हा ब्लॉग शोधा

मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०१०

काही बोलायाचे आहे..

थोडे बोलायचे होते miss झालेल्या महाभारताच्या episodes वर..
A R रेहमानच्या अंतरंगात निनादणाऱ्या nodes वर..


बऱ्याच मध्यरात्री न हिंडलेल्या सूर्यावर..
सह्याद्रीच्या राकट दगडी वाऱ्यावर..

गणपतीने पुऱ्या न केलेल्या नवसावर..
किंचाळणाऱ्या नोव्हेंबरच्या पावसावर..

थोडे बोलायचे होते.. अहिल्येच्या शिलेवर..
गुलजारच्या शब्दांत भिजणाऱ्या उर्मिलेवर..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा