हा ब्लॉग शोधा

मंगळवार, १७ डिसेंबर, २०१९

सराबोर

उनकी निगाहों में मैने कुछ रूहानी चाहतोंके भंवर देखें हैं
उन्होने जहाँ जहाँ छुआ था, मैने वहाँ तितली के पर देखें हैं

मुझसे नही बोला जायेगा जो मैं बोलना बहुत चाहता हूं
मैंने नहीं कोई लफ्ज अपने एहसासों से बेहतर देखें हैं

हमने सुन लिया, जो उन खामोश नजरों ने कह दिया था
उनकी धुंदली सी मुस्कान में मैंने उम्मीदोंके घर देखें हैं

चैन-ओ-सुकून जो मेरे जहाँ से कब के रुख़्सत हो गए थे
मैंने मेरे महबूब के चमन में बसे उनके आबाद शहर देखें हैं

उनके साथ बीते चंद पल मेरी उम्र के सबसे मुबारक लम्हे थे
वरना हमने तो जिंदगी भर बस उदासियोंके शाम-ओ-सहर देखें हैं

वे क्या जानें कितनी सराबोर थी उनके विदा होने की घडी
उन्होंने कहाँ पलट के मेरी आँखों में उतरे समंदर देखें हैं





सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९

कोजागिरी

किसने इतना बड़ा मोती ढूंढकर बनाया होगा चाँद
कौन मेरे इतने करीब खींचकर लाया होगा चाँद

इस काले आसमान के इनबॉक्स में जाने कहाँ से
ब्लॅक अँड व्हाईट फोटो बनके आया होगा चाँद

उनके छत पे भी थोडी चाँदनी उबलकर गिरी होगी
इक प्याली दूध में जो आज नहाने गया होगा चाँद

मशरीक से अपने फलक पे आते हुए देखा था मैने
किसीने फुंक मारकर मेरी तरफ उडाया होगा चाँद

रात उसे आँखो में भरकर पलकें बंद की थीं मैने
पता नही सुबह किस बूँद संग बह गया होगा चांँद

मै जानता हूँ वो किसी और की छत का रौशनदान है
फिर भी क्यूँ मेरे पूरे जहाँ पे इतना छाया होगा चाँद





.. 

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९

कल तक जो बेगाने थे, जन्मों के मीत हैं

न रिश्तों के बंधन हैं, ना कोई रिवाज़, ना रीत है
कल तक जो बेगाने थे, जन्मों के मीत हैं

सोहबत की हवाएँ जो खुशबू बन के सीने में महकतीं हैं
बातों की आवाजें जो गीत बन के कानों में चहकतीं हैं
चेहरों की रौशनी जो दीदार बन के आँखों में दहकती है
हमें जिंदगी के ऐसे सारे हसीन तोहफों से प्रीत है
कल तक जो बेगाने थे, जन्मों के मीत हैं

साथ गुजारे इक इक लम्हे में जैसे कईं सदियाँ मिलीं
हमराह बन के जहाँ जहाँ से चले, फुलों की वादियाँ मिलीं
खुश्क सहाराओं में भी संगत की सुकून भरी नदियाँ मिलीं
ये मुक़द्दरों का नही, दिल के मरासिमों का निहित है
कल तक जो बेगाने थे, जन्मों के मीत हैं

कभी जो मै चलते हुए फिसला तो थामने चले आएँ
मुसीबतों के दौर आये तो ढाल बन के सामने चले आएँ
मुश्कील राहों पे भी मैने पुकारा तो साथ घुमने चले आएँ
ये दोस्त ही जिंदगी का सबसे अनमोल संचित है
कल तक जो बेगाने थे, जन्मों के मीत हैं

मैने नही मांगा था कोई सुरज की सुर्ख रौशनी का गांव
मैने तो नही चाही थी चांद के शीतल चांदनी की छांव
मैने नही लगाए थे अपनी किस्मत से ख्वाहिशों के दांव
इक कतरे का यूँ पुरे समुंदर से मिलना ही उसकी जीत है
कल तक जो बेगाने थे, जन्मों के मीत हैं, जन्मों के मीत हैं




..

शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९

तुम्हारे भेजे फूलोंके रंग

मैने तुम्हारे भेजे फुलोंसे कुछ रंग चुने
की तुम्हारी हथेली पे मल दूँ
और फिर तुम्हारे रंगभरे हाथ तबतक थाम लूँ
जबतक मुझमें तुम्हारे सारे एहसासोंके
सुर्ख चिरागदान जगमगा न उठें,
जबतक हमारी भिनी भिनी
मुठ्ठियोंसे वो धुंआ न उमड़े
जो रुहोंकी दो चिनगारियाँ टकरा कर
एक दुसरे में मिट जाने से भभकता है

फिर जब इक सुकून की नर्म महकती हवा
रगों में खून के साथ बहने लगे,
मेरे कांपते होंठ तुम्हारी
पेशानी को छूकर वहीं जम जाएँ
और तुम सांस बनकर मेरे सीने में
भर जाओ इस तरह कि
जब साथ छूटे तो मेरी सांस ही छूट जाए..

तुम्हारे भेजे फूलोंके रंग
मेरी आंखोंसे बहुत अंदर तक रिसकर
देखो कितने सुहाने बन जाते हैं..!!

बुधवार, २५ सप्टेंबर, २०१९

धूप की तितलियाँ उड़ जाएं

इक हयात में जितना वाज़िब था शायद हमें मिल गया है,
अब उम्मीद के धूप की तितलियाँ यां से उड़ जाएं
या पत्तोंके सुहाने लिबास दरख्तोंसे उतर जाएं
आवाजें कुछ लंबी खामोशियों में गिर जाएं
और रूह से खुशियों के सारे मानी खो जाएं
आसमाओं के साये दिल की गीली धरती में दफ़्न हो
उम्मीदों के सैलाब गुमनामी की मुट्ठियों में जब्त हों
तेरी हथेली से मेहंदी जैसे चुपचाप अलविदा होती है,
वैसे मेरा वजूद सारे एहसासों से मिट जाए... 

जो कभी सोचा भी नहीं था, वो हासिल किया है,
इक हयात में जितना वाज़िब था शायद हमें मिल गया है..!!
अब धूप की तितलियाँ यां से उड़ जाएं...




बुधवार, २८ ऑगस्ट, २०१९

हजार मतलब

युं तो कभी दिलबर है, और कभी रकीब
दिल खुद ही इक मुश्किल है, खुद ही इक तरकीब

तेरा ख़याल तेरा मलाल दोनों एक समान
हकीकत की खुश्क जमीं, हसरतों का गीला आसमान 

तपती सुलगती रहीं हैं उम्रभर जिंदगी की कड़ियाँ
सब्ज दिखते हैं पेड़ लेकिन, भीतर जलती हैं लकड़ियाँ  

सौंधी ख्वाहिशें पिघल गईं जब भी अश्कों में नहाई
तेरी धुंदलीसी याद से भी अक्सर गहराती है मेरी तनहाई 
 
जाड़ों की ठंडी सुबह और तेरे बाहों की रजाई
वस्ल की हर रुत वफादार, हिज्र का हर मौसम हरजाई 

ख़्वाबों की पगडंडियों पे हाथों में हाथ थामकर चलना
तेरी नजदीकी से सुकून पाना, तेरी जुदाई से जी मचलना 

तेरे आवाज़ोंकी, तेरे दीदार की बेइंतहा तलब
दो लफ़्ज, दो स्माइली और उनके हजार मतलब





..

शुक्रवार, १२ जुलै, २०१९

कायनात

अकेला होता हूँ मगर अब मै
कभी तनहा नहीं होता
तू हमेशा मेरे साथ होती है

मेरे लब चुप सही मगर
मै खामोश नहीं होता
तेरे साथ हरदम बात होती है

अब बुझती हुई शाम
मुझे उदास नहीं करती
जो उसके बाद सपनों की रात होती है

कागजों में कैद रहती थी
मेरी हर एक नज़्म
अब तुम्हारे आवाजों की सौगात होती है

तुम बिन मेरी दुनिया
सुनी सुनी सी लगती है
तेरे आगोश में ही मेरी कायनात होती है



... 

कैफियत

असंख्य अस्पष्ट प्रतिमांत
तुझ्या असण्याचे आभास
हवेतून वाहत येऊन माझ्यापाशी
थबकलेले तुझे उष्म श्वास

पाण्यातल्या प्रतिबिंबासारखी तू माझ्यात
उतरतेस निश्चल गूढ गहिरी
अन पृष्ठभागाला स्पर्शताच जातेस
विघटून अनाम लहरींत

मला तुझे नि:स्पर्श रोमांच
हवे आहेत माझ्या अंगांगात
तुझ्या चेहऱ्याच्या अनुभूती ठेवायच्यात
कोरून माझ्या तळहातात

क्षितिजाचा पदर बाजूला सारून
हरवू दे मला तुझ्या ब्रह्मांडी तेजात
एक चुकलेला ठोका मांडू दे
माझ्या नावाचा तुझ्या काळजात

मला तुझ्या स्पर्शाची आस नाही
मात्र माझ्या कणाकणास तुझ्या आभासांचे कोंदण राहू दे
तुझ्या सगळ्या हळव्या आठवणींना
माझ्या डोळ्यांतून मनसोक्त निथळत वाहू दे

दोन किनाऱ्यांसारखे मला
जन्मभर तुझ्या समांतर येऊ दे
आणि माझ्या शून्यतेइतकेच अंतर
आपणां दोघात राहू दे



...

गेंद

कल तुम्हे जब
टेबल टेनिस सीखा रहा था
इतनी जोर से दे मारी थी
तुमने सूरज की गेंद
कि खो ही गयी

बदले में मैंने चाँद पकड़ाया
तो तुम नहीं मानी
कहा कि ये सफ़ेद मैली गेंद ठीक से नहीं दिखती
और खेल छोड़कर चली गई

रातभर ढूंढता रहा मै तुम्हारी मारी वह गेंद
फिर आखरी पहर
दूर पूरब में मुझे वो दिखाई दी काले पर्दे के पीछे

चलो अब फिर से खेलतें हैं
मैंने उसे पूरब से उठाकर
अपनी नीली हथेली पे रख लिया है


... 

जिस्म

जब मेरे जिस्म की लौ
तुम्हारी रूह से टकरा के
धुंए में तबदील हो गई थी

और उसके बाती की बची हुई लाल चिनगारी
तुमने अपनी मांग पे रख ली थी
मेरा नाम देकर

फूलों की कुछ नाजुक सी पंखुड़ियाँ
बदन पे महसूस की थी मैंने

और खुद के होने का एहसास
हथेली पर लेकर
फूँक मार के उड़ा दिया था हवा में

पता नहीं वक्त के
किस सिरे से लटककर
मेरी रूह फिर
उसी जिस्म में लौट आयी थी...

..तुम्हे पहली बार छूकर जो पिघला था मेरा जिस्म



... 

चंद्र आणि शुक्र

तुझ्या चेहऱ्यावरचे स्मित
वाऱ्यात भुरभुरणाऱ्या एका बटेत गुंतेल
आणि उडून माखेल आकाशाच्या कॅनव्हासवर
..लोक म्हणतील चंद्रोदय झाला

तुझ्या चुकार आठवणींचे आभास
जेव्हा अनुभूतींतून हळूहळू
पुसून विरत जातील तेव्हा
एक अश्रू ओघळेल चंद्राच्या डोळ्यातून
..लोक त्याला शुक्र म्हणतील

मी त्या आदिम काळोखी अवकाशाशी
एक अनंतापर्यंतचा करार केला आहे...
की चंद्राचे स्मित नेहमी तुझे
..आणि शुक्राचा अश्रू नेहमी माझा


 
... 


इंद्रधनू

दोन इंद्रधनू होते आकाशात

आरू सगळे रंग काढून बसायची
वेगवेगळे आकार रंगवत एखाद्या कागदावर
कधीकधी कागदावरचे रंग उडून
येऊन माखायचे तिच्या चेहऱ्यावर
किती गोंडस दिसायचे ते गालांचे इवले इवले रंगीत फुगे...

आपल्याला ना सुखाचे क्षण निसटू द्यायचे नसतात
वाळवणासारखे ठेवायचे असतात साठवून
पुढे कधी पुन्हा जगता यावेत म्हणून

खिडकीतून अजूनही दिसत होती दोन्ही इंद्रधनुष्ये
प्रखर आणि एवढी जवळ की
झाडावरच्या फुलांसारखी हाताने ओढून घ्यावीत खाली..!!
मी लगबगीने कॅमेरा घेऊन छतावर गेलो

आरुला स्वतःचे फोटो का काढू द्यायचे नसतात कुणास ठाऊक
ढगांच्या हातांनी झाकून ठेवते चेहरा
फोटो काढूच देत नाही
मी खूप आर्जवे करून लाडेलाडे फसवून
तिला चेहऱ्यावरून हात काढायला सांगितले
तर माझ्या पहील्या क्लिकच्या आधीच
चेहरा पुसून टाकला आभाळाने

फक्त काही सेकंदांचा उशीर
आणि कापसाने थेंब टिपून घ्यावेत तशी
दोन्ही इंद्रधनुष्ये शोषून घेतली ढगांनी
ढम्मु आरु नेहमी असेच करते

माझ्या साध्या साध्या सुखांचा गुणाकार करण्याचे मनसुबे
नेहमी हे असेच चुकतात


... 

चांदण्यात फिरताना

चल या चांदण्यात थोडे फिरू

मनाच्या किनाऱ्यावरची चमकती रेती
चेहऱ्यावर माळून घेऊ

डोळ्यांतून समुद्र काढून ठेवू एखाद्या बेटावर,
पाण्यातल्या चंद्रबिंबात वितळून उतरू
आणि पोचू क्षितिजापारच्या कोण्या तारकापुंजावर

थोडे गुरुत्वाकर्षण उधार घेऊ एखाद्या ताऱ्याचे
आणि मग गुंफून जाऊ एकमेकांत कायमचे

तू अवकाशीय लहरींची गाणी गुणगुणत रहा
आणि मी तोपावेतो थोडा पुढे जाऊन
व्होयाज़रच्या तबकडीवर लिहून येईल
आपल्या दोघांची नावे

कुठेतरी अंतराळाच्या अंतरंगात बनवू
आपल्या स्वप्नांचे एक छोटे वार्महोल
आणि पोचू त्यातून
एखाद्या सूक्ष्मतेच्या अनंत नाभिकीय प्रारणात

तिथे काही आवेगी क्वांटम उत्सर्जने पिऊ
आणि पुन्हा परतु आपल्या किनाऱ्यावर

तुझा हात हातात राहू दे चांदण्यात फिरताना



... 

थोड़ा थोड़ा दर्द

मेरे आसमाँ से अपनी
सारी आवाजें उतार लो
मै अकेले खलाओं में कराहना चाहता हूँ

तुम्हारी पसंदीदा नज्मों से
दो खूबसूरत मिसरें चुनकर
मै तुम्हारी तारीफ़ में कहना चाहता हूँ

खोल दो अपनी मुठ्ठी
एहसासों को उड़ने दो
मै इनके ताकुब में बहना चाहता हूँ

थोड़ा थोड़ा दर्द
देती रहना मुझे
मै इसकी आदत में रहना चाहता हूँ



... 

रक्त

उन्हाचा कितवा वार झेलला त्याने कुणास ठाऊक
बेरंगी रक्तात माखलेला चेहरा
बाहीने पुसून पुन्हा तो
एका अहिंसक असहकारात उभा ठाकला
आणि आपल्या राखरांगोळी झालेल्या नशिबाला
मातीतून वेचण्यासाठी शेतात वाकला

त्याच्या उघड्या पाठीवर कोडे बरसत राहिले तप्त उन्हाचे,
रक्त जखमांतून उसळून धावत राहीले अंगभर
त्वचा तीळतीळ फाटत राहीली
पण वेदनेचा एक अस्पष्ट आक्रोशही
फुटला नाही गळ्यातून त्याच्या

रोजच ज्याच्या रक्ताच्या अभिषेकाचा सोहळा
त्याचे कौतुक कोणाला

त्याच्या रक्ताला काय हो किंमत?
तसेही किंमत रंगाला असते, रक्ताला नाही

युद्धभूमीवर लाल रंगाचे सांडते
केवळ तेच रक्त..!!

आणि तितक्याच वेदना लेऊन
कर्मभूमीवर सांडणाऱ्या
त्याच्यासारख्या कित्येकांच्या रंगहीन स्त्रावाला
लोक कधी घाम म्हणतात..  तर कधी अश्रू..!!



... 

अंतराच्या पार राहू नको

तू अशी अनंत अस्वस्थ अंतराच्या पार राहू नको
हुरहुरीच्या पखाली घेऊन, माझ्या अंगभर वाहू नको

हे इशाऱ्यांचे अस्पष्ट उखाणे मला सुटत नाहीत
डोळ्यांतील कोड्यांची उत्तरे, पाण्यावर लिहू नको

एक ओथंबलेला ऋतू पाठवला आहे तुझ्या दारी
दोन ओले क्षण बांधून दे, त्याला रिक्त परतून लावू नको

दाटून आलो की कितीदा असाच मूकपणे आटून जातो मी
तूच विचार कसा आहेस, मी सांगण्याची वाट पाहू नको

हवे तेवढे माझ्या बोटांचे स्पर्श तुझ्या तळव्यांवर मांडू दे
आजही स्वप्नात तू उशाशी, अर्धे उसासे ठेवून जाऊ नको

आता भेटलीस की गोठवून ठेवेल सहवासाचे सारे क्षण
त्यांना भावनांची फुंकर मारत रहा, वास्तवाचे ऊन दावू नको

कधी एकत्र बसून सोडवू एकमेकांच्या आयुष्याचे गुंते
सोबतीने रंगवू भविष्य, आणि मग भूतकाळात डोकावू नको



... 

दुआ

तुम मेरी सबसे बडी हसरत थी
मेरी दुआओंकी सबसे अजीज चाहत

तुझ्यानंतर विश्वात मागावे असे काहीच नव्हते
'तू माझी व्हावीस' हीच होती सर्वोच्च इच्छा
आणि या इच्छेपलीकडे मोक्ष...!!!

'तू माझी' हा मर्त्य जीवनाशी जोडत असलेला
शेवटचा सर्वात प्रबळ धागा
त्यापलीकडे निरिच्छता, पूर्णत्व, समाधि.....

पण आज काही वेगळे घडले
एका मंत्रित शकुनसमयी आज
मैने इक दुआ मांगी

उस दुआ मे मैने
अपने लिए तुम्हे नही मांगा
आज मैने उससे भी बढकर कुछ चाहा

आज अपनी दुआ मे मैने
खुशियां मांगी
मगर सिर्फ तुम्हारे लिये.!!
और ये शर्त भी ना रखी
कि उनमे मै शामील रहूं... 



... 

शून्य

कधी कधी असेही होते
कितीतरी आठवणी दाटून येत राहतात तुझ्या
आणि त्यात तुझ्या अस्तित्वाला
नसतो कोणताही चेहरा..

एक वीज वाहत राहते नसांतून.
तू एक सर्वव्यापी निराकार भावना बनून
भिनत जातेस माझ्यात..

तुझे हजारो चेहरे मला दिसत राहतात
आणि कधी नुसतीच
एक फिकट धूसर दुलई वेढलेली असते भोवभोवती आभासांची..

डोळ्यांत खूपदा काही खूप जुन्या
ओळखीच्या सावल्या एकवटून येतात
पापण्या मिटण्या अन उघडण्यात नसतो तेव्हा काहीही फरक..

तू कितीही वेगवेगळे ऋतू पांघरून आलीस
तरी मी मात्र नुसता भिजत असतो.!!

तुझ्या आकारहीन प्रतिमा दाटतात माझ्या आभाळभर
आणि मी जमिनीवर स्वतःपुरता कुठेतरी
एक साकार शून्य झालेला असतो..!!



... 

पहली बारिश

आज पहली बारिश में भीगते हुए
अपने कंधे पे, सर पे,
कितनी बुँदे चुन कर जमा की थीं मैंने
..कि कभी तुम मिलो तो पहना दूँ.!

पानी पे पैरोंसे कुछ छपाकों की
धुनें भी बजाईं थी,
..तुम्हे सुनाऊँगा इक दिन.!

पहाड़ ने फूँक मार कर अपने सिर से
मेरी तरफ उड़ायी थी कुछ घटाएँ,
..तुम होती तो आधी आधी बाँट लेतें।!

उस सडकपर चलते हुए कितने पेड़ झुककर सलाम कर रहे थें
और पत्तियाँ ताली बजाकर ख़ुशी का इजहार कर रहीं थीं
तुम उस वक्त मेरे साथ होती तो......

....पता नहीं हर छोटे बड़े ख़ुशी के पल में
मुझे तुम ही क्यूँ याद आती हो.....



...

ना बादल बरसे

कल तुमसे जब मै बात कर रहा था
बादल इकठ्ठे हो रहे थे फलक पे

कुछ आसमानी साये उतर आये थे मुझमे
और नाच रहे थे चारों ओर

कितनी खुशनुमा हवा बह रही थी मुझे छूकर

वहाँ उस पहाड़ी के पार
उस नीले मकाँ की छत से
कुछ लहराती लाल पिली ओढ़नियों के पीछे से
तांक रहा था सूरज

फोन से उठ के कुछ ठंडी सदाएं
बह रही थीं मेरे सीने पर
और धरतीने पेड़ोंके हजारों हाथ
फैलाये थे आसमान की ओर

मेरे अंदर ओस ज़मने लगी थी
और कुछ काले बादलोंसे भी
उँगलियाँ बढ़ आयीं थी नीचे की तरफ

न जाने कितनी देर, कितने लम्हे
यही एक समा बना रहा
मगर आखिरतक
ना तो बादल बरसे, और ना मै.....



... 

अधूरीसी मुहब्बत

मुझे अपनी इस अधूरीसी मुहब्बत से मुहब्बत है
आपकी बेरुखीसे पलती मेरी बेकरारी से मुहब्बत है

मेरी एक हसीं दुनिया है मेरे वहमों की मेरे भरमों की
मुझे इन वहमों-भरम के झूठेमूठे एहसासों से मुहब्बत है

ये इक बेचैनी सी जो हरदम बदन में बहती रहती है
मुझे अपनी मर्ज-ए-मुहब्बत के इस दर्द से मुहब्बत है

तुम इनमे ख़्वाब बनके रहती हो या अश्क बनके बहती हो
मुझे इसीलिए अपनी इन दो आँखों से मुहब्बत है

न इश्क का इजहार करीए न मेरे प्यार से इनकार करीए
मुझे आपकी इस अनजान सी खामोशी से मुहब्बत है

ये घना कोहरा, ये धुंदले धुंदले से तेरे तमाम चेहरे, ये सब
मेरी रतजगोंके हमसफ़र हैं, मुझे इन बेरंग सायों से मुहब्बत है

तुम कहीं मुझे चाहकर मेरी चाहत को मुकम्मल न कर देना
मुझे जज्बातोंके इस इकतर्फा दौड़ते बहाव से मुहब्बत है



... 

बैठा हूँ

मै अपनी बेचैनियों के ये कितने बोझ, कांधे पे उठाये बैठा हूँ
तेरे एक प्यारे से भरम में मै, अपने आप को लुटाये बैठा हूँ

मेरे सारे ख़यालोंमे एक आप की चाहत ही उभरती है
हर दूसरी हसरत को मै, अपने दिल से मिटाये बैठा हूँ

न तो बरसता है मुसलसल पानी, न गुलाबी धुप खिलती है
मै अपने दामन में समेटे कुछ उदास सी घटाएँ बैठा हूँ

मै दिन में भी तुम्हे अपने ख्वाबो में बुनता रहता हूँ
और नींदों को अपनी तमाम रातोंसे घटाए बैठा हूँ

खुद से बेखुद होकर मैंने तुझे ही अपना खुदा बनाया है
और अपनी रूह को इक तेरे ही अक्स से सटाए बैठा हूँ

अपने ही जहन में मैंने तेरे साथ एक हसीं जहाँ बसाया है
तुझे बसाने के लिए अपनी दुनिया से मै जमाने को हटाए बैठा हूँ



... 

व्हाट्सएप

ये जो तुम्हारी उँगलियों को छूकर
मुझसे मिलने आतें हैं चंद हर्फ़
कुछ बेहद हसीन एहसास छाप देतें हैं दिल पे, जानती हो?

तुम्हारे नाम के सामने जो
एक हरी सी बूँद दिखाई देती है नोटिफिकेशन की
कितनी खुशियां पिरोए होती है, जानती हो?

पढ़नेवालों की लिस्ट में जबतक
तेरा नाम नहीं दिखता,
अधूरा सा रहता है मेरा स्टेटस,
उदास रहती हैं मेरी सदाएँ
जबतक तेरी आंखोंसे उतरकर
वो दो ब्लू टिक्स उनसे लिपट नहीं जातीं,

तुझे कुछ लिखना आसान नहीं है
जज्बातोंका उमड़ता समंदर
बड़े एहतियात से छानना पड़ता है,
कोई कतरा जिससे गलती से भी
छलक पड़ें मेरी चाहतें
मै भेजने से कितना कतराता हूँ, जानती हो?

वो दिलवाली स्मायली
कितनी दफा टाइप कर के
मिटा दी है तुम्हे भेजने से पहले, जानती हो?

इक तेरी मिनटभर की आवाज सुनने के लिए
भीड़ में तेरी धूंधलीसी हसती तसवीर देखने के लिए
मिन्नतों के कितने नपेतुले इंतेजामात करने पड़ते हैं, जानती हो?

चलो ये नज़्म अब यहींपर
ऐसी ही अधूरी सी रह जाएगी
जैसी अपनी कहानी भी अधूरी रहेगी, जानती तो हो..!!




... 

तेरी रुसवाई में

तेरी रुसवाई में खुद को टूटता बिखरता देखूं
हर टुकड़े में और फिर तेरा ही अक्स निखरता देखूं

इक तेरे ही इर्दगिर्द अपने ख्वाब की तामीर बनती देखूं
तेरी यादोंको कभी मुझसे रूठती, कभी बेवजह मनती देखूं

थोड़ा टहलने निकलूं तो सारे जहाँ में बेशुमार आदमी देखूं
हर दिलकश भीड़ में भी मै, मगर इक तेरी ही कमी देखूं

सूरज को उफ़क पे रोक लूँ और एक बादल तेरे शहर पे बरसता देखूं
इंद्रधनुष का इंतजाम करूँ और उसकी तस्वीर के लिए खुदको तरसता देखूं

तेरी खामोशी से अपनी रात जलाऊँ, सुबह आँखों में गीला कोहरा देखूं
थोड़ी सी भी गर उदास हो तू, तो अपने ही दिल में एक घाव गहरा देखूं

मै तो बस इक नाचीज हूँ, क्यूँ हर शब् मै तेरा ख्वाब देखूं
इक लौ जलाऊँ दिल की, और धु धु कर जलता आफताब देखूं

तेरे कदमों पे सजदे करूँ, एक तुझ ही में अपना खुदा देखूं
बेखुद हो तुझमें उतर गया हूँ, फिर भी खुद को तुझसे जुदा देखूं



...

महसूस

मजबूरियाँ हैं कि खून सी
दौड़ती रहती हैं नस नस में

चाहतें हैं कि छलक जातीं हैं
आँसू बन के आंखोंसे

यादें हैं कि साँसों सी
मेरा बस नहीं चलता उनपे

दर्द है कि दिल सा
कराहता रहता है सीने में

हाथ की लकीरें नहीं
ये जख्म हैं जो भरतें नहीं

ये उम्र नहीं मुहब्बत है
जो दिन ब दिन बढ़ती जाती है

ये रात नहीं होती रोज
ये मेरी दुनिया है जिसमे तू नहीं

और ये चारो तरफ हवा नहीं तेरा इश्क है
दिखाई नहीं देता पर मै महसूस करता हूँ



... 

तक़दीर

आज रात फिर
ख्वाबोंके नाख़ून कुरेदते रहेंगे
मेरी रूह को..

कोई साया बून्द बून्द खून
ऐसे चूसता रहेगा आंखोंसे
कि सुबह तक बस थोड़ी ओस बची रहेगी...

हसरतों के जुगनू ख्वाबोंके जंगल से
उड़ जायेंगे या मर जायेंगे..

फिर सुबह थपेड़े मारकर निकाल देगा
सूरज चाँद को मेरे आँगन से!!


मै बेबस सा अपनी लकीरोंमे
तेरा नाम ढूंढता रहूँगा...

एक बार तू ही क्यों साफ़ साफ़
मुझे कह नहीं देतीं?
कि जो मेरी तक़दीर में ही नहीं
वो लकीरोंमें कहाँसे होगा..!!!



... 

जुगनू

जुगनू देखें तुमने?
वहाँ पेड़ोंपर कूदतें, नाचतें
यहाँ से वहाँ उड़तें
एक साथ जलतें, बुझतें
जैसे नाच रहें हों
किसी गाने की धुन पे

पता है वें क्यों चमकते हैं?
क्योंकि वें प्यार में पड़ें होतें हैं

कितनी हैरत की बात है देखो ना
लोग बस उनका चमकना देखतें हैं
किसी को उनके दिलोंमे उमड़ी
मुहब्बत नहीं दिखाई देती

तुम भी तो वैसे ही
बस चमक देखती हो
अगर प्यार देख पातीं
तो भंडारदरा के उन अंधेरों में नहीं,
दिन की भरी रौशनी में भी तुम्हे
जुगनू चमकते हुए दिखाई देतें
मेरी आँखों में..... 



... 

बरसणे

आकाश असे उदास ओथंबलेले
दाटून येते ते नेहमी बरसण्यासाठीच
पण नेहमी नाही विरघळत ते

ढगांच्या काळ्या कभिन्न जड शिळा
उनाड मुलासारख्या फिरत राहतात आभाळात

एवढे मोठे असले म्हणून काय झाले?
आभाळालाही हवा असतो
एक आपुलकीचा खांदा
माथा टेकून वाहण्यासाठी

अबोल्याच्या स्तब्ध हवेत
ते नाही पाझरत कधीही

धरित्रीच्या उष्ण श्वासांनी तर
ते अजूनच संकोचते

खरेतर खूप सोपे आहे
आभाळाला पाणावणे

एक आपुलकीची हळवीशी
शीतल झुळूक भिडली काळजाला
की आपसुक निथळणे चालू होते त्याचे
थेट पूर्णतः कोरडे होईपर्यंत.... 



...

अपने हिस्से की धूप

जाने कितनी सदियोंसे
ये आसमानी जुगनू
रोज जल बुझ रहे हैं

जाने कितनेही युगोंसे
हर सुबह धूप दौड़ती आती है
और हर शाम मुझसे खो जाती है

क्या कोई इसका हिसाब रखता होगा?

मै तो कई सालों से
बंद दीवारों में
सफ़ेद रौशनी के दियोंमे बैठा
अपने हिस्से की कितनी ही धूप खो चुका हूँ

रोज मेरी धूप
दरवाजे, खिड़कियाँ खटखटाती रहती है,
और मै उसे किवाड़ोंसे, पर्दोंसे
धकेल देता हूँ फिर बाहर की तरफ

ये खिड़कियों के बंद काले काँच
रिवाजों की तरह है, जो तोड़े नहीं जाते

अपने हिस्से की धूप के लिए
मुझेही मेरा मकान छोड़ना होगा



... 

चाँद

ये चाँद है, ये मेरा इश्क है

किसी रात जब तुमसे बात करता हूँ
खिलखिलाकर मेरी पूरनमास हो जाती है

तुम भी मगर अजीब शख्स हो,
तुरंत अपनी बेरुखी की कुल्हाड़ी चलाकर
रोज थोड़ा थोड़ा काट देती हो
मेरे चाँद को...
सारे टुकड़े बिखरे पड़े रहते हैं
दिल की खलाओं में

जानाँ मै जब तेरे इश्क से जाता हूँ
तो जाँ से भी जाता हूँ

फिर अमावस की कोख से मुझमें
जान पैदा हो जाती है
और मै अपने भरम का इक इक टुकड़ा उठाकर
रत्ती रत्तीभर जोड़ लेता हूँ
फिर अपना चाँद

और फिर किसी दिन तू दुबारा
अपनी हकीकत के खंजर लेकर
मेरा नया चाँद उधेड़ने लगती है

मेरे वहम, मेरे भरम अनगिनत है,
मै अनगिनत दफा
अपना चाँद फिर फिर बनाता रहूँगा



...

गुरुवार, ११ जुलै, २०१९

ग़ालिब-ओ-गुलजार चलें

आपकी इनायत के जो हमें लम्हे दो चार मिलें
यूँ लगा हम आपके इश्क में सारी उम्र गुजार चलें

आपके कईं चेहरे उभरते हैं हमारे हसीन एहसासों में
हमारे सारे जज्बातोंमे एक आप ही के दीदार चलें

वो पीला पैरहन और चेहरे पर बिखरी बालों की बेलें
आपकी इक मुस्कान पे हमारी खुशियों के कारोबार चलें

रगों में कुछ अजीम सी खुशबुएँ दौड़ने लगी हैं
हमारे खून में जो आपकी मुहब्बतों के करार चलें

खुदाओंको अपनी इबादतोंसे महरूम कर के हम
आपके पाकीजा कदमोंपर अपना ये दिल उतार चलें

कबतक इंतज़ार में यूँही खिजाँ के मौसम पालते रहें
चले भी आओ कि हमारे चमन में कभी तो बहार चले

एक बार जो अपने होठों से आपका नाम चूम लें
फिर हमारी कलम से भी ग़ालिब-ओ-गुलजार चलें

जाँ से अजीज हो भी तो चाँद बाहों में नहीं आता
क्यूँ फिर आसमाँ की ओर हाथ उठाकर कोहसार चलें

मेरे आँगन में तेरे क़दमों की महक अभी तक आती है
जबकी तेरे बाद भी यहाँसे फूलोंके मौसम कई बार चलें

बताइये ये कातिलाना हुनर आपने कहाँ से सीखे हैं
कि ज़रा नजर मिला लें तो दिल पे तीर-ओ-तलवार चलें

जिस धड़कन में तेरा नाम आया था मै उसीमे जम गया हूँ
तुम दिल की गिरहें खोल दो तो साँसों की रफ़्तार चले


..

सोमवार, ३ जून, २०१९

घनव्याकुळ पक्षी गोठला होता

त्या विषण्ण अंधाऱ्या वृक्षावर एक
घनव्याकुळ पक्षी गोठला होता
क्षितिजावर ओळी लिहून गेला
भ्रमाच्या, तो कवी कोठला होता

अधीर रंगखुणांची स्वप्ने पाहत
एक वसंत निष्पर्ण मरून गेला
हा कसा दुष्काळ म्हणावा की
मनाला काठोकाठ भरून गेला

तिढ्यावर जिकडे जायचे मनात होते
नेमका तोच रस्ता मी टाळून गेलो
श्वास अडखळले पण जिवंत होतो
सरणावर तरी स्वतःस जाळून गेलो

उदास किनाऱ्यावरचे सफेद बगळे
पांढरधुक्यात हळुवार बुडून गेले
ते उन्मादी थवे टोळधाडींचे
माझे कोवळे मोहोर खुडून गेले

खिन्नपणे तुटत राहतात रेशीमपीळ
ही जीर्ण जमीन फाटून भेगाळते
मी जाळतो शतदा घरटे ज्याचे
ते पाखरू फिरून तिथेच रेंगाळते

ही दोन नद्यांतून वाहून जाते
शतजन्मांच्या ओळखीची खूण
कैदेत अबोलीच्या तू ठेवलेस चांदणे
स्त्रवतात स्वर त्याचे मग सांग कुठून

हे शाश्वत दोलायमान टांगणे आणि
हा मूक कोंडमारा पेलवत नाही
तरी अस्पष्टसे मनातल्या मनातही
जे बोलायचे तुज, ते मज बोलवत नाही

मंगळवार, २८ मे, २०१९

जन्मगाठ

तुकड्या तुकड्यांत विखुरलेला मी
तुला एकवटून असा भेटलोच नाही
आजन्म निखाऱ्यात जळतो विरहाच्या
समोर तुझ्या मात्र कधी पेटलोच नाही

एक ओली किनार तुझ्या सांजजाणीवेची 
एक वळीवाच्या उन्हाचा तीक्ष्ण बाण
तुझ्या फडफडत्या पदराच्या सावलीआड
माझ्या तेवत्या निरंजनाचे पंचप्राण

तुझ्याकडे नेणाऱ्या अनोळखी वाटेवर
कशास मांडलेस हे दग्ध धूसर भाव
मावेल ना तुझ्या विजेच्या मिठीत
माझ्या मनाचे हे मुठीएवढे गाव

तुझ्या सूर्यास्ती लाल क्षितिजावर
माझे नाव बोटांनी गोंदून ठेव
रात्रीच्या तारकामंडळात कुठे क्षीणसे
या काजव्याचे चमकणेही नोंदून ठेव

हे खोल आतल्या उर्मीचे आवेग आहेत
हा कोरड्या आकर्षणाचा बनाव नाही
कुठेतरी एक जन्मगाठ असेल बांधलेली
हा फक्त जाणीवांचा एकांगी लगाव नाही




सोमवार, २० मे, २०१९

और ये भी

यूँही ये दिल कभी खुश कभी उदास सा रहता है
और ये भी कि इसमे कोई शक्स खास सा रहता है

मै उसके नाम की एक नज्म भी लिख नाही पाता
और ये भी कि वो जेहन में उपन्यास सा रहता है

यूँ तो मै उसे सारी कायनात मे ढूँढता फिरता हूँ
और ये भी कि वो मेरे सीने मे साँस सा रहता है

मैने उसे दिल में बहोत अंदर कहीं छुपाकर रखा है
और ये भी कि वो मेरे जिकरों में बिंदास सा रहता है

गर नापो तो सदियों की दूरियाँ हैं हमारे दरमियाँ
और ये भी कि वो हर पल कुछ पास सा रहता है

वो मिलेगा हमको ये उम्मीद तो कईँ बार टुट गई
और ये भी कि वो हमारा है ये आभास सा रहता है

मैंने कईँ दफा उसे अपने मुस्तकबिल में देखा है
और ये भी कि वो यादों में इतिहास सा रहता है
(मुस्तकबिल-भविष्य)

मुझको पता है वो कभी मुझे मिल नहीं सकता
और ये भी कि हरपल उसका एहसास सा रहता है

हर ख़याल में मैंने इस मुहब्बत को लबरेज पाया है
और ये भी कि वो मेरी हसरतों में प्यास सा रहता है
(लबरेज-तृप्त, पूर्ण)

गुरुवार, ११ एप्रिल, २०१९

न्यू-क्लिअर एनर्जी - १

न्यूक्लिअर हा शब्द ऐकताच आपल्याला आठवतात चार मुख्य गोष्टी

१) हिरोशिमा, नागासाकी
२) पोखरण
३) चर्नोबिल
४) फुकुशिमा 

या चारही गोष्टी म्हणजे प्रचंड विध्वंस अशी आपली एकंदर भावना असते. त्यामुळे आपण न्यूक्लिअर हा शब्द ऐकताच काहीसे घाबरतो. आणि हा फक्त जैतापूरवाल्यांचा वा भारतीयांचा प्रॉब्लेम नाही तर हा एक वैश्विक प्रॉब्लेम आहे की न्यूक्लिअर हा शब्द ऐकताच जगातील सर्व देशांची माणसे माणसे काहीशी घाबरतात.

लहानपणी आपल्याला एक अनामिक भीती घातली जाते, भोकाडीची भीती. आणि आपण आयुष्यात कधीही भोकाडी पाहीली नसूनही भोकाडीला प्रचंड घाबरत असतो. या भोकडीच्या भीतीपायी आपण आपल्याला आवडत असलेल्या गोष्टीसुद्धा करण्यापासून स्वतःला रोखतो. पण मोठे झाल्यावर आपल्याला कळते की भोकाडी वगैरे काही नसते, आणि मग आपण भोकाडीला अजिबात घाबरत नाही. पण ज्या गोष्टींचे आपल्याला ज्ञान नाही किंवा अर्धवट ज्ञान आहे, ज्या गोष्टींबद्दल आपल्या ज्ञानात केवळ गैरसमज आहेत व आपण ते गैरसमज हेच सत्य आहे असे मानतो, वा ज्या गोष्टीबद्दल आपण फक्त इतरांचे कल्पनारंजन ऐकलेले आहे, त्या गोष्टींना आपण शिकलो, मोठे झालो, किंवा अगदी म्हातारे झालो तरीही घाबरत असतो. उदाहरणार्थ देव, सैतान, भूत, पिशाच्च, एलियन वगैरे.

अगदी असेच आपण न्यूक्लिअर विज्ञानाबद्दल आपल्याला सत्य माहीत नसल्याने किंवा त्याबद्दल आपल्या मनात असलेले वा पेरले गेलेले गैरसमज हेच सत्य आहे असे मानल्याने न्यूक्लिअर एनर्जीला घाबरत असतो.

जगात एनर्जीचे अगदी कमी ऑप्शन्स आहेत. एनर्जी किंवा पावर म्हणजे ढोबळपणे इलेक्ट्रिसिटी असे आपण समजतो, कारण आपले सर्वाधिक काम हे इलेक्ट्रिक एनर्जीच करत असते. जगातील प्रमुख पावर सोर्सेस आणि त्यांचा ऊर्जानिर्मितीतील सहभाग हे पुढीलप्रमाणे आहेत.

१) कोळसा - ४० टक्के
२) नैसर्गिक वायू - २३ टक्के
३) जलविद्युत - १६ टक्के
४) इतर रिन्यूएबल - ८ टक्के
५) पेट्रोलियम - ४ टक्के
६) न्यूक्लिअर - १० टक्के

यातील प्रत्येक स्रोतापासून वीज निर्माण होण्याच्या प्रक्रियेत काही धोका, जोखीम किंवा रिस्क असते. म्हणजे या स्रोतांपासून वीजनिर्मिती केल्यामुळे किंवा करण्याच्या प्रक्रीयेमुळे माणसांना प्राण गमावावे लागू शकतात. वॉट अवर हे वीजशक्ती मोजण्याचे एक एकक आहे. जसे एक हजार जीबी म्हणजे एक टीबी हे आपल्याला माहीत आहे, तसेच एक हजार गिगा वॉट अवर म्हणजे एक टेरा वॉट अवर होत. तर साधारण या सर्व स्रोतांपासून प्रत्येकी एक टेरा वॉट अवर वीजशक्ती निर्माण होताना साधारणतः किती माणसांचा मृत्यू होतो याची एक आकडेवारी पाहू. काय वाटते? प्रति टेरा वॉट अवर वीजशक्ती निर्माण करत असताना कोणत्या स्रोतामुळे सर्वाधिक माणसे मरत असतील? न्यूक्लिअर स्रोत यात सर्वात जास्त रिस्क असलेला स्रोत असेल का? की दोन नंबरचा स्रोत असेल? मी मुद्दाम न्यूक्लिअरचा आकडा सर्वात शेवटी सांगेल. तर वरील स्रोतांमुळे प्रति टेरा वॉट अवर वीजशक्ती निर्माण करत असताना होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे. 

१) कोळसा - १६१ मृत्यू
२) नैसर्गिक वायू - ४ मृत्यू
३) जलविद्युत - १.४ मृत्यू
४) इतर रिन्यूएबल - ०.७ मृत्यू
५) पेट्रोलियम - ३६ मृत्यू 

म्हणजेच एक टेरा वॉट अवर वीजशक्ती निर्माण करत असताना कोळसा हा स्रोत वापरल्याने जगात सरासरी १६१ लोकांचे मृत्यू होतात. तर पेट्रोलियममुळे ३६ लोकांचे मृत्यू होतात. मग एक टेरा वॉट अवर वीजशक्ती निर्माण करत असताना न्यूक्लिअरमुळे किती मृत्यू होत असतील? १००? की २०० की ५०?
काय वाटते? न्यूक्लिअर हे इतर सर्वांपेक्षा धोकादायक वाटते ना? मग न्यूक्लिअरमुळे होणारे मृत्यू किती असतील?
चला तर सांगतो की एक टेरा वॉट अवर इतकी वीजशक्ती निर्माण करत असताना न्यूक्लिअरमुळे केवळ ०.०४ इतके मृत्यू होतात. किंवा हेच थोड्या वेगळ्या भाषेत सांगायचे झाले तर विंड, सोलार हे न्यूक्लिअर पेक्षा १७ पट अधिक धोकादायक, जलविद्युत हे न्यूक्लिअर पेक्षा ३५ पट अधिक धोकादायक तर कोळसा हा न्यूक्लिअर पेक्षा तब्बल ४०२५ पट अधिक इतका प्रचंड धोकादायक असतो. आणि म्हणूनच आपल्या अज्ञानातून निर्माण झालेल्या समजुतीच्या उलट न्यूक्लिअर हा स्रोत जगातील सर्वात सुरक्षित असा स्रोत ठरतो. हे भोकाडी सारखेच झाले की नाही? लहानपणी आपण समजायचो की भोकाडी प्रचंड धोकादायक आहे, पण मोठेपणी (अक्कल आली तर) कळते की भोकाडीपासून आपल्याला काहीच धोका नाही. तसेच न्यूक्लिअर एनर्जी बद्दल सत्य जाणून घेतले तर कळते की उलटे न्यूक्लिअर एनर्जी हा खरेतर जगातील सर्वात सुरक्षित स्रोत आहे. म्हणजेच खरेतर गंगाधर ही शक्तिमान है.  



माहीतीचे मुख्य स्रोत 
https://www.iea.org/publications/freepublications/ 
(Key World Energy Statistics 2016)
https://www.nextbigfuture.com/2011/03/deaths-per-twh-by-energy-source.html

शुक्रवार, २९ मार्च, २०१९

यूंही तेरी खामोशी से

यूंही तेरी खामोशी से मेरी उम्मीद का पहाड पिघल जाता है
उफक पे सूरज जरा ठहरता है, और मायुस निकल जाता है

कुछ तिनके, थोडीसी रुई, बरामदे मे रोज गिराती है चिडीया
मेरे मकान की किश्त़ों में ही, बन उसका भी महल जाता है

यूं तो आसमान का हर तारा भी होता एक बडा पत्थर ही है
बस किसीसे बेइंतेहा मुहब्बत कर बैठता है, तो जल जाता है

मैं जज्बातों का उमडता लावा कब तक थाम पाऊंगा
अब छोटे छोटे सदमों से भी, अक्सर धीरज ढल जाता है

बिस्तर पे बगल में पड़ी रहती है, नींद मेरे जानिब नहीं आती
रातभर प्यासा तकीया पलकोंसे गिरी शबनम निगल जाता है  

और कितने बरस यूँही सहमा सहमा सा चुप सा रहूंगा मैं
एक नवजात बच्चा भी साल दो साल ही में संभल जाता है

दिल भी कितना नासमझ है, ये उस शख्स से मुहब्बत करता है
जो फल तो तोडना चाहता है,  मगर फ़ूलोंको कुचल जाता है

शुक्रवार, ८ मार्च, २०१९

तुम

आगे या पीछे नहीं, मेरे बाजू, मेरे साथ रहना तुम
ना दासी कहो ना देवी, मुझे अपना साथी कहना तुम

तुम्हारे प्यार की खातीर खुद को मिटा दुँगी लेकीन
मै अपना वजूद ही खो दूँ, ये ना कभी चाहना तुम

मुझे कईं दफा थामना, मेरी मदद भी करना मगर
खुद को मेरा मसीहा समझने के गुरूर में न बहना तुम

मेरी जिंदगी के हर अध्याय में तुम शरीक रहोगे मगर
कुछ पन्ने अकेले मेरे हैं, इस बात को भी सराहना तुम

बस एक खुबसुरत जिस्म नहीं, पुरी शख्सियत हुँ मै
जो मुझे इक चीज समझे, उन दस्तुरों को ढहना तुम

मै तुम बिन अधुरी हुँ, तुम भी मेरे बगैर मुकम्मल नहीं
मै तुम्हारी नायाब उपलब्धि, मेरा सबसे अजीज गहना तुम

माँ बहन बेटी पत्नी यही सबसे बडे किरदार नहीं मेरे
रिश्तों से परे मेरी अपनी पहचान है, ये तथ्य सहना तुम

औरत हुँ, अबला नहीं, बिलकुल तुम्हारी समकक्ष हुँ मै
तुम्हारी हमसफर हमदर्द हुँ, और मेरे हमदर्जा रहना तुम

बुधवार, ६ मार्च, २०१९

इजहार

होठोंतक आकर हर बार वापिस लौट जातीं हैं
इश्क की बातें भी समंदर की लहरों जैसी होतीं हैं

छलक तो जातें है जज्बात कईं दफा मगर
साफ साफ कोई बात जुबाँ पे नही आती है

यूं तो किया है हमने जिक्र प्यार का बहुत लेकीन
कुछ इस अंदाज से कि वो समझ नहीं पाती है

ऐसे तो दुनियाभर की बातें बुलवा लो हमसे
बस इसी काम में हिंमत जवाब दे जाती है

ये मर्ज सिर्फ अकेले मेरा ही नहीं शायद
वो भी तो कुछ कहने में कितना कतराती है

कह तो दे हम लेकीन कहीं वो इनकार न कर दें
इस खयाल से हमारी जान से जान चली जाती है

ये खुबसुरत जज्बात इक पल में जुर्म बन जायेंगे
यही सोच कर जुबाँ इजहार ए इश्क से घबराती है

रविवार, ३ मार्च, २०१९

इक मोर

कल उसने चांद जड लिया अपने काले दुपट्टेमें
मै आँखोमें धुआँ लेकर आसमान ताकता रहा

सुबह उसने मेहंदी लगी हथेली रख दी चेहरे के आगे
और मुझे उसकी लकीरोसे उगता सुरज दिखाई दिया

हर बात याद नही आती, पर हर बार याद आती है
मै टूटकर बिखरता हूं, उसकी अंजलि भर जाती है

इक मोर विरान टहनी पे बैठा अकेले क्या सोचता होगा
रंग जामुनी हो गये, फुलों के बदन को क्या चुभता होगा

अनोळखी

तो मनोमन बोलत राहतो तिच्याबद्दल, तिच्याशीच.!

त्याच्या मनात मांडलेली असते एक पुष्पशाला,
बागडणारी फुलपाखरे, हसणारी फुले,
कित्येक विविधरंगी पतंग उडत असतात त्याच्या आकाशात !!

एक अथांग गहीरा तलाव असतो त्याच्या नजरेत,
पापण्यांना टेकून बसलेला!

एका मंत्रित वाटेवर तो बेभानपणे पळत असतो,
तिच्या पाउलखुणांचा मागोवा घेत.!

तिचे शेकडो आभास दाटून येतात,
अन् मोरपिसांच्या सरी कोसळत राहतात त्याच्या ओंजळीत.!

तिच्या ओढणीचे रेशीम फडफडत असते,
होडीच्या शीडावर,
अन होडी एका अवखळ गर्तेत फिरत असते गोल गोल....

रात्रभर मनाचा तळ ढवळूनही
भानावर न आलेले स्वप्नांचे फेसाळ गहिवर,
पहुडलेले असतात किनाऱ्यावर निपचित..!!

तृणपात्यांवर झोका घेत असतात,
तिने शिंपडलेल्या सड्याचे दवबिंदू.!

चंद्र, आकाश, सूर्य, आरसा,
तिचा चेहरा उमटत असतो सगळीकडे आळीपाळीने..

तिचे हात तो आपल्या हातांत घट्ट धरून ठेवतो,
अन सुगरणीचे घरटे गुंफले जाते.!
तिचे केस ओघळतात चेहऱ्यावर त्याच्या,
अन ढग काळ्या रंगात माखून जातात..
ती डोळ्यांवर हात ठेवते त्याच्या,
अन् तत्क्षणी त्याची रात्र होते.

तिच्या नुसत्या विचाराने नादमधुर पडघम वाजू लागतात कानांत,
अन निनादत राहतात शहारलेले तरंग पाण्यावर.

तो तिला एक आर्त साद घालतो तेव्हा,
क्षितिजावर ओली कंपने आदळतात,
आणि तिचे नाव कोरड्या प्रतिध्वनींत गुंजत राहते कितीतरी वेळ.

अष्टौप्रहर ती त्याच्यात सामावलेली असते
त्याचे रोमरोम तिच्या आभासांचे कोंदण होते.

तो पुन्हा पुन्हा बोलत बसतो तिच्याशी,
पण तिला कधीही ऐकू येत नाही...

.....ती त्याच्या क्षितिजाबाहेर कोण्या अनोळखी विश्वात राहते..!!

शनिवार, २ मार्च, २०१९

लफ्ज

कागज पे कहाँ सजते थे अशआर कई रोज
अल्फाजों का भी तो मानी से चल रहा था जुआ

महफिल में मेरी कहाँ बची थी रौनक कोई,
हद ए निगाह तक बस फैला था गहरा धुआँ

न उम्मीद थी मन में, न था दिल को कोई गुमान
पर यहाँ माँगी और वहाँ मेरी कुबूल हुई दुआ

ख्वाहीश तो थी कि वे बस कोई इक नज्म सुने
और हमको तो जैसे रेगीस्तान में मिल गया कुआँ

हाँ, कल ही तो यारों साथ मेरे ये हसीं वाकेया हुआ
खुद उनके नाजुक लबोंने मेरे लफ्जों को छुआ

गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१९

बेमौसम

मै कहीं दूर किसी पहाड की चोटी पे,
अपने गम समेटकर रखते हुए,
इक सर्द हवा के काँपते बदन को छुकर,
जिस्मकी रूहानी कगार तक सिहर जाता हूंँ।

सीनेमें अपनोंसे मिले रंज के सुराख छुपाता,
रुख्सार पे मुस्कान की बिजलियाँ सजाता,
दिल के कुछ नाकाम रहे ख्वाब ढुंढता,
उम्र की वाकीफ ढलान तक उतर जाता हूं।

मै इक मुद्दत से गहराया हुआ, घना सा,
तकदीर की उंची खडी चट्टानसे कुदकर,
इक अनचाही बेमौसम बरसात बनके,
उसके इकरार की दहलीज तक बिखर जाता हूं।
उसके इनकार की दहलीज पर ठहर जाता हूं।।

मराठी

घाटामधल्या गर्द धुक्यात,
पठारावरल्या दग्ध उन्हात,
काळ्या सह्याद्रिच्या अथांग मिठीत,
गोदा भीमेच्या वत्सल कुशीत,
हिरव्याकंच घनगहिऱ्या वनांत,
शेतांमधल्या नांगरखुणांत,
धुव्वाधार पावसातल्या चिंब आंघोळीत,
तटबंदीवरल्या तोफगोळ्यांच्या रांगोळीत,
गावमंदिरातल्या भजनाच्या जागरात,
गर्दी, कोलाहलाच्या गडगंज शहरांत,
लावणी, पोवाड्यांतल्या सुरांत
ओव्या, अंगाई गात्या घरांत,
पुरणपोळीच्या गोड घासात,
वारीतल्या भक्तीपूर्ण नाचात,
लेण्यांतील कोरीव मूर्त्यांत
अभिजात वारली आकृत्यांत
काळ्या माय मातीत
चांदणसजल्या रातीत
पाखरांच्या गाण्यात, वाघाच्या डरकाळीत
किनाऱ्यावरच्या उंच नारळाच्या ओळींत
दर्याच्या उधाणल्या लाटांत
ओवळणीच्या मंगल ताटांत
जीर्ण प्राचीन शिलालेखांत
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आलेखांत
महाराष्ट्राच्या स्वरास्वरात
दशदिशांत, अन चराचरात
शोभते फक्त भाग्यवंताच्या ओठी
माझी मराठी माझी मराठी

गुरुवार, ३ जानेवारी, २०१९

भारतीय निवडणूक व राज्यपद्धतीतील अनेक दोष निवारण करण्याचा एक पर्याय

घराणेशाही, हुकूमशाही, बेबंद बहुमत, एका नेत्याच्या किंवा निवडक पाच सहा जणांच्या हेक्यानुसार देशाची/राज्याची धोरणे राबवली जाणे, भ्रष्टाचार, पैशाने प्रभावित होणारी निवडणूक समीकरणे, अयोग्य उमेदवारांची निवड, धर्म,जात,प्रांत,भाषा वगैरे अस्मितावादी मुद्द्यांचे प्रभावीकरण, जनतेप्रती अनास्था आणि उत्तरदायित्वापासून फारकत, जनतेला फसवून अथवा अनावश्यक बाबींवरून भडकावून सत्ता मिळवणे, गुंडगिरी आणि झुंडशाहीचे सबलीकरण, संघटीत राजकीय गुन्हेगारी, विशिष्ट घटकांचे तुष्टीकरण किंवा विशिष्ट घटकांचे दमन, सरकारी निष्क्रियता, अविचारी  पद्धतीची निर्णयप्रक्रिया असे अनेक दुष्परीणाम आपल्या लोकशाही व्यवस्थेत बघायला मिळतात. 

खरेतर कोणतीही संसदीय लोकशाही ही एकच नेता किंवा एका विशिष्ट विचारसरणीचा गट वा पक्ष यांच्या प्रभावातून मुक्त असायला हवी. अमेरिकेसारख्या अध्यक्षीय लोकशाहीत लोक आपला राष्ट्राध्यक्ष थेट निवडतात, तिथे एक व्यक्ती किंवा एक गट यांचा प्रभाव राष्ट्रीय धोरणांवर पडणे अपेक्षित आहे, पण आपल्यासारख्या संसदीय लोकशाहीत असे घडायला नको. मात्र थेट नेहरूंपासून मोदींपर्यंत जवळजवळ सर्वच सरकारांत प्रामुख्याने कोणत्याही एकाच नेत्याचा प्रभाव सर्व राष्ट्रीय धोरणांवर पडलेला दिसून येतो. असे प्रभावशाली वैयक्तिक नेतृत्व मग ते कितीही चांगले असो की वाईट, लोकशाहीच्या दृष्टीने धोकादायक आहे. एका व्यक्तीच्या किंवा केवळ एका विचारधारेच्या हाती देशाची दोरी असणे हे कधीही योग्य नाही.

वर उल्लेखलेले दोष आपल्या लोकशाहीत येण्याची अनेक करणे आहेत. मात्र माझ्या दृष्टीने आपली पक्षीय निवडणुकीची पद्धत हे सर्वात मोठे कारण आहे. आपल्या देशात ७ राष्ट्रीय तर ५१ प्रांतिक पक्ष आहेत. याव्यतिरिक्त जवळजवळ ५० पक्ष हे मर्यादितपणे प्रभावी असलेले मात्र अधिकारीक मान्यता प्राप्त नसलेले आहेत. म्हणजे देशात जवळजवळ ११० पक्ष आहेत. दिवसागणिक पक्ष विभाजन होणे, फुटणे, किंवा नवे पक्ष बनण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. केवळ सन २००० पासून आजपर्यंत १७ मान्यताप्राप्त तर ३५ अधिकारीक मान्यता प्राप्त नसलेले नवे पक्ष जन्मास आले आहेत. म्हणजे प्रत्येक वर्षाला जवळजवळ तीन नवे पक्ष जन्मास येत आहेत. असेच चालत राहिले तर तो दिवस दूर नाही जेव्हा पक्षांची संख्या लोकसभेतील खासदारांच्या संख्येपेक्षा अधिक होईल. प्रत्येक वेगळ्या विचारधारेचा एक पक्ष, आणि त्यामुळे निवडणुकांतून वारंवार उत्पन्न होणारी त्रिशंकू स्थिती हे पुढील काही वर्षात आपल्या लोकशाहीचे एक अनिवार्य रूप होणार आहे. असे अनेक पक्ष बनले तर केवळ आपसातील हेव्यादाव्यांमुळे संसदेत कोणत्याही विषयावर एकमत होणे कठीण होईल. हे असे होणे लोकशाहीसाठी चांगले नाही.

संघटित गुन्हेगारी ही वैयक्तिक गुन्हेगारीपेक्षा अधिक प्रभावी असते. पक्ष हे एक खूप मोठे संघटन असल्याने या पक्षीय संघटनेतून झुंडशाही, गुंडगिरी, कायदे मोडले तरी सुटण्यासाठी सेटिंग या प्रकारांना बळ मिळते. यामुळे संसदेचे अथवा विधानसभेचे उमेदवार नसलेल्या लोकांत सुद्धा गावपुढारी, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री, अशा अनेक नकली मात्र तरीही प्रभावी सत्ताकेंद्रांचा उगम होतो. अनेक सरकारी कॉन्ट्रॅक्ट, सरकारी योजना अशा गोष्टींत हे सहसा एखाद्या मोठ्या नेत्याची चापलूसी करून पदे मिळवलेले लोक त्या पाठबळावर खूप ढवळाढवळ करतात. यातून प्रचंड भ्रष्टाचार होतो. प्रत्येक पेमेंट प्रक्रीयेत कट मागितले जातात, कामे अडविली जातात. अनेक गुंडांना पक्षाच्या नावाखाली राजाश्रय मिळतो. पक्षाच्या नावाने जेवढ्या देणग्या मिळतात तेवढ्या वैयक्तिक उमेदवारांना मिळत नाही. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही पक्षांना देणग्या देऊन, भांडवलदार सर्व सरकारी धोरणांवर प्रभाव टाकून अनैतिक मार्गांनी नफा कमावतात.
ही संपूर्ण व्यवस्था आता एक संस्कृती बनलेली आहे. त्यामुळे कोणताही पक्ष सत्तेत आला तरी या व्यवस्थेतली फक्त पात्रे बदलतात. व्यवस्था मोडत नाही, ती तशीच राहते.

म्हणून सुदृढ लोकशाहीसाठी पक्ष ही पद्धतच मोडीत काढणे गरजेचे आहे. कारण वर सांगितलेल्या सर्व विकृती या पक्षीय रचनेतून आलेल्या आहेत. असे नाही की वैयक्तिक पातळीवर हे प्रकार घडत नाहीत, मात्र ते अपवादात्मक असतात. पक्षीय पाठबळाने हेच प्रकार सार्वत्रिक होतात. दुर्दैवाने भारतीय मतदार म्हणावा तितका जागरूक नसल्याने, तो उमेदवाराला नव्हे तर पक्षाला मतदान करतो. यामुळे अनेकदा लायकी नसलेले लोक निवडून जातात. एवढेच नाही तर एखाद्याला केवळ एखाद्या मोठ्या पक्षाचे पाठबळ नाही म्हणून किंवा त्याच्या पक्षातील लांबच्या राज्यातील कुणी मोठा नेता भ्रष्टाचारी निघाला म्हणून लोक आपल्या मतदारसंघातील त्या पक्षाच्या सुयोग्य असलेल्या उमेदवारालाही मत देत नाहीत. आणि दुसऱ्या बाजूने केवळ पक्षास मत द्यायचे म्हणून एखाद्या पक्षाच्या अयोग्य उमेदवारासही निवडून देतात. म्हणून पक्षीय पद्धत बंद करून वैयक्तिक किंवा अपक्ष निवडणूक पद्धत लागू करण्याची गरज आहे. पक्षपद्धती मोडीत निघाल्याने अनेक फायदे होतील. मुख्य म्हणजे पक्षाच्या नावाखाली अयोग्य उमेदवार निवडले जाणार नाहीत. केंद्र अथवा राज्यसरकारच्या कामांकडे, अथवा आपल्या पक्षाच्या एखाद्या प्रसिद्ध नेत्याकडे बोट दाखवून मते मागता येणार नसल्याने प्रत्येक उमेदवाराला आपल्या लोकसभा अथवा विधानसभा क्षेत्रात लोकोपयोगी कार्ये करावीच लागतील. अनेकदा पक्ष पद्धतीत फक्त मोठ्या नेत्यांच्या विभागातच कामे होतात, त्यांच्या मतदारसंघातच सरकारी योजनांचा पैसा जास्त वळतो. अपक्ष पद्धतीत हे टाळले जाऊन सर्व मतदारसंघांना समान महत्व मिळेल. अनेकदा केवळ पक्षीय व्हीप आहे म्हणून उमेदवारांना संसद अथवा विधानसभेतील अनेक प्रस्तावांवर हवे ते मत देण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही, अपक्ष पद्धतीत उमेदवार स्वविवेक वापरून प्रस्तावांवर मतदान करू शकतील. धार्मिक, भाषिक अथवा प्रांतिक मुद्द्यांवर निवडणुका लढल्या जाणार नाही. कुठेतरी लांबच्या राज्यात एक मंदिर बांधण्यासाठी देशातील सर्व मतदारसंघांतून मत मागता येणार नाही. मतदारसंघातील मुद्द्यांवरच मते मागावी लागतील. त्यामुळे मतदारसंघातील विकासाला जास्त महत्व मिळेल. प्रत्येक उमेदवार हा एकटा वैयक्तिक असल्याने, भ्रष्टाचारातून वाचण्यासाठी अथवा प्रकरणे दडपण्यासाठी आता जे संघटीत पाठबळ मिळते ते नष्ट झाल्याने भ्रष्टाचाराला खूप मोठा आळा बसेल. भ्रष्टाचार उघडकीस आल्यास प्रकरण दाबण्याची यंत्रणा कोणीही एकटा नेता उभारू शकत नसल्याने भ्रष्टाचार खूप अंशी कमी होईल. निवडणुकीच्या काळात साध्य होऊ शकणार नसलेली मोठमोठी फसवी आश्वासने देता येणार नाहीत. चलती असलेल्या एका पक्षाला देणगी देऊन अनेक मोठे उद्योगपती राष्ट्रीय धोरणे आपल्याला साजेशी करवून घेतात. पक्षच नसल्याने उद्योगपतींना वैयक्तिक प्रत्येक उमेदवारास अशा प्रकारे मॅनेज करून धोरणदिशा प्रभावित करता येणार नाही. पक्षीय पद्धतीत एक किंवा दोन पक्ष मॅनेज करणे सोपे असते, मात्र अपक्ष असलेल्या एवढ्या प्रचंड संख्येतील उमेदवारांना मॅनेज करणे अवघड असल्याने उद्योगपती पैशाच्या बळावर धोरणांवर प्रभाव टाकू शकणार नाहीत.

अर्थातच जसे अपक्षीय पद्धतीचे फायदे आहेत तसे काही तोटेदेखील आहेत. सर्वात पहिले म्हणजे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कार्यक्षेत्र हे मतदारसंघापुरते मर्यादित राहणार असल्याने राष्ट्रीय अथवा राज्य पातळीवरील धोरणे प्रभावीपणे ठरवता येणार नाहीत. पक्षांची एक विशिष्ट वैचारिक बैठक असल्याने, अभ्यासातून त्या विचारांशी सुसंगत अशी धोरणे ठरविण्यासाठी एक डेडीकेटेड टीम असते. म्हणजे धोरणे ठरविणारी टीम ही धोरणे राबविणाऱ्या टीमधुन वेगळी असू शकते, अपक्ष पद्धतीत ते होणार नाही. राज्य किंवा देशपातळीवर गरीब आणि मायनॉरिटीसाठी लोककल्याणकारी योजना राबविण्यात येणार नाहीत. संरक्षण किंवा इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात देशव्यापी पातळीवर विशिष्ट धोरणे ठरवली जाणार नाहीत, किंवा लोकप्रिय नसणारे परंतु गरजेचे असलेले निर्णय घेतले जाणार नाहीत. आपात्कालीन नियोजनाचे अथवा दीर्घकालीन स्ट्रॅटेजिक निर्णय घेतले जाणार नाहीत. देशात मागास राज्यांना किंवा राज्यात मागास प्रांतांना विशेष अनुनय मिळणार नाही. मंत्रिमंडळ बनविण्यात अडचणी येतील. मंत्रीपदे किंवा पंतप्रधानपद यांच्या शक्तीस मर्यादा येतील. ब्युरोक्रॅसीस म्हणजे नोकरशाहीस अधिक शक्ती आणि महत्व मिळेल.

मात्र हे तोटे असे नाहीत की ज्यांवर उपाय नाही. त्यासाठी काही अल्प संरचनात्मक तरतुदी कराव्या लागतील. जसे की निवडून आलेल्या सर्व अपक्षांमधूनच पंतप्रधान बनविण्यासाठी किंवा मंत्रिमंडळात समावेशासाठी काही निकष ठरवावे लागतील. त्या निकषांची पूर्ती करणाऱ्या उमेदवारांनाच त्या पदासाठी उमेदवार होता येईल. मग राष्ट्रपतींच्या निवडीच्या पद्धतीनेच पंतप्रधान आणि सर्व मंत्री निवडण्यात येतील. मंत्री किंवा पंतप्रधान यांचे अधिकार मर्यादित करावे लागतील. प्रत्येक मंत्र्याला मदतीसाठी संसदेतील प्रतिनिधींचीच एक समिती नेमावी लागेल. या समितीने धोरणे आखून मंत्र्याने ती संमतीसाठी संसदेत मांडावी. प्रत्येक मंत्रिमंडळासाठी एक सल्लागार मंडळ निर्माण करावे लागेल. ज्यात त्या क्षेत्रांतील एक्स्पर्ट अथवा नामांकीत व्यक्तींचा समावेश करावा लागेल. धोरणांविषयी अभ्यास आणि सल्ला देण्याचे काम हे मंडळ करेल. जेणेकरून देश पातळीवरील निर्णय आणि धोरणे राबवता येतील. सल्लागार मंडळ आपले मत मंत्रिमंडळ समितीपुढे मांडून त्यांच्या सहकार्याने व संमतीने धोरणांचे प्रस्ताव तयार करतील. कोणताही मंत्री कोणताही निर्णय स्वतः घेऊ शकणार नाही. प्रत्येक प्रस्ताव हा संसदेत मांडावा लागेल आणि संसदेलाच निर्णय घेण्याची शक्ती असेल. अशा प्रत्येक प्रस्तावावर प्रत्येक खासदाराला मत द्यावेच लागेल, आणि कुणी काय मत दिले हे जाहीर करावे लागेल. कुणी कोणत्या प्रस्तावावर काय मत दिले त्यावरून प्रत्येक मतदारसंघातील मतदात्यांना आपला खासदार नेमके काय करतो ते कळेल. त्यामुळे खासदारांवरही प्रत्येक प्रस्तावावर योग्य मत देण्याचा दबाव राहिल. खासदार संसदेत उपस्थित नसेल तर तो देशात जिथे कुठे असेल तिथून त्याला ऑनलाईन मत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक प्रस्तावाच्या बाजूने अथवा विरोधात मत देणे हे प्रत्येक खासदाराला अनिवार्यच असेल. संसदेच्या प्रत्येक अधिवेशनात राष्ट्रीय पातळीवरील निर्णयांचे अमुक इतके किमान प्रस्ताव मान्य झालेच पाहीजेत असा नियम बनवावा लागेल. आपात्कालीन परिस्थितीत यामध्ये काही सवलतींची तरतूद करता येईल मात्र आपात्कालीन परिस्थितीत घेतलेले निर्णय हे काही मर्यादीत काळाच्या आत संसदेत मंजूर झाले नाहीत तर अवैध ठरतील. हा खूप मोठा विषय असल्याने सर्व तरतुदी इथे देता येणार नाहीत, मात्र संरचनात्मक बदल करून ही पद्धत राबविणे शक्य आहे एवढेच मला सांगायचे आहे. सध्याच्या पद्धतीत फक्त निवडणूक पद्धतीत बदल करून आणि अल्पशी संरचनात्मक तरतूद करून हे साध्य होऊ शकते.

या अपक्षीय संसद पद्धतीत कधीही कोणतेही सरकार पडणार नाही. मध्यावधी निवडणूका होणार नाहीत. कोणत्याही मंत्र्याला निष्कासित करण्यासाठी महाभियोगासारखी किचकट पद्धत न वापरता संसदेचे साधे बहुमत पुरेसे ठेवले तर मंत्र्यांवरही संसदेचा वचक राहील. प्रत्येक निर्णयावर कोणी काय भूमिका घेतली हे पारदर्शक राहणार असल्याने खासदार फुटणे, खरेदी करणे, घोडाबाजार लावणे वगैरे प्रकारच उरणार नाहीत.
 
मान्य आहे की पक्षीय पद्धत ही अगदीच मुळापासून तडकाफडकी रद्द करता येणे अवघड आहे. मात्र तरीही किमान कोणत्याही पक्षास एक विशिष्ट चिन्ह नसावे, प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक उमेदवाराला वेगवेगळे आणि दरवेळी बदलणारे निवडणूक चिन्ह द्यावे. जेणेकरून लोकांना पक्षाचे चिन्ह पाहून नव्हे तर आपल्या मतदारसंघातील उमेदवाराला पाहून मत द्यावे लागेल. एव्हढेच नाही तर संसदेत प्रत्येक खासदाराला मत देणे हे अनिवार्य करावे आणि कोणी काय मत दिले याबाबत पूर्णपणे पारदर्शकता बाळगून पूर्ण देशाला त्याची माहिती देण्यात यावी.  एवढे उपाय जरी केले तरी लोकशाहीसाठी बराच फायदा होईल.  

आताची पक्षीय पद्धत आणि वर सांगितलेली अपक्षीय पद्धत या दोन्हींचेही आपापले फायदे आणि तोटे आहेत. मात्र समस्त जमाखर्चाचा ताळमेळ लावता अपक्षीय पद्धत ही बरीच उजवी ठरते. म्हणून ही पद्धत लागू झाली तर आपली लोकशाही अधिक सुदृढ आणि पारदर्शक व गतिमान होईल असे मला तरी वाटते.