वेळ- भविष्यातले "क्ष" वर्ष
जगभरातल्या न्यूज चॅनल्स आणि वर्तमानपत्रांचे मथळे एकाच बातमीने आठवडाभर भरून गेले आहेत. केंब्रीज विद्यापीठातले जैवतंत्रज्ञानाचे भारतीय वंशाचे प्राध्यापक श्री. समीर बोऱ्हाडे यांचा "नेचर" या विज्ञानपत्रिकेत प्रसिद्ध झालेला प्रबंध हे त्याचे कारण होय. यापूर्वी प्रा. बोऱ्हाडे यांचे तीन प्रबंध "नेचर" मध्ये प्रकाशित झाले होते परंतु यावेळी मात्र त्यांच्या प्रबंधास जगभराने डोक्यावर उचलून घेतले आहे. प्राध्यापक महाशयांनी सुखाच्या गुणसुत्राचा म्हणजे डीएनए कोडचा शोध लावला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी त्यावरून एक लस देखील तयार केली असून ती लस टोचताच कुणालाही सुखी होता येणार आहे. प्राध्यापक म्हणाले की आज मी जगातला सर्वात आनंदी माणूस आहे, कारण मला सापडलेल्या सुखाच्या सूत्राने मी जगातले सगळे दु:ख संपविणार आहे. आता एकाही मनात निराशा नांदणार नाही. आणि एकाही डोळ्यात अश्रू असणार नाहीत.
...
वेळ- "क्ष" वर्ष+एक महिना…
जगभरातल्या न्यूज चॅनल्स आणि वर्तमानपत्रांचे मथळे एकाच बातमीने आठवडाभर भरून गेले आहेत. केंब्रीज विद्यापीठातले जैवतंत्रज्ञानाचे भारतीय वंशाचे प्राध्यापक श्री. समीर बोऱ्हाडे यांचा "नेचर" या विज्ञानपत्रिकेत प्रसिद्ध झालेला प्रबंध हे त्याचे कारण होय. यापूर्वी प्रा. बोऱ्हाडे यांचे तीन प्रबंध "नेचर" मध्ये प्रकाशित झाले होते परंतु यावेळी मात्र त्यांच्या प्रबंधास जगभराने डोक्यावर उचलून घेतले आहे. प्राध्यापक महाशयांनी सुखाच्या गुणसुत्राचा म्हणजे डीएनए कोडचा शोध लावला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी त्यावरून एक लस देखील तयार केली असून ती लस टोचताच कुणालाही सुखी होता येणार आहे. प्राध्यापक म्हणाले की आज मी जगातला सर्वात आनंदी माणूस आहे, कारण मला सापडलेल्या सुखाच्या सूत्राने मी जगातले सगळे दु:ख संपविणार आहे. आता एकाही मनात निराशा नांदणार नाही. आणि एकाही डोळ्यात अश्रू असणार नाहीत.
...
वेळ- "क्ष" वर्ष+एक महिना…
जगभरात आता चर्चांचा काथ्याकुट चालू आहे. डब्लू.एच.ओ.च्या देखरेखीखाली जगातल्या जवळ जवळ सगळ्या देशांनी आपल्या तमाम नागरीकांस ही लस टोचण्याचा निर्णय घेतला आहे. आणि ज्या देशांच्या सरकारांनी असा निर्णय घेतला नाही तिथल्या विरोधी पक्षांच्या निवडणूक जाहिरनाम्यांत तो स्वीकारण्याचा वायदा केला गेला आहे. किंबहुना जाहीरनाम्यात हा एकमेव वायदा आहे. सगळे वैज्ञानिक हे 'हाच जगातला अंतिम शोध होय' असे सांगू लागले आहेत. सगळे धर्ममार्तंड हे 'ही लस म्हणजे ईश्वराचा प्रसाद' असल्याचे सांगत आहेत. कम्युनिस्ट या अभूतपूर्व लसीने येऊ घातलेल्या समानतेमुळे आनंदी आहेत तर भांडवलदारदेखील पैसा हा शेवटी आनंदासाठीच असतो आणि तो आनंद आता आयताच लाभतो आहे म्हणून खुश आहेत.
...
वेळ- "क्ष"+एक वर्ष…
आता सगळ्या जगभरात ही लस टोचली गेली आहे. लस टोचून घेण्यास कुणीही अपवादानेदेखील विरोध केला नाही. सुखी कुणाला व्हायचे नाही? काही विशेष घटना घडली नाही, संपत्ती प्राप्त झाली नाही, इतर कोणतीही मिळकत नाही, तरीही प्रत्येक जण एका अलोट आनंदाच्या लाटेवर स्वार आहे. कुणीही कोणत्याही कारणाने अथवा विनाकारण आनंदी होत आहे. नुसता सूर्य उगवल्याने लोकांस आनंदाच्या उकळ्या फुटताहेत, मावळल्याने फुटताहेत. भूक लागली म्हणून लोक आनंदी आहेत, भागली म्हणून आनंदी आहेत. आवाज आला, आनंद! शांतता आहे, आनंद.! डोळे उघडा, आनंद! बंद करा, आनंद.! बोला, आनंद! शांत बसा, आनंद.!! काम करा, आनंद! करू नका, आनंदच..!! शाळा नाहीत, ऑफिसे नाहीत, बँका बंद पडल्या आहेत, शेअर मार्केटात बैल अन अस्वलांच्या मुर्त्या सोडून कुणीही उरलेले नाही. कित्येकजण त्यांची आवडती कामे जी त्यांस आधी करायला मिळाली नाहीत ती करून घेत आहेत. माणसे स्वखुशीने शेतात राबताहेत, गाणी बनवून गाताहेत, कारखान्यांत कामे करताहेत. कुणी गाड्या चालवत आहे, कुणी कम्प्युटरवर वेगवेगळे सॉफ्टवेअर लिहितो आहे. पण या कामांना वेळेचे बंधन नाही. कोणतेही टारगेट नाही. जो तो हवे ते हवे तेवढे करतो आहे. जगातल्या सगळ्या दहशतवादी संघटनांनी समर्पण केले आहे. सगळे फरार गुन्हेगार समोर आले आहेत. त्यांना कुणी अटकही करत नाहीये. तुरुंग ओस पडले आहेत, घरे ओस पडली आहेत. शहरे, गावे आणि अगदी देश वगैरे अशा सीमाच राहिल्या नाहीत. माणसे कुठेही फिरताहेत. कुणीही मनाला वाटेल ते काम करताहेत, मन भरले की ते काम सोडून देताहेत. चराचरात नुसते सुखच सुख आहे.
...
वेळ- "क्ष"+दोन वर्षे...
प्रेयसींनी, बायकांनी रुसणे सोडले आहे. कारण त्या रुसल्या तरी प्रियकरा-नवऱ्यांस आनंदच होतोय. पोरे आईबापांस वैताग देऊ देऊन वैतागली पण आईबाप आपले आनंदीच. एका फडतूस नटाने अत्यंत वाईट सिनेमा काढला, प्रेक्षक आनंदीच. शंभर कवींच्या नवकविता ऐकूनही श्रोता खुश. तो सर्वात लोकप्रिय क्रिकेटर सलग दहादा शून्यावर गेला तरी देशात आनंदाचे भरते आलेले. भाजीत मीठ नाही, पण खाणारे खुशीत. आजारी झाला तर डॉक्टर पेक्षा रुग्णच आनंदी आहेत. पोरे कडू औषधे पिऊनही हसत आहेत.
…
वेळ- "क्ष"+चार वर्षे...
जगभरात आज खळबळ माजली आहे. सगळ्या टीव्ही चॅनल्स, वर्तमानपत्रे, इंटरनेटवर एकच खबर ऐकायला मिळत आहे. भारत नावाच्या देशात, महाराष्ट्र नावाच्या राज्यात, मुंबई या शहरात एक माणूस लस टोचल्यानंतरही दु:खी झाल्याचे आढळून आले आहे. सदरहु माणूस हा पूर्वाश्रमीचा (म्हणजे लसीपूर्वीचा) राजकारणी नेता असल्याची माहिती आहे. जगभरात अफवांना ऊत आला आहे. लस बनविणाऱ्या कारखान्यातील एक लॉट हा सदोष असल्याची अफवा पसरली आहे. डब्लू.एच.ओ.मध्ये नव्या ऐच्छिक संचालक मंडळाने सदरहु प्रकरणात सखोल चौकशीची शिफारस केली असून (हल्ली कुणीही आदेश देत नाही, शिफारस करतात) लोकांस अफवांवर विश्वास न ठेवता दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू ठेवण्याचे आवाहन केले आहे.
...
वेळ- "क्ष"+पाच वर्षे...
डब्लू.एच.ओ.द्वारा नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालात धक्कादायक बाबी समोर येत आहेत. सदरहु नेत्यानंतर त्याचा पूर्वीचा मित्र असलेल्या एका मोठ्या उद्योगपतीस दु:खावेगाचा झटका आल्याचे समितीने नमूद केले असून हळू हळू जगभरातल्या इतर नेते आणि उद्योगपतींत ही कमतरता पसरू लागली आहे. या नेते आणि उद्योगपतींनंतर कित्येक सामान्य माणसांतही हळू हळू दु:खावेगाची लक्षणे दृष्टीस पडू लागली आहेत. यामागच्या कारणांचे निष्कर्ष हे धक्कादायक असल्याचे सांगण्यात येत आहे.
...
वेळ- "क्ष"+सहा वर्षे...
माणसे आनंदी झाली, सुखी झाली, पण पूर्ण समाधानी झाली नाहीत. मध्यंतरी अलास्कातून जपानला गेलेल्या काही पर्यटकांनी असे नमूद केले की तेथील लोक हे जगातील इतर लोकांपेक्षा अधिक आनंदी आहेत. त्यामुळे जपान्यांनी लसीच्या मूळ घटकांत काही बदल करून आपल्या नागरिकांस सुधारित लस दिली असल्याची शंका त्यांनी उपस्थित केली. पण हा केवळ एक आरोप ठरला. मात्र आता संशयाचे हे भूत संपूर्ण जगात पसरू लागले आहे. सुरुवातीचा आनंदाचा बहर ओसरल्यावर लोक एकमेकांत आपल्या सुखांची तुलना करू लागले आहेत. तुलनेतून लोकांस असे वाटू लागलेय की सगळेच आनंदी असल्याने आनंदात काही वेगळेपण राहिलेले नाहीये. प्रत्येक क्षण आनंदाचा असल्याने आनंदही कंटाळवाणा ठरू लागला आहे. याहीपेक्षा आपण स्वत: तर आनंदी आहोतच मात्र आपल्यापेक्षा इतरजण अधिक आनंदी वाटत आहेत. लोकांना कळले आहे की काही लोकांना विशिष्ट काम केल्यावर अधिक आनंद मिळतो. मग सगळे लोक तीच कामे करण्यासाठी धडपडू लागले आहेत. उदाहरणार्थ प्रत्येक जण गाडी चालविण्याची संधी शोधू लागला आहे, विमान उडविण्याची स्वप्ने पाहू लागला आहे. पण प्रत्येकाला ती संधी मिळेना. काहीजण तर गवतावरून अनवाणी चालणे हे त्यांचे आवडते काम असूनही गाडी चालविल्यास वेगळा आनंद होईल काय या कुतूहलातून गाडी चालविण्याची कामना बाळगू लागले आहेत. विशेष म्हणजे जे काम करण्याची इच्छा झाली ते काम करण्यास मिळाले नाही तरी लोकांस आनंद हा मिळतच आहे कारण लस ही काहीही झाले तरी आनंदाची अनुभूती देणारीच आहे. पण लोकांचे समाधान होईना. तोच तोच पणा तीच ती भावना याचा लोकांस कंटाळा येतो आहे. जे आपल्याजवळ नाही ते मिळाल्यावर अथवा जे आपणास करायला मिळत नाही ते केल्यावर कसे वाटेल याचे कुतूहल लोकांना सतावू लागले आहे. खरेतर जगात आता दु:ख व्हावे असे काहीच उरले नाहीये. प्रत्येक गोष्टीत केवळ आणि केवळ आनंद आहे. मात्र इतरांस जे मिळते आहे त्याची आपल्यास स्वभावत: आवड असो वा नसो, त्या गोष्टीची आपणांस गरज असो वा नसो पण ते दुसऱ्याजवळ आहे आणि आपल्याकडे नाही एवढेच नव्हे तर दुसऱ्यास कदाचित तिच्यायोगे काही विशेष आनंदाची प्राप्ती होत असेल, ही भावना माणसांस सतावू लागली आहे. काहीजणांस उगीच आपले लसीकरणपूर्व आयुष्य अधिक रमणीय आणि रोमांचकारी होते असे वाटू लागले आहे. जो पहिला दु:खी माणूस समोर आला होता तो राजनेता याच भावनेतून दु:खी झाला होता. आपणांस जे मिळते आहे तेच इतरांना मिळते आहे हे पाहून त्याचे आपल्या सुखद अनुभूतींनी समाधान होईना. मी पूर्वाश्रमीचा कुणी विशेष असतांना आता एक सामान्य झालो आहे या भावनेने तो पूर्वीपेक्षा आता अधिक आनंदात असूनही असमाधानी राहू लागला. इतर राजनेते आणि उद्योगपतीही याच भावनेतून असमाधानी झाले. जगात इतरत्र असलेल्या कित्येक अनोळखी गोष्टींपासून आपण कदाचित वंचित असू अशी भावना लोकांत मूळ धरू लागली आहे. जे दुसऱ्याकडे आहे ते मला आवश्यक असो की नसो, दुसरा आनंदी दिसतोय म्हणजे ते मला मिळायलाच हवे असे प्रत्येकजणास वाटू लागले आहे.
....
लसीकरणाच्या पूर्वीची स्थिती तरी कुठे वेगळी होती? प्रत्येकाकडे काही गोष्टी होत्या, काही नव्हत्या. जोपर्यंत एखादी गोष्ट दुसऱ्याकडे आहे आणि आपल्याकडे नाही याची कल्पना नव्हती तोपर्यंत सगळे काही व्यवस्थित चालू होते. पण एखादी वस्तू दुसऱ्याकडे दिसली की ती आपल्याकडे नाही म्हणून माणसे दु:खी होत होती. त्यांना उगीचच त्या गोष्टीची गरज वाटू लागे आणि मग ती मिळविताना अपयश आले की ती अजून दु:खी होत. आणि समजा ती गोष्ट मिळालीच तरीही पुढे लगेच दुसरी गोष्ट दिसत असे. आणि मग पुन्हा ती नवी गोष्ट मिळविण्याची धडपड चालू होई. खरेतर दु:ख हे आपल्याकडे एखादी गोष्ट नाही याचे नसते, तर आपल्याकडे एखादी गोष्ट नाही पण ती दुसऱ्याकडे आहे याचे असते.
…
वेळ- "क्ष"+आठ वर्षे...
प्रसंग-प्राध्यापक बोऱ्हाडे यांची प्रेस कॉन्फरंस.
प्राध्यापक म्हणाले, आज माझ्यावर जगातल्या जवळ जवळ ४६ देशांतल्या न्यायालयांत केस दाखल करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी जामीन मिळविण्याएवढी रक्कम आणि वेळसुद्धा माझ्याकडे नाही. आठ वर्षांपूर्वी मी खूप उत्साही आणि आनंदी माणूस होतो, कारण माझा प्रयत्न प्रामाणिक होता. मला जगातली सगळी माणसे सुखी करायची होती. पण आता माझ्या लक्षात आले आहे की असे कधीही होऊ शकत नाही. कारण मानवी भावना, कल्पना, गरजा या अमर्याद आहेत. माणसाचे कुतूहल आणि नित्यनाविन्याची आस हाच त्याच्या सुख आणि दु:ख या दोहोंचे कारण आहे. डबके साचलेले राहिले की ते कुजते आणि त्यात दुर्गंधी येऊ लागते. माझी सुखाची लस ही त्याच डबक्यासारखी होती. स्थिर. अप्रवाही.!! जीवन प्रवाही आणि गतिशील असावे लागते. ते अवखळपणे वहावे लागते. त्याला उन्हाचे चटके आणि मेघांची छाया अशा दोघांचीही आवश्यकता असते तेव्हाच त्याचे सौंदर्य खुलते. दु:ख असले तरच सुखास किंमत आहे. सुख किंवा दु:ख ही कुठलीही विशिष्ट आणि ठोस अवस्था नाही ती फक्त एक तुलनात्मक स्थिती आहे. म्हणूनच दु:ख जेवढे मोठे तेवढाच सुखाचा आनंद मोठा होय. जवापाडे सुखासाठी दु:ख पर्वताएवढे हवेच हे मला उमजले नाही, म्हणून सुखाची लस बनविणारा मी स्वत:च आज जगातला सर्वात दु:खी माणूस आहे.
...
वेळ- "क्ष"+एक वर्ष…
आता सगळ्या जगभरात ही लस टोचली गेली आहे. लस टोचून घेण्यास कुणीही अपवादानेदेखील विरोध केला नाही. सुखी कुणाला व्हायचे नाही? काही विशेष घटना घडली नाही, संपत्ती प्राप्त झाली नाही, इतर कोणतीही मिळकत नाही, तरीही प्रत्येक जण एका अलोट आनंदाच्या लाटेवर स्वार आहे. कुणीही कोणत्याही कारणाने अथवा विनाकारण आनंदी होत आहे. नुसता सूर्य उगवल्याने लोकांस आनंदाच्या उकळ्या फुटताहेत, मावळल्याने फुटताहेत. भूक लागली म्हणून लोक आनंदी आहेत, भागली म्हणून आनंदी आहेत. आवाज आला, आनंद! शांतता आहे, आनंद.! डोळे उघडा, आनंद! बंद करा, आनंद.! बोला, आनंद! शांत बसा, आनंद.!! काम करा, आनंद! करू नका, आनंदच..!! शाळा नाहीत, ऑफिसे नाहीत, बँका बंद पडल्या आहेत, शेअर मार्केटात बैल अन अस्वलांच्या मुर्त्या सोडून कुणीही उरलेले नाही. कित्येकजण त्यांची आवडती कामे जी त्यांस आधी करायला मिळाली नाहीत ती करून घेत आहेत. माणसे स्वखुशीने शेतात राबताहेत, गाणी बनवून गाताहेत, कारखान्यांत कामे करताहेत. कुणी गाड्या चालवत आहे, कुणी कम्प्युटरवर वेगवेगळे सॉफ्टवेअर लिहितो आहे. पण या कामांना वेळेचे बंधन नाही. कोणतेही टारगेट नाही. जो तो हवे ते हवे तेवढे करतो आहे. जगातल्या सगळ्या दहशतवादी संघटनांनी समर्पण केले आहे. सगळे फरार गुन्हेगार समोर आले आहेत. त्यांना कुणी अटकही करत नाहीये. तुरुंग ओस पडले आहेत, घरे ओस पडली आहेत. शहरे, गावे आणि अगदी देश वगैरे अशा सीमाच राहिल्या नाहीत. माणसे कुठेही फिरताहेत. कुणीही मनाला वाटेल ते काम करताहेत, मन भरले की ते काम सोडून देताहेत. चराचरात नुसते सुखच सुख आहे.
...
वेळ- "क्ष"+दोन वर्षे...
प्रेयसींनी, बायकांनी रुसणे सोडले आहे. कारण त्या रुसल्या तरी प्रियकरा-नवऱ्यांस आनंदच होतोय. पोरे आईबापांस वैताग देऊ देऊन वैतागली पण आईबाप आपले आनंदीच. एका फडतूस नटाने अत्यंत वाईट सिनेमा काढला, प्रेक्षक आनंदीच. शंभर कवींच्या नवकविता ऐकूनही श्रोता खुश. तो सर्वात लोकप्रिय क्रिकेटर सलग दहादा शून्यावर गेला तरी देशात आनंदाचे भरते आलेले. भाजीत मीठ नाही, पण खाणारे खुशीत. आजारी झाला तर डॉक्टर पेक्षा रुग्णच आनंदी आहेत. पोरे कडू औषधे पिऊनही हसत आहेत.
…
वेळ- "क्ष"+चार वर्षे...
जगभरात आज खळबळ माजली आहे. सगळ्या टीव्ही चॅनल्स, वर्तमानपत्रे, इंटरनेटवर एकच खबर ऐकायला मिळत आहे. भारत नावाच्या देशात, महाराष्ट्र नावाच्या राज्यात, मुंबई या शहरात एक माणूस लस टोचल्यानंतरही दु:खी झाल्याचे आढळून आले आहे. सदरहु माणूस हा पूर्वाश्रमीचा (म्हणजे लसीपूर्वीचा) राजकारणी नेता असल्याची माहिती आहे. जगभरात अफवांना ऊत आला आहे. लस बनविणाऱ्या कारखान्यातील एक लॉट हा सदोष असल्याची अफवा पसरली आहे. डब्लू.एच.ओ.मध्ये नव्या ऐच्छिक संचालक मंडळाने सदरहु प्रकरणात सखोल चौकशीची शिफारस केली असून (हल्ली कुणीही आदेश देत नाही, शिफारस करतात) लोकांस अफवांवर विश्वास न ठेवता दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू ठेवण्याचे आवाहन केले आहे.
...
वेळ- "क्ष"+पाच वर्षे...
डब्लू.एच.ओ.द्वारा नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालात धक्कादायक बाबी समोर येत आहेत. सदरहु नेत्यानंतर त्याचा पूर्वीचा मित्र असलेल्या एका मोठ्या उद्योगपतीस दु:खावेगाचा झटका आल्याचे समितीने नमूद केले असून हळू हळू जगभरातल्या इतर नेते आणि उद्योगपतींत ही कमतरता पसरू लागली आहे. या नेते आणि उद्योगपतींनंतर कित्येक सामान्य माणसांतही हळू हळू दु:खावेगाची लक्षणे दृष्टीस पडू लागली आहेत. यामागच्या कारणांचे निष्कर्ष हे धक्कादायक असल्याचे सांगण्यात येत आहे.
...
वेळ- "क्ष"+सहा वर्षे...
माणसे आनंदी झाली, सुखी झाली, पण पूर्ण समाधानी झाली नाहीत. मध्यंतरी अलास्कातून जपानला गेलेल्या काही पर्यटकांनी असे नमूद केले की तेथील लोक हे जगातील इतर लोकांपेक्षा अधिक आनंदी आहेत. त्यामुळे जपान्यांनी लसीच्या मूळ घटकांत काही बदल करून आपल्या नागरिकांस सुधारित लस दिली असल्याची शंका त्यांनी उपस्थित केली. पण हा केवळ एक आरोप ठरला. मात्र आता संशयाचे हे भूत संपूर्ण जगात पसरू लागले आहे. सुरुवातीचा आनंदाचा बहर ओसरल्यावर लोक एकमेकांत आपल्या सुखांची तुलना करू लागले आहेत. तुलनेतून लोकांस असे वाटू लागलेय की सगळेच आनंदी असल्याने आनंदात काही वेगळेपण राहिलेले नाहीये. प्रत्येक क्षण आनंदाचा असल्याने आनंदही कंटाळवाणा ठरू लागला आहे. याहीपेक्षा आपण स्वत: तर आनंदी आहोतच मात्र आपल्यापेक्षा इतरजण अधिक आनंदी वाटत आहेत. लोकांना कळले आहे की काही लोकांना विशिष्ट काम केल्यावर अधिक आनंद मिळतो. मग सगळे लोक तीच कामे करण्यासाठी धडपडू लागले आहेत. उदाहरणार्थ प्रत्येक जण गाडी चालविण्याची संधी शोधू लागला आहे, विमान उडविण्याची स्वप्ने पाहू लागला आहे. पण प्रत्येकाला ती संधी मिळेना. काहीजण तर गवतावरून अनवाणी चालणे हे त्यांचे आवडते काम असूनही गाडी चालविल्यास वेगळा आनंद होईल काय या कुतूहलातून गाडी चालविण्याची कामना बाळगू लागले आहेत. विशेष म्हणजे जे काम करण्याची इच्छा झाली ते काम करण्यास मिळाले नाही तरी लोकांस आनंद हा मिळतच आहे कारण लस ही काहीही झाले तरी आनंदाची अनुभूती देणारीच आहे. पण लोकांचे समाधान होईना. तोच तोच पणा तीच ती भावना याचा लोकांस कंटाळा येतो आहे. जे आपल्याजवळ नाही ते मिळाल्यावर अथवा जे आपणास करायला मिळत नाही ते केल्यावर कसे वाटेल याचे कुतूहल लोकांना सतावू लागले आहे. खरेतर जगात आता दु:ख व्हावे असे काहीच उरले नाहीये. प्रत्येक गोष्टीत केवळ आणि केवळ आनंद आहे. मात्र इतरांस जे मिळते आहे त्याची आपल्यास स्वभावत: आवड असो वा नसो, त्या गोष्टीची आपणांस गरज असो वा नसो पण ते दुसऱ्याजवळ आहे आणि आपल्याकडे नाही एवढेच नव्हे तर दुसऱ्यास कदाचित तिच्यायोगे काही विशेष आनंदाची प्राप्ती होत असेल, ही भावना माणसांस सतावू लागली आहे. काहीजणांस उगीच आपले लसीकरणपूर्व आयुष्य अधिक रमणीय आणि रोमांचकारी होते असे वाटू लागले आहे. जो पहिला दु:खी माणूस समोर आला होता तो राजनेता याच भावनेतून दु:खी झाला होता. आपणांस जे मिळते आहे तेच इतरांना मिळते आहे हे पाहून त्याचे आपल्या सुखद अनुभूतींनी समाधान होईना. मी पूर्वाश्रमीचा कुणी विशेष असतांना आता एक सामान्य झालो आहे या भावनेने तो पूर्वीपेक्षा आता अधिक आनंदात असूनही असमाधानी राहू लागला. इतर राजनेते आणि उद्योगपतीही याच भावनेतून असमाधानी झाले. जगात इतरत्र असलेल्या कित्येक अनोळखी गोष्टींपासून आपण कदाचित वंचित असू अशी भावना लोकांत मूळ धरू लागली आहे. जे दुसऱ्याकडे आहे ते मला आवश्यक असो की नसो, दुसरा आनंदी दिसतोय म्हणजे ते मला मिळायलाच हवे असे प्रत्येकजणास वाटू लागले आहे.
....
लसीकरणाच्या पूर्वीची स्थिती तरी कुठे वेगळी होती? प्रत्येकाकडे काही गोष्टी होत्या, काही नव्हत्या. जोपर्यंत एखादी गोष्ट दुसऱ्याकडे आहे आणि आपल्याकडे नाही याची कल्पना नव्हती तोपर्यंत सगळे काही व्यवस्थित चालू होते. पण एखादी वस्तू दुसऱ्याकडे दिसली की ती आपल्याकडे नाही म्हणून माणसे दु:खी होत होती. त्यांना उगीचच त्या गोष्टीची गरज वाटू लागे आणि मग ती मिळविताना अपयश आले की ती अजून दु:खी होत. आणि समजा ती गोष्ट मिळालीच तरीही पुढे लगेच दुसरी गोष्ट दिसत असे. आणि मग पुन्हा ती नवी गोष्ट मिळविण्याची धडपड चालू होई. खरेतर दु:ख हे आपल्याकडे एखादी गोष्ट नाही याचे नसते, तर आपल्याकडे एखादी गोष्ट नाही पण ती दुसऱ्याकडे आहे याचे असते.
…
वेळ- "क्ष"+आठ वर्षे...
प्रसंग-प्राध्यापक बोऱ्हाडे यांची प्रेस कॉन्फरंस.
प्राध्यापक म्हणाले, आज माझ्यावर जगातल्या जवळ जवळ ४६ देशांतल्या न्यायालयांत केस दाखल करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी जामीन मिळविण्याएवढी रक्कम आणि वेळसुद्धा माझ्याकडे नाही. आठ वर्षांपूर्वी मी खूप उत्साही आणि आनंदी माणूस होतो, कारण माझा प्रयत्न प्रामाणिक होता. मला जगातली सगळी माणसे सुखी करायची होती. पण आता माझ्या लक्षात आले आहे की असे कधीही होऊ शकत नाही. कारण मानवी भावना, कल्पना, गरजा या अमर्याद आहेत. माणसाचे कुतूहल आणि नित्यनाविन्याची आस हाच त्याच्या सुख आणि दु:ख या दोहोंचे कारण आहे. डबके साचलेले राहिले की ते कुजते आणि त्यात दुर्गंधी येऊ लागते. माझी सुखाची लस ही त्याच डबक्यासारखी होती. स्थिर. अप्रवाही.!! जीवन प्रवाही आणि गतिशील असावे लागते. ते अवखळपणे वहावे लागते. त्याला उन्हाचे चटके आणि मेघांची छाया अशा दोघांचीही आवश्यकता असते तेव्हाच त्याचे सौंदर्य खुलते. दु:ख असले तरच सुखास किंमत आहे. सुख किंवा दु:ख ही कुठलीही विशिष्ट आणि ठोस अवस्था नाही ती फक्त एक तुलनात्मक स्थिती आहे. म्हणूनच दु:ख जेवढे मोठे तेवढाच सुखाचा आनंद मोठा होय. जवापाडे सुखासाठी दु:ख पर्वताएवढे हवेच हे मला उमजले नाही, म्हणून सुखाची लस बनविणारा मी स्वत:च आज जगातला सर्वात दु:खी माणूस आहे.