हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०१४

आमराई

सांगळे मास्तर पिंपळाच्या आळीतून पहाटे पहाटे नदीकडं लगबगीनं जाताना पवार मास्तराला दिसला. पवार मास्तर परसाकडनं परतत होता. मायला येवढ्या सकाळच्याला हे ब्येनं सांगळ्या हिकडं कुणिकडं निघालं? असा विचार करीत पवार मास्तरानं "अरे ए सांगळ्या" अशी जोरात हाक मारली. सांगळे मास्तराच्या कानावर हाक पडली आणि त्याने दचकुन इकडे तिकडे पाहिले. हाक नेमकी कुणी मारली आणि कुठून आली ते त्याला कळेना. पवार मास्तरने पुन्हा एकदा "अरे ए मास्तSSSSSर" अशी हाळी दिली. ती ऐकताच सांगळे मास्तरने एकदम जोरात धूम ठोकली, आणि मग नदी उताराला तो दिसेनासा झाला. पवार मास्तरानं मोबाईलवरून त्याचा नंबर लावला पण नदीकडे नेटवर्क येत नसल्याने फोन लागला नाही.

दुपारी मधल्या सुट्टीत पवार मास्तरने स्टाफरूममध्ये सांगळे मास्तरला गाठला. "काय रं लेका? सकाळी म्या तुला येवडा आवाज देतुया आनं तू पळूनच गेला?".
"मायला त्यो तू व्हता व्हय रं? म्या आपला उगाच भेऊन जोरात पळालो. बांधावरून उडी मारायच्या नादात मवा पाय मुरगाळला की लका".
"आरं पर म्या म्हणतु, तुवं घर तिकडं पार वरच्या आळीला असताना, तिकडून नदी यवडी जवळ असताना, मंग नदिवं जायासाठी पार गावाला येवडा वळसा घालून येयाची काय गरज व्हती? आण ते बी येवड्या फाटंचं?"
"आता तुला येवडं बी कळंना का लका? आरं रातच्याला पिपळाच्या आळीत थांबलू व्हतु म्या".
"पिपळाच्या आळीत? अन त्ये रं कह्याला? आनं कुणाच्या घरी?"
"अहो कोण कोणाच्या घरी गेला?" दिवटे मास्तरने आत पाय टाकता टाकता विचारले.
"काही नाही हो दिवटे सर, हा पवार आपलं उगीच काहीतरी बोलत असतो, तुम्हाला तर माहीतच आहे त्याचा स्वभाव. देव ना देव्हारा, आणि उगीच आपला चंदन उगाळीत बसतो." असे म्हणून गुपचूप सांगळे मास्तरने पवार मास्तरला गप्प राहण्याविषयी खुणावले. शाळा सुटल्यावर सांगळे मास्तराने पवार मास्तरास आपल्या फटफटीवर बसवले आणि जाता जाता म्हणाला, "च्यामायला पवार, त्या दिवट्यानं आपलं बोलणं ऐकलं आसंल काय? बेणीचं लय फाटक्या तोंडाचं हाये. समद्या गावात बोभाटा करून टाकील."
"आरं ऐकलं त्येनं तर काय फरक पडतुया? तू कंचा दरवडा टाकाया गेला व्हतास?"
"आरं तू येडा तो येडाच ऱ्हाणार बग. आरं रातच्याला पिपळाच्या आळीत म्या सुल्पीकडं गेलतु निजाया."
"आसं व्हय". पवार मास्तरच्या डोस्क्यात आताशी उजेड पडला.

सांगळे आणि पवार हे दोघेही बालपणापासूनचे अंडरवेअरस्ट्रीप फ्रेंड (म्हणजे लंगोटी यार). दोघे हायस्कुलापासून एकाच वर्गात शिकले, सोबतीने डीएड, आणि त्यानंतर ग्रज्युएशन केले व शेजारच्या गावी एकाच शाळेवर मास्तर झाले. म्हणजे गावातल्या लोकांनी दोघा मास्तरांना नवरा बायको म्हणावे एवढी दोघांची गट्टी. पवार हा बऱ्यापैकी हुशार, शांत, मितभाषी तर सांगळे कमालीचा खोडकर, भांडखोर आणि उपद्व्यापी. भिन्न स्वभावाचे असले तरीही दोघांची दोस्ती अगदी घट्ट होती. कधीतरीच मिळणारे सुख असो की दारिद्र्यामुळे पाचवीलाच पुजलेले दु:ख असो, दोघांनी त्या सुखदु:खात एकमेकांस नेहमीच साथ दिली होती.

हायस्कुलात पवारला वर्गातली शीला खूप आवडायची. मग सांगळ्याने स्वत: प्रयत्न करून शीलीच्या मैत्रिणींना गाठून, पवार आणि शीलीचे सुत जमवून दिले. सांगळ्याच्याही अर्थात तीन-चार मैत्रिणी होत्या, त्या त्याने स्वत:च्या हिकमतीवरच पटविलेल्या होत्या. पवारला चोवीस तास शीलीची आठवण बेचैन करी, तो सारखा तिच्याबद्दल बोले, विचार करीत राही. वेळी अवेळी उदास होई. मात्र सांगळे कधीही कोणत्याही पोरीबद्दल बोलत नसे. बेफिकीरपणे जाम मजा करीत असे. पवार विचारी, "काय रं तुला त्या गोपीची, राणीची, सुर्खीची, कंचीचीच आठवण येत न्हाई का?" मग सांगळे म्हणे, "आरं आठवण यीयाला त्या कुठं मम्बईला जाउन राह्यल्यात का काय? गावातच तर हायीत. जवा पायजेल तवा जाउन भेटायचं कंचीला बी. त्याचं काय येवडं?" 
सांगळे रोज एका तरी जणीला भेटे आणि कधी कधी आमराईत सुद्धा घेऊन जाई. तो नेहमी पवारला म्हणे की "आरं तू सुदिक जा की शीलीला घेऊन आमराईत". पण पवारला ते आवडत नसे. तो म्हणे, "नगं रे बाबा, अजून ती ल्हान हाये, आन ह्ये बरोबर बी न्हाई, म्या तिला कवाबी न्हेणार न्हाई आमराईत". तसेही पवार आणि शीलीला चार-पाच दिवसातून एकदाच भेटता येई. शीलीचा भाऊ सारखा शीलीवर नजर ठेऊन असे. एकदा त्याने पवारला दम सुद्धा भरला. मग सांगळ्याने त्याच दिवशी उगाच काहीतरी खुसपट काढून त्याला बेदम बुकलला. पवारला हे सुद्धा आवडले नाही. तो म्हणाला, "आरं कितीबी केलं तरी त्यो भाव हाय तिचा, मायला आपल्या भणीस कोणी नादाला लावतुया हे कुणाला आवडंल? त्याचा काय दोष नाय."

जेव्हा कधी पवार शीलीला एकांतात भेटे तेव्हा दोघे नुसतीच बसून राहत, काहीच बोलत नसत. शीलीच म्हणे अरे काहीतरी बोल की, पण पवार म्हणे "नुसती माह्या पुडं बसून ऱ्हा, आणं मला तुला डोळं भरून पाहून घेउंदे." शीली नुसतेच गप्प बसून रहायला वैतागायची. एके दिवशी शाळेच्या मागे पाटलाच्या शेतामध्ये बांधाच्या आड दोघे भेटली, तेव्हा शीलीनेच पवारचा हात पकडला, आणि त्याला जवळ ओढून मिठी मारली. मग हलकेच मान वर करून त्याच्या गालाचा मुका घेतला. पवारची कानशिले गरम झाली होती. छाती जोरजोरात धडधडत होती. त्याच्या अंगाला दरदरून घाम फुटला होता. त्याला काय होते आहे हे काहीच कळेना, त्याने मग डोळे बंद करून शीलीला तसेच कितीतरी वेळ कवेत धरून ठेवले. बऱ्याच वेळाने शीली बाजूला झाली, आणि तिने पवारकडे पाहिले, तो पांढराफटक पडला होता आणि त्याने डोळे घट्ट बंद करून ठेवले होते. शीलीने त्याला जोरात हलवल्यावर त्याने डोळे उघडले आणि तिला म्हणाला "हे समदं चुकीचं हाये. मला माफ कर". शीली जोरजोरात हसली आणि म्हणाली, "तू येडाच हायेस रे बाबा, तुला काय बी कळत नाय." पवार म्हणाला "चल आता घरी जाया पायजे." मग ती दोघे तिथून निघाली. शीलीने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली "चल आसंच हात धरून गावात न्ये मला". पवारने हात सोडवायची खटपट चालवली पण शीलीने तो घट्ट धरून ठेवला, आणि मग ती सारखी खांद्याने त्याला धक्का मारून त्याचा हात तसाच दाबून हसत हसत चालू लागली. बांधावरून दोघे पुढे आली तोच समोरून शीलीचा भाऊ येताना दिसला. त्याने या दोघांना हातात हात घालून चालताना पाहिले आणि तो तिथूनच जोरात ओरडला, "ये तुह्या मायला तुह्या. हरामखोरा थांब तुवा मुडदाच पाडतो". पवार त्याला पाहून गर्भगळीतच झाला. त्याने हिसका देऊन शीलीचा हात सोडवला आणि धूम ठोकून मागच्या मागून पसार झाला. शीलीच्या भावाने शीलीला तिथल्या तिथे तर कानफाडलीच पण घरी नेऊनही तिला बेदम मारली. शीलीची शाळा बंद झाली. त्यानंतर ती पवारला कधीच भेटली नाही. त्याच उन्हाळ्यात तिच्या घरच्यांनी तिचे लग्न लावून दिले. पवार वर्षभर अत्यंत दु:खात राहिला, आणि त्यानंतरही कोण्याही मुलीशी कधीही साधा बोलला देखील नाही.

नंतर बऱ्याच वर्षांनी एक वर्ष मागेपुढे दोघाही मास्तरांची लग्ने झाली. दोघांनाही दोन दोन पोरेदेखील झाली. सांगळे मास्तरची बायको दहावीपर्यंत शिकलेली होती, तर पवार मास्तरीण डी एड झालेली. ती पवार आणि सांगळे मास्तरांच्याच शाळेत मास्तरीण होती. तिथेच पवार मास्तर आणि तिचे सुत जमले. दोघांनी लग्न केले. तिचे माहेर त्याच गावातले. पहिले मुल होईपर्यंत तिने नोकरी केली. मात्र नंतर तिला हे सगळे व्याप पेलवेनात. दुसऱ्या गावाहून शाळेला येउन परत घरी जाउन मुले आणि घरची कामे बघणे हे तिला जमेना. ती मास्तरला म्हणू लागली की आपण आपली शाळा ज्या गावात आहे तिथेच राहू, म्हणजे ओढाताण कमी होईल. तशी पवार मास्तराच्या घरूनही काही अडचण नव्हती, पण आपण सासुरवाडीत रहावे ही कल्पना पवार मास्तरला आवडली नाही. तो तयार झाला नाही. दोघांची फार भांडणे झाली आणि शेवटी पवार मास्तरणीला नोकरी सोडावी लागली. तिला आपण नवऱ्याइतकेच शिकलेले असूनही घरी बसावे लागते याचा राग येऊ लागला. तिच्या कुरबुरी वाढल्या. हळूहळू सगळ्या कुरबुरी मोठ्या भांडणांत बदलू लागल्या. मास्तर आणि मास्तरणीचे अबोले लांबू लागले. दोन चार महिन्यांपर्यंत संवाद बंद होऊ लागले. बायको मास्तरला अंगाला हात लावू देणे सोडा, सरळ मार्गाने बोलत देखील नसे. पवार मास्तर हे सगळे सांगळे मास्तरला सांगे. तो पवार मास्तरलाच दोष देई. म्हणे "तूच तिला पयल्यापास्न लई डोक्यावर चढीवली. स्त्री पुरुष समानता म्हणं. आरं बाप्यानं बाप्या म्हणूनच ऱ्हावं गड्या. आजुनबी येळ गेल्याली न्हाई. च्यामायला दाखीव एकदा इंगा तिला, मंग आपाप सरळ होईल". पवार मास्तरला ते रागात पटेही आणि लगेच दुसऱ्या क्षणी वाटे की नाही, हे काही बरोबर नाही. त्याला नेहमी एक गोष्ट खटके की सांगळे मास्तर कायम आपल्या बायकोस तुसडेपणाने वागवी. तरीही त्याचा संसार अगदी आनंदात चाललेला दिसत होता. त्याची बायको कधीही काहीही तक्रार करीत नसे. वरून सांगळ्याने सुल्पीशी देखील सुत जमविले होते. अधून मधून तो रातच्याला तिच्याकडे जाई. शाळेतल्या कुळथे मास्तरणीशीही सांगळ्या जेव्हा तेव्हा अंगचटीला येई. एवढे असूनही सांगळ्याचे बायकोबरोबर मोठे भांडण झाले अथवा ती चार पाच दिवस रुसून बसली असे कधीही घडले नाही. पवार मास्तरला वाटे, 'साले आपण सरळमार्गी वागून देखील आपल्याच वाट्याला संसारात असे दु:ख, असा संघर्ष का? आणि सगळा फालतूपणा करूनही सांगळ्या एवढा मजेत का'? सांगळे मास्तर त्याला म्हणे, "साल्या तू येडा तो येडाच राहीला. तवा बी म्या येवडं सांगून बी शीलीला घेऊन आमराईत गेला न्हाईस, आन आता रांडच्या तुला लग्नाची बायकु बी पायजे तवा हात लावू द्येत न्हाय. थूत तुह्या मर्दानगीवं". पवार मास्तरचा जीव हे ऐकून कासावीस होई. "आरं बायकु न्हाय म्हणती ना? मग कर भाईर लफडं, च्यायला दोन मिनिटात त्या कुळथे बाईशी तुवा टाका भिडवून देतो". सांगळे मास्तराच्या या बोलण्यांनी पवार मास्तराच्या डोक्यात घण हाणल्यासारखे वाजे. पण तरीही तो अशा गोष्टी मुळापासून दुर्लक्षित असे. तो सांगळेला म्हणे, "अशे फालतू सल्ले मला न देशील तरच बरं हुईल". पण बायकोशी भांडणे, अबोला हे सहनशक्ती पलीकडे गेल्यावर त्याला आता सांगळ्याचे विचार थोडेफार पटू लागले होते. तशातच एके रात्री पवार मास्तर आणि बायकोचे फार कडाक्याचे भांडण झाले. दुसऱ्या दिवशी सकाळीच मास्तरीण पोरे घेऊन माहेरी निघून गेली.

आठवडाभर पवार मास्तर घराच्या बाहेर निघाला नाही, घरातच खूप दारू आणून तो सारखा पीत बसे. एक दिवस सांगळे मास्तर आला आणि शाळेत चल म्हणाला. पवार मास्तर तयार होईना. ज्या गावात बायको गेली आहे तिथे पायही टाकायची त्याची इच्छा नव्हती. पण सांगळे मास्तर बळे बळे त्याला घेऊन शाळेत गेला. शाळेत गेल्यावर सांगळे त्याला म्हणाला की "झालं ग्येलं समदं ईसरून जा, इचार करीत बसू नगंस, सम्द काही बराबर हुयील, बायकु गेली ना? मायला तिच्या नाकावं टिच्चून याच गावात गमजा मारू". मग पवार मास्तरला तिथे बसवून तो बाहेर गेला. पवार मास्तराच्या डोक्यात घण वाजत होते. बायको-भांडण, शीली-आमराई, सांगळे-गोपी,राणी,सुर्खी, सांगळे-त्याची बायको, सांगळे-सुल्पी, सांगळे-कुळथे.. पुन्हा बायको-भांडण, आमराई.. नाही नाही साला काय बी झाला तरी आमराईत जाणं वंगाळच..!! पवार मास्तरने एक दीर्घ निश्वास टाकला. सांगळे बाहेर गेल्यावर बरोबर पाच मिनिटांनी कुळथे मास्तरीण आत आली आणि पवार मास्तर शेजारी बसली. ती म्हणाली, "जाऊ द्या हो पवार सर, फार वाईट वाटून घेऊ नका. मी आहे ना. मला सांगळे सरांनी सगळे सांगितलेय". असे म्हणून बोलत बोलत तिने मास्तरचा हात धरला आणि त्याला जवळ ओढले. पवार मास्तराच्या डोक्यात घण वाजतच होते. सांगळे-सुल्पी, सांगळे-कुळथे-अंगचटीला येणे... मास्तरला सांगळे आणि कुळथेचे अंगचटीला येणे आठवून फार किळस आल्यासारखे झाले, आणि तो तिचा हात झटकून टाकून तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्याने सांगळे मास्तरकरवी रजा आणि बदलीसाठी अर्ज पाठवून दिला.

पवार मास्तरची बदली झाली भिमुर गावी. मास्तरला बऱ्याचदा वाटे की बायकोला, पोरांना आणायला जावे, पण तो गेला नाही. आता जरी तो सावरला असला तरी त्याचे पिणे आणि डोक्यात घण वाजणे वाढले होते. त्याला कधी कधी वाटे, च्यायला सांगळे सांगायचा तसे खरेच आमराईत जायला पाहिजे होते. आपण साले येडे होतो. आणि असे वाटले की त्याच्या डोक्यात अजून जोरजोरात घण बरसत. सांगळे मास्तर भिमुरपर्यंत त्याच्याबरोबर त्याला पोचवायला आला. खोली नीटशी लावून बाकी व्यवस्था लावून दोन दिवसांनी परतला. रोज पवार मास्तरला फोन करायचा. पवारही आता भिमुरात बऱ्यापैकी स्थिरावला.

एक दिवस पवार मास्तर शाळेतून परतत होता, येतायेता तो मंडईत भाजी घ्यायला गेला. त्याला त्याची आवडती भेंडीची भाजी मिळेना. त्याला एका भाजीवाल्याने सांगितले की तिकडे मंडईच्या कोपऱ्यावर एक भाजीवाली आहे तिच्याकडे कदाचित भेंड्या शिल्लक असतील तर बघा. पवार मास्तर तिकडे गेला. त्याने लांबून पाहिले की खरेच त्या भाजीवालीकडे एका छोट्या पाटीत भेंड्या ठेवलेल्या होत्या. पवार मास्तरला आनंद झाला. सगळ्या मंडईत फक्त एकच भेंडीवाली? काय म्हणावे या भिमुरला? त्याने तिच्याकडे नीट निरखून पाहिले. आणि तो जागच्या जागी थबकला. ती शीली होती. पवार मास्तर त्याच पावली माघारी फिरला, मघाच्या भाजीवाल्याने त्याला जाताना पाहून विचारले, काय मास्तर भेटली काय भेंडी? पवार मास्तरने त्याचेकडे लक्षच दिले नाही, तो घाईघाईने घरी आला. त्याचे हृदय आता जोर जोरात धडधडत होते. श्वास गरम झाले होते. त्याला काहीच सुचत नव्हते. त्याने भात लावला पण न जेवताच अंथरुणावर पडला. त्याचा डोळ्याला डोळा लागेना. बराच वेळ तो तसाच अंथरुणावर तळमळत राहिला. खूप वेळाने मग कधीतरी त्याचा डोळा लागला.

दुसऱ्या दिवशी पवार मास्तर भेंडी घ्यायला गेला. शीलीने भेंडी तराजूच्या पारड्यात भरली आणि पिशवीत टाकणार तोच पवारने तिचा हात धरला. शीलीने दचकुन वर पाहिले आणि पवारला पाहून आश्चर्याने म्हणाली, "अगं बाई, बारकू तू"? 
"व्हय शीले म्याच. बग तुह्यासाठी बदली घेऊन या गावात आलोय". 
शीली ते ऐकून अंमळ लाजली आणि खाली नजर करून खुदकन हसली. "कायतरीच तुझं". पवार मास्तर म्हणाला, "अगं खरंच. बरं त्ये जाऊ दे. तू माह्याबरुबर चल". ती म्हणाली कुठ? तो म्हणाला चल तर.   
"आणं माह्या भेंड्या"? 
"अगं बये त्या भेंड्या ऱ्हावू दे, तू चल". 
दोघे गावाबाहेरच्या घनदाट आमराईत गेले. पवार मास्तरने शीलीचा हात घट्ट धरला होता, मग एका ठिकाणी ते थांबले. पवार मास्तरने शीलीला घट्ट मिठी मारली. पवार मास्तर सुखाच्या ढगांवर उडत होता. थोड्या वेळाने मग शीलीने त्याचा हात पकडला आणि म्हणाली, "चल असंच हात धरून गावात न्ये मला". पवार मास्तर म्हणाला "आसंच? आनं कापडं"? शीली म्हणाली, "न्हाई असंच जायाचं दोगंबी". मग शीली पवार मास्तरचा हात धरून चालू देखील लागली. पवार मास्तर म्हणाला, येडी झाली काय तू? आसं कसं गावात जायाचं? पवारने हात सोडवायची खटपट चालवली पण शीलीने तो घट्ट धरून ठेवला, आणि मग ती सारखी खांद्याने त्याला धक्का मारून त्याचा हात तसाच दाबून हसत हसत चालू लागली. तेवढ्यात समोरून आवाज आला ""ये तुझ्या मायला तुझ्या. हरामखोरा थांब तुझा मुडदाच पाडतो". त्या आवाजासरशी पवार मास्तर खडबडून स्वप्नातून जागा झाला. त्याचे सगळे अंग घामाने भिजले होते. तो थरथर कापत होता. त्याच्या डोक्यात आता खूप जोरजोरात घण वाजू लागले. आता घण अधिकच कर्कश झाले होते. शीली-आमराई-बायको-भेंडी… पुढे सकाळपर्यंत मास्तरचा डोळा लागला नाही.

आज अगदी सकाळी सकाळीच पवार मास्तरने सांगळे मास्तरला फोन लावला. सांगळे मास्तरही आश्चर्यचकित झाला.
"काय रं? आज सकाळी सकाळीच फोन"?
"आरं येक बात सांगायची व्हती. काल मला भिमुरात शीली दिसली".
"काय म्हनतुस? पवाऱ्या नशीबवान हायेस लका. आता मांगच्यासारखं येड्यावानी करू नगंस, धर शीलीला अन सोड उपास."
जेव्हा आपल्याला हवा तो सल्ला ऐकायचा असतो तेव्हा आपण नेमक्या माणसालाच विचारतो. त्यामुळे धीर तर मिळतोच पण काही वाईट झाले तर सल्ला देणारास दोष देऊन आत्मवंचनेपासून वाचता येते. आणि सांगळे मास्तरने अपेक्षेप्रमाणे पवार मास्तरास हवा असलेलाच सल्ला दिला. काय असते की आपण जेव्हा द्विधेत असतो तेव्हा वाईट काम करण्यासाठी आपण नेहमी एक संधी शोधत असतो. त्याकामी मग एखाद्याचा सल्ला हीच पडत्या फळाची आज्ञा ठरते. पवार मास्तरला क्षणभर वाटले, की शीलीबद्दल असा विचार करणे योग्य आहे की नाही? पण असे वाटणे हे तर नैसर्गिकच आहे, अशी त्याने स्वत:ची समजूत घातली. एकदा पाप करायचेच असे मनाने घेतले की मग माणूस त्याचे समर्थनार्थ त्या वाईट कृत्यास 'नैसर्गिक प्रवृत्ती' अथवा 'जशास तसे' अशी कारणे अथवा बिरुदे लावून ते पाप करू धजतोच. गोष्ट चांगली असो की वाईट, ती करायचीच असे एकदा ठरवल्यावर तिच्या समर्थनासाठी शंभर कारणे शोधता येतात वा सापडतात. डोक्यात घण वाजत होते पण पवार मास्तर तिकडे दुर्लक्ष करीत होता. यात काही वाईट नाही. जर असते तर सांगळया एवढा सुखी कसा झाला असता? आपण तेव्हाच शीलीला आमराईत न नेऊन मोठी चूक केली असे त्याने मनाशी म्हंटले. आणि मग आता दैवयोगाने पुन्हा चालून आलेली ही संधी काही केल्या वाया जाता कामा नये असे ठरविले.

शाळा सुटेस्तोवर पवार मास्तरला दम निघेना. त्याला मंडई आणि तिथून पुढे आमराई खुणावीत होती. शेवटी हाफ डे टाकून तो निघालाच. भर उन्हाचा मंडईत आला. पाहतो तर काय, मंडईत शुकशुकाट.!! भाजीवाली मंडळी दुकाने बंद करून गेलेली. तिथून जाणाऱ्या एकाला मास्तरने विचारले, "मंडईला आज सुट्टी आहे काय"? त्याने सांगितले की दुपारी जेवणासाठी मंडई एक वाजेपासून चार वाजेपर्यंत रोजच बंद असते. पवार मास्तरचा खूप चरफडाट झाला. च्यायला लोकांची गैरसोय करून साले तीन तास सुट्टी घेतात म्हणजे काय? मास्तरला राग अनावर होत होता. आपल्या लागलेल्या भुकेसाठी लोकांना लागलेल्या भुकेचा राग करणारा माणूस कधी पाहिलाय का तुम्ही? नाही ? मग बंद मंडईत हात चोळीत फिरणाऱ्या पवार मास्तरला बघा की..!! च्यायला उगीच हाफ डे वाया गेला असा एक खास मास्तरी विचार पवारच्या डोक्यात उमटला आणि त्याची तगमग अजून वाढली.

चार वाजता मंडई उघडली खरी पण शीलीचे दुकान काही उघडले नाही. पवार मास्तरने चार वेळा त्या कालच्या भाजीवाल्याला विचारले की ते भेंडीवाले दुकान केव्हा उघडणार? भाजीवाला म्हणाला की आज मी सुद्धा आणली आहे भेंडी. बोला किती देऊ? नाही नको. च्यायला बोंबला, आता इथे उभा राहिलो तर हा भाजीवाला हजार प्रश्न विचारणार असा विचार करून पवार मास्तर तिथून थोडा बाजूला गेला आणि एका टपरीवरून तंबाखू मळीत मळीत शीलीच्या दुकानाकडे डोळे लावून उभा राहीला.

थोड्या वेळाने शीली आली आणि तिने दुकान उघडले. पवार मास्तरने लगबगीने तंबाखू थुंकून टाकली आणि तिकडे पळाला. शीली भाजी लावीत होती. पवार मास्तरने तिथे गेल्यावर तिला विचारले, "काय बरं हाये ना? हाये का वळख"? शीलीने चमकून मास्तराकडे पाहिले, त्याला थोडा वेळ निरखले आणि आश्चर्याने म्हणाली, "बाई गं बारकू तू? आरं मिश्यांमुळं म्या तुला वळीखलंच न्हाई बग. तू इकडं कसा काय"? 
मास्तर म्हणाला "माझी हिथंल्या शाळत बदली झालीया". 
"काय? मग तू इकडं कंदी आला"? 
"मला दोन आठवडं झालं हिथं. तू कशी हायेस"?
"म्या जाम मजेत हाये".
"आता तर तू लयीच सुंदर दिसाया लागलीस शीले". मास्तरने फासा टाकलाच. 
"चल, कायतरीच काय"?
"अगं खरंच. आयच्यान सांगतो".
मग गावाची, माणसांची विचारपूस झाली. पवारला गावच्या चौकशीने वैताग आला. त्याला फक्त आमराई दिसत होती. त्याने विचारले, "हिथं आमराई हाय काय"?
"काय? आमराई? अंन ती बी ह्या भिमुरात? आरं हे काय आपलं गाव हाये व्हय? तुला आंबं खायचं हायेत का? माह्या शेतात हायती चार आंब्याची झाडं, उद्या सकाळच्याला घरला ये, म्या थोडं आंबं काढून ठिवते".
"घर? घरी कोण कोण हाये तुह्या?
"सासू हाय, दोन प्वारं हायती आन मवा नवरा हाये"......
"नवरा?  पवार मास्तर चपापला. शीलीला नवरा आहे हे इतकावेळ त्याच्या ध्यानातच आले नव्हते. "त्यो काय करतो"?
"त्यो आमचं शेत बघतो. त्यो पिकवतो आन म्या हिथं विकते".
"कसा हाये त्यो"?
"त्यो लई चांगला हाये बग. मला लई जीव लावतो, अन माजा बी त्येच्यावर लय जीव हाय. दिवसभर कष्ट करतो. सोभावानं बी लई चांगला हाय. कदी कुणाला टाकून बोलणार नाय, कुणाला दुखावणार नाय की कुणाकडं बी वाईट नजरेनं बगणार न्हाई. अगदी तुझ्यासारखाच सरळमार्गी हाये बग".

पवार मास्तरच्या पायाला चप्पल घातलेली असूनही मातीचे चटके बसत होते, त्याचा चेहरा खर्रकन उतरला होता. एकतर शीलीचा नवरा असणार हाच विचार त्याच्या मनाला शिवला नव्हता, वरून शीलीचा त्याचेवर खूप जीव आहे हे तर त्यास अधिकच त्रासदायक वाटू लागले. शीलीने विचारले, "त्ये जाऊ द्ये, बोल तुला कंची भाजी देऊ? ही भेंडी देऊ काय? तुला आवडती ना"?
पवार मास्तर म्हणाला नको. शीली म्हणाली, "आसं कसं ? कायतरी घ्ये की". मास्तर म्हणाला ठीक हाये तर मग द्ये मला पावशेर कारलं.
"कारलं? तुला कवापास्न कारलं आवडाया लागलं"?
मास्तर म्हणाला, लगीन झाल्यापासून.
"काय तुजं लगीन झालं? काय गं बाई म्या बी येडीच हाये बग. तुला इचारलं बी न्हाई. बायकुला बी आणलंय काय भिमुरला"?
"न्हाई ती नंतर येणार हाये".
"मग ती आल्यावर तिला बी घेऊन घरी ये बरं का, ह्ये घे कारलं आन उद्या सकाळच्याला आंबं न्याया नक्की ये, म्या तुही माझ्या नवऱ्याची वळख करून देते".

कारलं घेऊन मास्तर खोलीवर आला. कुणीतरी खूप उंचावरून त्याला फेकून दिल्यासारखे वाटत होते.  कॅरमच्या खेळात राणीच्या मागे जोरात स्ट्रायकर मारावा, आणि राणीपासून चुकून तो समोरच्या बाजूवर आदळावा, तेव्हा तो जेवढ्या जोरात पुढे गेला होता तेवढ्याच जोरात विरुद्ध दिशेने मागे येतो. तसेच पवार मास्तराचे झाले. शीलीविषयी त्याचे एकमार्गी विचार अचानक विरुद्ध दिशेत बदलले. त्याला वाटले जर आपल्याला अध:पतनापासून अशी नियती वाचवीत असेल तर हे काम नक्की वाईटच असणार. तो विचार करू लागला की शीली असे का म्हंटली असेल की माझा नवरा अगदी तुझ्यासारखाच आहे? माझ्यासारखा म्हणजे कसा? बावळट? की खूप चांगला? मी चांगला आणि सरळमार्गी आहे? पण मी तर किती वाईट विचार करत असतो..!!  शीली मला सरळमार्गी का समजली? मला जर शीली मिळवायची असेल तर हा सरळमार्ग सोडावा लागेल. पण शीलीला आता आवडणारा तिचा नवरा असो की तेव्हा आवडणारा मी, तिला भावणारा पुरुष सरळमार्गीच हवा. मग अशा परिस्थितीत काहीही केल्या तिला मी  मिळवू शकणार नाही. पवार मास्तरला शीलीव्यतिरिक्त दुसरी कुणीही समोर दिसेना. मात्र त्याला आता काहीही करून एक स्त्री पाहिजे होतीच. आमराई त्याला खुणावत होती.  आता कुळथे मास्तरीण त्याच्या मनात गोंधळ घालू लागली. आपण शीलीला तेव्हा आमराईत न नेऊन चूक केली हे आता त्याने मनाशी पक्के केले होते. पण आपण कुळथे मास्तरणीला टाळण्यातही चूक केली की काय असे त्याला  वाटू लागले.  मात्र लगेच त्याला कुळथे मास्तरीण  आणि सांगळे यांचे अंगचटीला येणे आठवू लागले. तरीही आपण तिच्यासाठी प्रयत्न करून पहावाच काय? छे छे हा प्रकार किळसवाणाच आहे, साल्या सांगळ्याने निदान कुळथे मास्तरणीवर  तरी तोंड मारायला नको होते. पवार मास्तराच्या डोक्यात आता घण ढणाणा वाजत होते. हट साला, सांगळया म्हणतो तशी आपल्या मर्दानगीतच खोट आहे की काय?  आपले शरीर मर्दाचे आहे, त्याच्या गरजाही  मर्दाच्या आहेत पण मन मात्र बाईचे आहे. एकदम डरपोक.!! सरळमार्ग सोडून आपल्यात वाकड्यात जायची हिम्मत नाही आणि जर चुकून गेलोच तरी पुढे जाण्याची, आणि विपरीत परिस्थितीत निभावून नेण्याची आपली ददात नाही. आपण मनातल्या मनात वाईट, पापी असूनही बाहेर सरळमार्गी असल्याचा मुखवटा पांघरणाऱ्या आणि आपला तोच चेहरा इतरांना खरा वाटावा म्हणून मन मारून आततायी झटणाऱ्या अतिसामान्य प्रकारचे माणूस आहोत. आपण बदलू शकत नाही आणि म्हणूनच आपले नशीबदेखील बदलू शकत नाही.
याच विचारांच्या तंद्रीत असताना मोबाइलवर सांगळे मास्तरचा फोन आला, पण पवारने उचलला नाही. सांगळ्याने सात आठ कॉल केले पण पवार मास्तरने फोन उचललाच नाही. शेवटी रात्री जेवताना कारल्याच्या भाजीचा पहिला घास घेताच सांगळ्याचा परत फोन आला आणि पवार मास्तरने तो उचलला. उचलताच सांगळे मास्तर म्हणाला? "कारं लका, शीलीमदीच येवडा अडकून पडला की माजा फोन उचलाय बी येळ मिळंना काय"? कारल्याच्या घासाने पवार मास्तराचे तोंड आधीच कडू झाले होते, तो सांगळ्यावर ओरडलाच, " सांगळया ल्येका आसं काही बोलल्यालं मला आवडत न्हाई हे तुला माहित हाये ना? परत आसं काही बोलत जाऊ नगंस. म्या काय तुझ्यावानी फालतू न्हाय, समजला काय?
सांगळे मास्तर थोडा वरमला. बोलला, "का रं लका काय झालं"?
"काय नाय. फुडच्या आईतवारी म्या तिकडं येतुय".
"काय झालं? कशासाठी रं"?
"दुसरं काय नाय", सांगळे मास्तर उत्तरला. "बायकुची समजूत घालून तिला इकडं घेऊन यायची हाय".

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०१४

'फॅंड्री'

यष्टीच्या स्टॅंडजवळ दौल्याचे शेत आहे. ऐन गावात असल्याने मोकाट गायी, गाढवे, डुकरे यांची तिथे रेलचेल असते. तेव्हा शेतराखणीला दौल्याची ड्युटी लागे. आता आम्ही दोघे लंगोटीयार असल्याने दौल्याबरोबर मी ही राखणीला जायचो. आमचा एकच कार्यक्रम असे, कुणाची गाय, गाढव दिसले की जाम जोरात झोडपीत झोडपीत पिटाळून गावच्या कोंडवाड्यात नेउन कोंडायचे आणि मग आत कोंडल्यावर देखील त्यांस मनसोक्त चोपायचे. असे चोपल्यावर ते जनावर निदान चार दिवस शेताकडे पुन्हा फिरकत नाही हा आमचा समज.!! वरून त्याच्या मालकाला ग्रामपंचायतीकडे जो काय दंड भरावा लागे त्यामुळे आम्हाला अजूनच आनंद मिळायचा. रोज निदान ७-८ गायी/गाढवे बदडून, कोंडून, आम्ही आमच्या असुरी आनंदात व ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर टाकीत असू. ही झाली गायी आणि गाढवांची बात, पण गावात लय डुकरं आहेत. म्हणजे यत्र तत्र जिथे जिथे मलमुत्र त्या सर्वत्र डुकरं. आणि प्रत्येक गावात असते तसे नेमके यष्टीच्या स्टॅंडजवळ आमच्या गावातले सर्वात मोठे गटार आहे, त्यामुळे डुकरांचे दिनस्नान, नाश्ता, लंच आणि डिनर हे सगळे तिथेच चालू असायचे. थोडी गम्मत म्हणून मग डुकरे टाईमपास करण्यासाठी बाजूला दौल्याच्या शेतात जाऊन धुडगूस घालायची. शेतातला भात पार चिखलात बुडून जायचा. गायी आणि गाढवे हुडकायला आणि हाकलायला सोपी, पण डुकरे? ती कोंडवाड्यातही कोंडता यायची नाहीत. आणि सगळी सारखीच दिसत असल्याने त्यांच्या मालकाकडे तक्रार केली तरी ही डुकरे माझी नाहीत असे म्हणून तो सपशेल कानावर हात ठेवायचा. या डुकरांची अख्खीच्या अख्खी टोळी शेतात घुसायची, आणि लक्षात येईपर्यंत पार हैदोस घालून टाकायची. आम्ही मग लक्षात आल्यावर बाहेरून दगड मारू मारू त्यांना बाहेर हाकालायचो. ती अजून अजून आत घुसायची आणि आम्ही अजून दगड मारायचो, दर आठवड्याचे आम्ही डुकरांना मारलेले दगड गोळा केले असते तर सात रांजण सहज भरले असते. (पण आम्ही काही रांजण भरून ठेवले नाहीत आणि कोण्या नारदाने येउन आमचे पापक्षालन देखील केले नाही) असो, तर येन केन प्रकारेण आम्ही डुकरांना बाहेर काढायचो आणि मग असे जीव खाऊन त्यांना पीटाळायाचो की विचारू नका, कपड्यांना लागलेला चिखल, गाळात रुतून कुठेतरी निघून गेलेल्या चपला, मेहनतीने घामेजलेला चेहरा, हातात लांब काठ्या अशा अवतारात आम्ही डुकरांची ससेहोलपट करायचो.
एक दिवस डुकरांना फारच ऊत आला होता आम्ही दोन तीनदा डुकरे पिटाळली पण ती पुन्हा आली. मग मी दौल्यास म्हंटले, आता डुकरे लय झोडपायची आणि पार गावाच्या दुसऱ्या टोकापर्यंत हाकलायची. मग आम्ही हळू हळू दोन्ही टोकांनी मध्ये कोंडीत पकडून डुकरे शेताबाहेर हाकलली आणि मग एका बाजूने दौल्या व दुसऱ्या बाजूने मी गर्जना करीत त्यांवर तुटून पडलो, बऱ्याच डुकरांच्या पेकाटात काठ्या हाणल्या. डुकरे तशीच यष्टीच्या स्टॅंडमध्ये घुसली. मी दौल्याला म्हंटले, आता मस्त कोंडीत सापडली आहेत. अजून पुढे हाकलण्यापूर्वी मनसोक्त बदडून घेऊ. मग आम्ही सगळ्या स्टॅंडभर बदडू बदडू डुकरे पिटाळली, याच उद्योगात मी चिखलात पडल्याने आणि दौल्याची पळता पळता चप्पल तुटल्याने आम्ही दोघेही तापलेलो होतो, आमच्याकडून डुकरांची अशी जाम धुलाई चालू असतानाच दोन जण बराच वेळ लांबून आम्हाला पाहत होते. आमच्या एकंदर अवतारावरून त्यांनी आमच्या विषयी मनात काही कयास बांधले. मग एका कोपऱ्यात आम्ही एका डुकरास टोलवत असताना ते आमच्याकडे आले आणि म्हणाले, "ए डुक्करधऱ्यांनो लय मेहनत करता राव तुम्ही. आम्ही मघापासून तुम्हाला बघतोय. तुमच्या दोघांचा मेळ सुद्धा छान जमतो, तुमच्याकडून एकही डुक्कर वाचले नाही. अहो आमच्या आळीत सुद्धा लय डुकरे झालीत, इथली पकडून झाली की मग तिकडे याल का पकडायला?"
आम्हाला काय उत्तर द्यावे ते कळेना, मग थोडावेळ अगदी शांत राहून अचानक आम्ही दोघेही इतके जोर जोरात हसू लागलो की ते दोघे आमच्याकडे फार विचित्र नजरेने पाहत निघून गेले. एक जण जाता जाता दुसऱ्याला म्हणाला, येडेच दिसतात, जाऊ दे, त्यांची भाषा वेगळी असते, कदाचित त्यांना मराठी समजत नसेल...

प्यार व्यार

"आज अट्ठाईसवाँ मिल गया, उसका नाम है अमोल लांडे", रघुने मुझे आते ही यह खबर सुनाई रघु मेरा बहुत ही अच्छा दोस्त है। ये उन दिनोंकी बात है, जब हम हाईस्कूल में पढ़ा करते थे। हम दंसवी में थे और रघु आंठवी कक्षा में पढनेवाली पूजा से बेहद प्यार करता था। वैसे पूजा खुद ही इतनी प्यारी थी कि रघु के अलावा कई सारे लडके भी उसे उतनाही बेहद प्यार करते थे। रघु उन सभी की जानकारी रखता था, जो उसके हिसाब से उसके दुश्मन यानि पूजा को चाहनेवाले थे। यह अमोल लांडे उसकी लिस्ट में ऐसा अट्ठाईसवाँ दुश्मन था। मै रघु से पूछा करता के इन सभी की ऐसे लिस्ट बनाकर तू क्या करेगा? वह मजाक में कह देता कि सबको मार डालूँगा।  

पूजा का घर रघु के घर के बिल्कुल सामने ही था। रघु के आँगनसे पूजा का घर साफ़ साफ़ दिखाई देता था। रघु हमेशा आँगन में चारपाई डालकर उसपे लेटेलेटे पूजा के घर की तरफ टकटकी लगाए बैठता। स्कुल जाने के वक्त वह आँगन में आकर खड़ा होता, और जब पूजा अपने घर से निकल कर मोड़ से रास्ते तक पहुंचती, तब जाकर वो पीछे से निकलता। हर रोज रघु पूजा के पीछे पीछे चलकर स्कुल आता। रघु बताता था कि जब वो बहुत छोटा था, तब हमेशा वह पूजा के साथ खेलता था। तब दूल्हा-दुल्हन के खेल में पूजा अक्सर उसकी दुल्हन बन जाती थी। मगर फिलहाल के दो चार सालोंसे उसने खुद होकर पूजा से बात भी नहीं की। वो डरता है कि कहीं बातों बातों में पूजा को पता न चल जाए कि वो उसके बारे में क्या सोचता है। पूजा जब कभी उसके घर आती है, तो वो छुप जाता है। और वैसे ही छुप छुप कर उसे देखता है। उसे ये भी डर सताता है कि बचपन में पूजा उसे रघु भैय्या कहती थी, तो कहीं अब भी वो आदतन उसे भैय्या ही ना कह दें।

जब भी रघु और मै एकसाथ होतें, तो रघु केवल पूजा ही के बारे में बातें करता रहता। पूजा ने आज ये पहना है। पूजा ने आज दो चोटी बाँधी हैं। पूजा आज घर से सीधे स्कुल नहीं आयी, बीच में गौरी जनरल स्टोअर्स में रुककर उसने एक पेन ख़रीदा। पूजा को डेरी मिल्क बहुत पसंद है। उसके घर में सचिन तेंडुलकर की बहुत बड़ी फ़ोटो है। और ऐसी ही हजारो बातें रघु करता रहता। मै कभी उसको सुनता, कभी अनसुना कर देता लेकिन रघु को मेरे लगाव या अलगाव से कोई फर्क ना पड़ता। वो तो पूजा के बारे में बस बातें करता ही जाता। कभी हम गाँव से बाहर हरियाली पर लेटे लेटे आकाश को तांकते रहते, तो रघु कहता, "अगर पूजा साथ होती तो कितना अच्छा होता"। कभी हम नदी में तैर रहे होते, तो रघु को याद आता कि पूजा को गहरे पानी से बहोत डर लगता है। फिर वो कहता कि अगर पूजा अब यहाँ आये और गलती से पानी में गिर जाए, तो मै उसे तैरकर पार ले जाऊँगा। मै कहता, "कमीने, जिससे प्यार करता है, उसे पानी में गिराने के बारे में सोचता है?" यह सुनकर वह हड़बड़ा जाता कि कैसे उसने भावना में बहकर अपनी पूजा के बारे में ऐसा बुरा सोचा। फिर वह अपने ही आप अपने गाल पर दो तमाचे जड़कर उस गुनाह की सजा ले लेता। और कहता, "मेरी प्यारी पूजा, मुझे माफ़ कर दो।" उसकी ऐसी हरकतोंपर मै उसे खूब डाँटता। कहता, अबे गधे मैंने तुझे यूँही उल्लू बनाया, ये कोई बड़ी बात नहीं थी। बेकार में तूने अपने गाल लाल करा लिए। फिर मै जोर जोर से उसपर हँसता रहता। लेकिन रघु कहता "चाहे ये कोई बड़ी बात ना हो, लेकिन पूजा को कोई तकलीफ हो, ये मै बर्दाश्त नहीं कर सकता। उसे तो सिर्फ हँसते रहना चाहिए। उसके दामन में सिर्फ ख़ुशी ही ख़ुशी होनी चाहिए। उसे तो कल्पना में भी कोई दुख पहुंचे ये मै सह नहीं सकता।

पिंकी हमारे पड़ोस में रहती थी और पूजा के ही क्लास में पढ़ती थी। वह पूजा की बेस्ट फ्रेंड थी। वह हमेशा हमारे घर आती, या मै उनके घर जाता। हम दोनों घरों के बच्चे मिलकर दिनभर खूब खेलते रहते। साथ बैठकर पढ़ाई करते। पिंकी को साइंस और मैथ्स थोड़ी कम समझ में आती थी। फिर मै उसे ये दोनों सब्जेक्ट सिखा देता। पूजा भी पिंकी के साथ अक्सर हमारे घर आती। मेरे साथ खेलतीं। एक दिन पूजा ने मुझसे कहा, "राहुल भैया, मुझे भी अंग्रेजी और मैथ्स समझ में नहीं आती, क्या तुम मुझे भी सिखाओगे?" मैंने कहा, "हाँ हाँ क्यों नहीं? मगर मेरी भी दसवीं कक्षा की पढ़ाई है, इसलिए ज्यादा देर तक नहीं सिखा पाउँगा। चलेगा?" वो मान गयी। फिर मै अक्सर पिंकी और पूजा दोनोंको जब भी वक्त मिले पढाने लगा। रघु कई बार मुझसे पूछता रहता कि जब वो तुझसे पढने आती है, तो क्या कभी मेरे बारे में कोई बात करती है? असल में पूजा ने कभी भी रघु के बारे में कोई बात नहीं की लेकिन मै रघु से कहता कि "हाँ तो, कई बार वो तुम्हारा जिक्र करती है।" रघु इस बात से बड़ा खिल जाता और पूछता कि वो मेरे बारे में क्या बात करती है? मै इसपर कोई बहोत ही ढुलमुलसा झूठमुठ का जवाब दे देता, मगर मेरे उसी झूठ से सारा दिन रघु के चेहरेपर मुस्कान खिली रहती।  मुझे वो बड़ा अच्छा लगता।

रघु मेरे घर कभी कभार ही आता था। वो हमेशा डरता था कि कहीं वो आये और पूजा भी उसी वक्त मेरे घर में हो, तो न जाने क्या होगा। मै कहता, "अरे पागल, उससे बात नहीं करेगा तो उसे पता कैसे चलेगा कि तू उसे चाहता है? कभी तो उसे बतायेगा? तू उसे एक बार बता तो दे, क्या पता शायद वो 'हाँ' ही कह दे।" रघु बोलता, उसे यह बात पता चल जाए और वो ना कह दे तो? "अरे ना कहेगी तो क्या? उसमे कौनसे ऐसे हीरे-जवाहरात जड़ें हैं? वो नहीं तो कोई और मिल जायेगी।" मेरे ऐसा कहने पर रघु बहोत निराश होता, और कहता, "यार तू तो ऐसी बात मत कर। पता है? ऐसे बिना कुछ कहे, बिना उसे पूछे, जीने में एक अलग मजा हैं। उसके प्रति जो मेरी भावनाएँ हैं, वह अपार आनंदकारी अनुभूतियाँ हैं। जब उसके बारे में सोचता हूँ, तो मुझे अपने खुद के होने पर नाज़ होता है। उसकी मात्र एक झलक से मन में कितनीही सुंदर सुंदर भावनाएँ उभर आती हैं। जब उसकी खिलखिलाकर हँसने की आवाज सुनता हुँ, तो मेरे कानों में कितनीही मधुर किलकारियाँ गूंजती रहती हैं। जब कभी मै मुस्कुराता हुँ, तो मेरी मुस्कराहट में वही बसी होती है। अगर मैं उसे बोल दूँ, और वो मना कर दे, तो मुझसे ये सारी भावनाएँ खो जाएँगी। और मै इन्हे कतई खोना नहीं चाहता। मैंने हैरानी से कहा, "तुझे पता है? पिंकी ने मुझे बताया था कि अमोलने पूजा को एक प्रेमपत्र लिखा था। मगर पूजा ने लेने से इनकार कर दिया। साले तू अपनी भावनाओंकोही चिपककर बैठ, और तबतक उधर वो अमोल लांडे पुरजोर कोशिश करके खुद ही पूजा से चिपक लेगा। कुछ कर कि किसी और से पहले तू ही पूजा को लपक ले।" रघु ने गुस्सा होकर कहा, "देख राहुल, पूजा के बारे में ये चिपकना और लपकना जैसी गन्दी बातोंका जिक्र करना तक मुझे अच्छा नहीं लगता। वह इन सब गन्दी बातोंसे परे है। उसके बारे में ऐसा कहना या सोचना भी पाप है। अगर फिर तुमने गलती से भी ऐसा कुछ कहा, तो अच्छा नहीं होगा।" मुझे उसका ऐसे बात करना पसंद नाही आया। फिर भी मैंने कहा, "यार तू कबतक अपनी भावनाएं यूँही छुपाकर रखेगा? क्या तुझे नहीं लगता कि वो हमेशा तेरे पास हो, तुझसे बातें करे, तू उसका हाथ अपने हाथ में लें, उसे अपनी बाहों में भरे?" रघु ने कहा, "नहीं यार, मै तो उसे छूना भी नहीं चाहता। मै चाहता हूँ कि किसी कोमल फूल की तरह वो बस अनछुई यूँही खिली रहे। उसपर जरा सी भी खरोंच न आये। मैं तो ये भी नहीं चाहता कि मै हर पल उसे देखता रहूँ, न जाने शायद मेरी नजरोंसे बहनेवाली भावनाओंकी तीव्रता से उसपर कोई आंच आये। मै बस चाहता हूँ कि वो अपने ही आप में उलझी रहे, खुद ही पे इतराती रहे, हमेशा हसती रहे, मुझे बस ये एहसास हो कि वो खुश है। मुझे बाकी कुछ भी नहीं चाहिए। मेरे लिए प्यार का मतलब, उसे छूना या सिर्फ अपने ही लिए उसे छुपाकर रखना नहीं है। उसके नाम मात्र से मेरे मनमंदिर में जो पवित्र घंटियाँ बजने लगती हैं, उसकी मुस्कराहटसे मुझे जो किसी मंदिर में बैठे हुए मंत्रों की आवाज सुनने का एहसास होता है, वही पवित्रता मेरे मनमें हमेशा कायम रहे, और उसका केवलमात्र कारण वही हो। यही मेरे लिए प्यार का मतलब है।" मै यह सुनकर दंग रह गया, पूजा के नामभर से जिसे मंदिर में होने का पवित्र एहसास होता था, उस रघु की बातें सुनते हुए मैंने मन ही मन में एक मंदिर सजा कर रघु और पूजा की मूर्तियाँ उसमें स्थापित कर लीं। 

एक दिन मै रघु के साथ मंदिर जा रहा था। हमें सामने मंदिर से पिंकी और पूजा बाहर आते हुए दिखाई दीं। उन्होंने भी हमें देखा। मैंने रघु से कहा, "चल आज पूजा से तेरी बात करतें हैं।"  लेकिन रघु वहाँ नहीं रुका। वह पूजा को देखते ही दबे पाँव पीछे से चला गया। मै अकेला ही आगे गया। पिंकी और पूजा दोनों मेरे पास आईं, और फिर पूजा ने मुझसे पुछा, क्या वो रघु था? मैंने कहा, "हाँ।" पूजा के चहरे पर कुछ अजीब से भाव उमड़े। उसने पूछा, "क्या वो तुम्हारा दोस्त है?" मैने कहा, "हाँ हाँ, वो तो मेरा बहुत ही अजीज दोस्त है।" पूजा बोली, "क्या? ऐसे गंदे लडके भी तुम्हारे दोस्त होंगे ये मैंने कभी सोचा नहीं था।" मैं यह सुनकर हक्का बक्का रह गया। मैंने पूजा से पूछा, "क्यूँ? क्या हुआ? क्या उसने कोई गलत हरकत की?" पूजा बोली, "एक हो तो बताऊँ ना, हमेशा मेरा पीछा करता रहता है। मुझे घूरता रहता है। उससे पीछा छुड़ाने के लिए मै किसी दूकान में घुस जाती हूँ, तो ये वहाँ भी टपक पड़ता है। मुझे हमेशा डर लगा रहता है कि कहीं  वो कभी मुझे बीच रस्ते में ही पकड़कर कोई गंदी हरकत न कर दें। तुम उससे अपनी दोस्ती तोड दो तो ही अच्छा है। मुझे तो वो कोई सनकी पागल ही लगता है। और मै डरती हूँ कि कहीं वो मुझपर एसिड वैसिड न फेंक दें।  
मै पूजा से क्या कहता? एसिड तो मेरे कानोंपर फेंका जा रहा था, वह रघु, जो डरता था कि कहीं उसकी नजरभरही से पूजा को कोई चोट न लग जाए, पूजा सोच रही थी कि वो उसके साथ कोई गंदी हरकत न कर दें। पीछे मंदिर में जोर जोर से घंटियाँ बज रही थी। जब भी रघु पूजा की बात करता, तो मुझे मंदिर की घंटियाँ सुनने का सुंदर एहसास होता था। मगर उस वक्त वहां मंदिर की घंटियाँ मुझे बड़ी बर्बर लग रही थी। मुझे याद आया, मैंने कहीं पढ़ा था कि सच्चा प्यार कभी परवान नहीं चढ़ता। मै उस वक्त मंदिर में नहीं गया। बाहर से भगवान की मूर्ति की तरफ बस एक बार गुस्से से देखा और मन ही मन मे पुछा कि "तुमने ऐसा क्यो किया?" फिर मै पूजा और पिंकी से और कूछ भी ना कहते हुए चुपचाप वहाँ से चल दिया। चलते हुए अपने आप को मै बहुत ही भारी महसूस कर रहा था। दूरपर रघु खड़ा था। वह तेजी से मेरे पास आया और उसने पूछा, "क्या हुआ? क्या पूजा ने मेरे बारे में कुछ कहा? क्या उसने मुझे वहांसे जाते हुए देखा? मैंने कहा, "नहीं यार! मुझे नहीं लगता कि वो लड़की तुझे जरासा भी ठीक से देख पायी है....."
पांच साल बाद पूजा की शादी हो गयी। मैंने रघु से कहा कि पूजा तेरे लायक थी ही नहीं। तू उसे भूल जा। रघु ने इसपर कोई जवाब नहीं दिया। वह बस हलकासा मुस्कुराकर चल दिया। पूजा की शादी के तीन साल बाद रघु ने भी शादी कर ली। अब रघु के दो बच्चें हैं। अपनी लड़की का नाम वह 'पूजा' रखना चाहता था, मगर मैंने उसे ऐसा करने नहीं दिया। दो दिन पहले कई दिनोंके बाद रघु का फोन आया। मैंने कहा, "क्या यार? कितने दिनों बाद मुझे याद कर रहा है? यु.एस. जाकर लोग अक्सर अपनोंको भूल जाते हैं, मगर मुझे तुमसे तो ये उम्मीद न थी। कई दिन से तुम फेसबुक पर भी नहीं दिखाई दिए?" रघु ने कहा, "हाँ यार, अब इतना बीजी रहता हूँ कि फेसबुक वगैरह के लिए वक्त ही नहीं मिलता। मैंने लगभग महीने दो महीनों से फेसबुक यूज नहीं किया है, पता नहीं मेरा अकाउंट अभी एक्टिव है भी या नहीं।" उसी रात मैंने यूँही फेसबुक पर रघु का ईमेल वाला यूजरनेम डाला और पासवर्ड की जगह Pooja टाइप कर के देखा। मुझे पता चला कि रघु का यहवाला अकाउंट अभी तक एक्टिव है….!!!!!