पहिली ओळ ही दुसऱ्या आणि तिसऱ्या अशा दोन्ही सानींची उला म्हणून वापरण्याचा प्रयोग केला आहे. अशा फक्त सहा ओळी (सानी) समाविष्ट केल्याने गजलेत थेट सहा शेर वाढले. म्हणून 18 ओळींत आता 12 शेर बनले आहेत. एरवी12 शेरांसाठी 24 ओळी लागतात.
वाचताना पहील्या दोन ओळी वाचल्यावर तिसऱ्या ओळीच्या आधी पुन्हा पहीली ओळ वाचावी, म्हणजे शेर पूर्ण होतो.
😊😊
लिहिणार फक्त आनंदगाणी, सल मनीचा कधी सांगणार नाही
आता पुन्हा तुझ्या सुरांकडे मी, माझे शब्द सजवून मागणार नाही
पुन्हा काळजाच्या ठोक्यातून मी, सलगीचा जोगवा मागणार नाही
पुढेही पडत राहील चंद्रास साकडे, माझ्या चांद्रमौळी डोळ्यांचे
पण तुझ्या ओवळणीच्या ताटाबाहेर, चांदणे त्याचे पांगणार नाही
पण तुझ्या उपासनेच्या रात्रीस मी, याचक होऊन जागणार नाही
जेवढा उजेड वाहीला पुढ्यात तुझ्या, तेवढाच तू क्षितिजी माखून घे
तुझ्या आकाशी माझ्या ओल्या उन्हाचे, इंद्रधनु पुन्हा रंगणार नाही
पुन्हा मनाच्या कवडशांची तोरणे मी, तुझ्या नभास टांगणार नाही
कधी आवेगाने फुटतीलही आपसूक, उरी साठलेल्या उमाळ्यांस पान्हे
पण तू रुजविलेल्या ओलाव्यातुन पुन्हा, स्वप्नांचा कोंब उगणार नाही
मात्र उपेक्षेच्या अभिशापांची वेदना, मी पुन्हा कदापि भोगणार नाही
माझ्या चिरंजीव व्यथेचा जन्मजात मणी, मी दक्षीणेत देईन मात्र
उत्तरेच्या गर्भावर माझ्या वाहत्या जखमेचे, ब्रम्हास्त्र डागणार नाही
पश्चातापाच्या आवाहनाने भिक्षेत दुःखाचा, उ:शाप मागणार नाही
मी व्रतस्थ केवळ तुझ्या सुखाचा, त्यास मी याचनेने भागणार नाही
माझ्या स्वप्नातील भविष्याचा दाह, तुझ्या वर्तमानास लागणार नाही
जे सौख्य मागितले ती चूक होती, मी पुन्हा असे स्वार्थी वागणार नाही
..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा