कमळी
ती तशी घामेजलेली, विस्कटलेले केस आणि कमरेभोवती पदराचा बांधलेला काचा अशा
अवतारात घरात घुसली. सोताला देव माणूस म्हणवून घेतो पण कुत्रा आहे मेला कुत्रा. असे म्हणत तिने चुलीत लाकडे
कोंबली आणि डब्यातून पीठ काढून तिथेच चूल फुंकता फुंकता रागारागात ते मळू
लागली. बाहेर खेळत असलेल्या सुंदऱ्या आणि पिंट्याने आपल्या आईला घरात
येताना पाहिले. दोघांपैकी धाकटा पिंट्या तसाच खेळणे सोडून पळत तिच्या मागोमाग घरात घुसून
चुलीजवळ आला, आणि आये मला भूक लागलेय असे म्हणून कुरकुरू लागला. तिने त्याच्या
पाठीत तशाच पिठाच्या हाताने एक गुद्दा घातला आणि म्हणाली दिसत नाही का
मेल्या तुलाच गिळायला सैपाक करतेय ना आल्याआल्या.? त्या गुद्याबरोबर डोळ्यात पाणी
आले पिंट्याच्या. पण निदान त्याचा कुरबुरीचा आवाज बंद झाला एवढेच कमळीला समाधान. आई घरात आल्याआल्या
लगेच जे खायला मिळू शकते ते म्हणजे केवळ फटका हे सुंदऱ्याला थोरला
असल्याने अनुभवातून कळून चुकले होते त्यामुळे तो काही भूक लागलेली असूनही
पिंट्याबरोबर घरात गेला नाही.
कमळी
ही मंगळूची बायको. मंगळूला स्वत:चा असा फक्त एक बारीक जमिनीचा तुकडा वडिलोपार्जित संपत्ती म्हणून मिळालेला.
त्यात फक्त एक पावसाळी पीक निघे. जेमतेम चार पोती भात व्हायचा म्हणजे पाच
सहा मण तांदूळ. कितीही राबले तरी वर्षभरासाठी ती मायमाती फक्त एवढेच देऊ
शकायची. मग मंगळूला चरितार्थासाठी दुसऱ्यांच्या शेतावर काम करावे लागे. गाव
काही फार सधन शेतकऱ्यांचे नसल्याने कामही जेमतेमच मिळे. तेही त्या गावात शेतात
काम करण्याच्या बदल्यात पैसे देण्याची पद्धतच नव्हती. कामाच्या बदल्यात
डाळीडूळी मिळत, कधी बाजरी, ज्वारी, भुईमुगाच्या शेंगा अशा वस्तू मिळत,
त्यातूनच रोजच्या भाकर अन कालवणाची तरतूद होई. पण दोन पोरे, बायको आणि एक
म्हातारी जगवायची म्हणजे पैसा तर लागणारच. डॉक्टरचे पैसे नाहीत म्हणून
कित्येक वर्षे अंगावरच खोकला काढलेल्या मंगळूच्या म्हातारीचा आवाजच बंद झाला होता. आणि आजकाल तिची
तब्येत वरचेवर जरा जास्तच वेळा बिघडत असे. पैसाच नाही म्हणून डॉक्टरकडे जात नाही हे खरे कारण असले तरीही कुणी डॉक्टरकडे जा असे म्हंटले की मला तर बाई त्या डाक्टरच्या सुईची लय भीती वाटते असे म्हातारी म्हणायची आणि दुखणे अंगावरच काढायची.
गावात कामाच्या बदल्यात पैसा मिळायचा तो फक्त गेनू पाटलाच्या इथे. तेही शेतीव्यतिरिक्त इतर काम असेल तरच. गेनू पाटील तसा बोलूनचालून बरा होता. अडीनडीला कोणालाही मदत करायचा. मंगळू त्याचेकडेच सिजनला कामाला जायचा, त्यातून मिळणाऱ्या पैशानेच त्याला घरात मीठमिरची खरेदी करता यायची. आणि कसलाही नाद वा व्यसन नसल्याने गाठीला दोन पैसे जमवून लेकराबाळाला एखादा कपडालत्ता करता यायचा. मंगळू हा एक प्रामाणिक, निर्व्यसनी आणि अत्यंत कष्टाळू गडी म्हणूनच सगळ्या गावात ओळखला जायचा.
एके वर्षी दुष्काळ पडला. मंगळूच्या जमिनीच्या तुकड्यात भाताचा एक दाणाही उगवला नाही. पावसाचा थेंबही न पडल्याने डोंगर, गावाकुसाची जमीन हिरवी झालीच नाही. लांब कुठेतरी पडलेल्या पावसामुळे नदीला मात्र पाणी आले होते एवढाच काय तो पंचक्रोशीला दिलासा. स्वत:च्या शेतातही काही नाही आणि पाटलाकडेच काय तर गावात कुणाकडेही काही काम नाही त्यामुळे त्या वर्षी मंगळूवर उपासमारीने मारण्याची वेळ आली. पण नशिबाने अशा ऐन दुष्काळात पाटलीण बाळंत झाली तेव्हा मदतीला आणि घरकामाला म्हणून पाटलाने मंगळूला एखादी बाई पाहायला सांगितली. मंगळूने मग हीच संधी साधून कमळीला तिथे कामाला ठेवले. पण चौथ्याच दिवशी कमळी दुपारीच घाबऱ्याघुबऱ्या घरी आली आणि मंगळूला म्हणाली की उद्यापास्न मी पाटलाच्या घरी कामाला जाणार नाही. त्या पाटलाची नजर लय वंगाळ हाये. मंगळू म्हणाला येडी झाली का तू? घरात खायला एक दाणा अन खिशात एक दमडी उरल्याली न्हाई. समद्या तालुक्यात लोक उपाशी मरू लागल्यात, पाटील कसाबी आपल्याला जगण्यापुरता काहीतरी देईल. आपली म्हातारी बी हाथरुनाला पडलेय. तिला आज ना उद्या डाक्टर दाखवावाच लागेल. अन परत पुढच्या साली पेरणीचे दिवस येतील तवा गाठीला चार पैसे नकोत का? ते कोण दिल आपल्याला? आणि पाटलाचं म्हंशील तर देवमाणूस हाये त्यो, समद्या गावाला माहित हाये पाटील किती चांगला हाये ते. त्येच्यामुळं तर घरात पोरांच्या पोटाला दोन घास लागत्यात. तूला भरम झालाय. गप वाड्यावं जात जा. मी हाये ना तोवर तसली कायबी काळजी करू नको. त्यानेच असे बोलल्यावर मग कमळी नाखुशीने का होईना, पाटलाकडे कामाला जात राहिली.
एके वर्षी दुष्काळ पडला. मंगळूच्या जमिनीच्या तुकड्यात भाताचा एक दाणाही उगवला नाही. पावसाचा थेंबही न पडल्याने डोंगर, गावाकुसाची जमीन हिरवी झालीच नाही. लांब कुठेतरी पडलेल्या पावसामुळे नदीला मात्र पाणी आले होते एवढाच काय तो पंचक्रोशीला दिलासा. स्वत:च्या शेतातही काही नाही आणि पाटलाकडेच काय तर गावात कुणाकडेही काही काम नाही त्यामुळे त्या वर्षी मंगळूवर उपासमारीने मारण्याची वेळ आली. पण नशिबाने अशा ऐन दुष्काळात पाटलीण बाळंत झाली तेव्हा मदतीला आणि घरकामाला म्हणून पाटलाने मंगळूला एखादी बाई पाहायला सांगितली. मंगळूने मग हीच संधी साधून कमळीला तिथे कामाला ठेवले. पण चौथ्याच दिवशी कमळी दुपारीच घाबऱ्याघुबऱ्या घरी आली आणि मंगळूला म्हणाली की उद्यापास्न मी पाटलाच्या घरी कामाला जाणार नाही. त्या पाटलाची नजर लय वंगाळ हाये. मंगळू म्हणाला येडी झाली का तू? घरात खायला एक दाणा अन खिशात एक दमडी उरल्याली न्हाई. समद्या तालुक्यात लोक उपाशी मरू लागल्यात, पाटील कसाबी आपल्याला जगण्यापुरता काहीतरी देईल. आपली म्हातारी बी हाथरुनाला पडलेय. तिला आज ना उद्या डाक्टर दाखवावाच लागेल. अन परत पुढच्या साली पेरणीचे दिवस येतील तवा गाठीला चार पैसे नकोत का? ते कोण दिल आपल्याला? आणि पाटलाचं म्हंशील तर देवमाणूस हाये त्यो, समद्या गावाला माहित हाये पाटील किती चांगला हाये ते. त्येच्यामुळं तर घरात पोरांच्या पोटाला दोन घास लागत्यात. तूला भरम झालाय. गप वाड्यावं जात जा. मी हाये ना तोवर तसली कायबी काळजी करू नको. त्यानेच असे बोलल्यावर मग कमळी नाखुशीने का होईना, पाटलाकडे कामाला जात राहिली.
कमळीच्या कामाचे पैसे पाटील थेट मंगळूला देत असे. एरवी कोणत्याही कामाला पाटील मंगळूलाच बोलावीत असे. त्यामुळे तो नेहमी वाड्यावर असे. पण आता काही कामच नसल्याने मंगळूचे पाटलाच्या वाड्यावर जाणे बंदच झाले. फक्त कमळीचा पगार घ्यायला आठवड्यातून एकदा तो वाड्यावर जाई. अशात कमळी परत एके दिवशी मंगळूला म्हणाली की मला पाटलाकडे नाही जायचे, त्याचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे हायेत. तुम्हाला कळत कसं न्हाई? पण मंगळू ऐकला नाही, कारण दोनच दिवसांपूर्वी पाटलाने मंगळूला कमळीच्या कामाचे पैसे आता रोजचे तीन रुपये वाढवून देत जाईल असे सांगितले होते. कमळी आता रोजच मला कामाला पाठवू नको असा धोशा लावु लागली, मग वैतागून एकदिवस मंगळू तिच्यावर खूप ओरडला आणि परत पाटलाबद्दल आसं बोलून कामाला जाणार नाही असे म्हणाली तर बघ असा त्याने तिला दम दिला.
तीनेक महिने लोटले असतील. दुष्काळामुळे कुणाला कामच नसल्याने गावात गावकुटाळक्या ऐन भरात होत्या. गावात आता हलक्या आवाजात पाटील अन कमळीबद्दल कुरबुर होत होती. ती मंगळूला कळत नव्हती असे नाही. त्याला त्याचे फार वाईट वाटायचे पण पाटील असं करणार नाही हे त्याला पक्के माहित होते. त्यामुळे तो थोडा काळजीत असला तरी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करीत होता. मात्र एक दिवस त्याने त्याचा मित्र गणपा आणि कुशाबाला बोलताना ऐकले. गणपा सांगत होता की आज त्यानं प्रत्यक्ष पाहीलं की पाटील कमळीला हातात उचलून घेऊन पाटलाच्या मळ्यातल्या घरात घेऊन गेला आणि आतून दाराची कडी लावून घेतली. वरून तो हेही म्हणाला की पाटील तसा वाटत
नाही पण नक्कीच कमळीनं आपल्या देखण्या रूपाच्या जोरावर त्याच्या पैशाच्या
लोभाने त्याला फसवलं असणार. गेले कित्येक दिवस दोघांचा हा उद्योग बिनबोभाट चालू आहे. पण आता हे मंगळूला तरी कंच्या तोंडानं सांगावं? गणपा निदान आपल्या बाबतीत तरी कधीच खोटे बोलणार नाही याची मंगळूला खात्री होती त्यामुळे त्याचे हे बोलणे ऐकून त्या दिवशी मात्र मंगळूचे माथेच फिरले. तो प्रचंड रागात घरी आला. कमळी आधीच घरात येउन रडत बसली होती. मंगळू बाहेरून आला तशी कमळी लगेच त्याच्या जवळ जाउन त्याच्या खांद्यावर डोके ठेऊन ओक्साबोक्षी रडू लागली. आज मला पाटलाने जबरदस्ती… एवढेच म्हणून ती अजूनच धाय मोकलून रडू लागली. मंगळूने तिला तशीच दूर ढकलली आणि ओरडला, पाटलाने? जबरदस्तीने की मर्जीने? मला सगळे कळलेत तुझे धंदे, चल हट बाजूला. असे म्हणून मंगळूने तिला दूर लोटले. आणि अजून जोरात तिच्यावर खेकसला. त्याच्या खेकसन्यासरशी एक आंबटशा किळसवाण्या वासाचा भपकारा कमालीच्या नाकातोंडात गेला.
तुमी दारू पिली? अवो पण का? घरात दोन वेळ दाणापाणी येत रहावे म्हणून मी काय काय सहन करतेय, इथं तुमची म्हतारी आजाराने मरायला टेकलीय आणि अशात ही थेरं कराया तुमाला लाज न्हाई वाटत?
तू मला शिकवती का गं? माझी लाज काढती? छीनाल साली. अशी शिवी हासडून मंगळूने आयुष्यात पहिल्यांदा कमळीवर हात उचलला. चल हट बाजूला असे म्हणून त्याने तिला लाथ मारून बाजूला ढकलली आणि घराबाहेर तनातना निघून गेला. कमळी कितीतरी वेळ रडत राहीली. दोन्ही पोरे एकमेकांना बिलगून रात्रीपर्यंत एका कोपऱ्यात घाबरीघुबरी होऊन गप्पगार बसून राहीली. यानंतर चार दिवस कमळी पाटलाच्या घरी गेली नाही. पण पाचव्या दिवशी पोरांच्या चेहऱ्यावरची भूक पाहून तिला राहवले नाही, आणि ती कामाला गेली. पोरांची भूक मंगळूलाही दिसत होतीच. तोही कमळीस जाताना पाहूनही काहीच बोलला नाही.
या प्रसंगानंतर बरेच दिवस उलटून गेले. आता सगळ्या गावाला माहीत झालं होतं की गेनू पाटील कमळीवर कित्येक दिवसांपासून हात टाकतोय. गावभरात ही गोष्ट कुजबुजली जाऊ लागली होती. पाटील एवढा चांगला माणूस असूनही त्यानं असं कसं केलं याचं लोक नवल करीत. नक्कीच कमळीनेच पाटलाला जाळ्यात फसवले असणार असे लोक म्हणत. सगळ्या गावाला कळलेय ते मंगळूला कसे कळत नाही याचेही लोक नवल करीत. पण मंगळूला हे सगळं कळत होतं, फक्त ते थांबवणं त्याच्या शक्तीपलीकडे होतं. याच मनस्थितीमुळे मंगळू एव्हना दारूच्या पूर्ण आहारी गेला होता. सदानकदा दारू पिउन तो आधी निदान घरातच निपचित पडून राहायचा पण आता मात्र तो सरसकट गावात कुठेही लोळत पडलेला दिसू लागला होता. कमळीच्या दु:खाला तर पारावार नव्हता. मंगळू दारू प्यायचे सोडून दुसरे काहीच काम करीत नव्हता. त्यामुळे पाटलाकडे गेले नाही तर उपाशी मरावे लागेल हे तिला माहित होते. म्हणून कसेही मन मारून ती पाटलाकडे जातच राहिली. मंगळू आता घरात कशावरूनही तिला भांडायचा आणि मारायचा. दिलेला पैसा मंगळू दारूत उडवतो म्हणून एकदा कमळीने पाटलाकडून थेट आपल्याकडेच पगाराचे पैसे घेतले. त्यादिवशी मंगळूने तिला इतके मारले की दोन्ही पोरे मध्ये आली नसती तर तिचा जीवच गेला असता.
मंगळू कमळीशी काहीच बोलायचा नाही. तिला स्पर्श करणे तर दूरच. जे काही होत होते ते त्याच्या मनाला खूप कुरतडून काढायचे. पण पोरांच्या पोटाला पीळ बसू नये म्हणून मंगळू आपल्या मनाचा हा पीळ सहन करत होता. एक दिवस दारूच्या गुत्त्यातून मंगळू बाहेर पडला. झोकांड्या खात तो चालला होता तसा त्याची गाठ म्हैपतीशी पडली. मागे एकदा म्हैपती हा पाटलाच्या दुधाच्या हिशेबात घोटाळा करतो हे मंगळूने पाटलाला सांगितले होते आणि पाटलाने तपासल्यावर तो तसे करतो हे त्याच्या लक्षात आले होते. तेव्हापासून म्हैपतीला पाटलाच्या वाड्यावर बंदी होती, त्यामुळे तो मंगळूवर डूख धरूनच होता. मंगळूने त्याला येताना पाहिले आणि नशेत असूनही आपण त्याला टाळले पाहिजे हे त्याला लगेच कळले व तो दुसऱ्या दिशेने जाऊ लागला. आम्ही सगळे जवळच पारावर बसलेलो होतो. आम्हाला पाहून आता मंगळूचा आमच्यासमोर पाणउतारा करण्याची नामी संधी आहे हे म्हैपतीने लगेच हेरले आणि त्याने वाट बदलून कलटी मारून निघालेल्या मंगळूला मुद्दाम हाक मारून बोलावले. मंगळू म्हणाला नको घाई हाये जरा म्हणून घरी निघालोय. म्हैपती म्हणाला, आरं ल्येका तुझ्या घरात आता तुझं हाय तरी काय? जे हाय ते समदं गेनू पाटलाचं हाय, ये वाइच इकडं. जरा चार माणसात येत जा की लेका. तो असे बोलल्यावर आणि आम्हा सगळ्यांना पाहिल्यावर मग मंगळू नाइलाजाने हेलपाटत पाराजवळ आला. म्हैपती म्हणाला, काय मग मंगळू? वाड्यावरलं काम कसं चाललंय? कमळी वैनी म्हणे तिथं लय शेवा करतीया? पाटील म्हणे तुला शेपरेट अन कमळी वैनीला शेपरेट पगार देतुया? मजा हाये लेका तुजी. ऐन दुस्काळात दोन दोन पगार.!! आसं कंचं काम करती रं वैनी वाड्यावं? मंगळू काहीच न बोलता मान खाली घालून उभा होता. आरं सांग की ल्येका. असे म्हणून म्हैपतीने मंगळूची हनुवटी धरून बळजबरीने त्याचा चेहरा वर केला. मंगळूच्या कपाळावर उठलेली आठी मला स्पष्ट दिसत होती. तो म्हैपतीला म्हणाला, आसं काय बी न्हाई बगा म्हैपतराव. पाटलीनबाय बाळंत झाली म्हणून जाते ही वाड्यावं. आणि आवो फक्त माज्याकडंच देत्यात पगार पाटील. हिला न्हाई देत पैसे. तिला पैसे न्हाई देत? म्हणजी कमळी वैनी जे काम करती त्ये फुकाट करती काय? मायला मग आशी कामं जर ती फुकाट करीत आसंल तं एखाद्या टायमाला आमच्याकडं बी दे की पाठवून लेका तिला. म्हैपती असे बोलल्यावर मंगळूच्या कपाळावरची शीर तडातडा उडू लागली होती आणि डोळे लालबुंद झाले होते, हाताच्या मुठी त्याने करकचून आवळल्या होत्या. तशाच अवस्थेत त्याने पारावर बसलेल्या आमच्याकडे पाहीले आणि मग काहीसे विचीत्रसे हसत मला म्हणाला, पहा ना नामदेवराव, काही म्हणा म्हैपतरावाचा सोभाव लय मस्कऱ्या बगा. येंच्या नादाला कोणी लागू नये. जो लागला त्येचं म्हैपतराव बोलून बोलून पार कातडं सोलून काढतील न्हाई का? असे म्हणून परत हा हा हा असे जोरात कृत्रिमपणे आणि अत्यंत भेसूर भकास हसत पुन्हा झोकांड्या खात मंगळू तिथून निघून गेला. खूप दारू पिल्यामुळे एवढे जिव्हारी लागलेले बाण, आणि अपमानाचे घोट गिळून मंगळू तो तसा भकास हसत होता की आजकाल वारंवार घडणाऱ्या अशा प्रसंगी तसे हसता यावे म्हणून एवढी दारू पीत होता हे मला न सुटलेले कोडे आहे.
मंगळू कमळीशी काहीच बोलायचा नाही. तिला स्पर्श करणे तर दूरच. जे काही होत होते ते त्याच्या मनाला खूप कुरतडून काढायचे. पण पोरांच्या पोटाला पीळ बसू नये म्हणून मंगळू आपल्या मनाचा हा पीळ सहन करत होता. एक दिवस दारूच्या गुत्त्यातून मंगळू बाहेर पडला. झोकांड्या खात तो चालला होता तसा त्याची गाठ म्हैपतीशी पडली. मागे एकदा म्हैपती हा पाटलाच्या दुधाच्या हिशेबात घोटाळा करतो हे मंगळूने पाटलाला सांगितले होते आणि पाटलाने तपासल्यावर तो तसे करतो हे त्याच्या लक्षात आले होते. तेव्हापासून म्हैपतीला पाटलाच्या वाड्यावर बंदी होती, त्यामुळे तो मंगळूवर डूख धरूनच होता. मंगळूने त्याला येताना पाहिले आणि नशेत असूनही आपण त्याला टाळले पाहिजे हे त्याला लगेच कळले व तो दुसऱ्या दिशेने जाऊ लागला. आम्ही सगळे जवळच पारावर बसलेलो होतो. आम्हाला पाहून आता मंगळूचा आमच्यासमोर पाणउतारा करण्याची नामी संधी आहे हे म्हैपतीने लगेच हेरले आणि त्याने वाट बदलून कलटी मारून निघालेल्या मंगळूला मुद्दाम हाक मारून बोलावले. मंगळू म्हणाला नको घाई हाये जरा म्हणून घरी निघालोय. म्हैपती म्हणाला, आरं ल्येका तुझ्या घरात आता तुझं हाय तरी काय? जे हाय ते समदं गेनू पाटलाचं हाय, ये वाइच इकडं. जरा चार माणसात येत जा की लेका. तो असे बोलल्यावर आणि आम्हा सगळ्यांना पाहिल्यावर मग मंगळू नाइलाजाने हेलपाटत पाराजवळ आला. म्हैपती म्हणाला, काय मग मंगळू? वाड्यावरलं काम कसं चाललंय? कमळी वैनी म्हणे तिथं लय शेवा करतीया? पाटील म्हणे तुला शेपरेट अन कमळी वैनीला शेपरेट पगार देतुया? मजा हाये लेका तुजी. ऐन दुस्काळात दोन दोन पगार.!! आसं कंचं काम करती रं वैनी वाड्यावं? मंगळू काहीच न बोलता मान खाली घालून उभा होता. आरं सांग की ल्येका. असे म्हणून म्हैपतीने मंगळूची हनुवटी धरून बळजबरीने त्याचा चेहरा वर केला. मंगळूच्या कपाळावर उठलेली आठी मला स्पष्ट दिसत होती. तो म्हैपतीला म्हणाला, आसं काय बी न्हाई बगा म्हैपतराव. पाटलीनबाय बाळंत झाली म्हणून जाते ही वाड्यावं. आणि आवो फक्त माज्याकडंच देत्यात पगार पाटील. हिला न्हाई देत पैसे. तिला पैसे न्हाई देत? म्हणजी कमळी वैनी जे काम करती त्ये फुकाट करती काय? मायला मग आशी कामं जर ती फुकाट करीत आसंल तं एखाद्या टायमाला आमच्याकडं बी दे की पाठवून लेका तिला. म्हैपती असे बोलल्यावर मंगळूच्या कपाळावरची शीर तडातडा उडू लागली होती आणि डोळे लालबुंद झाले होते, हाताच्या मुठी त्याने करकचून आवळल्या होत्या. तशाच अवस्थेत त्याने पारावर बसलेल्या आमच्याकडे पाहीले आणि मग काहीसे विचीत्रसे हसत मला म्हणाला, पहा ना नामदेवराव, काही म्हणा म्हैपतरावाचा सोभाव लय मस्कऱ्या बगा. येंच्या नादाला कोणी लागू नये. जो लागला त्येचं म्हैपतराव बोलून बोलून पार कातडं सोलून काढतील न्हाई का? असे म्हणून परत हा हा हा असे जोरात कृत्रिमपणे आणि अत्यंत भेसूर भकास हसत पुन्हा झोकांड्या खात मंगळू तिथून निघून गेला. खूप दारू पिल्यामुळे एवढे जिव्हारी लागलेले बाण, आणि अपमानाचे घोट गिळून मंगळू तो तसा भकास हसत होता की आजकाल वारंवार घडणाऱ्या अशा प्रसंगी तसे हसता यावे म्हणून एवढी दारू पीत होता हे मला न सुटलेले कोडे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा