अंगणात
आला.
पोराला म्हणाला, "सुन्या तू बी चाल रं बरुबर. तिकडं मला मदत व्हईल अन परत येताना तू संगं आसला म्हंजी काय अडचण ऱ्हाणार नाय." मग सुन्याने त्याच्याकडची पिशवी घेतली आणि तापाने फणफणणारा पुन्या आमच्याबरोबर जोर जोरात निघाला. रानात पोचल्यावर गजाबा पहिल्यांदा पुन्यावर जाम उखडला. "मायला हरामखोरा तुला येळेवं येता येत न्हाई का रं सुक्काळीच्या?" "माफ करा मंडळी म्या इसरलो व्हतो नायतर टायमाच्या आदीच आलू असतू." पुन्या म्हणाला. पण त्याच्या माफीने काशाबाचे समाधान झाले नाही, तो म्हणाला "भोसडीच्या कामाची गोष्ट बरी तेवढी इसरला? कोंबडं कापल्यावं तांदूळ अन पैकं मागाया न्हाई इसरणार न्हवं का? आता आटीप लवकर. फुकाची बडबड करू नगं" पुन्याने गुपचूप त्याचा पूजा आणि इतर कार्यक्रम उरकला, कोंबडा कापला आणि त्याचे मुंडके घेऊन तिथून निघाला. थोडा पुढे गेला असेल तोच काशाबा ओरडून म्हणाला "आरं ए भगता, आता पैसं मागाया इसरला का रं गाभडीच्या?" पण पुन्या म्हणाला की मला पैसे नकोत, आणि तसाच चालता झाला.
एकदा मी गिरणीत दळण घेऊन गेलो होतो. ओळीने सगळ्यांची बाचकी ठेवलेली होती. मी जाऊन सगळ्यात मागे माझे बाचके ठेवले. आधी बरेच नंबर असल्याने माझे दळण व्हायला खूप वेळ लागेल या हिशेबाने मी निघालो. तेवढ्यात माझे लक्ष पुढे लायनीत उभ्या असलेल्या पुन्याकडे गेले. तो पहिल्या नंबरवर त्याचा दळणाचा डबा घेऊन उभा होता. आता गिरणीवाला पुन्याचे दळण टाकणार तोच त्याच्या मागची बाई गिरणीवाल्यास म्हणाली, "आरं थांब थांब. तुहं डोस्कं फिरलं का काय? त्या भूताळ्याच्या दळनावं माजं दळण टाकणार व्हय? चल आधी माजं दळण दळून दये मंग त्येचं काय त्ये पहा." "अगं सोनाबाय पण त्येचा आदी नंबर हाये." गिरणीवाला म्हणाला. "आसंना का त्येचा नंबर, म्हणून काय आमची दळनं खराब करायची काय? या रताळ्याला बी कसं कळत न्हाई काय की बाई, सगळ्यांचं झाल्यावं दळण घेऊन येवा की त्येनं" पुन्याने हे ऐकून आपले दळण बाजूला घेतले. खरेतर ती बाई पुन्याची लांबची चुलतीच होती, पण तिने त्याचे दळण बाजूला काढून स्वत:चे दळण दळायला लावले. त्यानंतर तिच्या मागची बाईदेखील पुन्याच्या आधी माझं सुद्धा दळून दे असे म्हणू लागली. मी काय बोलणार? माझा नंबर तर खूप मागे होता, म्हणून मी काही बोलू शकत नव्हतो, मी गुपचूप मग माझा नंबर येईपर्यंत गावात टाईमपास करण्यासाठी निघून आलो. तासेकभराने मी जेव्हा परत आलो तोपर्यंत पुन्या तिथेच दळण घेऊन उभा होता. कुणालाही त्याच्यानंतर आपले धान्य दळून पिठाला भुताटकी लावून घ्यायची नव्हती, त्यामुळे पुढे पुढे ढकलला जात पुन्याचे दळण अगदी माझ्या नंबरपर्यंत आले. मी शेवटचा होतो. मी मात्र त्याला म्हंटले की "पुन्याबा तू घे दळून माज्या आदी. मला काय बी हरकत न्हाई." पण तो म्हणाला, "नगं नगं रं बाबा, आता एवढा येळ थांबलूया तर तुव्हं बी दळण होऊंदे. उगाच तुमच्या घरात बी कुणाला बाधा बिधा व्हईल." असे म्हणून त्याने मलाच आधी दळून घ्यायला सांगितले, आणि माझ्या कितीतरी आधी दळायला गिरणीत आलेला पुन्या सगळ्यात शेवटी दळण घेऊन बाहेर पडला.
नंद्या मेंबराने एके दिवशी नवी खिलारी बैलांची जोडी घेतली. नंद्या मेंबर हा गेली पस्तीस वर्षे ग्रामपंचायतीचा मेंबर म्हणून निवडून येत होता. आधीची दहा बारा वर्षे तोच गावाचा सरपंच होता. त्यामुळे आधी त्याला सगळे नंदू सरपंच म्हणत. पण मागच्या पंधरा वर्षांपासून नंदू मेंबर स्वत: निवडून येत असला तरी त्याचा पॅनल मात्र हरत होता. नंद्यानंतर गावात साताठ सरपंच झाले. एवढे आजीमाजी सरपंच एकाच वेळी गावात असल्याने, नंद्याला आता सगळे नंद्या मेंबरच म्हणत. तर नंद्या मेंबर नवी बैलजोड घेऊन गावात शिरतच होता, तेवढ्यात समोरून पुन्या आला. नंद्या मेंबराला नवी जोडी घेऊन येताना पाहून पुन्याने सहज विचारले, "काय नंदू मेंबर? नवीन जोड काय? काय बी म्हणा, पण खिलारी बैलांचा रुबाब काही औरच बरं का." हे ऐकताच नंद्या मेंबरचा अचानक पारा चढला. त्याने सरळ पुन्याच्या थोबाडीत ठेऊन दिली आणि म्हणाला, "तुझ्या आयचा दळभद्री तुझ्या. भाडखावा नव्या बैलांला नजर लावतो का रं? आपसकुनी कुठला. मायच्याला, न्हाई तुही ब्याद गावातून घालवून दिली तं नंद्या मेंबर नाव सांगणार न्हाई."
दुसऱ्या दिवशी डेरीवर दुध घालायला आलेल्या सुभ्याला पुन्याने विचारले, "सुब्या गाय विली जणू? काय झालं रं? गोऱ्हा झाला का कालवड?" सुब्यानेही मग अपशकुनी म्हणून पुन्यावर सगळ्यांच्या पुढं आगपाखड केली. दुर्दैवाने त्याच रात्री सुब्याच्या नव्याने व्यालेल्या गायीचे वासरू मेले. दुसऱ्या दिवशी सकाळीच सुब्याने ते मेलेले वासरू आणून चावडीपुढे टाकले आणि पुन्याने करणी करून वासरू मारून टाकले असे आरडाओरडा करून म्हणू लागला. त्याच्या गोंधळामुळे चावडीपुढे गर्दी जमली. नंद्या मेंबर सुद्धा तिथे आला, आणि सुब्याला म्हणाला की "आता लय झालं. या गावच्या घाणीचा आजच्या आज बंदोबस्त करूनच टाकू." मग नंद्या मेम्बराने लगेच ग्रामपंचायती मार्फत मिटिंग बोलवायला लावली. दोन तासात सगळे गाव जमा झाले आणि पुन्यावर दंड आकारण्यासाठी चर्चा चालू झाली. पुन्याला बोलावले गेले. नंद्या मेंबरने गावकऱ्यांस सांगितले की "पुन्यानं करणी करून सुब्याचे वासरू मारून टाकलं असून सुब्याची गाय देखील आटवली हाय. या अपशकुनी माणसाला आताच आवर घातला न्हाई तं गावात एकबी जित्राब जिवंत राहणार नाही. म्या तर कालच पन्नास हजाराची बैलजोडी आणलीया तिचं काही बरं वाईट झालं तं किती नुस्कान व्हईल? त्यामुळे पुन्याला नुकसानभरपाई द्यावी लागंल." पुन्याने डोळ्यात पाणी आणून आपण तसे काही केलेले नाही असे गावकऱ्यांस गयावया करून सांगितले. पण त्याचे कोणीही ऐकायला तयार होईना. मग नंद्या मेंबर आणि इतर पंचांनी पुन्यास वासरू मारण्यास जबाबदार ठरवून पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. पुन्या ते ऐकून मटकन खालीच बसला. माझा काहीही दोष नाही आणि पाच हजार काय पाचशे रुपये भरण्याची देखील माझी ऐपत नाही असे सांगून तो धाय मोकलून रडू लागला. पण त्याच्या त्या आक्रंदनाचा कुणावरही परिणाम झाला नाही. आठ दिवसात दंड भरला नाही तर पुन्याला गावातून हाकलून देऊ अथवा पोलिसात देऊ असे ठरवून मिटिंग संपली. पुन्या कितीतरी वेळ तिथेच चावडीवर धाय मोकलून रडत राहिला पण त्याचेकडे कोणी लक्ष दिले नाही. मी तिथून नंद्या मेंबरच्या घरी गेलो आणि हे तुम्ही केले ते काही बरोबर नाही असे त्यास सांगितले. "नंदू काका, आरं आसं करणी करून कुठं वासरू मरतं काय? तूच सांग बरं." त्यावर नंद्या मेंबर मला म्हणाला. "हे बग राहुल, करणी केल्यानं वासरू मरणं तं सोड, सादं झाडाचं पान बी तोडता येऊ शकत न्हाय ह्ये मला बी ठाऊक हाय. पण त्या बेण्या पुन्याला लई माज आलाय. जवा पहावं तवा आपसकून करून कामात खोडा घालतंय येड्या भोकाचं. त्येला अशीच अद्दल घडवाया पायजे." "आरं नंद्या काका पर त्या गरीबाला येवढा दंड करणं बरुबर न्हाय, ह्यो अन्याय हाय." "मायला तू साळंत जातु म्हंजी काय लय शाना झाला का रं?" नंद्या मेंबर मला म्हणाला, "चल जा गुमान घरी. ल्हान तोंडी लय मोठा घास घिऊ न्हवं."
दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या शेतातल्या घरी आंघोळीसाठी पाणी तापवत असताना पुन्या लांबून येताना दिसला. एवढे गरम होत असूनही त्याने घोंगडी सगळ्या अंगाला लपेटून घेतली होती. मी आणि नाना व्हरांड्यात बसलो होतो तेवढ्यात पुन्या तिथे आला. आल्या आल्या त्याने रडायला सुरुवात केली. म्हणाला "माह्यावं अन्याय झालाय. म्या गरीब माणूस, अन्नाला महाग हाय तिथं पाच हजार रुपये कुठून द्येणार?" सगळी जमीन अन घर इकावं लागंल मला. पण तुमास्नी खरं सांगतो म्या त्या वासराला काय बी क्येलं न्हाई बगा. आसं करणीनं कुणाला बी मारता येत न्हाय." "आरं पर सम्द गाव म्हणतया की त्वाच करणी केली." नाना म्हणाले. "जर करणी करून कोणाला मारता येत न्हाई तं मंग त्या मागं सुंदऱ्या पाटलाला त्वा कसा काय रगताच्या उलट्या कराया लावून मारला?" "अवो देवाच्यान सांगतो सुंदऱ्या पाटील म्या न्हाई मारला. त्यो म्येला त्येच्याच कर्मानं. दारू पेउन पेउन त्येचं पोट सडलं व्हतं. खोकताना रगात पडलं म्हणून सुंदऱ्या पाटील माह्याकं अंगारा घियाला आला व्हता. आता रगताचा खोकला काय अंगाऱ्यानं बारा व्हतो का कंदी? त्यो मरणारच व्हता. म्या फकस्त त्येच्या मरणाचा फायदा घेतला." "म्हंजी त्वा त्येला मारला न्हाईस?" "न्हाई बा. सुंदऱ्यानं त्येचा आजार कुणाला बी सांगितला न्हवता. माह्याकं त्यो अंगारा घियाला आला म्हणून मला कळालं. थोड्याच दिवसांत सुंदऱ्या मरणार हाये हे मला म्हाईत व्हतं. त्या भीम्यानं माझी एक कालवड न्येली व्हती, पर दोन वरसं झाली तरी पैकं देईना, तव्हा त्येला घाबरवण्यासाठी म्या म्हनलं का सुंदऱ्या पाटलानं बी माझे पैशे बुडवले म्हणून मी येत्या आमुशेला त्येच्यावं मुठकरणी करणार हाये. चार दिसात सुंदऱ्याला रगताच्या उलट्या चालू झाल्या अन त्यातच त्यो म्येला. भिम्यानं दुसऱ्याच दिशी माज्या कालवडीचं पैसं आणून दिलं. त्येनंच सुंदऱ्या पाटलाला म्या मुठकरणीनं मारल्याचं समद्यास्नी सांगीतलं. मला बी मुठ भानामतीचं काम मिळंल, अन त्येच्यामुळं पोटापाण्याची येवस्ता हुयील म्हणून म्या बी त्ये नाकारलं न्हाई." "आरं तिच्या बायलीला, आशी भानगड झाल्ती व्हय? बरं मंग आता म्या काय करू?" "तुमी काय बी करून त्येवढा दंड माफ करायला लावा नंद्या मेंबराला. आख्या गावात त्यो फकस्त तुमचंच आयकू शकतो." "आरं पर नंद्या लय बिघडलेला हाय तुज्यावं. त्येला समजावता येणार न्हाई. नंद्या म्हंजी कुत्र्याची शेपूट हाय, काय बी क्येलं तरी सरळ नाय व्हणार." "आसं बोलू नगा, मी लय अपेक्षेनं आलुय तुमच्या दारात. मला मागारी धाडू नगा. नायतर माझी बायकापोरं उपाशी मरतील. म्या ते बगू शकत नाय." मग पुन्याने अंगावर लपेटलेली घोंगडी काढली. त्याने घोंगडीच्या आत कुऱ्हाड लपवून आणली होती. तो नानांना म्हणाला "तुमी जर नंद्याला समजावू शकत नसाल तं एक काम करा ही कुऱ्हाड माज्या डोक्यात घाला अन मला मारून टाका, कारण जर तुम्या मला मारला नाय तर नंद्याच्या डोस्क्यात ही कुऱ्हाड घातल्याबिगर मी ऱ्हाणार नाय." असे म्हणून पुन्या रडू लागला. घरात पुन्याची भानामती सोडून कमाईचा कोणताही मार्ग नव्हता. नुकतेच त्याने घर शाकारायला घेतले होते. घर पूर्णत: उस्तरुन ठेवले होते आणि सगळा संसार बाहेर अंगणात मांडला होता. तो गेला असता तर घरच्यांना उघड्यावरच रहावे लागणार होते. त्यामुळे जेलमध्ये गेला तर त्याची बायकामुले हाल हाल होऊन उपाशी मरणार हे स्पष्ट होते. नाना काही बोलेनात हे पाहून मीच पुढे झालो. मी म्हणालो, "पुन्याबा तू काळजी करू नगंस. तू दंड भरू नको, पोलिस अशा गुन्ह्यासाठी कोणाला बी अटक करू शकत न्हाय. हा सरकारी नियमानुसार गुन्हा नाहीच. नंद्या मेंबराला काहीबी बरळू दे, इथं काय मोगलाई लागून ग्येली का काय?" माझ्या या बोलण्याने पुन्याचे थोडे समाधान झाले, आणि मग तो घरी निघून गेला. पुन्याने गावात जाताच घरात आणि त्याच्या दोन तीन मित्रांना सांगितले की त्याला अटक होऊ शकत नाही. कारण भानामतीने वासरू मारणे हा सिद्ध न होणारा गुन्हा आहे. तो थोडा निश्चिंत झाला आणि पुन्हा घराच्या कामाला लागला.
आठ दिवसांनी पंचायत भरली. नंद्या मेंबराने पुन्यास विचारले की दंडाची रक्कम आणली आहे काय? पुन्याने नकार दिला आणि म्हणाला की मी गुन्हा केलेला नाही आणि मी दंड भरणार नाही. कुणी कितीही साक्षी दिल्या तरी पोलिस अशा गुन्ह्यासाठी अटक करू शकत नाही. नंद्या मेंबर हे ऐकून रागाने लाल झाला. तो म्हणाला थोड्याच वेळात शेजारच्या गावातील पोलिस स्टेशनवरून गाडी येईल आणि पुन्याला अटक करून घेऊन जाईल. थोड्या वेळाने मग खरेच दोन गाड्या आल्या. त्यातली एकच पोलिसांची गाडी होती. दुसऱ्या गाडीवर महाराष्ट्र शासन असे लिहिलेले होते पण ती गाडी पोलिसांची नव्हती. मग पोलिस चावडीकडे आले आणि पुनाजी भांगरे नावाचा इसम कोण आहे असे त्यांनी विचारले. नंद्याने पुन्या कोण ते त्यांस दाखविले आणि पोलिसांनी पुन्याच्या हातात बेड्या ठोकल्या. पुन्याने माझ्याकडे पाहिले. मी उठलो आणि म्हणालो की "थांबा तुम्ही पुनाजीला अटक करू शकत नाही. कारण सरकार दरबारी हा गुन्हाच नाही. त्यामुळे पुन्यास सोडून द्यावे." तेवढ्यात नंद्या मेंबर माझ्यावर धावून आला. आणि मला म्हणाला, "गप बसतो का तू? विनीस्पेकटर सायेब काय येडे हाईत अन तूच तेवडा लय शहाणा काय रं?" मग इन्स्पेक्टरकडे वळून नंद्या म्हणाला, "सायेब जा घेऊन ही ब्याद आताच्या आता. आज आमुशा हाये. या सुक्काळीच्याला आज न्येला न्हाई तर रातच्याला करणी करून आजून बळी घेयील. माझ्या बैलजोडीला आधीच त्येनं नजर लावलीया. मी धोका पत्करू शकत न्हाई." मग मीही इरेला पेटलो, म्हणालो "साहेब हे चूक आहे. हा गुन्हा नाही हे तुम्हालाही ठाऊक आहे. त्यामुळे पुन्याला अटक करण्यात काही अर्थ नाही." साहेब माझ्याकडे रागाने पाहत होता. हे कुणाचे पोर आहे असे त्याने एकाला विचारले. त्याने मग माझी ओळख सांगितल्यावर साहेब माझ्याकडे आला आणि माझ्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाला, "पोरगं फार हुशार आहे. भानामती केली म्हणून आम्ही कुणाला अटक करू शकत नाही हे खरे आहे. पण आम्ही पुन्याला अटक करीत आहोत ते वासरू मारले म्हणून नव्हे. नंदूरावांनी काल पोलिस स्टेशनात तक्रार दिली आहे की पुनाजी याने स्वत:च्या घराच्या कामासाठी अनाधिकृतपणे फॉरेस्टच्या जमिनीतली खूपशी झाडे तोडली आहेत. आमच्या बरोबर आलेल्या दुसऱ्या गाडीत फॉरेस्टचे अधिकारी असून ते पंचनाम्यासाठी पुनाजी भांगरे याच्या घरी गेले आहेत. त्यांना पंचनाम्यात गुन्हा केलेला आढळला तरच आम्ही पुन्याला अटक करू." हे ऐकून लोकांच्यात खूप कुजबुज चालू झाली. मलाही काय बोलावे हे सुचेना. खरेतर गावातला प्रत्येकजण घराच्या कामासाठी म्हणा वा शेताच्या कामासाठी म्हणा, फॉरेस्टच्याच जमिनीतली झाडे तोडीत असे. त्यात काही विशेष नव्हते. पण नंद्याने पुन्याला अटक करण्यासाठी मुद्दाम हा डाव खेळला होता. आता मीही काही म्हणू शकत नव्हतो. थोड्या वेळाने फॉरेस्टचे अधिकारी तिथे आले आणि त्यांनी तोडलेली लाकडे ही फॉरेस्टच्या जमिनीवरील झाडांचीच असून पुनाजी भांगरे नामक इसमाने घर कामासाठी ती तोडलेली आहेत असा पुरावा मिळाला असल्याचे सांगितले. मग इन्स्पेक्टरने मला विचारले, "काय कॉलेजकुमार? आता तुमचे काही ऑब्जेक्शन आहे काय?" मी मान खाली घातली. माझ्यासमोर अन्याय होत होता पण मी काहीही करू शकत नव्हतो. पोलिस धाय मोकलून रडणाऱ्या पुन्याला बेड्या घालून घेऊन गेले. पुन्याची बायको आणि मुले पोलिसांचे पाय धरून धरून आळवणी करत होते, रडत होते पण पोलिसांना त्यांच्या आक्रोशाने काहीही फरक पडला नाही. पुन्या भगताला पोलिस गाडीत टाकून घेऊनच गेले. पुन्याची बायको आणि सुन्या कितीतरी वेळ धाय मोकलून रडत राहिले. नंद्या मेंबर जोरजोरात हसत लोकांपुढे आपल्या धुर्तपणाचे स्वत:च कौतुक करीत तिथून मोठ्या तोऱ्यात निघून गेला.
पुन्याला पोलिसांनी धरून नेल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच चावडीपुढे नंद्या मेंबर तावातावात बडबड करीत होता आणि एकामागून एक अशा खूप शिव्या घालीत होता. त्याचा तो तळतळाट पाहून पुन्हा खूप गर्दी जमली. काय झाले असे जो तो एकमेकांस विचारू लागला. मग एकाने हळूच कुणाला तरी सांगितले की नंद्या मेंबराच्या नव्या खिलारी बैलजोडीतला एक बैल रात्री अचानक मरून गेला. अमावस्येची रात्र पुन्याला भानामती करायला मिळू नये म्हणून चतुराई करून आधीच पुन्याला जेलमध्ये पाठविणाऱ्या नंद्या मेंबराचा बैल भानामती न करताही मरून गेला होता. आणि त्याचे खापर कुणावरही फोडता येईना म्हणून नंद्या मेंबर वेडापिसा झाला होता.
दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या शेतातल्या घरी आंघोळीसाठी पाणी तापवत असताना पुन्या लांबून येताना दिसला. एवढे गरम होत असूनही त्याने घोंगडी सगळ्या अंगाला लपेटून घेतली होती. मी आणि नाना व्हरांड्यात बसलो होतो तेवढ्यात पुन्या तिथे आला. आल्या आल्या त्याने रडायला सुरुवात केली. म्हणाला "माह्यावं अन्याय झालाय. म्या गरीब माणूस, अन्नाला महाग हाय तिथं पाच हजार रुपये कुठून द्येणार?" सगळी जमीन अन घर इकावं लागंल मला. पण तुमास्नी खरं सांगतो म्या त्या वासराला काय बी क्येलं न्हाई बगा. आसं करणीनं कुणाला बी मारता येत न्हाय." "आरं पर सम्द गाव म्हणतया की त्वाच करणी केली." नाना म्हणाले. "जर करणी करून कोणाला मारता येत न्हाई तं मंग त्या मागं सुंदऱ्या पाटलाला त्वा कसा काय रगताच्या उलट्या कराया लावून मारला?" "अवो देवाच्यान सांगतो सुंदऱ्या पाटील म्या न्हाई मारला. त्यो म्येला त्येच्याच कर्मानं. दारू पेउन पेउन त्येचं पोट सडलं व्हतं. खोकताना रगात पडलं म्हणून सुंदऱ्या पाटील माह्याकं अंगारा घियाला आला व्हता. आता रगताचा खोकला काय अंगाऱ्यानं बारा व्हतो का कंदी? त्यो मरणारच व्हता. म्या फकस्त त्येच्या मरणाचा फायदा घेतला." "म्हंजी त्वा त्येला मारला न्हाईस?" "न्हाई बा. सुंदऱ्यानं त्येचा आजार कुणाला बी सांगितला न्हवता. माह्याकं त्यो अंगारा घियाला आला म्हणून मला कळालं. थोड्याच दिवसांत सुंदऱ्या मरणार हाये हे मला म्हाईत व्हतं. त्या भीम्यानं माझी एक कालवड न्येली व्हती, पर दोन वरसं झाली तरी पैकं देईना, तव्हा त्येला घाबरवण्यासाठी म्या म्हनलं का सुंदऱ्या पाटलानं बी माझे पैशे बुडवले म्हणून मी येत्या आमुशेला त्येच्यावं मुठकरणी करणार हाये. चार दिसात सुंदऱ्याला रगताच्या उलट्या चालू झाल्या अन त्यातच त्यो म्येला. भिम्यानं दुसऱ्याच दिशी माज्या कालवडीचं पैसं आणून दिलं. त्येनंच सुंदऱ्या पाटलाला म्या मुठकरणीनं मारल्याचं समद्यास्नी सांगीतलं. मला बी मुठ भानामतीचं काम मिळंल, अन त्येच्यामुळं पोटापाण्याची येवस्ता हुयील म्हणून म्या बी त्ये नाकारलं न्हाई." "आरं तिच्या बायलीला, आशी भानगड झाल्ती व्हय? बरं मंग आता म्या काय करू?" "तुमी काय बी करून त्येवढा दंड माफ करायला लावा नंद्या मेंबराला. आख्या गावात त्यो फकस्त तुमचंच आयकू शकतो." "आरं पर नंद्या लय बिघडलेला हाय तुज्यावं. त्येला समजावता येणार न्हाई. नंद्या म्हंजी कुत्र्याची शेपूट हाय, काय बी क्येलं तरी सरळ नाय व्हणार." "आसं बोलू नगा, मी लय अपेक्षेनं आलुय तुमच्या दारात. मला मागारी धाडू नगा. नायतर माझी बायकापोरं उपाशी मरतील. म्या ते बगू शकत नाय." मग पुन्याने अंगावर लपेटलेली घोंगडी काढली. त्याने घोंगडीच्या आत कुऱ्हाड लपवून आणली होती. तो नानांना म्हणाला "तुमी जर नंद्याला समजावू शकत नसाल तं एक काम करा ही कुऱ्हाड माज्या डोक्यात घाला अन मला मारून टाका, कारण जर तुम्या मला मारला नाय तर नंद्याच्या डोस्क्यात ही कुऱ्हाड घातल्याबिगर मी ऱ्हाणार नाय." असे म्हणून पुन्या रडू लागला. घरात पुन्याची भानामती सोडून कमाईचा कोणताही मार्ग नव्हता. नुकतेच त्याने घर शाकारायला घेतले होते. घर पूर्णत: उस्तरुन ठेवले होते आणि सगळा संसार बाहेर अंगणात मांडला होता. तो गेला असता तर घरच्यांना उघड्यावरच रहावे लागणार होते. त्यामुळे जेलमध्ये गेला तर त्याची बायकामुले हाल हाल होऊन उपाशी मरणार हे स्पष्ट होते. नाना काही बोलेनात हे पाहून मीच पुढे झालो. मी म्हणालो, "पुन्याबा तू काळजी करू नगंस. तू दंड भरू नको, पोलिस अशा गुन्ह्यासाठी कोणाला बी अटक करू शकत न्हाय. हा सरकारी नियमानुसार गुन्हा नाहीच. नंद्या मेंबराला काहीबी बरळू दे, इथं काय मोगलाई लागून ग्येली का काय?" माझ्या या बोलण्याने पुन्याचे थोडे समाधान झाले, आणि मग तो घरी निघून गेला. पुन्याने गावात जाताच घरात आणि त्याच्या दोन तीन मित्रांना सांगितले की त्याला अटक होऊ शकत नाही. कारण भानामतीने वासरू मारणे हा सिद्ध न होणारा गुन्हा आहे. तो थोडा निश्चिंत झाला आणि पुन्हा घराच्या कामाला लागला.
आठ दिवसांनी पंचायत भरली. नंद्या मेंबराने पुन्यास विचारले की दंडाची रक्कम आणली आहे काय? पुन्याने नकार दिला आणि म्हणाला की मी गुन्हा केलेला नाही आणि मी दंड भरणार नाही. कुणी कितीही साक्षी दिल्या तरी पोलिस अशा गुन्ह्यासाठी अटक करू शकत नाही. नंद्या मेंबर हे ऐकून रागाने लाल झाला. तो म्हणाला थोड्याच वेळात शेजारच्या गावातील पोलिस स्टेशनवरून गाडी येईल आणि पुन्याला अटक करून घेऊन जाईल. थोड्या वेळाने मग खरेच दोन गाड्या आल्या. त्यातली एकच पोलिसांची गाडी होती. दुसऱ्या गाडीवर महाराष्ट्र शासन असे लिहिलेले होते पण ती गाडी पोलिसांची नव्हती. मग पोलिस चावडीकडे आले आणि पुनाजी भांगरे नावाचा इसम कोण आहे असे त्यांनी विचारले. नंद्याने पुन्या कोण ते त्यांस दाखविले आणि पोलिसांनी पुन्याच्या हातात बेड्या ठोकल्या. पुन्याने माझ्याकडे पाहिले. मी उठलो आणि म्हणालो की "थांबा तुम्ही पुनाजीला अटक करू शकत नाही. कारण सरकार दरबारी हा गुन्हाच नाही. त्यामुळे पुन्यास सोडून द्यावे." तेवढ्यात नंद्या मेंबर माझ्यावर धावून आला. आणि मला म्हणाला, "गप बसतो का तू? विनीस्पेकटर सायेब काय येडे हाईत अन तूच तेवडा लय शहाणा काय रं?" मग इन्स्पेक्टरकडे वळून नंद्या म्हणाला, "सायेब जा घेऊन ही ब्याद आताच्या आता. आज आमुशा हाये. या सुक्काळीच्याला आज न्येला न्हाई तर रातच्याला करणी करून आजून बळी घेयील. माझ्या बैलजोडीला आधीच त्येनं नजर लावलीया. मी धोका पत्करू शकत न्हाई." मग मीही इरेला पेटलो, म्हणालो "साहेब हे चूक आहे. हा गुन्हा नाही हे तुम्हालाही ठाऊक आहे. त्यामुळे पुन्याला अटक करण्यात काही अर्थ नाही." साहेब माझ्याकडे रागाने पाहत होता. हे कुणाचे पोर आहे असे त्याने एकाला विचारले. त्याने मग माझी ओळख सांगितल्यावर साहेब माझ्याकडे आला आणि माझ्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाला, "पोरगं फार हुशार आहे. भानामती केली म्हणून आम्ही कुणाला अटक करू शकत नाही हे खरे आहे. पण आम्ही पुन्याला अटक करीत आहोत ते वासरू मारले म्हणून नव्हे. नंदूरावांनी काल पोलिस स्टेशनात तक्रार दिली आहे की पुनाजी याने स्वत:च्या घराच्या कामासाठी अनाधिकृतपणे फॉरेस्टच्या जमिनीतली खूपशी झाडे तोडली आहेत. आमच्या बरोबर आलेल्या दुसऱ्या गाडीत फॉरेस्टचे अधिकारी असून ते पंचनाम्यासाठी पुनाजी भांगरे याच्या घरी गेले आहेत. त्यांना पंचनाम्यात गुन्हा केलेला आढळला तरच आम्ही पुन्याला अटक करू." हे ऐकून लोकांच्यात खूप कुजबुज चालू झाली. मलाही काय बोलावे हे सुचेना. खरेतर गावातला प्रत्येकजण घराच्या कामासाठी म्हणा वा शेताच्या कामासाठी म्हणा, फॉरेस्टच्याच जमिनीतली झाडे तोडीत असे. त्यात काही विशेष नव्हते. पण नंद्याने पुन्याला अटक करण्यासाठी मुद्दाम हा डाव खेळला होता. आता मीही काही म्हणू शकत नव्हतो. थोड्या वेळाने फॉरेस्टचे अधिकारी तिथे आले आणि त्यांनी तोडलेली लाकडे ही फॉरेस्टच्या जमिनीवरील झाडांचीच असून पुनाजी भांगरे नामक इसमाने घर कामासाठी ती तोडलेली आहेत असा पुरावा मिळाला असल्याचे सांगितले. मग इन्स्पेक्टरने मला विचारले, "काय कॉलेजकुमार? आता तुमचे काही ऑब्जेक्शन आहे काय?" मी मान खाली घातली. माझ्यासमोर अन्याय होत होता पण मी काहीही करू शकत नव्हतो. पोलिस धाय मोकलून रडणाऱ्या पुन्याला बेड्या घालून घेऊन गेले. पुन्याची बायको आणि मुले पोलिसांचे पाय धरून धरून आळवणी करत होते, रडत होते पण पोलिसांना त्यांच्या आक्रोशाने काहीही फरक पडला नाही. पुन्या भगताला पोलिस गाडीत टाकून घेऊनच गेले. पुन्याची बायको आणि सुन्या कितीतरी वेळ धाय मोकलून रडत राहिले. नंद्या मेंबर जोरजोरात हसत लोकांपुढे आपल्या धुर्तपणाचे स्वत:च कौतुक करीत तिथून मोठ्या तोऱ्यात निघून गेला.
पुन्याला पोलिसांनी धरून नेल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच चावडीपुढे नंद्या मेंबर तावातावात बडबड करीत होता आणि एकामागून एक अशा खूप शिव्या घालीत होता. त्याचा तो तळतळाट पाहून पुन्हा खूप गर्दी जमली. काय झाले असे जो तो एकमेकांस विचारू लागला. मग एकाने हळूच कुणाला तरी सांगितले की नंद्या मेंबराच्या नव्या खिलारी बैलजोडीतला एक बैल रात्री अचानक मरून गेला. अमावस्येची रात्र पुन्याला भानामती करायला मिळू नये म्हणून चतुराई करून आधीच पुन्याला जेलमध्ये पाठविणाऱ्या नंद्या मेंबराचा बैल भानामती न करताही मरून गेला होता. आणि त्याचे खापर कुणावरही फोडता येईना म्हणून नंद्या मेंबर वेडापिसा झाला होता.
" भन्नाट भानामती " :) (y)
उत्तर द्याहटवासॉलिड़़
उत्तर द्याहटवाजोरदार